Tuesday, October 25, 2016

बालसायबर गुन्ह्यांबाबत जागृतता महत्त्वाची


देशात इंटरनेट वापरणार्‍या 40 कोटी लोकांमध्ये मुलांची संख्या जवळपास दोन कोटी 80 हजार आहे.ही आकडेवारी इंटरनेटऐंड मोबाईल असोशिएशन ऑफ इंडियाच्या एका सर्व्हेक्षणावर आधारित आहे. तर एसोचॅमचा सर्वे सांगतो की, पहिल्या आणि दुसर्‍या श्रेणीतल्या शहरांमधील सात ते तेरा वयोगटातील 76 टक्के मुले रोज यू-ट्यूब पाहतात.13 वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं सोशल मिडियाचा वापर करतात.बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या अभ्यासानुसार 2017 मध्ये भारतातली जवळपास 10 कोटी मुलं ऑनलाइन असतील. तुम्ही ही बातमी चांगलीच आहे, असे म्हणाल.पण यात मुलांच्या विरोधात घडणार्‍या सायबर गुन्ह्यांची संख्या वाढण्याचा धोकाही लपला आहे. 
2004 मध्ये दिल्लीतल्या एका नामांकित विद्यालयातलं एमएमएस कांड उजेडात आलं होतं, तेव्हा बालसायबर गुन्ह्याची खुली चर्चा रंगली होती. पण आज 12 वर्षे उलटून गेली तरी नॅशनल क्राइम रिकॉर्ड ब्यूरो मुलांविरोधात घडणार्‍या सायबर गुन्ह्यांना स्वतंत्र अशा वेगळ्या मापदंडात तोलताना दिसत नाही. यामुळे मुलांच्याविरोधात किंवा त्यांच्याबाबतीत घडणार्‍या सायबर गुन्ह्यांचा खरा आकडा समजून येत नाही. पोलिस अधिकार्‍यांना सायबर गुन्ह्यांबाबत फारशी माहिती अथवा ज्ञान  नसल्याकारणाने नेहमीच पिडित मुलांना केस दाखल न करताच परत पाठवले जाते. असल्या प्रकरणात गुन्हेगारांना शिक्षा मिळण्याचे प्रमाणदेखील कमी आहे. देशात ऑनलाइन चाइल्ड सेक्सुअल अब्युजमटीरिअलला तात्काळ रिपोर्ट करण्याची अथवा हटवण्यासाठी हॉटलाइनदेखील नाही. खूपच कमी लोकांना याबाबतचा रिपोर्ट करण्याचे ज्ञान आहे. अशी सामुग्री असलेल्या वेबसाइटची संख्या गेल्या बारा वर्षात 147 टक्क्यांनी वाढली आहे.
युनिसेफचा अलिकडेच प्रसिद्ध झालेला बाल ऑनलाइन सुरक्षा आणि भारत हा रिपोर्ट आपल्याला या धोक्यापासून सावध करतो आहे. तंत्रज्ञानाच्या बदलत्या स्वरुपामुळे मुलांच्याविरोधात घडणार्‍या सायबर गुन्ह्यांच्या पद्धतींमध्येही बदल होत आहेत.यात प्रामुख्याने सायबर बुलिंग,ऑनलाइन यौवन व्यभिचार, ऑनलाइन यौवनशोषण आदी गुन्ह्यांचा समावेश आहे.देशात अशा पिडित मुलांसाठी ज्या काही थोड्या बहुत सोयी-सुविधा आहेत, त्या महानगरांपुरत्याच मर्यादित आहेत.मेमध्ये दिल्लीत झालेल्या सार्क देशांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बाल यौवन व्यभिचार,हिंसा(ऑनलाइनसह) संपवण्याची विषय निघाला होता.पण त्यानंतर पुढे काय झाले कळायला मार्ग नाही. स्मार्टफोनद्वारा इंटरनेटचा वापर करणार्‍या मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.अर्थात डिजिटल जमाना असल्याकारणाने मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी हे तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, यात तीळमात्र शंका नाही. शिवाय मुलांना इंटरनेटपासून दूर ठेवण्यात किंवा त्यांच्या हातून स्मार्टफोन काढून घेण्यात कुठला शहाणपणा नाही. मात्र या मुद्द्याची चर्चा समाजस्तरावर घडण्याची आवश्यकता आहे आणि यातून मुलांना,पालकांना आणि शैक्षणिक संस्थांना जागृत करण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment