Friday, July 31, 2020
हिरोशिमाच्या इतिहासातील काळा दिवस
Saturday, July 25, 2020
(रहस्यकथा) तिथे काही तरी आहे
रावसाहेब म्हणाला,"लवकर चल, नाहीतर पाऊस आला की आपलं काही खरं नाही. भिजून जायचो आपण. पुढं आसऱ्याला कुठं झाडही नाही की घरही!"
तो असे म्हणतोय तोच पावसाचे थेंब पडायला लागले. मोहन आता थांबून बाजूच्या मैदानात काहीतरी पाहत होता. काही अंतरावर धूर दिसत होता.
तो म्हणाला,"रावश्या, जरा तो धूर बघ.अशा या मोकळ्या मैदानावर कुणी आग लावली असेल बरं? आजूबाजूला दूरदूरपर्यंत एखादी वस्तीदेखील दिसत नाही."
रावश्याने धुराकडे पाहिलं. बारीकसा धूर आकाशाच्या दिशेने मंदपणे चालला होता. तो म्हणाला,"या आगीची आणि धुराची चिंता सोड आणि आपली काळजी कर. आणि असल्या रिकाम्या जागेत जळणाऱ्या आगीत तुला कसलं रहस्य दिसलं?" रावश्याने त्याचा हात धरून त्याला पुढं ओढण्याचा प्रयत्न केला,पण मोहनची नजर अजूनही त्याच धुरावर खिळली होती.
मोहन म्हणाला,"माझं मन म्हणतंय, या आगीत काहीतरी रहस्य नक्की दडलं आहे. बघ ना ,आजूबाजूला चिटपाखरूही नसताना ही आग लावली कुणी? आणि का लावली? "असे म्हणून तो त्यादिशेने चालू लागला. आता नाइलाजाने रावश्यालाही त्याच्याबरोबर जाणं भाग पडलं. तो बडबडत होता,"अरे,पाऊस पडेल आणि आग आपोआप विझेल.तुला का त्याची पंचेती. "
"अरे,असं नको व्हायला. आग विझण्याअगोदरच आपल्याला तपास केला पाहिजे." काही वेळातच दोघेही त्या आगीजवळ पोहचले. पाऊस वाढत होता. समोर कसलीशी पिशवी जळत होती. पावसामुळे आग विझत चालली होती आणि त्यातून धूर निघत होता.
मोहनने पायाने आग विझवली आणि ती पिशवी घेऊन पाहू लागला. कापडी असलेली पिशवी बऱ्यापैकी जळाली होती. त्याने ती उलटी करणार तोच करणार तोच त्यातून अर्धवट जळालेले कागद खाली पडले. त्याबरोबर आणखीही काही तरी पडल्याचा आवाज झाला. त्यातली अंगठी खाली पडली होती. रावश्याने अंगठी उचलली आणि ती निरखून पाहू लागला. त्यावर 'एन' लिहिले होते. इकडे मोहन जळालेली कागदं उलटून पालटून पाहात होता. ती कसल्याशा डायरीची पानं होती. पावसामुळे अर्धवट जळलेल्या कागदावरील अक्षरं पुसट झाली होती. अक्षरं व्यवस्थित वाचता येत नव्हती. पिशवीवर 'बीएमसी' असं प्रिंट केलेलं होतं.
मोहन म्हणाला,"पावसामुळे आग विझली असती तर इकडे कुणाचंच लक्ष गेलं नसतं. आता ही 'एन' अक्षराची अंगठी कुणाची आहे? आणि ही कागदं का जाळली गेली? ही अंगठी आणि कागदं जाळण्यामागं काय रहस्य आहे? याचा आपल्याला शोध घ्यावाच लागेल. आपलं लक्ष गेलं नसतं तर याची उत्तरं शोधली गेली नसती."
मोहनने जळालेली कागदं पिशवीत घालून रस्त्याच्या दिशेने निघाला. अंगठी अजूनही रावश्याच्या हातात होती. आता पाऊस थांबला होता. तिकडे बरंच लांब काही वस्त्या दिसत होत्या. छोटं गाव असावं. ते दोघे तिकडे गेले. तिथे त्यांना एक दुकान दिसलं. त्यावर असलेल्या बोर्डावर 'बीएमसी' लिहिलं होतं.
दोघेही त्या दुकानात घुसले. गल्ल्यावर बसलेल्या माणसाने डोळ्यानंच विचारलं,"काय हवं?"
बाजूलाच पिशव्या विक्रीसाठी अडकवलेल्या होत्या.
मोहनने जळालेली बॅग त्याच्यासमोर धरली आणि विचारलं,"ही बॅग तुमच्या दुकानातूनच विकली गेलीय काय? असेल तर कधी विकली गेली आणि कोणाला?"
गल्ल्यावर बसलेला माणूस उठला आणि त्यानं पिशवी पाहिली. "ही तर जळालेली आहे. एका तासापूर्वी एका तरुणाने पिशवी खरीदली होती. बहुतेक ती हीच असावी."
बॅग जळाली असली तरी त्याचे नवेपण अजूनही जागोजागी दिसत होते.
मोहनने उतावीळपणे विचारलं,"त्या तरुणाचं नाव सांगू शकाल? दिसायला कसा होता तो? आणि तो एकटाच होता की आणखी कोण त्याच्यासोबत होते?"
दुकानदार म्हणाला,"त्याचे केस कुरळे होते आणि त्याने दाढी वाढवली होती. त्याने लाल रंगाचा शर्ट घातला होता आणि त्याचे डोळे सुजलेले होते. त्याचा चेहरा रडवेलासा दिसत होता. पण काय झालंय काय,मला तरी सांगा. तो चोर होता का? आणि तुम्ही पोलीस आहात का?"
ऐकून मोहन आणि रावसाहेब दोघेही हसू लागले. मग त्यांनी ही अर्धवट जळालेली पिशवी कुठे सापडली ते सांगितले.
"म्हणजे त्या तरुणाने ही पिशवी जाळायसाठी घेतली होती?" दुकानदाराने प्रश्न केला.
मोहन विचार करत होता,'त्या तरुणाच्या हातात डायरीची पानं असतील. त्याने ती पिशवीत टाकली आणि त्याला आग लावली. पण का जाळली? असं काय होतं या डायरीच्या पानांमध्ये?'
दुकानदार बाहेर आला. त्याने कागदं आपल्या हातात घेतली आणि ती आलटून पालटून पाहिली. पण त्याला त्यात काही विशेष दिसलं नाही. ती काही खास कागदपत्रेही नव्हती.
"आता काय करायचं?" रावसाहेबनं विचारलं आणि त्याने वर आकाशाकडे पाहिलं. आकाश स्वच्छ होतं आणि हलकं ऊन पडलं होतं.
मोहन म्हणाला,"आपल्याला पुन्हा एकदा त्या ठिकाणी जावं लागेल."
"का?" रावश्याने विचारलं.
"मी या अंगठीचा विचार करतोय. ही या पिशवीत कशी आली? त्याला अंगठी जाळायची नव्हती. ती जळणार तर कशी?कदाचित तो कागदं पिशवीतून काढत असताना त्याच्या हाताच्या बोटातून ती निघून पडली असावी. मला तर असंच वाटतंय. असे असेल तर तो तरुण पुन्हा तिथे नक्की येईल!"
"तो तिथे अंगठी शोधायला येणार का?"
"त्याला अंगठी हरवली असल्याचं लक्षात येईल,तेव्हा तो नक्की येईल. आणि बोटातली अंगठी हरवली आहे, ही गोष्ट फार काळ लपून राहणार नाही. कारण बोटांकडे सारखी नजर जात असते." मोहन म्हणाला आणि पुन्हा वेगाने त्या मैदानाच्या दिशेने निघाला.
"अरे, तो बघ,समोर!"रावसाहेबने मोहनचा हात पकडून समोर नजरेने निर्देश करत म्हणाला.
समोर मैदानात लाल रंगाचा ठळक टिपका दिसला. लाल शर्ट घातलेला तरुण खाली वाकला होता. मोहनचा अंदाज बरोबर होता. दोघेही वेगाने चालत त्या तरुणाजवळ पोहचले. त्या दोघांना पाहून लाल शर्टाचा तरुण चपापला.
मोहनने विचारले,"काय शोधतो आहेस?"
"काही...काही नाही!"तरुण म्हणाला.
"तुझं नाव 'एन'ने सुरू होतं का?" मोहनने विचारलं.
तरुण म्हणाला,"हो, माझं नाव नामदेव आहे.पण तुम्हाला कसं माहीत?"
"आम्हाला हे नाव अंगठीमुळे समजलं." मोहन म्हणाला आणि त्याला अंगठी दाखवली.
"अरे, ही तर माझी अंगठी आहे.मी याच्याच शोधात इकडे आलो होतो." असे म्हणून त्या तरुणाने अंगठी घेण्यासाठी हात पुढे केला.
"आम्हाला काय माहीत की, ही अंगठी कुणाची आहे? पण एक मात्र आम्हाला ठाऊक आहे की, तू तिथल्या वस्तीवरल्या दुकानातून एक पिशवी खरेदी केलीस होतीस आणि त्यात डायरीची पाने घालून ती इथे जाळलीस." मोहन पुढे म्हणाला की,''आम्ही ही घटना पोलिसांना सांगायला चाललो आहोत. पोलिसच सांगतील की, ही अंगठी नेमकी कुणाची आहे."
"प्लिज, पोलिसांकडे जाऊ नका. तुम्हाला अंगठी द्यायची नसेल तर नका देऊ. पण मला पोलीसांच्या चक्करमध्ये पडायचं नाही. पण मी ते सगळं सांगेन,जे कुणाला सांगायचं नव्हतं."
मोहन म्हणाला,"हे बघ नामदेव, जे काही असेल ते खरं खरं सांग. नाहीतर पोलीस...! सांग, ही सगळी काय भानगड आहे?"
त्या तरुणाचा आवाज घोगरा झाला. सांगू लागला, "काही दिवसांपूर्वी माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. मी आमच्या घराची साफसफाई करत असताना त्यांची डायरी सापडली. त्यांनी लिहिलं होतं की, ते चंदन तस्करीचं काम करत होते. मग माझ्या लक्षात आले की, एक छोटीशी नोकरी करत असताना त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून येतात. मला याबाबतीत कुणालाच काही सांगायचं नव्हतं. पण मला खूप वाईट वाटत होतं.मग मी विचार केला की, ही डायरीच आपण नष्ट करावी. मी दुकानदाराकडून पिशवी विकत घेतली आणि इथे लांब येऊन त्या डायरीतील ती पानं फाडली आणि या पिशवीत घालून आग लावली.मी विचार केला होता की, आता ही गोष्ट कुणालाच कळणार नाही,पण..." आणि बोलता बोलता त्याच्या डोळ्यांत पाणी आले आणि तो हमसून हमसून रडू लागला.
मोहन त्याच्याजवळ गेला आणि खांद्यावर हात ठेवत म्हणाला,"तुझ्या वडिलांनी जे केलं ते चुकीचं आहे. पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाची बदनामी होऊ नये, तू जे केलंस, ते योग्यच आहे. खरेच, आम्ही कुणाला काही सांगणार नाही." मोहनने त्याची अंगठी त्याला परत केली.
दोघेही तिथून निघाले. काही अंतर गेल्यावर त्यांनी मागे वळून पाहिले. मैदानात तिथे हलकासा धूर दिसत होता. बहुतेक नामदेवने डायरीची ती पानं पुन्हा जाळली असावीत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012
Friday, July 24, 2020
मुलीच हुशार कशा?
पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रियांवर खूप काळ अन्याय झाला.त्यांच्यातील गुणांना शतकानुशतके वाव मिळाला नाही. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वार्थाने विकसित झाले नाही. पुरुषप्रधानतेमुळे पुरुषांना जे अवास्तव स्वातंत्र्य मिळाले,त्यामुळे त्यांचेही मोठे नुकसान झाले. नंतर मात्र स्त्रियांना मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे पुरुषांच्या या कमतरता उघड झाल्या.
प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष केल्यानेच माणसातले सुप्त गुण उघड होतात.त्यामुळेच बऱ्याचदा दरिद्री, अनाथ, संकटग्रस्त वा अभावग्रस्त मुले ही सर्व तऱ्हेची अनुकूलता लाभलेल्या लक्ष्मीपुत्रांपेक्षा जास्त यश कमावतात. काहीतरी मिळवण्याचे ध्येय त्यांच्यासमोर असते. हीच गोष्ट आजवर दडपल्या गेलेल्या महिलांबाबतीतही घडते आहे. त्यांना आपली गुणवत्ता टिकवून ठेवणे गरजेचे असते,तरच आपले शिक्षण पुढे चालू राहते,याची त्यांना जाणीव असते. याउलट मुलांना मोकळे वातावरण, स्वातंत्र्य, शिक्षणाच्या संधी सहज उपलब्ध होतात. त्यामुळेच त्यांच्यापुढे कमी आव्हान असतात. यामुळे त्यांच्यात जिद्द,प्रेरणा राहत नाही.
आणखी एक कारण म्हणजे मुलींना 'सातच्या आत घरात' चे बंधन पूर्वीपासूनच होते. तसेच दिवसाही त्यांनी उगीचच गप्पाटप्पा, फिरणे वगैरे गोष्टीत अनावश्यक वेळ काढू नये, अशी अपेक्षा नव्हे तशी सक्तीच होती. अर्थातच त्यामुळे मुलींना घरातला वेळ विधायक कामांसाठी देता येई. याउलट मुलांना उशिरापर्यंत खुशाल बाहेर राहण्याची मुभा असल्याने उनाडपणा व व्यसनात ती सहजी सापडू शकतात. त्यांच्या संगतीबाबत पालकांना तेवढे जागरूक राहावेसे वाटत नाही.
पूर्वी स्त्रिया घरात बंदिस्त होत्या तरी त्यांना दिवसभर भरपूर गृहकामे असत. स्वयंपाक, मुलांचा सांभाळ, दळण-कांडण, घरातील वृद्धांची सेवा, पै-पाहुणे यांचा पाहुणचार हे पूर्वापार संस्कार स्त्रीला स्वस्थ बसू देत नाहीत. यासाठी अपार मेहनत आणि चिकाटी लागते. याउलट मुलांना शिक्षणाची संधी मिळाली तरी दैनंदिन व्यवहाराचे जीवनशिक्षण त्यांना मिळाले नाही. घरातील अति महत्त्वामुळे आपण कसेही वागलो तरी चालेल, आपले तेच बरोबर, अशी वृत्ती त्यांच्यात निर्माण झाली. अनिर्बंध वर्तणुकीचे संस्कार या पुरुषप्रधानतेमुळे झाले.
शिवाय व्यवस्थापनात मुलीच मुलांपेक्षा अधिक सरस ठरतात. आज मोठमोठ्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारीची जागा मुलींनी पटकावल्या आहेत आणि त्या कंपन्या सुव्यवस्थित चालवताना दिसतात. यावरूनच मुलींचे व्यवस्थापन कौशल्य लक्षात येते.
एकत्र कुटुंब पद्धतीत घरातील ज्येष्ठांशी वागताना वापरण्याचे कौशल्य, पाहुण्यांचे आदरातिथ्य करताना पाळावयाचा शिष्टाचार, स्वयंपाक करताना वापरावी लागणारी कल्पकता, प्रयोगशीलता, कृतीशीलता, कौशल्य, काटकसर, नियोजन, घरखर्च भागवताना पैशांची बचत आणि आर्थिक नियोजन ,घरातील विविध कामे एकाचवेळी पार करताना करावे लागणारे वेळेचे नियोजन, तत्परता अशा अनेक गोष्टींमुळे स्त्रियांमध्ये आपसूकच व्यवस्थापन कौशल्य विकसित होत जाते. या संस्कारांमुळे स्त्रियांचे व्यक्तिमत्त्व घरी असूनही एकांगी झाले नाही. यामुळे मानसशास्त्रीय तत्त्वानुसार, संधी मिळताच 'ट्रान्स्फर ऑफ ट्रेनिंग' होऊ शकते. उलट, पुरुषवर्ग अशा प्रशिक्षणापासून वंचित राहिला. त्यांचा फावला वेळ अनुत्पादक गोष्टीत जातो. कलाकौशल्याची आवड निर्माण होत नाही. ती जोपासली जात नाही. बेफिकीर वृत्ती वाढीला लागते.
संधी मिळताच स्त्रियांना या जीवनशिक्षणाचा उपयोग ,कलागुणांचे संस्कार शिक्षणातही कामी येतात. त्यामुळे परीक्षा तसेच वेगवेगळ्या प्रांतांत स्त्रिया आघाडीवर राहू शकतात. आज प्रत्येक क्षेत्रात मुली आघाडीवर आहेत. शिवाय त्यांना संधीही दिल्या जात आहेत. आणि त्याचा पुरेपूर लाभ त्या घेत आहेत.
मात्र आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असल्या तरी पुरुष संस्कृतीच्या अन्याय, अत्याचाराचा फटका त्यांना बसतच आहे. स्त्रियांची होत असलेली सरशी या पुरुषांना खटकत आहे. ही गोष्ट सामाजिकदृष्ट्या घातक आहे. पुरुषांनी स्त्रियांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्या सोबतीने वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व घडवायला हवे. दोघांचेही व्यक्तिमत्त्व सर्वांगीण, परिपूर्ण झाले तरच खऱ्या अर्थाने समानता अस्तित्वात येईल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012
Thursday, July 23, 2020
(बालकथा) हुशार पाहुणे
शिंपी आतल्या घरात गेला आणि बायकोला म्हणाला,"ऐक, मी तुला शिव्या दिल्या की, तूही मला शिव्या द्यायच्या. मी तुला काठीने मारायला धावलो की, तू पिठाचे मडके घेऊन बाहेर पळायचं. मी तुझ्या मागोमाग धावत येईन. पाहुणे समजतील की, यांच्यात भाडणं लागली आहेत.आणि मग ते माघारी निघून जातील."
काही वेळानंतर शिंपी दुकानात बसल्या बसल्या बायकोला शिव्या देऊ लागला. त्याला उत्तर म्हणून त्याची बायकोही त्याला शिव्या देऊ लागली. शेवटी शिंप्याने काठी घेतली आणि उठून बायकोच्या अंगावर धावून गेला. बायकोने रागाने पिठाचे मडके उचलेले आणि घराबाहेर पळाली. तिच्या मागोमाग शिंपीही काठी घेऊन धावला.
पाहुणे विचार करू लागले. त्यातला एकजण म्हणाला,"बहुतेक हा शिंपी मोठा लोभी आहे. त्याची पाहुणचार करण्याची इच्छा नाही,त्यामुळेच त्याने हे नाटक चालवलं आहे. पण आपण याला असा सोडायचा नाही.चल, आपण वरच्या माडीवर जाऊन झोपून जाऊ" पाहुणे वर जाऊन झोपले.
पाहुणे गेले असतील म्हणून शिंपी आणि त्याची बायको दोघेही हळूच घरात आले. पाहुणे घरात नव्हते,त्यामुळे त्याला खूप आनंद झाला. म्हणाला,"बरं झालं,ब्याद गेली. "मग दोघेही एकमेकांचे कौतुक करू लागले.
शिंपी म्हणाला,"मी किती हुशार, काठी घेऊन लगेच धावलो." यावर त्याची बायको म्हणाली,"मी पण काही कमी नाही, लगोलग मडकं घेतलं आणि बाहेर पळाले."
पाहुणे वर झोपूनच त्यांचे सगळे बोलणे ऐकले होते. त्यातला एकजण म्हणाला,"आणि आम्हीही किती हुशार!वर येऊन आपलं निवांत झोपलो."
ऐकून दोघेही चरकले. त्यांनी त्यांना खाली बोलावलं. चांगला पाहुणचार केला आणि मग निरोप दिला. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 7038121012
Wednesday, July 22, 2020
अनवट वाटा
भविष्याची चिंता
Monday, July 20, 2020
उद्योजकतेतून अधिक रोजगार निर्मिती शक्य
अभ्यासातील स्वावलंबन
Saturday, July 18, 2020
(लघुकथा) बाबांची लाडकी
Friday, July 17, 2020
ऑनलाईन शिक्षण : अगोदर सुविधा तर द्या
Wednesday, July 15, 2020
(रहस्य कथा) चोर...चोर
Tuesday, July 14, 2020
(लघुकथा) खरी नाती
कलावतीचं काळीज चरकलं. पुन्हा श्रीमंत माणसं! तिने श्रीमंत माणसांची गरीब माणसांशी वागणूक अनुभवली होती. पण तिच्यासाठी दोन्ही मुली समान होत्या. तिने कधी भेदभाव केला नाही. ती त्यांना खायला बनवण्यात व्यग्र झाली.
सारिताच्या वडिलांचा एका अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या जागी तिला ऑफिसात शिपाईची नोकरी मिळाली होती.
(लघुकथा) बदल
फक्त वाघमारे आजोबांनीच नाही तर सांगली रोडला पहाटे फिरायला येणाऱ्या सर्वांनाच तसे वाटत होते. फिरून आल्यावर वाघमारे आजोबा रमेशला म्हणाले,
"गड्या रमेश, आता आम्ही फक्त कपबशी नाहीतर काचेच्या ग्लासातच चहा पिणार बरं!" टपरीवर जमलेल्या सगळ्यांनीही त्याला हेच सांगितलं. रमेशनं ऐकून घेतलं. तो काहीच बोलला नाही.
(लघुकथा) सरडा
"अरे यार, मग ओळख करून दे ना, चल! एखाद-दुसरं कंत्राट मिळायला कामी येतील. कुठले आमदार आहेत म्हणालास?" सुभाष
"कवठेमहांकाळचे माजी आमदार आहेत." मी
"म्हणजे माजी आहेत तर!" सुभाषचा आवाज नरम पडला.
"स्वभावानं फार चांगले आहेत ते. चल भेटू!"
सुभाषच्या चेहऱ्याचे भाव बदलले.
(लघुकथा) गरिबीच्या नावावर...
(लघुकथा) निर्णय
"मला माहित आहे ,बाबा ऐकणार नाहीत. परंतु, मला टेक्निकल लाईनला जायचं आहे. मला डॉक्टर व्हायचं नाही." असं म्हणत त्यानं आईच्या खांद्यावर आपलं डोकं टेकवलं.
रात्री जेव्हा प्रतापराव जेवण करून टीव्हीसमोर बसले,तेव्हा शोभा म्हणाली,"मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे."
"बोल, काय बोलायचंय तुला?" प्रतापराव टिव्हीकडे पाहतच म्हणाले.
Sunday, July 12, 2020
(बालकथा) दामाजीपंतांचा नोकर
दुष्काळ पडल्याने लोक अन्नाला महाग झाले होते. भुकेने काही लोकांनी दम तोडला होता. परंतु इकडे गोदामे धान्यांनी भरलेली होती. दामाजीपंतांना पाहवलं नाही,त्यांनी आदेश दिला,"गोदामाचे टाळे खोला, गरजूंना धान्य वाटा.कुणीही उपाशी राहता कामा नये."
Saturday, July 11, 2020
सांगलीच्या साहित्य चळवळीचा होतोय गौरव
Thursday, July 9, 2020
लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आवश्यक
Tuesday, July 7, 2020
( बालकथा) प्रगाढ विश्वास
कोसळणाऱ्या विजा आणि मनुष्यहानी
Monday, July 6, 2020
शिक्षण सेवकांची कैफियत,'सांगा, कसं जगायचं?'
एसटी वाचली पाहिजे
Sunday, July 5, 2020
पालकांनी सावध राहिले पाहिजे
Saturday, July 4, 2020
जालिहाळ बुद्रुक व्यसनमुक्तीच्या दिशेने...
Thursday, July 2, 2020
(लघुकथा) ढेकूण
(लघुकथा) आदर
महिलांबाबत चिंताजनक वस्तुस्थिती
(लघुकथा) देवाचं रूप
धानम्माला तपासल्यावर तिच्या हाताचे ऑपरेशन करावे लागेल, असे डॉक्टर म्हणाले. खूप विचार केल्यानंतर त्याने ऑपरेशनचा दिवस विचारला. डॉक्टरांनी त्याला चार दिवसानंतरची तारीख दिली. ऑपरेशनच्या आदल्यादिवशी मुलीला ऍडमिट करायला सांगितलं.