Monday, October 30, 2017

(करिअर वाटा) आहारतज्ज्ञ बना,करिअर घडवा

     उत्तम आरोग्यासाठी आहाराची भूमिका महत्त्वाची आहे. सकस आणि संतुलित आहार आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढवते. बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल काहीही आणि कसंही खाल्लं जात आहे.जंकफूडवर अधिक भर दिला जात आहे. त्यामुले पोटाच्या तक्रारी वाढल्या आहेतच शिवाय खाण्या-पिण्याच्या संबंधित अनेक आजारही बळावत आहेत. त्यामुळे याचा परिणाम माणसाच्या कामांवर होत आहे. शारीरिक,मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खाण्या-पिण्याच्या सवयी, अनियमितपणा, सकस आणि संतुलित आहाराचा अभाव यामुळे आरोग्य बिघडण्याचे प्रमाण वाढले आहे. साहजिकच सकस  आणि संतुलित आहाराचे सेवन, खाण्या-पिण्याच्या सवयी याबाबतीत लोकांना मार्गदर्शनाची गरज आहे. आजकाल याबाबत जागृतीही वाढली आहे,त्यामुळे डायटिशियन ( आहार तज्ज्ञ) ची आवश्यकता भासू लागली आहे. या क्षेत्रात करिअर करायला मोठी संधी असून वेतनही चांगले मिळत आहे.

     आरोग्य चांगले राहण्यासाठी काय करावं लागेल, याबाबत जागरुकता वाढत आहे. संतुलित आणि सकस आहार म्हणजे काय? त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा? खाण्या-पिण्याच्या वेळा कशा पाळाव्यात याबाबत अधिक माहिती आहार तज्ज्ञाला अधिक असते. आहार तज्ज्ञ आपला आहार आपल्या आरोग्यास अनुकूल असावा, याबाबतची काळजी घेतात. अर्थात शिक्षण घेतल्याशिवाय, वाचल्याशिवाय कोणी आहार तज्ज्ञ होऊ शकत नाही. काळ वेगाने बदलतो आहे. लोक आपल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. आपल्या आरोग्याबाबत लोकांची वाढत असलेली जागरुकता पाहता आज डायटिशियन ( आहार तज्ज्ञ) ची मागणी पहिल्यापेक्षा अधिक वाढली आहे.
डायटिशियनचे काम
एका डायटिशियनचे महत्त्वाचे काम म्हणजे लोकांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी आहारासंबंधीची माहिती आणि मार्गदर्शन करण्याचे आहे.एकाद्या माणसाचे वय , आजार इत्यादी गोष्टींचा विचार करून त्यांचे आरोग्य कसे उत्तम राहील यासंबंधी योग्य स्वरुपाचा आहार निश्चित केला जातो. त्याचबरोबर याही गोष्टीचा विचार केला जातो की, आहार कशाप्रकारे तयार करायला हवा. सगळ्या न्यूट्रिशनल वॅल्यू आणि प्रिंसिपलनुसार आहार असावा,याकडे लक्ष दिले जाते.कोणत्या आहारात कोणते पौष्टीक तत्त्व (विटामिन आणि मिनरल्स) किती प्रमाणात असतात,यावरही त्यांचे संशोधन सुरू असते. सांगण्याचे तात्पर्य असे की, आहार तज्ज्ञ आपले आरोग्य चांगले राहण्याबरोबरच काळानुरूप तंदरुस्त राहण्याचा मंत्रही सांगतात.
शैक्षणिक पात्रता
आहार तज्ज्ञ बनून आपले भविष्य बनवण्याची आणि दुसर्यांना योग्य आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला द्यायची इच्छा असेल तर तुम्हाला बारावी उत्तीर्ण व्हावे लागेल. त्यानंतर दोन वर्षांची न्यूट्रिशियनचा पदवी कोर्स करू शकता.जर बारावीला होम सायन्स किंवा विज्ञान विषय असेल तर तुम्हाला प्राधान्यक्रम म्इलतो. याशिवाय यात बीएसस्सी (होम सायन्स), एमएसस्सी (फूड अँड न्यूट्रिशियन) आणि डायटेटीक्समध्येदेखील पदवी मिळते.
नोकरीची संधी
या क्षेत्रात पुष्कळ नोकरीच्या शक्यता आहेत. अगोदर फक्त हॉस्पीटल्समध्ये आहार तज्ज्ञांना मागणी होती. मात्र आता एयरलाइन्स,रेल्वेला भोजन सप्लाय करण्याच्या ठिकाणी,कॉर्पोरेट,हॉटेल्स, हेल्थ आणि फिटनेस सेंटर्ससारख्याठिकाणी  जीम,कॉलेज आणि विद्यापीठात अध्यापक म्हणून करता येते. याशिवाय केटरिंग विभाग,फूड मॅन्युफॅक्चरिंग रिसर्च लॅब, चाइल्ड हेल्थ केयर सेंटर, ब्युटी क्लिनिक, सरकारी आरोग्य विभाग आदी ठिकाणीदेखील काम करण्याची संधी मिळते.कन्सल्टेंटमध्येसुद्धा करिअरची सुरुवात करता येते. तसे पाहायला गेले तर डायटिशियनची सगळ्यात जास्त मागणी हेल्थ केअर सर्विसमध्ये असते. आपल्यासाठी हॉस्पीटल आणि क्लिनिकमध्ये चांगल्या शक्यता आहेत.सरकारी विभागातही डायटिशियन म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते. या सरकारी संस्थांमध्ये आपल्याला लोकांच्यात जाऊन त्यांना खाण्या-पिण्याच्या सवयीसंबंधी जागृती करण्याची संधी मिळू शकते.
वेतनसंबंधी
या क्षेत्रात मिळकतदेखील चांगली आहे.ट्रेनी टायटिशियन 20 ते 25 हजार रुपये प्रतिमहिना कमावतात. दोन-तीन वर्षाच्या अनुभवानम्तर संधीबरोबरच वेतनदेखील चांगल्या प्रकारे वाढत जाते.स्वत:चे क्लिनिक काढून प्रॅक्टिसदेखील करता येते.
प्रशिक्षण संस्था:
युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली (दिल्ली)
बुंदेलखंड युनिव्हर्सिटी,झांशी (उत्तरप्रदेश)
कोलकाता विद्यापीठ,कोलकाता
गुरु नानकदेव युनिव्हर्सिटी, अमृतसर(पंजाब)

वर्तमानपत्रे वाचा,पर्सनॅलिटी बनवा

     कित्येकजणांच्या दिवसाची सुरुवात वर्तमानपत्र वाचल्याशिवाय होत नाही. त्यांना रोज चहाबरोबर वर्तमानपत्र हवे असते. कारण त्यांना जगातल्या घडामोडी जाणून घ्यायची मोठी उत्सुकता असते. आपल्या आजूबाजूला, शहरात,तालुक्याच्या,जिल्ह्याच्या ठिकाणी, राज्यात,देशात नव्हे संपूर्ण विश्वात काय चालले आहे, हे जाणून घ्यायला त्यांचे मन अतुर असते.काहींना आपल्या आवडीच्या विषयावर आलेल्या बातम्या,लेख वाचायला फार आवडते. त्यामुळे त्यांच्या मित्रपरिवारात किंवा सहकार्यांमध्ये एकप्रकारचा दबदबा असतो. कारण काही घटना घडली असेल,तर त्याची सत्यता पडताळण्यासाठी विचारा त्यांना,ते नेहमी पेपर वाचतात, असाच सूर निघत असतो.शिवाय त्यांच्या बोलण्याला एकप्रकारचे वजन प्राप्त असतं,कारण त्यांच्या बोलण्यात विश्वासाहर्ता असते.त्यामुळे वर्तमानपत्र वाचणे, हा काही टाईमपास नाही, हे लक्षात घ्यायला हवे.या वर्तमानपत्रांमुळे माणूस अपडेट तर राहतोच,पण त्याचे ज्ञानही वाढत असते.त्यामुळे आजच्या घडीला वर्तमानपत्रे वाचणे आपली पर्सनॅलिटी बनवण्यासाठी उरपयोगाचे आहे, हे आजच्या विद्यार्थ्यांनी आणि करिअर करू पाहणार्यांनी लक्षात ठेवायला हवे.

     जो कोणी विद्यार्थी वर्तमानपत्र वाचत नसेल,त्याने तात्काळ वर्तमानपत्राशी दोस्ती करावी,ते त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी चांगलेच आहे. रोज वर्तमानपत्र वाचल्याने तुम्हाला नव्या शब्दांची ओळख होणार आहे.या नव्या शब्दांमुळे तुमच्या माहितीत वाढच होणार आहे. आज कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आणि नोकरीसाठी इंग्रजी एक अनिवार्य विषय बनला आहे. अशा वेळेला रोज आपल्या मातृभाषेबरोबरच एकादे इंग्रजी वर्तमानपत्र वाचत राहिल्यास स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या युवकांसाठी फारच लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे कसे मिळेल,तसे वर्तमानपत्रे वाचून काढा.त्यासाठी हमखास वेळ द्या.
     आजच्या धावपळीच्या जगात जर तुम्ही स्वत: देश-परदेशात चाललेल्या ज्वलंत मुद्द्यांबाबत अपडेट राहिलात तर लोकांमध्ये तुमची एक वेगळीच ओळख निर्माण होते. जर एकाद्या व्यक्तीला या मुद्द्यांबाबतीत माहिती हवी असेल तर साहजिकच तुम्हाला शोधण्याचा प्रयत्न होतो.तुम्ही विद्यार्थी असा किंवा नोकरदार, तुम्हाला आपल्या आजूबाजूला काय चालले आहे,याची माहिती असायलाच हवी.यामुळे तुमच्या जागरुकतेबाबतचा स्तर समजून येतो.त्यामुळे या सगळ्या बातम्या किंवा माहिती मिळवण्याचे माध्यम आहे ते म्हणजे वर्तमानपत्र. तुम्ही हे ऐकलंय का बघा, आजच्या वर्तमानपत्रातल्या मुख्य बातम्या उद्या जनरल नॉलेजच्या पुस्तकांच्या पानांमध्ये असतात.
      आजच्या माहितीच्या या युगात प्रत्येकाला सगळ्यात अगोदर बातम्या जाणून घेण्याची जिज्ञासा असते. याबाबतीत इलेक्ट्रॉनिक माध्यमाने तर फारच मोठी सोबत केली आहे आपल्याला! पण ज्यावेळेला बातम्यांच्या विश्वासाहर्तेचा प्रश्न निर्माण होतो,तेव्हा वर्तमानपत्राशिवाय पर्याय राहत नाही. वर्तमानपत्रात डोकावून पाहिल्याशिवाय त्यांचा संबंधित बातम्यांवर विश्वास बसत नाही. आजच्या काळातदेखील वर्तमानपत्र आपले आरोग्य राखण्याच्या उपचारांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. स्कॉटलंडमध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, जे लोक नियमितपणे वर्तमानपत्रे वाचतात, त्यांचे आरोग्य वर्तमानपत्र न वाचणार्या लोकांपेक्षा 20 टक्क्यांनी चांगले असल्याचे आढळून आले आहे. या शोधात असेही आढळून आले आहे की,नियमितपणे वर्तमानपत्र वाचल्याने तणाव उत्पन्न करणारे हार्मोन्स म्हणजेच कोर्टीसोलचा स्तर कमी राहतो. लहान मुले, मोठी किंवा वयस्कर माणसे वर्तमानपत्रातल्या आपल्या आपल्या उपयोगाच्या गोष्टी सकाळीच वाचून काढतात. आणि मग पूर्ण दिवसात बहुतेक वेळ ते सकाळी वाचलेल्या गोष्टींवर विचार करतात. सकाळच्या वेळेला वर्तमानपत्र वाचल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्यांवर विचार करण्याची संधी मिळते आणि मग आपला मेंदू नकारात्मक विचारांपासून दूर राहतो. मग युवक मित्रानों, वाचणार ना पेपर? जे कोणी वर्तमानपत्र वाचत नसेल त्यांनी वाचायला सुरुवात करा. यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये फायदा तर होतोच,पण तुमच्या आरोग्यावरदेखील सकारात्मक परिणाम होतो.                                      

Sunday, October 29, 2017

वर्तमान आनंदाने जगा

     माणसाला उद्याची चिंता फार असते. उद्या माझं कसं होणार?पोरांचं कसं? पण या उद्याच्या नादात आजचा क्षण मात्र आनंदाने जगायचं सोडून देतात. आज आलेले महत्त्वाचे क्षण आपण उगाचंच काळजी करत घालवतो. त्यामुळे माणसं फार काही गमावून बसतात. उद्या हा येतच नसतो,तरीही त्याच्या काळजीने कमालीची काटकसर करतात. पोरा-पोरींसाठी पुंजी गोळा करून ठेवतात. आज मात्र पोटाला चिमटे मारून बसतात. माणसाने काटकसर करावी, आपले सेव्हिंग ठेवावे. उद्याची थोडीफार तरतूद करून ठेवावी,मात्र ती आजचा आनंद हिरावून घेणारी नसावी. पैसे असूनही माणसे भिकार्यासारखी वागतात, तेव्हा त्यांच्या जगण्याला जगणं म्हणायचं का, हाच प्रश्न आहे. भूत,वर्तमान आणि भविष्य यात सर्वाधिक महत्त्व आपण वर्तमानाला द्यायला हवं. गेलेला भूतकाळ आपल्याला खूप काही देऊन गेलेला असतो. त्यातून सुखाचे क्षण वेचून बाकीचे सारे विसरून आजचा वर्तमान आनंदाने जगाचा असतो. हाच आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. उद्याचे कोण काय बघितले आहे, असा विचार करत भविष्याची तमा न करता जगलं पाहिजे.

     आजचे काम उद्यावर ढकलू नका, ते आजच करा नव्हे आताच करा, असे आपल्याला सांगितले जाते. कारण उद्या उद्या करत वेळ मारून नेला जातो आणि काम काही होत नाही. त्यामुळे आजचे काम आजच नव्हे आताच करा, या उक्तीचा स्वीकार करायला हवा.आपल्यासाठी सर्वात अवघड काम कोणतं आहे, माहित आहे का पाहा. जर ते माहित नसेल तर ते जाणून घ्या. तुमच्यासाठी सर्वात अवघड काम आहे, ते म्हणजे तुम्ही काल करू शकला नाही ते! त्यामुळे आजचा म्हणजे वर्तमानाचीच काळजी घ्या,कारण भविष्य आपोआप तुमची काळजी घेणार आहे. तुम्हाला उद्यासाठी तयारी करायची असेल तर तुम्हाला आजचा सदुपयोग करायला हवा. उद्याच्या नादात आजचा दिवस वाया घालवला तर  तुमच्या आयुष्याला यशाचे पाठबळ मिळणार नाही. उद्याचे यशाचे शिखर पाहायचे असेल तर आज काळजी करत बसण्यापेक्षा यशाकडे लक्ष केंद्रित करत वाटचाल करा. मात्र आज सुखासाठी, आनंदासाठी लागणार्या वस्तूंचा त्याग करू नका. आजची गरज भागवा.त्यात कंजुषी करू नका.
     लक्षात ठेवा, गेलेल्या काळाकडे पाहून आपण जीवन समजू शकतो,पण येणार्या काळावर लक्ष ठेवून आपण जीवन जगू शकतो. तसं पाहायला गेलं तर अनुभवाशिवाय आपल्या पदरी काही मिळत नाही.फक्त त्यातून शहाणे होऊन आपल्याला आज जगता आले पाहिजे. कारण भविष्याची आपल्याला काहीच कल्पना असत नाही.त्यामुळे वर्तमानाची काळजी करायला हवी. तुम्ही गमावलेला काळ कधीही तुमच्या आजच्याशी बरोबरी करू शकत नाही. भूतकाळात आपल्या हातून चुका घडल्या म्हणून आणि उद्याची काळजी करत त्याची भिती बाळगत जगण्याने आजचा दिवस मात्र वाया जाणारा असतो. फक्त सकारात्मक विचार मनाशी ठेवा. महापूर किंवा दुष्काळ याचा विचार न करता प्रत्येक शेतकरी पुढच्या वर्षी आपण नक्की श्रीमंत होऊ असा विचार करतात. असा शेतकर्यांप्रमाणेच आपले विचार सकारात्मक ठेवा. खरे तर आपल्याला भविष्याबद्दल काहीच माहित नसते, त्यामुळे ते एका दृष्टीने बरेच आहे, असे म्हणायला हवे,कारण आपण एक क्षणही सुखाने जगू शकलो नसतो. भविष्याची काळजी ही अशा प्रकारची वाळवी आहे, जी आतल्या आत माणसाला पोखरून पोकळ करून टाकते.
     प्रत्येक माणसाचे जीवन फक्त वर्तमानातच स्थीर असते. कारण भूतकाळात तर काम होऊन गेलेले असते आणि भविष्यकाळ तर अनिश्चित असतो.गेलेल्या काळाचा वापर कसा करायचा, हे समजून घेतले पाहिजे. प्रत्येक समजूतदार माणूस भूतकाळापासून धडा घेऊन पुढे वाटचाल करत असतो आणि प्रत्येक मूर्ख भविष्याची काळजी करत झुरत असतो.
     आपण काय व्हायचे आहे, याचा विचार केला पाहिजे. कारण त्यादृष्टीने पावले टाकत राहिले पाहिजे. आपला वर्तमान सफल करण्यासाठी सतत आपले काम करत राहिले पाहिजे.वर्तमान चांगले असेल तरच भविष्यकाळ नक्की चांगले असते. तुम्ही उद्या कोण होणार आहे, हे आज ठरवित असतो, त्यावरूनच आपली वाटचाल राहायला हवी. तुम्ही आज काय करत आहात,यावरूनच तुमचे चांगले किंवा वाईट भविष्य नक्की होत असते.
     आपण नेकीने राहिलो, वागलो, आनंदाचे क्षण सुटू दिले नाहीत तर आपल्यासारखा सुखी प्राणी आणखी कोणी नाही. जिद्द,चिकाटी,मेहनत यांच्या जोरावर आजचे जीवन जगत असाल तर उद्याचा सुवर्ण काळ तुमचा आहे. इतिहासाच्या पानात यशस्वी माणसाच्या जीवनगाथा भरलेल्या असतात. तुम्हीही तुमच्या कामाने असे काही करा की, इतिहासदेखील तुमच्या यशाचा साक्षीदार व्हायला हवा. या जगात तीन प्रकारचे लोक असतात. पहिले इतिहासाचा अभ्यास करतात.दुसरे इतिहास लिहितात. त्यामुळेच इतिहासाच्या पहिल्या पानावर त्यांचे नाव असते.परंतु, तिसरे लोक या सगळ्यांपेक्षा खास असतात. कारण हेच तिसरे लोक इतिहास निर्माण करणारे असतात. त्यामुळेच संपूर्ण पुस्तकच त्यांच्यावर लिहिलेले असते.

Saturday, October 28, 2017

ध्येय गाठायचे असेल तर...

     आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर कोणते तरी एक ध्येय निश्चित केले पाहिजे. त्याशिवाय आयुष्याला दिशा मिळत नाही. अभ्यास करताना किंवा करिअरच्या वाटा शोधताना ध्येय निश्चित असेल तर मार्गक्रमण करताना कोणतीही अडचण येत नाही. एक ना धड भाराभर चिंध्या असा प्रकार झाला तर आयुष्यात काहीच करता येत नाही. त्यामुळे शाळा-कॉलेजपासूनची आपले एक ध्येय निश्चित केले पाहिजे. यात आपल्या आवडीला प्राधान्य दिल्यास सोन्याहून पिवळे! कारण आवड ध्येय गाठायला मदत करते. आवडीने काम करत राहिल्यास ते करताना कंटाळा येत नाही. आजवर जे प्रतिष्ठित,मान्यवर आपल्या आयुष्यात श्रीमंत झाले आहेत किंवा मोठ्या हुद्द्यावर पोहचले आहेत,त्यांनी आपल्या आवडीला प्राधान्य दिले आणि त्यात करिअर केले.त्यामुळे ध्येय निश्चित करताना आवडीकडे अधिक लक्ष द्यायला हवे.

     आपण एकदा का ध्येय निश्चित केले तर यश तुमच्यापासून लांब नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे.पुढे ध्येय गाठण्यासाठी विचार आणि परिश्रमपूर्वक प्रयत्न करायला हवा, हे खरे तर सांगण्याची गरज नाही. आपल्याकडे असलेल्या वैयक्तिक क्षमता आणि योग्यता यांच्यानुसार आपले जीवन चकाकू शकणारे आपले ध्येय असायला हवे. मार्गक्रमण करीत असताना आपल्या ध्येयाचा कधीही विसर पडता कामा नये,त्याच्यापासून भटकू नये, नाही तर ध्येयहीन झाल्यावर तुम्हाला जे काही मिळेल,त्यावरच समाधान मानावे लागेल. ध्येय मिळण्यासाठी आपल्या कामाला एका शिस्तबद्ध चौकटीत बांधून घ्या. योजना तयार करा. शिवाय वेळोवेळी आपल्या प्रगतीचे मूल्यमापन करा. कारण आवश्यक वाटल्यास आपल्या कार्यपद्धतीत बदल, सुधारणा करायच्या असतील,तर त्या करायला संधी मिळते.
     बारीक सारीक अपयशामुळे खचून जाऊ नये,यासाठी प्रामाणिकपणे आपल्या ध्येयाशी चिकटून राहा. कामाला प्राधान्य द्या. निराशा येईल, असे विचार मनात आणून नका.कायम सकारात्मक दृष्टीकोण ठेवा. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचायचे असेल तर तुमच्यात आत्मविश्वास ठासून भरलेला असला पाहिजे.त्याचबरोबर उत्साह आणि साहसदेखील असायला हवे. यातले एकही कमी होता कामा नये, नाहीत मग तुम्ही आपले ध्येय कधीच गाठू शकणार नाही. आपली नजर नेहमी आपल्या ध्येयावर खिळवून ठेवली पाहिजे. ज्याप्रमाणे अर्जुनाने माशाच्या डोळ्यावर आपला डोळा केंद्रीत केला होता तसे!
     ज्या व्यक्तीच्या जीवनात काहीही ध्येय नाही,त्या व्यक्तीचे जीवन झाडाच्या त्या तुटलेल्या फांदीसारखे असते, जे इकडे तिकडे भटकत तर असतेच,पण आयुष्यभर यशस्वी होत नाही. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे, ध्येय ठरविताना सकारात्मक विचारासोबत आपल्या शारीरिक,मानसिक आणि आर्थिक क्षमतेचे आकलन आवश्य करायला हवे. नाही तर मग तुमच्या वास्तविक क्षमतांच्या खूप पलिकडे असलेले तुमचे ध्येय असेल. कुबेराच्या संपत्तीप्रमाणे या संपूर्ण विश्वात इतरही विविध प्रकारची संपत्ती आहे. त्या संपत्तीची कवाडे तुमच्या योग्य ध्येय आणि समजूतदारपणा यामुळेच उघडू शकतात. एक लक्षात ठेवा कुणाला उत्तर देण्यासारखे आपल्याकडे काही आहे,म्हणून पक्षी गात नाहीत. तर त्यांच्याकडे गाण्यासारखे काही तरी आहे, म्हणूनच ते गात असतात. आपल्याकडे जे काही आहे,ते शोधता आले पाहिजे.

शिकवणी घेणार्‍या शिक्षकाची जबाबदारी मुख्याध्यापकावर कशी?

     शाळेतला शिक्षक खासगी शिकवणी घेत असेल तर आता त्याला जबाबदार संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाला धरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अर्थात हा मुख्याध्यापकावर सरळसरळ अन्याय आहे. आता मुख्याध्यापकाने शाळा सुटल्यावर शिक्षक काय करतो, कुठे जातो, काय पितो आणि काय खातो हे तेवढे पाहायचे बाकी राहिले आहे. शासनाने आपली जबाबदारी झटकण्याचाच बेजबाबदार प्रकार आहे. आधीच मुख्याध्यापकांना मानसिक त्रास कमी आहेत, त्यात याची एक भर! मुख्याध्यापकाने शाळा प्रशासन सांभाळायचे की, शिक्षकांचे खासगी आयुष्य तपासायचे? खरे तर अलिकडच्या काही वर्षात शिक्षक भरती झालेली नाही.त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिक्षकांची संख्या रिक्त आहे.त्यामुळे त्याचा भार दुसर्याला शिक्षकावर भडत आहे. तर काही ठिकाणी कंत्राट बेसवर शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. त्यांना तासिकेनुसार महिन्याला सात ते दहा रुपयांपर्यंत मानधन पडते. एवढ्यावर घरखर्चदेखील भाग नाहीत. त्यामुळे तो अधिक कमाई करण्यासाठी खासगी शिकवण्या घेणार तर काय करणार, असा प्रश्न आहे.

      खासगी विनाअनुदानीत शाळा-कॉलेजवर राबवणार्या शिक्षकांची तर फारच केविलवाणी अवस्था आहे. खरे तर शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करत असताना शिक्षकांनी खासगी शिकवणी घेणे किंवा एखाद्या संस्थेत अर्धवेळ नोकरी करणे बेकायदेशीर आहे. मात्र त्याला मानस्वरुपात मिळणारे वेतन महिन्याकाठी सात- आठ हजार येणार असेल तर त्याचा घरप्रपंच चालणार तरी कसा? मात्र मोठा पगार आणि नोकरीत कायम असलेला शिक्षक खासगी शिकवण्या घेत असेल तर जरूर त्याच्यावर कारवाई करायला हवी. मानधन बेसवर काम करणार्या शिक्षकांना याबाबत आडकाठी न घालता शिकवण्या घेण्यास परवानगी द्यायला हवी.
     वास्तविक बंदी मागचा उद्देश वेगळा आहे. मात्र यासाठी संबंधित शिक्षकाच्या खासगी शिकवण्या घेण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापकाला जबाबदार धरणे चूक आहे. शिक्षणसंस्था चालकाची काही जबाबदार आहे की, नाही? त्यांनी खरे तर शाळेसाठी पूर्ण वेळ काम करणार्या शिक्षकाचीच नेमणूक करायला हवी.मुख्याध्यापकाला या प्रकरणी जबाबदार धरून काय साध्य होणार आहे? शिक्षकांना पूर्ण वेतन द्या आणि अशा शिकवण्या घेणार्या शिक्षकांवर बिनधास्त कारवाई करायला हरकत नाही. मात्र स्वतंत्र समिती त्यासाठी शासनाने नेमायला हवी.त्यांच्या पाहणीत शिक्षक,प्राध्यापक दोषी आढळला तर कारवाई करण्याची जबाबदारी संबंधीत समितीवर सोपवा. अथवा शिक्षण संस्था चालकांना जबाबदार धरा. फार फार तर मुख्याध्यापक शिकवणी घेत नाही म्हणून हमीपत्र संबंधीत शिक्षकांकडून लिहून घेऊ शकेल, त्या उप्पर मुख्याध्यापक काय करणार आहे. हा आदेश शाळेतल्या शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचे संबंध बिघडणारा आहे. संबंधीत शिक्षक शाळेतल्या कामात कामचुकारपणा करत असेल, मुख्याध्यकावर त्याची काही तरी जबाबदारी राहणार आहे.शाळेबाहेर तो काय करतो?,याची जबाबदारी मुख्याध्यापक कशी घेऊ शकतो?
     अनेकवेळा शाळांमध्ये शिकवण्याऐवजी मुलांनी खासगी शिकवणीला यावे यासाठी शिक्षकांकडून प्रयत्न होतात. खासगी शिकवणीला आलास की, चांगले अंतर्गत गुण देऊ, असे अमिष दाखवले जाते.हे चित्र नाकारले जाऊ शकत नाही.अशा शिक्षकांवर कारवाई व्हायलाच हवी.मात्र कारवाई करण्याची अथवा त्यातील सत्यता तपासण्याची जबाबदारी एखाद्या नियुक्त समितील देण्याची गरज आहे. हा शिक्षण क्षेत्रातला मुख्य आजार आहे,मात्र त्याच्या उपचाराची जबाबदारी मुख्याध्यापकावर  सोपवून तो आजार बरा होणार आहे का? मात्र  कमी मानधनवजा पगारात काम करणार्या शिक्षकाच्या पोटापाण्याचे काय? रोज रोजंदारीवर जाणार्या अज्ञानी,कमी शिकलेल्या माणसाला आता रोज 300 ते 500 रुपये पगार पडतो. आणि पदवी आणि अध्यापन संबंधितचे प्रशिक्षण,पदवी-पदविका सारखे मोठे शिक्षण घेऊन शिक्षणाचे ज्ञानदान करणार्याला महिन्याला फक्त सात- आठ हजार रुपये? ये बहुतही ना इन्साफी है! शासन आपली जबाबदारी झटकून काय साध्य करणार आहे?

रोबोट: मानवाचा मित्र

      जपान सातत्याने घटणार्या जन्मदर आणि वयोवृद्ध लोकांच्या समस्येशी सामना करताना दिसत आहे. सध्याच्या घडीला 65 वर्षांपेक्षा अधिक वयाची लोकसंख्या जवळपास एक चतुर्थांश आहे. वृद्धापकाळातील जगणं तसं अनेक समस्यांनी घेरलेलं असतं. या कालावधीत त्यांना कुणाच्या तरी आधाराची गरज असते.हाच मोठा प्रश्न सध्या जपानकडे आहे.त्यांचे जीवन सुस्थितीत जाऊ दे, शेवटपर्यंत त्यांना सुखा-समाधानाचे जीवन जगता यावे,यासाठी जपान प्रयत्नशील आहे. त्यासाठी त्यांनी रोबोटिक टेक्नॉलॉजीचा आधार घेण्याचे ठरवले आहे. मात्र हे तंत्रज्ञान कितपत सहाय्यभूत ठरेल, हे प्रत्यक्षच पाहावे लागणार आहे.

     इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनच्या अंदाजानुसार 2019 सालापर्यंत जगभरात रोबोटिक किंवा या तंत्रज्ञानाशी जोडलेल्या गेलेल्या सेवांवर 135.4 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत खर्च केला जाईल.रोबोटचा सर्वात जास्त वापर आरोग्य सेवा आणि प्रोसेस मॅन्युफॅक्चरिंग उद्योगांमध्ये होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहेखरे तर आज रोबोट कित्येक कामाच्या क्षेत्रात मानवाच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करत आहे,पण आतादेखील अशा क्षेत्रांची कमतरता नाहीजिथल्या परिस्थितीनुसार मानवाच्या तात्काळ निर्णय घेण्याच्या क्षमतांचा विकल्प शोधणे सोपे नाहीकित्येक क्षेत्रांत मानवाचा उन्नत दृष्टीकोन आणि रोबोट हे दोन्ही एकत्र येऊन काम करू लागले तर मानवाची प्रगतीच आहेयाकडे लोकांचे अधिक लक्ष आहे.
     जगातला पहिला सायबोर्ग (सायबरनेटिक ऑर्गेनिज्मचे संक्षिप्त नावटाइप रोबोट हायब्रिड एसिस्टीव लिंब (एचएएलयाचे सर्वात मोठे उदाहरण आहे.जपानच्या सायबरडाइन कंपनीद्वारा बनवण्यात आलेला हा रोबोट सूट घालणार्या माणसाची शारीरिक क्षमता वाढवतोवास्तविकज्यावेळेला आपल्याला काही करायचं आहेजसं कीचालणे.तेव्हा आपण विचार करतो कीआपल्याला चालायचं आहेयासाठी जे आवश्यक संकेत आपल्या मेंदूतून त्या पेशींपर्यंत पोहचतात,ज्यांना ते काम करायचं आहे.हे संकेत मज्जातंतूच्या माध्यमातून पोहचतातया प्रक्रियेत फारच कमी संकेत आपल्या त्वचेवरही उमटतातहा रोबोट सूट हेच संकेत पकडतो आणि आपली ऊर्जा हे काम करण्यासाठी लावतो.या रोबोटिक सूटचा वापर बर्याच गोष्टींमध्ये किंवा परिस्थितींमध्ये केला गेला आहे.याचा एक प्रकार आहे,सिंगल जॉइंट,जो हात आणि गुडघ्याच्या सांध्याच्या रुपात केला जातोशिवाय अंथरुणावर पडलेल्या माणसाठीदेखील उपयोगाचा ठरला आहेत्याचबरोबर याचा होल बॉडी सूट आपत्कालीन बचाव आणि मदत कार्यासाठीदेखील लाभाचा ठरला आहे.
     2011 च्या विध्वंशकारी भूकंपानंतर जपानमधल्या एका वीज संयंत्रात झालेल्या अणूस्फोट अपघातात रेडिएशनदरम्यान मदतकार्य करणार्या लोकांनी हा सूट परिधान केला होताटोकियोच्या हानेडा विमानतळावर यातलाच लंबर प्रकारचा सूट मजुरांसाठी वापरला जातोअधिक वजन असलेला माल उतरवण्यासाठी याचा उपयोग होतो.
     आज जपान ज्या समस्यांशी लढा देत आहेत्याच समस्यांना आगामी काळात बाकीच्या देशांनादेखील तोंड द्यावे लागणार आहेअशा परिस्थितीत लोकसंख्येच्या या बदलाच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी जपानने जी सुरुवात केली आहेत्याकडे सगळ्यांनीच गंभीरपणे पाहणे,गरजेचे आहेभारतासारख्या देशाला तर खासकरून या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे आहेआपल्या देशातही वृद्धांची लोकसंख्या पुढच्या काही दशकात वाढणार आहेयादृष्टीने पेपर रोबोट उल्लेखनीय आहेहा रोबोट घरीच वृद्धांचा सांभाळ करतो आणि युवकांबरोबर त्यांचा सुसंगतपणा बसवण्याकामी फारच उपयुक्त सिद्ध होत आहे हा रोबोट सॉफ्टबँक या जपानी कंपनीने तयार केला आहेहा रोबोट वृद्धांची शारीरिक काळजी घेण्याबरोबरच त्यांची भावनात्मक दृष्ट्याही काळजी घेतो.
अलिकडेच सोनी कंपनीने पुन्हा एकदा रोबोटिक व्यवसायात उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहेआता त्याला 10 वर्षांपेक्षा अधिक वर्षे उलटली आहेत,ज्याला एबो नावाच्या रोबोटचे उत्पादन बंद करूनहा रोबोट दिसायला कुत्र्यासारखा होता.या खेपेलाही अशाच प्रकारचा रोबोट बनवण्याची इच्छा त्यांनी जाहीर केली आहे.हा मानवाचा सांभाळ,पोषणसारख्या नियमित गरजांसाठी उपयुक्त ठरेलअसा त्यांना विश्वास आहे.
     आता रोबोटसोबत राहणं,काही अवघड नाहीइथे कुणाला फसवण्याचाही प्रश्न येत नाहीआज या तंत्रज्ञानामध्ये वेगाने प्रगती होताना दिसत आहेजे लोकांना व्यावहारिक मदत करू शकतेइतिहासात खरे तर तंत्रज्ञानाच्या बदलामुळे कित्येकांना आपल्या नोकर्या गमवाव्या लागल्या आहेत.पण काही गोष्टींना आकार देण्याच्या कामी त्यांनी आपल्याला मदतदेखील केली आहे.त्यामुळे तंत्रज्ञान मानव विकासवाढीशी पुरते गुंतले गेले आहे.मानवाच्यादृष्टीने अशी काही कामं आहेतजे रोबोट करू शकत नाहीतत्यामुळे हा बदल सकारात्मकरित्या घेऊन पुढे जाण्याची गरज आहे.

कालबाह्य कॉम्प्युटर शिक्षण

     नव्वदच्या दशकात कॉम्प्युटर शिक्षणाला शालेय शिक्षणात स्थान देण्यात आलेपरिणामस्वरुप या शतकाच्या सुरुवातीलाच या क्षेत्रात  आपल्या देशाचा दबदबा वाढायला लागला.यात मध्यमवर्गीय यशाच्या कित्येक कहाण्या समोर आल्याजसे कीइन्फोसिस आणि अन्य स्वदेशी कंपन्याही होत्याज्या कंपन्यांनी लाखो युवकांना या क्षेत्रात करिअर बनवण्यासाठी प्रेरित केलेपण हे यश दीर्घकाळापर्यंत टिकू शकले नाही.देशात माहिती तंत्रज्ञानचा बाजार एकशे पन्नास अब्ज डॉलरचा आहे,जो देशाच्या जीडीपी (घरेलू सकल उत्पादन)च्या 9.5 टक्के आहे आणि संपूर्ण जगात 37 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देत आहे.अर्थव्यवस्थेला इतके महत्त्वपूर्ण योगदान देणारे हे क्षेत्र आज उत्पादकतेच्या दृष्टीकोनातून यासाठी मागे पडले आहे कीकॉम्प्युटर शिक्षणात नवोन्मेषची भारीच कमतरता आहेशिवाय बाजाराच्या मागणीच्या प्रमाणात तर फारच मागे आहेतंत्रज्ञानावर वाढलेले अवलंबन फायद्याचे तेव्हाच होईल,ज्यावेळेला माहिती तंत्रज्ञानचे शिक्षण महाविद्यालय आणि शाळास्तरावर अधिक गांभिर्याने शिकवले जाईल.
      कॉम्प्युटर शिक्षण दोन प्रकारच्या समस्यांचा बळी ठरला आहेपहिला प्रकार म्हणजे शाळांमध्ये अजूनही फोकस एमएस वर्ड,एक्सेल,पावर पॉइंट आदींवर दिला जात आहेदुसरा प्रकार हा कीकॉम्प्युटरची प्राथमिक भाषा शिकवण्याचा संपूर्ण जोर बेसिकसारख्या भाषेवर दिला जात आहेएकेकाळची प्रमुख कॉम्प्युटर भाषाजसे कीसी,लोगो,पास्कलकोबोल बेसिकजावा , या आता व्यवहाराच्या बाहेर फेकल्या गेल्या आहेत,त्याच भाषा आपल्याकडे  अजूनही अभ्यासक्रमाच्या भाग बनून राहिल्या आहेतखरे तर सध्या कॉम्प्युटर तंत्रज्ञानामध्ये प्रमुख देशांनी ओपन सोर्स सॉफ्टवेअर आणि ओपन सोर्स लँग्वेजचा स्वीकार केला आहेआर,पायथॉन,रुबी ऑन रेललिस्पटाइप स्क्रिप्टकोटलिनस्विफ्ट आणि रस्ट आदी कॉम्प्युटर भाषांचा वापर वाढू लागला आहेया भाषा सी,लोगोपास्कल,कोबोल बेसिकजावा इत्यादीच्या तुलनेत अधिक संक्षिप्त आणि सोप्या आहेत.या भाषांची मागणी  अशा क्षेत्रांमध्ये अधिक कामाच्या आहेतज्यांची आज खूप मागणी आहेउदाहरणच द्यायचे झाले तर आर्टिफिशयल इंटेलिजेंस आणि रोबोटिक्सचे देता येईल.
     आज प्रत्येक उद्योग माहिती तंत्रज्ञानाच्या भरवशावरच चालले आहेतमग ते निर्मिती,शस्त्रक्रियाभरती क्षेत्र असेल किंवा लेखा-वित्त आदी.सगळेच कॉम्प्युटरकृत होत आहेतग्राहकदेखील पहिल्यापेक्षा अधिक प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करू लागला आहेआता कॉम्प्युटर कौशल्य आणि त्याची भाषा अवगत करणं आवश्यक झालं आहेपण आपल्याकडे उच्चशिक्षणाची फारच वाईट अवस्था आहेशिक्षण संस्थांमध्ये प्रायोगिक कार्य आणि वास्तविक कोड निर्मिती करण्यासारखी परिस्थिती नाहीत्यामुळे कोणी कॉम्प्युटर पदवीधारक एखाद्या नोकरीमध्ये जाईल,त्यावेळेला कंपनीला त्याला शिकवावं लागणार आहेत्यामुळे कंपनीवरच अनावश्यक खर्चाचे ओझे वाढणार आहेत्यामुळे वेळही वाया जाणार,हे साहजिक आहे.
     2011 मधील आय नॅस्कॉमच्या एका अहवालानुसार देशातील 25 टक्के आयटी इंजिनिअर पदवी धारण केलेले युवकच फक्त या रोजगाराच्या लायकीचे आहेतआता तर सहा वर्षांनंतर परिस्थिती आणखी वाईट झाली आहेएस्पाएरिंग माइंड स्टडीच्या एका अहवालानुसार देशातील पाच टक्के कॉम्प्युटर इंजिनिअरच उच्च स्तरीय प्रोग्रामिंगसाठी उपयुक्त आहेतवेगाने डिझिटल होणार्या भारतात नवनव्या तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेषांना भारतीय कौशल्य विचारशक्तीमध्ये आणण्यासाठी अधिक मुक्त आणि प्रगत कॉम्प्युटर शिक्षणाच्या दिशेने नेण्यातच भले आहेअन्यथा एकेकाळी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर राहिलेल्या भारताचा प्रतिस्पर्धेच्या या बाजारात टिकाव लागणे कठीण आहे.


शिक्षक मित्रानों, शासनाला काय करायचे ते करू द्या

     राज्यातल्या प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेचा घोळ आता संपुष्टात आल्याचे दिसत आहे. परवाच ग्रामविकास खात्याचे सचिव असिम गुप्ता यांनी राज्यातल्या जिल्हा परिषद सीईओंशी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली.यात शासन बदलीवर ठाम असल्याचे दिसले. त्यामुळे शिक्षकांच्या बदल्या तब्बल सहा महिन्यानंतर होणार आहेत,हे आता स्पष्ट झाले आहे. या बदलीप्रकरणी शासनाने वरच्या कोर्टात स्टे  येऊ नये यासाठी कॅव्हेट दाखल केले आहे.मात्र आता शिक्षक संघटना वेगळाच मुद्दा घेऊन कोर्टात जाण्याची भाषा करत आहे. नियमानुसार ज्यांनी शिक्षकांना नेमणुका दिला,त्यांनाच बदल्याच अधिकार आहे, असा मुद्दा या शिक्षकांनी उपस्थित केला आहे. त्यांच्यामते ग्रामविकास खात्याला बदल्यांचा अधिकारच नाही. ते कशी काय बदली करू शकतात, असा त्यांचा प्रश्न आहे. अर्थात हे तांत्रिक मुद्दे आहेत. शासन यावर नक्कीच तोडगा काढेल,त्यामुळे बदल्या या होतीलच.त्यामुळे फार ताणत बसण्यापेक्षा शासनाला एकदा काय करायचे आहे,ते करू द्या, असेच म्हणायची वेळ आली आहे.

     ग्रामविकास खात्याकडून शिक्षकांना पगार अदा केला जातो. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या संस्था राज्याच्या ग्रामविकास खात्याअंतर्गत येतात.त्यामुळे उगाच कुठला तरी तांत्रिक मुद्दा घेऊन ऊठसुठ शासनाच्या विरोधात कोर्टात जाणे,योग्य नाही. शासन बदलीला ठाम आहे. कितीही शिक्षकांच्या संघटनांनी प्रयत्न केला तरी बदल्या या होणार,हे स्पष्टच दिसत आहे. उलट वारंवारच्या कोर्ट फेर्याने शासनही इरेला पेटले असल्याचे चित्र सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे. शासन स्तरावर एवढ्या मोठ्या पद्धतीने आणि ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया पहिल्यांचाच होत आहे. वास्तविक एकादी नवी योजना राबवत असताना काही प्रमाणात त्रुटी या राहणारच आहेत,मात्र त्या दूर करण्याचा आणि त्यातून बदल्यांमध्ये काही शिक्षकांवर अन्याय झाला तर त्या शासन स्तरावर दूर केल्या जातीलही. नाही तर अन्यायाविरोधात शासनाला कोर्टात खेचण्याचा अधिकार शिक्षकांना आहे.त्यामुळे या बदली प्रकरणांमुळे शिक्षक संघटनांना जी भिती आहे, ती बदल्या झाल्याशिवाय लक्षात येणार नाहीत. या बदल्यांबाबत शासनस्तरावरही ठोस अशी भूमिका स्पष्ट नाही,पण जो पर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण होणार नाहीत,तोपर्यंत त्यातल्या त्रुटी स्पष्ट होणार नाहीत.त्यासाठी बदल्या पहिल्यांदा होण्याची गरज आहे.
     ऑनलाईन बदली प्रक्रियेमुळे आता शिक्षकांच्या बदल्यांमध्ये जिल्हा परिषद,पंचायत समिती किंवा आमदार-खासदार यांचा हस्तक्षेप यापुढे होणार नाही.बदल्या या पारदर्शी होणार आहेत.त्यामुळे ज्यांच्यावर सतत अन्याय झाला आहे,त्यांना यातून दिलासा मिळणार आहे,तर ज्यांनी राजकारण्यांना हाताशी धरून अगदी घराजवळ, शेताजवळ नोकर्या केल्या त्यांची काही प्रमाणात अडचण होणार आहे. या बदल्यांमध्ये 20 गावे मागण्याचा अधिकार शासनाने दिला आहे.त्यामुळे शिक्षकांची फार मोठी अडचण होणार नाही. काही दोन-तीन टक्के शिक्षकांची गैरसोय होईल. अर्थात दर बदल्यांमध्ये होत आली आहे. तरीही त्या दूर करण्यासाठी मार्ग असणार आहे.
     शासन राज्य स्तरावर पहिल्यांदाच ऑनलाईन आणि इतक्या मोठ्या प्रमाणात बदल्या करत आहे. त्यामुळे सर्व्हर डाऊन होण्याचे प्रकार वाढले.यासाठी शिक्षकांना मोठा मनस्ताप झाला. शासनाला सातत्याने बदली सॉफ्टवेअरमध्ये बदल आणि विकसित करावा लागत आहे. वास्तविक शासनाने प्रायोगिक पद्धतीने एकादा जिल्हा या बदली प्रक्रियेसाठी घेण्याची गरज होती,त्यामुळे त्यांना येणार्या अडचणी समजल्या असत्या आणि त्यानुसार बदल करून ते राज्यभर राबवता आल्या असत्या. एकदम मोठा घास घेतला की,त्रास हा होणारच! तसा त्रास सगळ्यांनाच झाला. शिवाय त्यात शिक्षक आणि त्यांच्या संघटना बदल्या थांबवण्यासाठी कोर्टात गेल्या,त्यामुळे ही प्रक्रियाही लांबत गेली. अन्यथा आतापर्यंत या बदल्या कधीच झाल्या असत्या. शिक्षक कोर्टात घेतल्याने शासनाने काही पावले मागे घेत फक्त पहिल्या तीन संवर्गाच्या बदल्या करण्यास राजी झाले होते. त्यामुळे प्रत्येक मोजक्याच बदल्या होणार होत्या. मात्र शिक्षकांनी संवर्ग चारवर यामुळे अन्याय होतोय, अशी भूमिका घेत पुन्हा कोर्टाचे दरवाजे ठोठावले. शेवटी कोर्टाने सगळ्याच संवर्गाच्या बदल्या करा, असा आदेश देऊन आपल्या निर्णयावर ठाम राहण्याच्या सूचना शासनाला दिल्या. त्यानुसार आता सर्वच संवर्गाच्या बदल्या होणार आहेत. संवर्ग चारच्या बदल्या मे 2018 मध्ये होणार होत्या आता त्या शिक्षकांच्या आगाऊपणामुळे आता लगेच होणार आहेत. यात शिक्षक आणि शिक्षक संघटनांचा आततायीपणा नडला. आता तरीही शिक्षक संघटना शिक्षकांचा कैवार घेऊन कोर्टात जाण्याची भाषा करत आहे.त्यामुळे आता त्यांना गप्प बसा, असे म्हणण्याची वेळ आली आहे. शासनाला एकदा काय करायचे ते करू द्या. बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यावर उदभवलेल्या त्रुटीसाठी संघर्ष करा आता गप्प राहा, असा सुज्ञ सल्ला देण्याची गरज निर्माण झाली आहे. शिक्षकांनीही आता वेट आणि वॉचचे धोरण स्वीकारण्याची आवश्यकता आहे.

Friday, October 27, 2017

जीवनात पुढे जायचे तर ध्येय निश्‍चित करा

     जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात अगोदर कोणती गोष्ट केली पाहिजे तर पहिल्यांदा आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. ध्येय नसलेला माणूस समुद्रात भरकटलेल्या नावेसारखा आहे, असे म्हणायला हरकत नाही. ध्येय नसेल तर त्याला किनारा सापडणारच नाही. त्यामुळे आयुष्यात पुढे जायचे असेल तर कोणतेही एक ध्येय निश्चित केले पाहिजे. आयुष्यात खूप मोठे कष्ट केला,पण यश हाताला लागत नाही,कारण तिथे ध्येय नसते. मला कलेक्टर व्हायचे आहे, असे ध्येय निश्चित करून वाटचाल केल्यास त्याला कष्टाची,मेहनत,जिद्द,चिकाटी या गोष्टींचा हातभार लागला की, तुम्ही कलेक्टरच होताच.कारण कलेक्टर व्हायला काय काय करावे लागेल, कोणती दिशा पकडावी लागेल, असा मार्ग सापडतो.त्यामुळे त्यादिशेने वाटचाल सुरू राहते. महत्त्वाचे म्हणजे आपल्या जीवनात काही तरी ध्येय असायलाच हवे. एकदा ध्येय निश्चित ठरले की, त्यासाठी तुमच्या सर्व क्षमता वापरल्या जातात. क्षमतांचा पुरेपूर वापर झाला की, तुमचे ध्येय खूप जवळ असल्याचे तुम्हाला आढळून येईल.

     तुम्ही सगळ्याच गोष्टी करू, असे म्हटले तर ते शक्य होत नाही.कोणत्या तरी एका गोष्टीवर लक्ष केंद्रित केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. तुम्ही यशस्वी होणार नाही. समजा तुम्ही दोन बसच्या मागे धावत असाल तर तुम्ही एकही पकडू शकत नाही,कारण तुम्हाला कोणती बस पकडायची आहे आणि तिच्यातून कुठेपर्यंत प्रवास करायचा आहे, हेच तुम्ही नक्की केलेले नसते. त्यामुळे त्या दोन्हीही बस तुमच्या हाताला लागत नाहीत. तुम्ही तुमच्या जीवनाचे काही ध्येयच निश्चित केले नसेल तर तुमच्या नशिबात अपयश,त्रास आणि गोंधळ याशिवाय काहीच मिळणार नाही. कारण विटा आणि मातीच्या चिखलाला आपण इमारत म्हणू शकत नाही.
     खरे तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यात यश मिळवणे,प्रगती करणे आणि पुढे जाणे हे पहिले ध्येय असते,मात्र एक गोष्ट कळत नाही की, प्रत्येकजण आपले ध्येय गाठण्यासाठी विचारपूर्वक प्रयत्न का करत नाही? एके ठिकाणी मी दोन व्यंगचित्रे पाहिली, एकात एका मोठ्या माणसाच्या मागून एक तरुण त्याचे सामान अंगा-खांद्यावर घेऊन चालत असतो. त्या व्यंगचित्राखाली लिहिले होते, ज्यांचे काही ध्येय असत नाही,ते इतरांसाठी काम करतात. दुसर्या चित्रात सुटाबुटातली एक व्यक्ती पुढे आहे आणि त्याच्या मागे एक साधारण माणूस त्याचे सामान घेऊन चालतो आहे. त्याच्याखाली लिहिले होते- ज्यांचे ध्येय असते, त्यांच्यासाठी दुसरे लोक काम करतात. त्यामुळे आपल्याला आयुष्यात ध्येयाला किती नहत्त्व आहे,हे अधिक सांगण्याची गरज नाही.
     आता आपले ध्येय निश्चित झाल्यावर गप्प बसून चालणार नाही.ते गाठण्यासाठी धडपड तर करावी लागणारच आहे. आपले ध्येय गाठण्यासाठी माणसाने सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. कारण कुत्रेही काही शोधत निघाले तर त्यालाही कुठे ना कुठे, कशाचे ना कशाचे हाड सापडते. अशाच प्रकारे अगदी अज्ञानी व्यक्तीनेदेखील आपल्या ध्येयासाठी सतत प्रयत्न केले तर त्यालाही थोडे फार यश नक्कीच मिळते. आपल्या देशात असे अडाणी शेतकरी आहेत की, त्यांच्या प्रयत्नाने, अनुभवाने एक यशस्वी,प्रगतशील शेतकरी बनले आहेत. आपल्या आयुष्यात एकादे मोठे ध्येय ठरवले आणि ते मिळवण्यासाठी विचारपूर्वक प्रयत्न केले तर कधी ना कधी ते ध्येय गाठण्याची तुम्ही आशा कायम ठेवू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, आपल्याला कुठे जायचे आहे,हे ज्या व्यक्तीला माहित नाही,त्याला आपले ध्येय कधीच मिळवता येत नाही.
     जीवन फक्त एकदाच मिळते. त्यामुळे त्याचा सदुपयोग झाला पाहिजे. तुम्ही जर आपले योग्य ध्येय गाठण्यासाठी विचारपूर्वक प्रयत्न करीत जगत असाल तर तुम्हाला हवे ते मिळवण्यासाठी हे एकच जीवन पुरेसे आहे, हे लक्षात घ्या. एक लक्षात ठेवा,कोणते ना कोणते तरी ध्येय निश्चित करून तुम्हाला जीवनात पुढे जायचे आहे. पण तुमचे हे ध्येय प्राप्त करण्यासारखे असायला हवे.

आपली योग्यता

     आज कुठल्याही ठिकाणी योग्यता महत्त्वाची आहे. योग्यता असल्याशिवाय कुणी कुणाला आपल्या सावलीला उभे करू देत नाही.त्यामुळे योग्यता बनवायला लागते.ती सहजासहजी प्राप्त होत नाही.त्याच्यासाठी अपार कष्ट करायला लागतात.फक्त वय वाढून चालत नाही, तशी तुमच्यात योग्यताही यायला हवी.त्यामुळे आपल्या आयुष्यात योग्यतेला सर्वात वरचे स्थान आहे. आज योग्यता असल्याशिवाय नोकरी आणि छोकरीदेखील मिळत नाही. योग्यता असल्यावर मतदान करता येईल, ते कुणाला करायचे,ही योग्यता तुमच्या अंगी यायला हवी आहे. यासाठी आपला समाज,देश आणि समस्या समजून घेण्याची जाण आली पाहिजे. आपली योग्यता ओळखू न शकलेले आपल्या आयुष्यात कधीच काही ध्येयप्रेरित करू शकत नाही. अशांचे जीवन कुत्र्या-मांजरांसारखे आहे.

     योग्यता असलेली माणसे संधी शोधतात. ज्यांच्याकडे योग्यता आहे,तेच फक्त विशेष संधी आणि परिवर्तनासाठी नेहमी सज्ज असतात. त्यामुळे तुमच्याकडे चांगली योग्यता असेल,तर तुमचे सातत्यपूर्ण प्रयत्न तिला सर्वोत्तम करतात. तुमच्याकडे साधारण योग्यता असेल तर तुमचे सातत्यपूर्ण प्रयत्न त्यात सुधारणा करून तिचे विशेष योग्यतेत रुपांतर करतात. अशी प्रयत्नवादी माणसे कधीच मागे पडत नाहीत. सचिन तेंडुलकर, विराट कोहली असो किंवा आजही पंच्याहत्तर वर्षे पार केलेले  अँगी यंग मॅन अमिताभ बच्चन असो, त्यांनी सातत्याने आपल्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला म्हणून इथवर पोहचले.
     ऑफिसात अथवा अन्य कुठेही योग्यता असलेला माणूस असेल तर त्याचे वरिष्ठ बिनधास्त असतात. अशा माणसाकडे एक भरवशाचा व्यक्ती म्हणून पाहिले जाते. त्यामुळे योग्यता किती महत्त्वाची आहे, हे ध्यानात घ्यायला हवे. जर समजा आपल्या देशाचे लष्कर जर अयोग्य व्यक्तीच्या हातात दिले तर काय होईल? आज उत्तर कोरियाच्या हरकतीमुळे संपूर्ण जग चिंतेत पडले आहे. सनकी माणसाच्या हातात सत्ता गेल्यावर काय होते,याची कल्पना आपल्याला आली असेल. त्यामुळे योग्य माणसाच्या हातात सत्ता, जबाबदारी गेल्यास त्याच्यावर अवलंबून असलेली मानसे बिनघोरी असतात. योग्यता असलेला माणूस स्वत:बरोबरच जिथे कार्यरत असतो, तिथलीही प्रगती करत असतो. त्याच्या हातात कुणाचेही भवितव्य अंधारात असणार नाही. तो जिकडे जाईल,तिकडे आसमंत उजाळून टाकील, प्रकाशून टाकेल.
     आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, संधी योग्य व्यक्तीसाठीच असते. योग्य व्यक्तीच संधीचा लाभ घेऊ शकते,ते वेळेचा दुरुपयोग करीत नाहीत आणि नेहमी यशस्वीही होतात. योग्यता निर्माण करता आली की, पुढच्या गोष्टी सहजसाध्य आहेत. योग्यता असलेली व्यक्ती संयमी असायला हवी. योग्यता सिद्ध करावी लागते. आपली योग्यता इतरांसमोर जाहीर करायची असेल आणि इतरांनी आपल्या योग्यतेचा सन्मान करावा, असे तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही आधी इतरांकडे असलेल्या योग्यतेचा सन्मान केला पाहिजे. आयुष्यात यश मिळवायचे असेल तर त्याच्याकडे योग्यता असणे महत्त्वाचे आहे, हे धान्यात ठेवले पाहिजे.
     जाता जाता आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते, योग्यता असलेल्या माणसाकडे फार मोठी जबाबदारी येते.कारण तो त्याचा हक्क आहे. म्हणून तो काही बेजबाबदार वागत नाही. एकवेळ तो स्वत: काही बालंट अंगावर घेईल,पण दुसर्यावर ती जबाबदारी टाकणार नाही. एक लक्षात घ्या, योग्य व्यक्ती समाजाच्या आदराला पात्र ठरते, कारण योग्यता देश आणि समाजासाठी अतिशय उपयुक्त आहे.

युवकानों,इकडे लक्ष द्या

     आजच्या तरुण पिढीबद्दल सगळीकडेच प्रचंड नाराजीचा आणि काळजीचा सूर ऐकायला मिळतो.आजचा तरुण भरकटला आहे,व्यसनाधीन झाला आहे.संतापी बनला आहे, असे म्हटले जाते. अभ्यासूवृत्ती, संशोधनवृत्ती त्याच्यात उरली नाही.पहिल्यासारखी प्रगती त्याच्यात दिसत नाही.त्यामुळे या पिढीचे कसे होणार, याची काळजी करताना लोक दिसतात.वास्तविक यात काही चुकीचे नाही. आज होणारे खून-हाणामार्या यात तरुणांचा सहभाग अधिक आहे,हे नाकारून चालत नाही. वर्तमानपत्रात कुठे तरी एकादी बातमी एकाद्या तरुणाने कसल्यातरी परीक्षेत यश मिळवल्याचे वाचायला मिळते,मात्र त्याच पेपरात खून,मारामार्याच्या बातम्या अनेक असतात आणि त्या घटनेत तरुणांचा सहभाग अधिक असतो. हा विरोधाभास विचार करायला लावणारा आहे.

      परवा दोब दुचाकी वाहनांची धडक होता होता वाचली. यात दोन युवक सुपरफास्ट वाहन चालवत होते, तर दुसरा वाहन चालक ज्येष्ठ होता. ते तरुण अपघात झाला नाही,हे सुदैव पण त्या ज्येष्ठ माणसावर ओरडत होते,शिवीगाळ करत होते.म्हणजे चूक या तरुणांची होती तरीही चोर ते चोर वर शिरजोर होत त्या ज्येष्ठ माणसाच्या अंगावर धावून जात होते. शेवटी त्या ज्येष्ठ माणसाने ओळखले की, याचा तोंडाला लागण्यात अर्थ नाही. त्यामुळे आपली गाडी सुरू केली आणि गपगुमान निघून गेला. काय चाललंय काय या तरुणांच? यांना कुणी सांगणारं आहे की नाही, असा प्रश्न पडतो.ही पिढी अशीच वागत राहिली तर या देशाचं कसं होणार,हा काळजीचा सूर देशाच्या भवितव्यासाठी आहे. उद्या ज्यांच्या हातात आपला देश सोपवणार आहोत,त्यांचे वागणेच असे बेफिकीरीचे असेल तर देशदेखील बेफिकीरच राहणार आहे. मागच्या पिढीच्या जोरावर फार दिवस जगता येत नाही. त्यामुळे आजच्या पिढीने आता स्वत:साठी स्वत:च एक आचारसंहिता आखून घ्यायला हवी आहे.
     युवकांसाठी काही विचार त्यांच्याच आवडीच्या सोशल मिडियावर पाहायला मिळाले.तेच त्यांच्यासाठी इथे देत आहे. चांगले विचार वाचून सोडायचे नसतात,ते आत्मसात करायचे असतात. आज अशा चांगल्या विचारांचा वॉट्स अॅपवर,फेसबूकवर रतीबच घातला जात आहे,मात्र त्यांचा फारसा उपयोग होत नाही, असेच दिसते.ती वाचली जातात आणि सोडून दिली जातात.पण त्या विचारांवर गांभिर्याने विचार करायला सुरुवात केली तर फार चांगला फायदा युवकांचा होणार आहे.त्यासाठीच काही विचार इथे देत आहे.
     मघाशी ज्येष्ठाशी दोन तरुण कशी वागली,हे मी सांगितले आहे, त्यावरच हा विचार आहे. तरुण पिढीने ज्येष्ठांचा आदर करायला हवा, कारण काळासोबत तेही नंतर ज्येष्ठ होणार आहेत. उद्या ते म्हातारे झाल्यावर याहीपेक्षा वाईट वागणूक त्यांना त्यांची पिढी देणार आहे.त्यामुळे आज आपण सुधारलो तर अशा पद्धतीने उद्याची पिढी वागणार नाही,याचा विचार आताच्या पिढीने करायला हवातरुण मित्रानो, तुम्हाला हे माहित आहे का की, तुमच्यात जितकी क्षमता आहे, तितके अधिकार तुम्हाला प्राप्त आहेत किंवा पुढे प्राप्त होणार आहेत. जर माहित नसेल तर, ते जाणून घेण्यासाठी कामाला लागा. यातच तुमचे भले आहे.
     तरुण पिढी देश, समाज आणि जगाची आशा असते,कारण एके दिवशी संपूर्ण जगालाच त्यांच्यावर अवलंबून राहावे लागत असते. मोठी जबाबदारी या युवकांवर आहे,त्यामुळे आजच्या युवकांनी फार मोठ्या जबाबदारीने वागले पाहिजे. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे, तरुणांनी नेहमी सतर्क राहिले पाहिजे,कारण ही सतर्कताच त्यांना आयुष्यात यशस्वी होण्याचा मार्ग दाखवत असते. खरे तर आपल्या जीवनासाठी आवश्यक असलेले सर्व काही व्यक्ती तरुणपणीच मिळवित असते. ती व्यक्ती जर असे करू शकली नाही,तर समजून घ्या की, गरजांची आंधळी स्पर्धा आणि शर्यत यामध्ये ती मागे पडली आहे.
     शेवटी एकच सांगायचे आहे, जो कोणी असो, त्याच्या आयुष्याचा तोच शिल्पकार असतो.त्यानेच ठरवायचे आहे,त्याने कसे जगायचे. कोणी तरी म्हटले आहे, तरुण आशादायी असतात, त्यामुळे त्यांनी इतके सतर्क राहण्याची आवश्यकता असते की सहजपणे त्यांना कोणी फसवू नये.या जगात सक्षमपणे जगायचे असेल तर सावधपणे जगायला शिकले पाहिजे. नाही तर फसवायला माणसे टपूनच बसली आहेत.त्यामुळे आततायीपणा न करता चांगले आयुष्य जगायला शिका,कारण तुमच्यावर तुमच्या कुटुंबाचे,समाजाचे,देशाचे भवितव्य अवलंबून आहे.

Thursday, October 26, 2017

पाला-पाचोळा गोळा करून पर्यावरण राखणार्‍या आदिती देवधर

     शहरांमध्ये बंगल्यांसमोर, सोसायट्यांमध्ये झाडे लावण्याचा छंद एक चांगला संदेश देतो. झाडे लावा, झाडे जगवा, या आवाहनाला प्रतिसाद देत लोक शहरांमध्ये आपापल्या परीने झाडे लावतात. त्यांची काळजी घेतात. त्यामुळे शहरांमधल्या कॉलन्या, सोसायट्यांना एक प्रकारचा हिरवा टच येतो. मात्र या झाडांमुळे एक समस्याही निर्माण होते. ती म्हणजे वाळलेल्या पानांचा कचरा. बंगलेमालकांना अथवा सोसायट्यांच्या नोकरांना ही वाळलेली पाने गोळा करून जाळून टाकण्याचे एक कामच लागते. त्यामुळे कधी कधी लोकांना का झाड लावले, असे वाटणे साहजिकच आहे. शिवाय वारंवार हा झाडांच्या वाळलेल्या पानांचा कचरा गोळा करून जाळल्याने धूर होतो. लोकांच्या नाका-तोंडात जातो. लोकांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे पाला-पाचोळा गोळा करून कंपोस्ट खत करायला शेतकर्यांना दिला तर! हाच विचार पुण्याच्या आदिती देवधर यांच्या मनात आला आणि त्यांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरातील पालापाचोळा गोळा करून शेतकर्यांना फुकट द्यायला सुरुवात केली. यामुळे प्रदूषणापासून मुक्तता झाली आणि शेतकर्यांना कंपोस्ट खतासाठी कच्चे मटेरिअल मिळाले. कुठल्याही मोबदल्याशिवाय एक समाजसेवा म्हणून आदिती हे काम करत आहेत.

     आदिती यांचे शिक्षण एम.. पर्यंत झाले आहे. पर्यावरण राखण्यासाठी काही तरी करण्याची त्यांची इच्छा होती. नदी वाचवण्यासाठी त्यांनी 2014 मध्ये जिवंत नदी नावाची एक संस्था उभी केली. दरम्यानच्या काळात झाडांखाली, घर,बंगल्यांसमोर पडणारा पालापाचोळा जाळल्याने प्रदूषण वाढत असल्याने त्यांनी आजूबाजूचा पालापाचोळा गोळा करण्याचे काम करत होत्या.पण त्यांच्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न उभा होता, तो म्हणजे या पालापाचोळ्याचे करायचे काय? दरम्यान त्यांना पालापाचोळा गोळा करून त्याचे कंपोस्ट खत तयार करून आपल्या शेतात, बागेत घालणार्या सुजाता नफाडे यांच्याशी त्यांची ओळख झाली. यावेळेला त्यांना या पालापाचोळ्याचे महत्त्व समजले.
शहरातले लोक पालापाचोळा टाकाऊ पदार्थ आहे, असे समजून जाळून टाकतात, यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते. अर्थात निसर्गातील कुठलीच वस्तू बेकार किंवा टाकाऊ नाही, याची त्यांना कल्पना आली. साधारण नोव्हेंबर ते एप्रिल काळात पानगळती सुरू असते.जमिनीचा ओलावा राखण्याचे काम या पानांमुळे होते. विविध प्रकारचे किडे-कीटक या वाळलेल्या पानांच्या ढिगाच्या आश्रयाला येतात. मान्सून काळात हीच पाने कुजून त्याचे खत तयार होते. त्यामुळे जमिनीचा कस वाढण्यास मदत होते. अशा प्रकारे पालापाचोळ्याचे महत्त्व समजल्यावर त्यांनी ब्राऊन लिव्स नावाची वेबसाइट सुरू केली. यात पालापाचोळ्याची उपयोगितता आणि कंपोस्ट खत बनवण्याच्या विविध पद्धती याबाबतीत माहिती देण्यात आली आहे. या मोहिमेशी जोडले गेलेल्या आणि जोडले जाणार्या लोकांना याची माहिती व्हावी, हा उद्देश त्यामागे आहे. शिवाय अन्य गरजू लोकांनाही यामुळे माहिती मिळणार आहे.
     वेबसाइटबरोबरच त्यांनी एक फेसबूक पेजदेखील बनवले आहे. शिवाय वॉट्स अॅप ग्रुपसुद्धा बनवण्यात आला आहे.ग्रुपशी दोनशेपेक्षा जास्त लोक जोडले गेले आहेत. फक्त पुण्यातच नाही तर देशातल्या वेगवेगळ्या भागात पालापाचोळा वाचवण्यासाठी एक मोहीमच उघडली गेली आहेअर्थात हे लोक पैशांसाठी काम करत नाहीत. आर्थिक हितसंबंध यात नाहीत. प्रामाणिकपणे पर्यावरण वाचवण्याचे काम या ग्रुपच्या माध्यमातून होत आहे. या मोहिमेशी जोडलेले गेलेले लोक आजूबाजूचा पालापाचोळा गोळा करतात आणि ते पोत्यात भरून जे कंपोस्ट खत बनवतात,त्यांना नेवून देतात. यासाठी त्यांच्याकडून एक पैसाही घेतला जात नाही. या माध्यमातून लोकांना पाचोळा जाळण्यापासून परावृत्त केले जाते. सुखलेली पाने (पाचोळा) जाळल्याने दोन प्रकारचे नुकसान होते. एक म्हणजे विषारी धूर हवेत पसरतो. आपल्यासाठी ते धोकादायक आहे. आणि दुसरे म्हणजे जमिनीचा ओलावा कमी होतो. दुष्काळ पडण्याला अथवा तापमान वाढायला हेदेखील एक कारण आहे, असे आदिती देवधर यांना वाटते.
     एकट्या पुण्यात पालापाचोळा गोळा करणे आणि तो घेणे अशाप्रकारचे एक मोठे नेटवर्क तयार झाले आहे. काही शेतकरी किंवा बागायतदार त्यांच्याकडून हा गोळा केलेला पालापाचोळा घेऊन जातात. कित्येक हाऊसिंग सोसायट्या,काही कंपन्या आणि एक शाळा त्यांना हा कचरा गोळा करून देते. आता आदिती देवधर यांचे हे नेटवर्क निर्माल्यही गोळा करतंदेवाच्या पुजेसाठी वापरण्यात येणारे फूल,फळ,पाने व अन्य साहित्य एकत्र गोळा करून त्याचेही कंपोस्ट खत बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हे अभियान  इतके पुढे गेले आहे की,हैद्राबाद,बंगळुरू, नाशिक आणि दिल्लीसारख्या ठिकाणी सुरू आहे. तेथील लोक एकत्र येऊन पालापाचोळा गोळा करण्याचे काम करत आहेत. पुण्यातल्या महापालिकेच्या अधिकार्यांनीही त्यांच्याकडे पालापाचोळा गोळा करण्यासंदर्भात मदत मागितली आहे. ही चळवळ लोकप्रिय होत आहेच शिवाय याचे नेटवर्क जाळेही हळूहळू इतर शहरांमध्ये पसरत आहे. लोकांना योग्य मार्गदर्शन केल्यास त्यांची चांगली मदत पर्यावरण रक्षण करण्यास होते.

Wednesday, October 25, 2017

पेन्शनच्या पैशांतून खड्डे मुजवणारा अवलिया

     आपल्याला माहिती आहे, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आपल्या देशातील शहरांची अवस्था काय झाली आहे. आपल्या देशात सगळ्यात अधिक अपघात रस्त्यांमधील खड्ड्यांमुळे होत आहेत. या अपघातामुळे मृत्यू पावणार्यांची संख्याही काही कमी नाही. जखमींची तर गणतीच नाही. रस्त्यांवरील खड्ड्यांची एक मोठी समस्याच आहे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था अथवा पाटबंधारे विभाग याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असतात. त्यामुळे या खड्ड्यांचे करायचे काय, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. (सध्या सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत यावर बराच गदारोळ उठला आहे. नागरिक रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आंदोलन करीत आहेत.) मात्र हैद्राबादमधल्या निवृत्त रेल्वे इंजिनिअरने यावर तोडगा काढला आहे. त्याने चक्क आपल्या मासिक पेन्शनमधून रस्त्यांवरील खड्डे मुजवण्याचा विढा उचलला आहे. आतापर्यंत त्याने हजाराहून अधिक खड्डे बुजवले आहेत. आता तर ते यासाठी पूर्ण वेळ काम करीत असून त्यांच्या अमेरिकेतल्या मुलानेदेखील त्यांना द्यायला सुरुवात केली आहे.

     अशा या अवलियाचे नाव आहे,गंगाधर टिळक कटनम.त्यांचा जन्म सध्याच्या तेलंगणा राज्यातील येर्नाद्यूम नावाच्या गावात शेतकरी कुटुंबात झाला.त्यांनी आपल्या आयुष्यातील 35 वर्षे रेल्वेमध्ये वरिष्ठ इंजिनिअर पदावर काम करत घालवले.2008 मध्ये सेवेतून निवृत्त झाल्यावर आपल्या मुलाकडे अमेरिकेला राहायला गेले. पण तिथल्या वातावरणात रमले नाहीत. दोन वर्षातच ते माघारी मायदेशात आले. इथे आल्यावर त्यांनी हैद्राबादमधल्या एका सॉफ्टवेअर एजन्सी कंपनीत सल्लागार म्हणून काम करू लागले. याच दरम्यान एकदा त्यांच्या गाडीतून ऑफिसला जाताना त्यांच्या मनाला स्पर्शून जाणारी एक घटना घडली. त्या घटनेने त्यांच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली.
     झाले होते असे, रस्त्यावरून गादीतून जाताना खड्ड्यातल्या पाण्यात चाक गेले आणि त्यातले चिखलमय पाणी शेजारून चाललेल्या शाळकरी मुलांवर उडाले.या घटनेने ते अस्वस्थ झाले. पुढे अशीच घटना त्यांच्यासोबतही घडली. अशा घटना पुन्हाही त्यांच्याबाबतीत घडल्या. शिवाय एका रस्ता अपघातात एका अॅटो रिक्षावाल्याचा जीव गेला.त्याला वेगात असलेल्या बसने ठोकर मारली. त्यामुळे मात्र त्यांनी याबाबतीत काही तरी करावे हवे, याचा विचार करायला सुरुवात केली. आणि शेवट आपण स्वत:च खड्डे बुजवायचे या निर्णयावर झाला. आपल्या पेन्शनच्या पैशांतून खड्डे बुजवायलादेखील त्यांनी सुरुवात केली. अर्थात असले काम त्यांच्या बायकोला आवडले नाही. त्यांनी असले काम करण्यास मज्जाव करूनही गंगाधर आपले काम करीत राहिल्याने शेवटी त्यांच्या पत्नीने आपल्याला मुलाला अमेरिकेतून बोलावून घेतले. मुलगा अमेरिकेतून आला खरा,पण त्याने आपल्या वडिलांना समजावून सांगण्यापेक्षा आपल्या आईलाच समजावून सांगू लागला. उलट त्याने वडिलांचे कौतुक केलेच शिवाय त्यांच्या कामाला हातभार लावायला तयार झाला.मुलाचा हा व्यवहार त्यांना आणखी उत्साह देणारा ठरला.
     महापालिकेच्या प्रशासनाला अथवा सरकारला सांगून सगळ्या प्रश्नांची सोडवणूक होणार नव्हती. त्यामुळे हे खड्डे आपणच मुजवायचे असा निर्णय पक्का झाल्यावर ते जिथे कुठे जात, तिथे जाताना आपल्या गाडीत खड्डा मुजवण्याचे आवश्यक साहित्य सोबत घेऊन जाऊ लागले. सुरुवातीला ते जिथे कुठे रस्त्याचे काम सुरू होते, तिथून खडी वगैरे घेऊन जाऊ लागले. नंतर ते साहित्य मिळेनासे झाले. त्यामुळे त्याची खरेदी करून रस्त्यावरील खड्डे मुजवण्याचे काम सुरु ठेवले. त्यांना रेल्वेकडून बर्यापैकी पेन्शन मिळत होती, त्यामुळे त्यांनी नंतर खड्डे मुजवण्याचा पेशा म्हणूनच पत्करला. ॠल्लागाराची नोकरीदेखील त्यांनी सोडली. ही नोकरी त्यांनी त्यांचा वेळ जावा,यासाठी पत्करली होती. 2010 पासून सुरू झालेली ही खड्डे मुजवण्याची मोहीम अजूनही सुरू आहे. आतापर्यंत एक हजाराहून अधिक खड्डे मुजवण्याचे काम केले. दरवर्षी ते खड्डे मुजवून आपली दिवाळी साजरी करतात.यंदाही त्यांनी अशीच दिवाळी साजरी केली.