Wednesday, September 28, 2016

विद्यार्थ्यांना मजदूर बनवायचे आहे का?

      शालेय स्तरावर गणित आणि इंग्रजी या विषयांना नवा पर्याय देण्याचे सूतोवाच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे.तावडे यांनी शाळांचा विचार केला आहे,मुलांचा नाही, असेच यावरून दिसून येते.आज ज्या विषयांची गरज आहे, त्याच विषयांना तिलांजली देण्यास शिक्षणमंत्री तयार झाले आहेत. तसा निर्णय झाल्यास तो दूरगामी परिणाम करणारा ठरेल. यातून निकालाची टक्केवारी वाढू शकेल. मात्र विद्यार्थ्यांची संख्या महत्त्वाच्या विषयापासून दूर राहून अधिकार्याऐवजी राज्यात मजदूर तयार होतील. दहावी असो की बारावी, सर्वाधिक विद्यार्थी गणित अथवा इंग्रजी विषयात अनुत्तीर्ण होतात,ही वस्तुस्थिती आहे. मात्र या विषयांची गरजही लक्षात घेतली पाहिजे.
      शिक्षणमंत्र्यांनी शैक्षणिक वस्तुस्थिती जाणून विद्यार्थ्यांना इंग्रजीगणित विषयाला पर्याय देण्याचे संकेत दिले असावेइयत्ता दहावीत इंग्रजीगणित विषयात 10 ते 20 टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण होतातया 20 टक्के अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विषय पर्याय निवडीचा 80टक्के विद्यार्थ्यांचा नुकसान होईलपुढील येणारी पिढी अधिकारी न होता मजूर निर्माण होतीलगणित व इंग्रजी विषयाला पर्याय शोधण्यापेक्षा या पद्धतीवर प्रभुत्व कसे मिळवता येईल हा खरा प्रश्न आहे.विद्यार्थ्यांना शाळेत खरेच शिक्षण घेण्यासाठी टाकले काअसा प्रश्न निर्माण होतोसामाजिकशैक्षणिक गुणवत्ता टिकविण्यासाठी प्राथमिक शिक्षणापासून दर्जेदार शिक्षण देण्याची गरज आहेगणित आणि इंग्रजी विषयाला पर्याय हा विचार करणे देखील चुकीचे आहेयामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता टाळता येत नाहीपुढील करिअरसाठी इंग्रजी व गणित हे विषय महत्त्वाचे आहेतहे विषय नसतील तर करिअर करणे अवघड आहेआपल्या पाल्यांसाठी कोणते विषय निवडायचे हेदेखील पालकांना अवघड जाईल,त्यामुळे हा निर्णय घेणे व विचार करणेदेखील अवघड आहे.
     गणित आणि इंग्रजी तर सोडाचपण हल्ली मराठीतही अनेक विद्यार्थी नापास होत आहेतमग आपण मराठीही काढून टाकणार का ? अशाच प्रकारे आपण संस्कृतही घालवून टाकली आहेजर काही बदलायचे असेल तर शिक्षण देण्याची पद्धती आणि पाठ्यपुस्तके बदलायला हवीतविद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या गणिताच्या भीतीला शासनाने खतपाणी घालत त्यांच्या आयुष्यातून गणित हद्दपार करण्यापेक्षा त्याची भीती कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
     या विषयांना पर्याय देण्यापेक्षा मुलांना त्यांचा कल पाहून शिक्षण द्यायला हवेव त्यावर अधिक भर द्यायला हवामुलांचा कल निश्चित करणे आणि त्यानुसार किमान पाचवीपासून व्यवसाय कौशल्याचे धडे देण्यास हरकत नाहीआता त्यासाठीआयटीआय’ ही स्वतंत्र व्यवस्था आहेती व्यवस्था शाळांशी संलग्न करता येईल का याचा विचार व्हावासुतार कामगवंडी कामवेल्डिंगचे काम,संगणक-मोबाईल दुरुस्ती यासाठी तेथे प्रवेशास दहावी उत्तीर्णची अट नाहीअशावेळी शाळांमधूनच त्या कौशल्याबद्दल मार्गदर्शन उपलब्ध झाल्यास ही मुले किमान दहावीचा उंबरठा ओलांडून जाऊ शकतील.
     बदलत्या काळात जसे व्यवसाय कौशल्य महत्वाचे आहे तसेच भाषा कौशल्याला देखील पर्याय नाही.व्यावसायिक कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांना आज भारतापेक्षा भारताबाहेर संधी अधिक आहेतइंग्रजीचे किमान ज्ञान नसेल तर अशा विद्यार्थ्यांच्या संधी केवळ त्या प्रांतापुरत्याच राहतीलहेही लक्षात घेतले पाहिजेगणित-इंग्रजीत अनुत्तीर्ण होण्यास विद्यार्थी जबाबदारअसेच मानले जातेमग शिक्षकांचे कायसातत्याने एक-दोन विषयांमधील अनुत्तीर्णतेचा प्रश्न आहेतर अध्यापनाच्या रूढ पद्धतीचा फेरविचार केव्हा होणारकाठिण्य पातळीसंदर्भात एकवेळ लवचिकता चालू शकेलपण मुख्य विषयांना दूर ठेवणे विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणारे होईल असे वाटत नाही.  
                              

Sunday, September 4, 2016

शिक्षण आयोग नेमण्याची गरज

     शिक्षकांच्या कार्यकर्तृत्वांचा गौरव करण्याचा हा दिवस. त्यांचा सन्मान राखला जावा यासाठी केंद्र आणि राज्य शिक्षण विभागाकडून वर्षभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. पण शिक्षक दिनादिवशी हे जे कार्यक्रम होत आहेत,हे सगळे सोपस्कार आहेत, अशी आता खात्री व्हायला लागली आहे. कारण शासन,संस्थाचालक,समाज आता शिक्षकाला पूर्वी दिलं जात होतं ते स्थान देत नाही. त्यातच ज्ञानदानाचे पवित्र कार्य म्हणून पाहण्याची दृष्टी ही लोप पावली पावत चालली आहे.शिक्षकाला पोटार्थी शिक्षक म्हणून पाहिले जात आहे. शिक्षणावरील खर्च कमी करण्यासाठी गेल्या काही वर्षात अनेक राज्यांमधे नवीन शिक्षकांची भरती थांबवण्यात आली. त्याऐवजी दहा महिन्यांच्या करारावर कंत्राटी शिक्षक नेमले गेले. ह्या शिक्षकांच्या शिक्षण, पगार यासंबंधी ‘मिळेल तो  तरुण’ एवढीच अट राहिली. गेल्या पाच वर्षांत भारतभरात पाच लाखांच्यावर असे शिक्षक नेमले गेले. त्यांना ‘शिक्षक’ न म्हणता गुरुजी, शिक्षामित्र, शिक्षाकर्मी, शिक्षण-सेवक अशी गोंडस नावं दिली गेली. आणि ‘शिक्षक’ म्हटल्यानं येणाऱ्या कायदेशीर जबाबदारीतून सरकार बाहेर पडलं. शिक्षकासाठी कराराची ही पद्धती कायमची बंद केली तर चांगले शिक्षक देशाचे भविष्य घडवण्यासाठी योगदान देऊ शकतील. आजही आपल्या विविध मागण्यांसाठी शिक्षकांना रस्त्यावर यावे लागते, मोर्चे काढावे लागतात, संप करून सरकार आणि विद्यार्थ्यांना वेठीस धरावे लागते, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
जगभरातील प्रगत देशांमध्ये शिक्षणासाठी सुरू असलेल्या यंत्रणेकडे डोळे उघडून पाहण्याची गरज आहे. युरोपीय देशात फिनलॅँडसारख्या देशाने शिक्षणात केलेली प्रगती लक्षात घेतली तर शिक्षक, विद्यार्थी आणि समाजविकासाचे उद्दिष्टय़े काय असायला हवे, हे लक्षात येईल. बारावीपर्यंतचे सर्वाना शिक्षण सक्तीचे व समान करणे आणि खासगी शाळा संस्था सरकारच्या ताब्यात घेणे, हा यावरील एकमेव उपाय आहे. एकीकडे पहिलीपासून ते पदवीपर्यंत एका वर्गात २० विद्यार्थ्यांचे स्टॅँडर्ड युरोपीय देशांनी मान्य केले असून जगभरात हा मापदंड वापरला जातो. आपल्याकडे मात्र शिक्षण हक्क कायद्याच्या आड दडून प्राथमिक,माध्यमिक शाळेतील वर्गात विद्यार्थी अक्षरशा:कोंबले जातात. इतक्या विद्यार्थ्यांना शिकवणारा शिक्षक हा केवळ रखवालदार बनतो, शिक्षक नाही. मेंढरांसारखे विद्यार्थ्यांना सांभाळणे इतकेच तो करू शकतो. त्यात बदल केले तर शिक्षकांवरील ताण कमी होऊन संस्कारमय शिक्षण मिळेल.   देशातील एकूणच शिक्षणव्यवस्थेची दुरवस्था सुधारण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण आयोग नेमण्याची गरज आहे. ज्या आयोगाला न्यायालयीन आणि निवडणूक आयोगाप्रमाणे स्वायत्तता असणे गरजेचे आहे. केवळ शिक्षण क्षेत्रातीलच व्यक्ती या आयोगाचे सदस्य असतील, याची खबरदारी त्या-त्या सरकारने घेतली पाहिजे. मात्र हे सदस्य गुणवत्तेवर आणि त्यांनी निर्माण केलेल्या योगदानावर असावेत.
जगभरातील शिक्षण व्यवस्था झपाटय़ाने बदलत चाललेली असताना आपल्याकडे मात्र गुणवत्तेच्या नावाखाली केवळ बाजारीकरण करण्यात येत आहे. यात ना शिक्षकांची ना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे संरक्षण, सुरक्षा राखणे दुरापास्त होऊन बसले आहे. देशाला महासत्ता बनवण्याचे स्वप्न  पाहत असतानाच दुसरीकडे केंद्र सरकारने शिक्षणाकडे सर्वाधिक लक्ष घालण्याची गरज होती; परंतु  सरकारने आहे त्या तरतुदींनाही कात्री लावून एकूणच शिक्षणव्यवस्था अडचणीत आणली आहे. एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या १० टक्के निधीच्या तरतुदींची गरज असताना  सरकारने मात्र केवळ २.९ टक्के तरतूद ठेवून आपली शिक्षणाप्रती उदासीन भूमिकाच स्पष्ट केली आहे.  सरकारने ही उदासीनता हटवल्याशिवाय त्यांच्याकडून  शिक्षकांचा आजच्या दिवशी होणारा गौरव हा बेगडी आहे, असेच  म्हणावे लागेल.

पोलिसांवरील हल्ले ही व्यवस्थेविरुद्धची चीड

        मुंबईतील वाहतूक पोलिस विलास शिंदे यांचा हल्ल्यात मृत्यु झाला.याची तीव्र प्रतिक्रिया राज्यभर उमटली.असे असले तरी पोलिसांवरील हल्ले थांबता थांबेनात.पोलिसांवर हल्ले करणारे सराइत गुन्हेगार नाहीत.सामान्य नागरिक आहेत. त्यामुळे ही माणसे इतकी  हिंस्त्र का वागत आहेत,याचा विचार व्हायला हवा.पोलिसांवर हल्ले होतात याची अनेक कारणे आहेत. यातले पहिले कारण म्हणजे त्यांचा वचक कमी झाला आहे, दरारा संपला आहे, अशी एक  समाजमनात  भावना निर्माण झाली  आहे आणि यातून आणखी एक लोकांच्या मनात  भयशंका निर्माण झाली आहे,ती म्हणजे जेथे पोलीसच असुरक्षित आहेत तेथे सर्वसामान्य नागरिक किती सुरक्षित असणार ? अलीकडे पोलीस हा आपल्या व्यवस्थेत नेहमीच टिंगलटवाळीचा विषय राहिलेला आहे. आगोदरही पोलीस टिंगलटवाळीचा विषय होता,पण त्यावेळेस त्याच्या हातातल्या दंडुक्याचा दरारा होता. आज हातात बंदूक असलेल्या पोलिसांचा आदर, वचकदेखील  वाटेनासा झाला आहे. राजकारणी तर या पोलीसांना आपल्या हातचे बाहुले असल्यासारखे वागवतात .आणि पोलीसदेखील तसे वागतात. अर्थात ते मजबूर असतात,कायद्याने आणि नैतीकतेने. मागे एकदा  ठाण्यामध्ये एका उद्दाम राजकीय कार्यकर्त्यांने एका महिला पोलिसास भररस्त्यात मारहाण केली. विलास शिंदे यांना अशाच एका हल्ल्यामध्ये आपले प्राण गमवावे लागले. शिंदे यांच्या हल्ल्यानंतर या घटना सुरूच आहेत. कायद्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे आणि त्याकरिता कोणत्याही नागरिकावर कारवाई करण्याची शक्ती ज्यांच्या हाती आहे अशा पोलिसांवर आपण हात टाकू शकतो असे कोणालाही वाटू लागले आहे,हे वाटणे आणि तशी प्रत्यक्षात कृती होवू लागणे,ही समाजाच्यादृष्टीने भयंकर घातक आणि भीतीदायक आहे. राजकारण्यांसमोर नांगी टाकणारे पोलीस सर्वसामान्यांसमोर वाघ होतात आणि त्यांना वाटेल तशी वागणूक देतात हा पोलिसांबाबत राग आहे.  एरवी सराईत गुन्हेगार नसलेली माणसेही किरकोळ कारणावरून  हल्ले करायला लागले आहेत. या प्रश्नचिन्हाला कारणीभूत आपली राजकीय व सामाजिक व्यवस्था आहे हे नीट लक्षात घेतले पाहिजे. पोलिसांवर हल्ले होण्याला आता दूसरे कारण आहे,ते म्हणजे भ्रष्ट पोलीस आणि त्यांची यंत्रणा. चिरीमिरीसाठी प्रत्येकापुढे हात पुढे करणारे पोलीस त्यांच्याविषयीचा आदर नाहीसा करत आहेत,हे  सर्वात मोठे कारण आहे. पोलीस दलात चिरीमिरी संस्कृती फोफावली  आहे. पोलीस दलातील भ्रष्ट प्रवृत्ती  राजकारण्यांच्या फायद्याच्याच असतात. तेव्हा त्यांचे व्यवस्थित साटेलोटे चाललेले आहे,असा समज सर्वसामान्यांचा झाला आहे,असे म्हणायला जागा आहे.आणि त्यातून सर्वच पोलिसांची प्रतिमा ढागाळत चालली आहे.पण पोलीस चिरिमिरी खातात, भ्रष्टाचार करतात, निरपराधांना छळतात म्हणून त्यांची ‘इज्जत’ राहिलेली नाही आणि म्हणून त्यांच्यावर हल्ले केले जातात  किंवा केवळ पोलिसांबद्दलच्या अनादरातून वा द्वेषातून हल्ल्यांचे प्रकार घडतात,असे नव्हे .ते पोलिसांना दिलेले आणि म्हणून राज्यव्यवस्थेला दिलेले आव्हान आहे. गल्लीतल्या टपोरी तरुणांमध्येच नव्हे, तर क्वचितप्रसंगी सर्वसामान्य गणल्या जाणाऱ्या माणसांमध्येही असे आव्हान देण्याचे धाडस यायला लागले आहे,याचा खरेच विचार व्हायला हवा आहे. माणसे व्यवस्थेप्रति हिंस्र बनत  तर नाहीत ना,हे तपासून पाहण्याची वेळ आता आली आहे.