Wednesday, October 30, 2019

'धन्यवाद...' शब्द खूपच महत्त्वाचा


मराठी मध्ये 'धन्यवाद...' आणि इंग्रजीमध्ये थँक्स… हे दोन शब्द खूपच महत्त्वाचे आहेत. हे शब्द आपल्या आयुष्याला  उन्नत करतात.  आपल्याला नेहमी सुखी ठेवतात. खरे तर एखाद्याला आपल्या यशाचे श्रेय देणे सोपे नसते. पण लक्षात ठेवा, जर आपण एखाद्याचे आभार मानत असाल तर याचा अर्थ असा की, तुम्ही यशाच्या मार्गावर आहात.
मानवी स्वभाव  असा आहे की, आपल्या हातून काही चुकले तर  त्याचे खापर आपण इतरांवर फोडायला लागतो. अशा आपल्या वागण्यामुळे आपलेच नुकसान होते. आपल्या चुकीचे खापर दुसऱ्यावर फोडायची गरज नाही,पण माणूस स्वभाव आहे. कारण आपण आपली चूक मान्यच करत नाही.

संघटनेत ताकद असते

एकदा कबुतरांचा एक गट अन्नाच्या शोधात भटकला.  बराच वेळ उड्डाण करूनही त्यांना खायला काही मिळालं नाही.  'कंटाळा आला आहे.' सगळे कबूतर म्हणाले.
 कबुतरांना धैर्य देत त्यांचा मोरक्या  कबूतर म्हणाला की, 'आणखी थोडे प्रयत्न करो. आपल्याला नक्कीच काहीतरी मिळेल.'  पुढे गेल्यावर त्यांना जंगलात पुष्कळ धान्य विखुरलेले दिसले.  सर्व कबूतर खूष झाले आणि शेतात उतरे आणि दाणे टीपू लागले.  अचानक त्यांच्यावर मोठे जाळे पडले.  ते सर्व त्यात अडकले.  त्यांना काहीच कळेना काय करावे. तेवढ्यात त्यांना एक शिकारी त्यांच्याकडेच येताना दिसला.  सर्व कबूतर घाबरून गेले.

Tuesday, October 29, 2019

अनुवादाचे विश्व


आजच्या युगात इंग्रजी आणि हिंदी भाषेचे ज्ञान असणे  सामान्य असले तरी  महत्त्वाचे आहे. हिंदी ही आपली अधिकृत राजभाषा आहे. मात्र इंग्रजीशिवाय या जगात प्रगती करणे कठीण आहे.  एवढेच नाही तर या दोन भाषांमधील आपले ज्ञान चांगले असेल तर आपल्याला करिअरसाठी एक चांगला पर्यायही मिळतो.  आज प्रत्येक क्षेत्रात इंग्रजी-हिंदी  अनुवादकांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.  जर आपल्याला भाषांतरात रस असेल तर आपण घरी बसून पैसे कमवू शकता.  चांगल्या अनुवादकासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वेळोवेळी इंग्रजी-हिंदी भाषांतर जगतात होणारे बदल, ट्रेंड आणि वादविवादाची जाणीव असणे आवश्यक आहे.

खरे सामर्थ्य

एका  जंगलामध्ये सिंहाची खूप दहशत होती.  तो रोज जंगलातल्या प्राण्यांना मारू खात असे. सर्व विचलित झालेल्या प्राण्यांनी एक दिवस परिषद घेतली आणि त्यामध्ये सिंहाला बोलावले. सिंहाने प्राण्यांना या परिषदेचा हेतू विचारला.  प्राण्यांचा प्रतिनिधी म्हणाला," महाराज,तुम्ही आम्हाला मारून खाणे स्वाभाविक आहे हे आम्हास ठाऊक आहे.  परंतु रोज एकापेक्षा अधिक प्राणी मारणे योग्य नाही.  आमचा असा प्रस्ताव आहे की, आम्ही रोज एक प्राणी तुमच्या गुहेपर्यंत पाठवून देऊ. तुम्ही त्याला मारून आपली भूक भागवत जा.शिवाय तुम्हाला  शिकार करण्यासाठी भटकावेही लागणार नाही. सिंहाला हा प्रस्ताव पसंद पडला.  तो म्हणाला,"मी हा प्रस्ताव मान्य करतो पण माझी शिकार वेळेवर पोहोचली नाही तर मी तुम्हा सगळ्यांना ठार करीन." 

... कारण उद्या कधीच येत नाही.


दोन मित्र होते.  त्यांनी एकत्र शिक्षण घेतले.  दोघांचेही एकच स्वप्न होते, स्वता:चा व्यवसाय सुरू करायचा. शाळा, एकाच  महाविद्यालयात आणि एकच शिक्षण घेऊनही या दोघांमध्ये बराच फरक होता.  एका मित्राला व्यवसाय सुरू करण्यासाठी घरून आर्थिक मदत मिळाली, तर दुसर्‍या पालकांची भांडवल चांगल्या महाविद्यालयात शिकण्याचे मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेले.  आर्थिक स्थितीतील हा फरक होताच,पण   या व्यतिरिक्त या दोघांच्या स्वभावातही तफावत होती.  समृद्ध वातावरण असलेल्या मित्राला आपले काम उद्यावर ढकलण्याची सवय होती. दुसऱ्या मित्राच्या वाट्याला दुर्लक्षित जीवन आले होते. त्यामुळे तो  प्रत्येक गोष्टींचे  महत्त्व त्वरित समजावून घेत असे आणि त्याला लगेच  सामोरा जात असे. समृद्ध मित्राने व्यवसाय उघडला परंतु दुसरा मित्र एका कंपनीत कामाला लागला. 

Monday, October 28, 2019

संकटातून धडा शिका...


संकटाच्या वेळेतून  आपल्याला धडा मिळतो. सुरुवातीला आपण ज्या त्रासांपासून दूर पळत होतो, ते आपल्यासाठी मार्ग बनले. आयुष्यात तुम्ही आणि आम्ही बर्‍याचदा अडचणीत सापडतो, प्रथमच असे दिसते की अडचणींमधून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही.  पण आश्चर्यकारक असं काही घडतं की , आम्ही माणसं प्रत्येक वेळी अडचणींवर विजय मिळतो आणि पुढे जातो.  अडचणींशी आपण दोन हात करतो,तेव्हा कळतं की आपल्यात किती सामर्थ्य आहे. मला असे वाटते की, आपण देखील काहीतरी करू शकतो. अडचणी सोडवल्या जातात, परंतु आम्ही काही गोष्टी या धड्यांमधून शिकतो. जगातील कोणतीही शाळा शिकवू शकत नाही असे काही धडे आपल्याला यातून मिळतात. असे धडे कठीण काळानंतरच आपल्यापर्यंत येतात.

दररोज काहीतरी नवीन शिका...

 माणूस जन्म घेतो, जग पाहतो आणि गोष्टी शिकतो.  पण तो जसजसा मोठा होत जातो,तसतशी त्याच्या मनातून उत्सुकता कमी होऊ लागते.  आपल्याला काहीतरी मोठे करायचे असेल, यशस्वी व्हायचे असेल तर दररोज काहीतरी नवीन शिकण्याची सवय लावली पाहिजे.  प्रत्येक मनुष्याला काहीतरी नवीन आणि मोठे करावेसे वाटत असते.  यासाठी प्रत्येकजण कठोर परिश्रम देखील करतो, परंतु आपणास हे माहित आहे की मोठे स्वप्न साकारण्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळे करावे लागेल, जे इतरांपेक्षा वेगळे असेल.

Sunday, October 27, 2019

गर्भपातात महाराष्ट्र आघाडीवर


आपल्या देशात अनेक कारणांनी गर्भपात होतात. गर्भाची वाढ व्यवस्थित नसल्यापासून ते मुलगाच हवा हा अट्टाहास आणि अनैतिक कारणाने वाढलेला गर्भ पाडण्यापर्यंत अशी अनेक कारणं आपल्याला यासाठी सापडतील. आपल्या पुरोगामी राज्यात हा गर्भपाताचा आकडा थक्क करणारा आहे. राज्यात दरवर्षी 1 लाख 70 हजारांहून अधिक गर्भपात होत असल्याची आकडेवारी सांगते. विशेष म्हणजे यासाठी जनजागृती मोहिमदेखील मोठ्या प्रमाणात राबवण्यात येते,पण त्याचाही काही उपयोग झाला नसल्याचे दिसून येते.  या गोष्टीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
गर्भपाताची अनेक कारणं आपल्याला सापडतील.

Friday, October 25, 2019

हिवाळ्यात पावसाळा...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालादिवशी एक पोस्ट व्हॉटस अपवर फिरत होती. "आजचा दिवस संमिश्र अनुभवांचा.. भाजपने विजयात पराभव अनुभवला...
 राष्ट्रवादीने पराभवात विजय अनुभवला... शिवसेनेने वरळीच्या विजयात बांद्र्याचा पराभव अनुभवला...
 इतरांनी दुसऱ्यांच्या पराभवात स्वत:चा विजय अनुभवला...आणि महाराष्ट्रातील जनतेने नेहमी प्रमाणेच ....हिवाळ्यात पावसाळा अनुभवला...
राज्याच्या निवडणुकीच्या निकालानंतरचे चित्र हे असे आहे. 220 जागांची मॅजिक फिगर भाजप-सेना युतीला गाठता आली नसली तरी युतीची सत्ता मात्र अबाधित राहिली आहे. या खेपेला भाजपच्या 20 जागा घटल्या तर शिवसेनेच्या सहा जागा कमी झाल्या.महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या निवडणुकीत गेमचेंजर बनले.

Thursday, October 24, 2019

प्रांतोप्रांतीची दिवाळी


भारतातील सर्वच प्रांतात दिवाळी उत्साहात साजरी केली जाते. मात्र प्रांतात त्याची रूपं विविध आहेत. त्यातल्या विधींत वैविध्य आढळते. उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत थोड्या फार वेगळ्या आहेत. या बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
जम्मू-काश्मीर: काश्मिरात दोन दिवसांची दिवाळी असते. जे हिद आहेत, ते नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजन करतात. दिवाळीत इथे पुरुषांच्या कपाळावर शंकराच्या तिसऱ्या डोळ्याप्रमाणे लाल कुंकवाचा डोळा काढतात. या लालभडक तिलकामुळे सर्व दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यापासून दूर राहतात, असा समज प्रचलित आहे.

फटाके फोडा पण जपून


हल्ली फटाके फोडायला कोणतेही निमित्त पुरेसे असते. लग्नापासून तर निवडणुकांपर्यंत. वाढदिवसापासून निवडीपर्यंत काहीही कारण पुरेसं आहे. फटाके हवेच. त्यात दिवाळी म्हटली तर विचारुच नका.  हा सणच फटाक्यांचा आहे. आपल्याकडे दिवाळी हा सण फटाके फोडून पारंपरिकरित्या सर्वत्र साजरा केला जातो. लहान मुले या सणाची उत्सुकतेने वाट पाहतात. कारण त्यांना फटाके वाजवून मजा करायची असते. मोठ्यांनाही यानिमित्ताने आपली हौस भागवता येते.  परंतु, बरेच लोक फटाके फोडल्याने होणारे आजार याबाबतीत अनभिज्ञ असतात. फटाके फोडताना इजा होते, नाकातोंडात धूर जातो. मात्र फटाके फोडताना योग्य ती काळजी घेतल्यास दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करता येतो.

Wednesday, October 23, 2019

पोषण मोहिमा अपयशी का?

प्रगत महाराष्ट्रात 80 हजारच्या आसपास कुपोषित बालके आहेत आणि तब्बल सव्वा पाच लाख बालके कुपोषणाच्या उंबरठ्यावर आहेत. हा मोठा काळजीचा प्रश्न असून हा चिंतेचा विषय गांभीर्याने घेण्याचा विषय आहे. विशेष म्हणजे यासंदर्भातल्या जनजागृतीवर वर्षाला 144 कोटी खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे फक्त जनजागृती करून भागणार नाही तर पालक आणि शासनाच्या काय अडचणी आहेत, हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे. बरीच मुले अंगणवाडीत येत नाहीत. पालकांमध्ये अज्ञान आहे. गरिबी आहे. या प्रश्नांची सोडवणूक होण्याची गरज आहे.
आदिवासी भागातील मुलांच्या कुपोषणाची एक वेळ गोष्ट आपण मान्य करू,मात्र सर्व सेवा आणि सुविधा पोहचलेल्या ग्रामीण भागातील चित्रही भयंकर असल्याने शासनाचे नियोजन कुठे तरी चुकते आहे,हे मान्यच करायला हवे. ग्रामीण भागात सर्वदूर शिक्षण पोहचले आहे. याहीपेक्षा अधिक वेगाने मोबाईलद्वारा तंत्रज्ञान पोहचले आहे. या तंत्रज्ञानाच्या जोरावर कुपोषणावर मात करता येते का, याचा विचार होण्याची गरज आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून कुपोषित बालकांपर्यंत आपण पोहचायला हवे आणि त्याला सुदृढ करण्याच्या दृष्टीने पावले उचलायला हवीत. जवळ पास साडेपाचशे प्रकल्प कुपोषित बालकांसाठी राबवले जात आहेत.