Tuesday, December 24, 2019

(तात्पर्य 1) पूर आणि देव


एकेकाळी एका गावात भयंकर पाऊस पडला. ज्यामुळे गावात पूर आला.  गावात एक माणूस राहत होती, ज्याचा देवावर अटल विश्वास होता.  पूर आला तेव्हा सर्व गावकरी सुरक्षित ठिकाणी जाऊ लागले.  हे लोक त्या माणसालाही आपल्यासोबत यायला सांगत होते.  परंतु तो म्हणाला की तुम्ही सर्व निघून जा,  देवावर माझा पूर्ण विश्वास आहे, तो मला वाचवायला येईल.  हे ऐकून गावातील लोक निघून गेले.  हळूहळू संपूर्ण गावात पुराचे पाणी पसरले. आता पुराचे पाणी त्याच्या  गुडघ्यावर  येऊ लागले. आता बचावकर्ते नाव घेऊन त्याला न्यायला आले.  पण त्याने पुन्हा तेच उत्तर दिले की माझा देव मला वाचवण्यासाठी येईल.  बचावकर्ते निघून गेले.

तरुणांमध्ये बहिरेपणा वाढला


आज आपण मोबाईलला आपला अविभाज्य घटक मानला आहे. अनेकांच्या त्याच्या शिवाय पान हलत नाही. दिवसभर हातात नाहीतर खिशात आणि रात्री उशाला हा मोबाईल असतो. अर्थात त्याची गरज नाकारता येत नसली तरी त्याला आपण सर्वाधिक मूलभूत गरज मानली आहे. तरुणांनी त्याच्याबरोबरच त्याच्याशी संलग्न असलेले आणखी एक गॅजेट जवळ केले आहे,ते म्हणजे हेडफोन. प्रवास करताना, वाहन चालवताना, रस्त्यावर,बाजारात इकडे तिकडे फिरताना माणसे त्यातल्या त्यात तरुण पिढी कानाला हेडफोन लावून वावरत असते.  हेडफोनचा वापर किती, कसा करावा, यासाठी काही एक मर्यादा असणे आवश्यक आहे. अर्थात ही मर्यादा स्वत:ची स्वत: घालून घेणे उत्तम.

Wednesday, December 18, 2019

(बालकथा) मैत्रीचा अर्थ


सोनू आणि मोनू आज फारच आनंदात होत्या. आज त्यांना त्यांची वर्गमैत्रीण शुभांगीच्या वाढदिवस पार्टीला जायचं होतं. शुभांगी त्यांच्या वर्गातील सर्वात श्रीमंत मुलगी होती. तिचा वाढदिवस फाइव स्टार हॉटेलमध्ये साजरा केला जात असे. या निमित्ताने तिच्या वर्गातील सर्वच मुले एक दिवस फाइव स्टारच्या मेजवानीची मजा लुटायचे.
संध्याकाळचे चार वाजले होते,पण अजून शुभांगीच्या गाडीचा ड्रायव्हर त्या दोघींना घ्यायला आला नव्हता. सोनू मोनूला म्हणाली, “ ताई, शुभांगी तर म्हणाली होती की, तीन वाजता ड्रायव्हरकाका आपल्याला न्यायला येतील म्हणून...पण आता चार वाजले. असं तर नसेल, शुभांगी तिच्या ड्रायव्हरला आपलं नावच सांगायला विसरली...आपण आता पार्टीला जातोय की नाही कुणासठाऊक? ”
सोनूचे बोलणे ऐकून मोनू म्हणाली, “ तू फार काही काळजी करू नकोस, वाट पाहण्याचे फळ गोडच असते. ”

(बालकथा) संगतीचा परिणाम

भैरूला चोरी करण्याची खूप वाईट सवय लागली होती. त्याची बायको त्याला कित्येकदा समजावून सांगायची आणि वाईट माणसांच्या संगतीपेक्षा चांगल्या माणसांची दोस्ती करा म्हणायची.पण त्याच्यावर कोणत्याच गोष्टीचा परिणाम व्हायचा नाही. तो म्हणायचा की,संगत चांगली असो वा वाईट, ती माणसाला बदलू शकत नाही. त्याची बायको आता समजावून सांगून थकली होती.

Tuesday, December 17, 2019

इथे स्वयं गणपती बाप्पाने दिली होती आपली मूर्ती

(चिंतामण गणेश मंदिरसीहोरमध्यप्रदेश)
देशभरातील गणपतीच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक मंदिर आहे सीहोर येथील चिंतामण गणेश मंदिर.सांगितलं जातं कीयेथील गणपती बाप्पा आपली प्रार्थना लवकर ऐकून घेतातआपली चिंता दूर करतात आणि इच्छा पूर्ण करतात.येथील चिंतामण गणेश भारतातल्या चार स्वयं मूर्तींपैकी एक आहेसीहोर येथील गणपतीबाबत सांगितलं जातं कीभगवान गणपती आजही इथे साक्षात मूर्तीच्या रुपात वास करतातअसं म्हटलं जात कीबाप्पाचे इथे पवित्र मनाने पूजन केल्यावर कधीही आपल्या भक्तांना रिकाम्या हाताने माघारी पाठवत नाहीतयाच कारणामुळे गणेश उत्सवानंतर भक्तांची अलोट गर्दी असते.

Sunday, December 15, 2019

(बोधकथा) उच्च विचार


एकदा एका व्यक्तीने पाहिले की, एक गरीब मुलगा मोठ्या उत्सुकतेने त्याची किंमती ऑडी कार न्याहळत होता. त्या गरीब मुलावर तरस खाऊन त्या श्रीमंत व्यक्तीने त्याला आपल्या कारमध्ये बसवून त्याला फिरायला घेऊन गेला. थोड्या वेळाने फिरून आल्यावर मुलाला त्याने खाऊ-पिऊ घातलं. गाडीतून उतरताना मुलाने विचारलं,  साहेब, तुमची कार खूप चांगली आहे. ही खूपच महाग असेल ना?
श्रीमंत व्यक्ती मोठ्या अभिमानाने म्हणाली,  हो, लाखों रुपयांची कार आहे.
गरीब मुलगा म्हणाला,  कार विकत घेण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागले असतील नाही?

(मोटीवेशन) यशाची ऑनलाईन डिलिव्हरी शक्य नाही


ऑनलाईन शॉपिंग आणि फूड डिलिव्हरीच्या जमान्यात तुम्ही एकाद्याला विचारलंत की, तुम्हाला आयुष्यात काय हवंय तर उत्तर एकच येईल-कम्फर्टेलबल लाइफ. क्लिक अँड डन आताच्या या काळाने आयुष्याला काही अधिकच कम्पर्टेबल बनवलं आहे. आमच्या गरजा तर केवळ एका क्लिकच्या अंतरावर आहेत पण लक्ष्य, त्याचं काय? कम्पर्टेबल लाईफच्या चक्क्ररमध्ये  आम्ही आमच्या लक्ष्यापासून बाजूला सरकलो आहोत. आम्हाला वाटतं की, प्रत्येक लक्ष्य सहजपणे मिळेल. त्यामुळे आम्ही आता कठोर मेहनतची सवय विसरून गेलो आहे. पण आम्हाला लक्ष्य प्राप्त करण्यासाठी आपल्या आरामदायी जीवनशैलीला लगाम घालायला हवा. आपल्याला लक्ष्य गाठण्यासाठी त्यावर फोकस करायला हवं. आपलं लक्ष भटकतं राहिलं तर कधीच सफलता मिळणार नाही. आम्हाला दृढ संकल्पाबरोबरच आपलं ध्येय मिळवण्यासाठी मेहनत करायलाच हवी. यशाला कुठलं शॉर्टकट नाही. तुम्हाला कष्ट करायलाच हवे.धैर्य राखणं आणि नव्या गोष्टी शिकत राहणं महत्त्वाचं आहे.

( बालकथा) समजूतदार सारिका


रविवारचा दिवस होता. सारिका आनंदात होती,कारण ती बाबांबरोबर आज संध्याकाळी चार वाजता रंकाळा बघायला जाणार होती. ती शाळेचा गृहपाठ लवकर पूर्ण करण्याच्या नादात होती. तिसर्या वर्गात शिकणार्या सारिकाने खरोखरच चार वाजेपर्यंत आपला गृहपाठ पूर्ण केला. तेवढ्यात तिच्या बाबांनी तिला हाक मारली, “ सारिका बाळा, तयार हो लवकर. ”
सारिकाच्या आईने बाबांना येताना भाजीपाला आणायला सांगितला. बाबा सारिकाला म्हणाले, “ सारिका जा बरं, जरा स्कूटर पूसून घे.”
ती लगेच आवरून स्कूटर पुसायला निघून गेली. तिने भाजीपाला घ्यायला एक पिशवीही घेतली आणि स्कूटरच्या डिकीत ठेवून दिली. मग आपले हात धूवून बाबांना म्हणाली, “ चला बाबा. ”

Friday, December 13, 2019

(मोटीवेशन) यशासाठी निवडा- लाइफ लाइनी


प्रत्येकजण यशाच्या वाटेवर चालायला तयार असतो. या वाटेत कित्येकदा अशा संधी येतात, त्याने तुमचं आयुष्य बदलून जाईल, पण तेव्हा तुम्हाला नेमकं काहीच सुचत नाही. तुम्हाला वाटतं की, अडचणींवरचा मार्ग सुटणार नाही आणि मग तुम्ही निराश व्हायला लागतात. पण कामादरम्यान नेहमी चार लाइफ लाइन तुमच्यासाठी तयार असतात. कौन बनेगा करोडपतीप्रमाणेच या लाइफ लाइनींचा तुम्ही वापर केलात, तर तुमच्या अडचणींवर मार्ग निघू शकेल. कित्येकदा प्रोफेशनल लाइफमध्ये तुम्ही अडचणीत सापडता. कळत नाही की, काय करायचं? पण लक्षात ठेवा- कौन बनेगा करोडपतीच्या धर्तीवर अडचणीच्यावेळीदेखील चार लाइफ लाइनी नेहमी मदतीसाठी धावून येतात.

(मोटीवेशन) आनंदी रहा... आयडिया सुचतील


एकाद्याला विचारून बघा, त्याच्या आयुष्याचे ध्येय काय आहे? कोणी म्हणेल- चांगलं करिअर, तर कोणी म्हणेल चांगलं आयुष्य. आणखीही अशीच काहीतरी उत्तरं येतील. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सारी ध्येये तेव्हाच पूर्ण होऊ शकतील, जेव्हा माणूस खूश, आनंदी असेल. जर तुम्ही आनंदी राहाल तरच तुमच्या आयुष्यातली सर्व स्वप्ने पूर्ण होतील. नोकरी असेल किंवा बिझनेस, काम करण्याची एनर्जी तेव्हाच मिळेल, जेव्हा तुम्ही आनंदी रहाल. आनंदी असाल तेव्हाच तुमचं डोकं मोकळं राहील. आणि चांगल्या चांगल्या आयडियाज येतील. खरोखरच एकादी आयडिया तुमचं लाइफ बदलू शकेल. त्यामुळे आनंदी राहा. आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीकडे नव्या दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा. मग पहा, जगसुद्धा तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहील आणि लोक म्हणतील-मित्रा! इतक्या आयडिया तुझ्या डोक्यात येतात तरी कोठून? आयुष्यात पुढं जायचं असल्यास तुमच्याजवळ युनिक आयडिया असायला हवी. तरच तुम्ही या गर्दीतून वेगळा सिद्ध करू शकाल. आता अडचण अशी आहे की, आयडिया काही झाडाला लागत नाहीत. आयडिया डोक्यात तेव्हाच येतात, जेव्हा माणूस आनंदी राहतो आणि डोकं खुलं ठेवतो.

(बालकथा) वाईट सवय

एका शहरात एक श्रीमंत माणूस राहत होता. तो आपल्या मुलाला ज्या ज्या वेळेला त्याच्या वाईट सवयी सोडण्यास सांगतो, तेव्हा त्याचे एकच उत्तर असते," अजून मी खूप लहान आहे. हळूहळू त्या सवयी सोडून देईन." पण तो कधीच सवयी सोडण्याचा प्रयत्न करत नसे.खूप समजावून सांगूनही त्याने सवयी सोडल्या नाहीत. त्याच दिवसांमध्ये एक संत माणूस शहरात एका आश्रमात उतरला होता. त्यांचा खूप नाव लौकिक होता. श्रीमंत माणसाने आपल्या मुलाला त्यांच्याकडे नेले आणि आपली समस्या सांगितली. संत महात्म्याने आश्रमातल्या बागेतील एका रोपाकडे बोट दाखवून म्हटले," तू ते रोप उपटू शकतोस का?"

(बालकथा) उचला जबाबदारी


एक जमीनदार होता. त्याची खूप शेती होती. शेतात पीक जोमदार होतं. तो रोज सकाळी  उठून शेतावर जायचा.  मजुरांसोबत शेतीच्या विकासावर चर्चा करायचा. काही अडचण आल्यास,ती सोडवण्याचा प्रयत्न करायचा. संपूर्ण गावात सर्वाधिक उत्पन्न तो घ्यायचा.  वय वाढत गेलं तसा तो आजारी पडू लागला. त्याच्या मृत्यूनंतर शेतीवाडीची संपूर्ण जबाबदारी त्याच्या मुलावर येऊन पडली. खूप संपत्ती असल्याने  त्याला शेतीचे फार काही वाटत नव्हते. त्याला रोज सकाळी शेतावर जायची गरज वाटत नव्हती. यासाठी मजूर लोक ठेवले होते. पण यावेळी त्याला शेतीत घाटा आला. निम्म्यापेक्षा अधिक पीक जनावरांनी खाल्ले होते. काहींना कीड लागली होती.

Thursday, December 5, 2019

आजची मुले रोगाच्या कचाट्यात


आधुनिक जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या बदलत चाललेल्या सवयींमुळे आपला देश कुपोषण, लठ्ठपणा आणि बिगर संसर्गरोगांनी ग्रस्त होत चालला आहे. कंप्रिहेसिव नॅशनल न्यूट्रीशन सर्व्हे ( सीएनएनएस) नुसार देशातील बालके आणि किशोरवयीन मुलांच्या अभ्यासादरम्यान ही माहिती समोर आली आहे. हा सर्व्हे गेल्या काही दशकातील आपल्या समाजात होत असलेल्या तीव्र आर्थिक आणि सामाजिक बदलाच्या दिशेने बोट दाखवत आहे. सर्व्हेमध्ये बालकांच्या खाण्यापिण्याविषयी आणि होणार्या रोगांविषयी अभ्यास करण्यात आला आहे. पण खाणपिणं किंवा रोग बर्याच प्रमाणात सामाजिकतेशी सबंधित असतात. यातून आर्थिक परिस्थितीदेखील समोर येते. हा अहवाल भीतीदायक आहे कारण गेल्या काही वर्षांत बालकांमध्ये आणि किशोरवयीन मुलांमध्ये डायबिटीज, हायपरटेन्शन आणि किडनी संसर्गाचे रोग वाढले आहेत.

Wednesday, December 4, 2019

मायक्रो-प्लास्टिक आणि आपण

आपण आपल्या देशातील प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी मोठे अभियान चालवत आहोतजगभरात जवळपास सगळ्याच ठिकाणी अशाप्रकारची अभियाने चालवली जात आहेतसध्या तरी आपला पहिला प्रयत्न एकदा वापर केला जाणार्या प्लास्टिकपासून मुक्तता मिळवण्याचा आहेकारण ते जगाच्या प्लास्टिक प्रदूषणामध्ये मोठी भूमिका निभावत आहेया प्लास्टिकबरोबरच आणखी एक आव्हान आपल्यासमोर उभे राहिले आहेते म्हणजे मायक्रो-प्लास्टिकचेमायक्रो-प्लास्टिक म्हणजे प्लास्टिकचे बारीक बारीक कण.सुक्ष्म कण.  जे सहज डोल्यांना दिसत नाहीतहे कण सर्वत्र आहेतया हवेत आहेतज्या हवेतून आपण श्वास घेतोत्या पाण्यात आहेतज्या पाण्याचा आपण वापर करतोत्या अन्नात आहेजे आपण खातो.

रस्ते अपघातांमध्ये घट

रस्ते अपघात आपल्यासाठी मोठा चिंतेचा विषय बनला आहेइतर देशांच्या तुलनेत आपल्या देशात रस्ते अपघातांची आणि बळींची संख्या मोठी आहेरस्त्यांवरील मोठमोठे खड्डेदारू पिऊन वाहन चालवणेबेदरकार वाहन चालवणे,वाहतुकीचे नियम मोडणेअधिक काळ वाहन चालवणे अशी अनेक कारणे वाहन अपघातांची आहेतअलिकडच्या काळातील तरुणाई तर वाहनांना खेळणे समजून बेदरकारपणे वाहन चाालवताना दिसत आहे.त्यांना आपल्या जीवाची तर पर्वा नाहीच,पण दुसर्याच्या जीवाचीही काळजी वाटत नाही.

न्याहारी,स्मृतिभ्रंश आणि ब्रेन सफाई

आपल्या शरीराला व्यायाम महत्त्वाचा आहे. व्यायामामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहते. उत्साह येतो. ऊर्जा खर्च होते. त्यामुळे डॉक्टर मंडळी नेहमी व्यायाम करा,फिरायला जात जा असा सल्ला आपल्या रुग्णांना देत असतात. व्यायामाबरोबरच सकाळी नाश्ता केला जावा, असे सांगितले जाते. आपल्या आयुर्वेदातसुद्धा व्यायाम करण्याची वेळ सकाळी नाश्त्याच्या अगोदर योग्य असल्याचे म्हटले आहे. याला एका संशोधनाने पुष्टी मिळाली आहे. 'द जर्नल ऑफ क्लिनिकल एन्डोक्राइनोलॉजी एन्ड मेटाबोलीजम' मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शोधात म्हटले आहे की, व्यायाम केल्याने इन्सुलिन लेव्हल योग्य राहते आणि हार्मोन्स सुद्धा योग्यरीत्या स्त्रावतात. त्याचबरोबर ऊर्जा योग्यप्रकारे खर्च होते. 

वैद्यकीय शिक्षण स्वस्त व्हायला हवे

आपल्याकडे वैद्यकीय सेवा सुविधा आणि डॉक्टरांची कमतरता असल्याने अनेकदा रुग्णांना गंभीर प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या कमी असल्याने त्याच बरोबर हे शिक्षण कमालीचे महागडे असल्याने अनेक युवकांना वैद्यकीय शिक्षण घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे. यासाठी मुळात खासगी शिक्षण देणाऱ्या संस्थांना अधिक फी घेण्यापासून रोखण्याची आवश्यकता आहे. तरच डॉक्टरांची संख्या वाढण्याबरोबरच सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे.

किशोरवयीन मुले आणि क्रिकेट

आपल्याला माहीत आहे, क्रिकेट हा आपल्या देशातल्या लोकांचा श्वास आहे. सर्वाधिक क्रिकेट वेडे भारतात आहेत. भारतीय क्रिकेट संघ मैदानावर असेल तर देशातले लहान थोर एक तर टीव्ही समोर असतात किंवा क्रिकेट स्कोर जाणून घेण्यासाठी सतत मोबाईलशी खेळत असतात. जिथून कोठून माहीत मिळेल,तिथून सातत्याने ती मिळवण्याचा प्रयत्न करत  असतात. शाळा,कॉलेज, सरकारी,खासगी  कार्यालये इथली कामकाजी यंत्रणा या काळात काहीशी सुस्तावलेली असते. पण क्रिकेटबाबत उत्साह असतो.  याच क्रिकेटचे वेडामुळे भारतातील किशोरवयीन मुले इतर देशातल्या किशोरवयीन मुलांपेक्षा शारीरिक दृष्ट्या सक्षम असल्याचा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) दिला आहे.

प्रिय भक्त कोण?

एकदा नारद मुनी फिरत फिरत विष्णू लोक पोहोचले.  त्यांनी विष्णू देवास विचारले,'परमेश्वरा, तुमचा प्रिय भक्त कोण आहे?'  नारद मुनी यांना त्यांचे नाव घेतले जाईल,अशी अपेक्षा होती, कारण ते प्रत्येक क्षणी 'नारायण' या शब्दाचा जपमाळ करत असत. पण भगवान विष्णू म्हणाले,'पृथ्वीवर राहणारा सुखीराम नावाचा शेतकरी माझा प्रिय भक्त आहे.' सुखीराम यांचे नाव ऐकून नारद मुनी लगेच पृथ्वीवर पोहोचले.  त्यांनी पाहिले, सुखराम सकाळी एकदाच देवाचे नाव घेतो आणि मग बैल घेऊन शेतात निघून जातो.  तेथे तो दिवसभर शेतात नांगरतो  आणि संध्याकाळी घरी येतो.

Sunday, November 3, 2019

महिला सशक्तीकरण: काल आणि आज


भारतीय संस्कृतीमध्ये नारीला सन्मानजनक वागणूक देण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. आपल्या वैदिक शास्त्रांत म्हटलं गेलं आहे,'यत्र नार्यस्तु पूजयंते, रमयंते तत्र देवता'.हिंदू सनातन धर्मात माता दुर्गेला जगाचे पालन करणारी ,त्यांचे कल्याण करणारी आणि दृष्टांचा संहार करणारी अधिष्ठात्री देवी मानली गेली आहे. गार्गी, सावित्री, सीता,कौशल्या आणि कुंतीसारख्या अनेक विदुषी नारींच्या व्यक्तिमत्त्व,त्याग आणि साहसाच्या गाथा आजदेखील आपल्या समाजात ऐकल्या,वाचल्या जातात. भारतीय समाजाच्या विविध कालखंडांवर नजर टाकल्यावर आपल्याला लक्षात येईल की, महिलांना वैदिक काळात कुंटुंबात,समाजात आदराचे स्थान होते. तत्कालीन समाजात अशी धारणा होती की,नारीशिवाय पुरुषाला धर्म,कर्म, अर्थ,काम आणि मोक्षाची प्राप्ती होऊ शकत नाही.

Friday, November 1, 2019

सगळीकडे भानगडीच भानगडी


काही दिवसांपूर्वी मी विचार करत होतो की, मी कुठल्या भानगडीत तर पडलो नाही ना? खूप विचार केल्यावर मी या निष्कर्षाला आलो की, नाही!आपण कुठल्याच भानगडीमध्ये पडलो नाही. मला माझा अभिमान वाटला. मग पुन्हा विचार केला , का आपण कुठल्या भानगडीत पडलो नाही? हा विचार करताना बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. अर्जून महाभारताच्या रणांगणावर आपल्याच नातेवाईकांविरोधात लढायला उभा होता. त्याच्या पुढे प्रश्न पडला होता की, आपल्याच माणसांचा संहार कसा करायचा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला,'ब्रम्ह सत्य,जगत मिथ्या'. याचा अर्थ हे दिसणारं जग सत्य नाही,ब्रम्हच सत्य आहे. त्यामुळे अर्जुना तू या जगताच्या भानगडीत पडू नकोस. हे सर्व फसवं आहे. आजच्या कलियुगात तर आपल्याला फारच विचित्र गोष्टी पाहायला मिळत आहेत. आजची मुलं आईबापांना एक तर आश्रमात पोहचते करत आहेत किंवा वाऱ्यावर सोडत आहेत. माझ्याच परिसरातील एक घटना आहे. आईवडिलांना गावाकडेच टाकून मुले पुण्या-मुंबईला स्थायिक झाले आहेत.

जग उजळेल

दोन दिवे खास मित्र होते.  एकत्र राहायचे.  त्यातील एक दिवा थोडा मोठ्या आकाराचा होता.  दिवाळीच्या रात्री घराचा मालक आला. त्याने मोठा दिवा पेटवला.
 दिव्याने परिसर उजळून निघाला. मोठ्या दिव्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने विचार केला
 की,आपण रात्रभर उजळत राहू  आणि मालकाला आनंदित करून टाकू. कोणताही  दुसरा दिवा माझ्याशी स्पर्धा करू शकणार नाही. मी माझ्या प्रकाशाने संपूर्ण घर उजळून टाकेन.  मग त्याचा मित्र त्याच्या जवळ येऊन उभा राहिला.
छोटा दिवा म्हणाला, 'मित्रा, मला पण  प्रकाश दे, जेणेकरून मलादेखील अंधार कमी करण्यास हातभार लावता येईल.  मीही यासाठी योगदान देऊ शकतो.  मोठा दिवा बढाई मारत म्हणाला, ' तू काय प्रकाश देशील? यासाठी मी एकटा पुरेसा आहे.'  लहान दिवा गप्प राहिला. मोठा दिवा एकट्याने घर उजळून टाकण्याचा प्रयत्न करू लागला. पण संपूर्ण घर उजळून टाकण्यास तो असमर्थ ठरला.

Wednesday, October 30, 2019

'धन्यवाद...' शब्द खूपच महत्त्वाचा


मराठी मध्ये 'धन्यवाद...' आणि इंग्रजीमध्ये थँक्स… हे दोन शब्द खूपच महत्त्वाचे आहेत. हे शब्द आपल्या आयुष्याला  उन्नत करतात.  आपल्याला नेहमी सुखी ठेवतात. खरे तर एखाद्याला आपल्या यशाचे श्रेय देणे सोपे नसते. पण लक्षात ठेवा, जर आपण एखाद्याचे आभार मानत असाल तर याचा अर्थ असा की, तुम्ही यशाच्या मार्गावर आहात.
मानवी स्वभाव  असा आहे की, आपल्या हातून काही चुकले तर  त्याचे खापर आपण इतरांवर फोडायला लागतो. अशा आपल्या वागण्यामुळे आपलेच नुकसान होते. आपल्या चुकीचे खापर दुसऱ्यावर फोडायची गरज नाही,पण माणूस स्वभाव आहे. कारण आपण आपली चूक मान्यच करत नाही.

संघटनेत ताकद असते

एकदा कबुतरांचा एक गट अन्नाच्या शोधात भटकला.  बराच वेळ उड्डाण करूनही त्यांना खायला काही मिळालं नाही.  'कंटाळा आला आहे.' सगळे कबूतर म्हणाले.
 कबुतरांना धैर्य देत त्यांचा मोरक्या  कबूतर म्हणाला की, 'आणखी थोडे प्रयत्न करो. आपल्याला नक्कीच काहीतरी मिळेल.'  पुढे गेल्यावर त्यांना जंगलात पुष्कळ धान्य विखुरलेले दिसले.  सर्व कबूतर खूष झाले आणि शेतात उतरे आणि दाणे टीपू लागले.  अचानक त्यांच्यावर मोठे जाळे पडले.  ते सर्व त्यात अडकले.  त्यांना काहीच कळेना काय करावे. तेवढ्यात त्यांना एक शिकारी त्यांच्याकडेच येताना दिसला.  सर्व कबूतर घाबरून गेले.

Tuesday, October 29, 2019

अनुवादाचे विश्व


आजच्या युगात इंग्रजी आणि हिंदी भाषेचे ज्ञान असणे  सामान्य असले तरी  महत्त्वाचे आहे. हिंदी ही आपली अधिकृत राजभाषा आहे. मात्र इंग्रजीशिवाय या जगात प्रगती करणे कठीण आहे.  एवढेच नाही तर या दोन भाषांमधील आपले ज्ञान चांगले असेल तर आपल्याला करिअरसाठी एक चांगला पर्यायही मिळतो.  आज प्रत्येक क्षेत्रात इंग्रजी-हिंदी  अनुवादकांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.  जर आपल्याला भाषांतरात रस असेल तर आपण घरी बसून पैसे कमवू शकता.  चांगल्या अनुवादकासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वेळोवेळी इंग्रजी-हिंदी भाषांतर जगतात होणारे बदल, ट्रेंड आणि वादविवादाची जाणीव असणे आवश्यक आहे.

खरे सामर्थ्य

एका  जंगलामध्ये सिंहाची खूप दहशत होती.  तो रोज जंगलातल्या प्राण्यांना मारू खात असे. सर्व विचलित झालेल्या प्राण्यांनी एक दिवस परिषद घेतली आणि त्यामध्ये सिंहाला बोलावले. सिंहाने प्राण्यांना या परिषदेचा हेतू विचारला.  प्राण्यांचा प्रतिनिधी म्हणाला," महाराज,तुम्ही आम्हाला मारून खाणे स्वाभाविक आहे हे आम्हास ठाऊक आहे.  परंतु रोज एकापेक्षा अधिक प्राणी मारणे योग्य नाही.  आमचा असा प्रस्ताव आहे की, आम्ही रोज एक प्राणी तुमच्या गुहेपर्यंत पाठवून देऊ. तुम्ही त्याला मारून आपली भूक भागवत जा.शिवाय तुम्हाला  शिकार करण्यासाठी भटकावेही लागणार नाही. सिंहाला हा प्रस्ताव पसंद पडला.  तो म्हणाला,"मी हा प्रस्ताव मान्य करतो पण माझी शिकार वेळेवर पोहोचली नाही तर मी तुम्हा सगळ्यांना ठार करीन." 

... कारण उद्या कधीच येत नाही.


दोन मित्र होते.  त्यांनी एकत्र शिक्षण घेतले.  दोघांचेही एकच स्वप्न होते, स्वता:चा व्यवसाय सुरू करायचा. शाळा, एकाच  महाविद्यालयात आणि एकच शिक्षण घेऊनही या दोघांमध्ये बराच फरक होता.  एका मित्राला व्यवसाय सुरू करण्यासाठी घरून आर्थिक मदत मिळाली, तर दुसर्‍या पालकांची भांडवल चांगल्या महाविद्यालयात शिकण्याचे मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेले.  आर्थिक स्थितीतील हा फरक होताच,पण   या व्यतिरिक्त या दोघांच्या स्वभावातही तफावत होती.  समृद्ध वातावरण असलेल्या मित्राला आपले काम उद्यावर ढकलण्याची सवय होती. दुसऱ्या मित्राच्या वाट्याला दुर्लक्षित जीवन आले होते. त्यामुळे तो  प्रत्येक गोष्टींचे  महत्त्व त्वरित समजावून घेत असे आणि त्याला लगेच  सामोरा जात असे. समृद्ध मित्राने व्यवसाय उघडला परंतु दुसरा मित्र एका कंपनीत कामाला लागला. 

Monday, October 28, 2019

संकटातून धडा शिका...


संकटाच्या वेळेतून  आपल्याला धडा मिळतो. सुरुवातीला आपण ज्या त्रासांपासून दूर पळत होतो, ते आपल्यासाठी मार्ग बनले. आयुष्यात तुम्ही आणि आम्ही बर्‍याचदा अडचणीत सापडतो, प्रथमच असे दिसते की अडचणींमधून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही.  पण आश्चर्यकारक असं काही घडतं की , आम्ही माणसं प्रत्येक वेळी अडचणींवर विजय मिळतो आणि पुढे जातो.  अडचणींशी आपण दोन हात करतो,तेव्हा कळतं की आपल्यात किती सामर्थ्य आहे. मला असे वाटते की, आपण देखील काहीतरी करू शकतो. अडचणी सोडवल्या जातात, परंतु आम्ही काही गोष्टी या धड्यांमधून शिकतो. जगातील कोणतीही शाळा शिकवू शकत नाही असे काही धडे आपल्याला यातून मिळतात. असे धडे कठीण काळानंतरच आपल्यापर्यंत येतात.

दररोज काहीतरी नवीन शिका...

 माणूस जन्म घेतो, जग पाहतो आणि गोष्टी शिकतो.  पण तो जसजसा मोठा होत जातो,तसतशी त्याच्या मनातून उत्सुकता कमी होऊ लागते.  आपल्याला काहीतरी मोठे करायचे असेल, यशस्वी व्हायचे असेल तर दररोज काहीतरी नवीन शिकण्याची सवय लावली पाहिजे.  प्रत्येक मनुष्याला काहीतरी नवीन आणि मोठे करावेसे वाटत असते.  यासाठी प्रत्येकजण कठोर परिश्रम देखील करतो, परंतु आपणास हे माहित आहे की मोठे स्वप्न साकारण्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळे करावे लागेल, जे इतरांपेक्षा वेगळे असेल.

Sunday, October 27, 2019

गर्भपातात महाराष्ट्र आघाडीवर


आपल्या देशात अनेक कारणांनी गर्भपात होतात. गर्भाची वाढ व्यवस्थित नसल्यापासून ते मुलगाच हवा हा अट्टाहास आणि अनैतिक कारणाने वाढलेला गर्भ पाडण्यापर्यंत अशी अनेक कारणं आपल्याला यासाठी सापडतील. आपल्या पुरोगामी राज्यात हा गर्भपाताचा आकडा थक्क करणारा आहे. राज्यात दरवर्षी 1 लाख 70 हजारांहून अधिक गर्भपात होत असल्याची आकडेवारी सांगते. विशेष म्हणजे यासाठी जनजागृती मोहिमदेखील मोठ्या प्रमाणात राबवण्यात येते,पण त्याचाही काही उपयोग झाला नसल्याचे दिसून येते.  या गोष्टीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
गर्भपाताची अनेक कारणं आपल्याला सापडतील.

Friday, October 25, 2019

हिवाळ्यात पावसाळा...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालादिवशी एक पोस्ट व्हॉटस अपवर फिरत होती. "आजचा दिवस संमिश्र अनुभवांचा.. भाजपने विजयात पराभव अनुभवला...
 राष्ट्रवादीने पराभवात विजय अनुभवला... शिवसेनेने वरळीच्या विजयात बांद्र्याचा पराभव अनुभवला...
 इतरांनी दुसऱ्यांच्या पराभवात स्वत:चा विजय अनुभवला...आणि महाराष्ट्रातील जनतेने नेहमी प्रमाणेच ....हिवाळ्यात पावसाळा अनुभवला...
राज्याच्या निवडणुकीच्या निकालानंतरचे चित्र हे असे आहे. 220 जागांची मॅजिक फिगर भाजप-सेना युतीला गाठता आली नसली तरी युतीची सत्ता मात्र अबाधित राहिली आहे. या खेपेला भाजपच्या 20 जागा घटल्या तर शिवसेनेच्या सहा जागा कमी झाल्या.महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या निवडणुकीत गेमचेंजर बनले.

Thursday, October 24, 2019

प्रांतोप्रांतीची दिवाळी


भारतातील सर्वच प्रांतात दिवाळी उत्साहात साजरी केली जाते. मात्र प्रांतात त्याची रूपं विविध आहेत. त्यातल्या विधींत वैविध्य आढळते. उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत थोड्या फार वेगळ्या आहेत. या बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
जम्मू-काश्मीर: काश्मिरात दोन दिवसांची दिवाळी असते. जे हिद आहेत, ते नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजन करतात. दिवाळीत इथे पुरुषांच्या कपाळावर शंकराच्या तिसऱ्या डोळ्याप्रमाणे लाल कुंकवाचा डोळा काढतात. या लालभडक तिलकामुळे सर्व दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यापासून दूर राहतात, असा समज प्रचलित आहे.

फटाके फोडा पण जपून


हल्ली फटाके फोडायला कोणतेही निमित्त पुरेसे असते. लग्नापासून तर निवडणुकांपर्यंत. वाढदिवसापासून निवडीपर्यंत काहीही कारण पुरेसं आहे. फटाके हवेच. त्यात दिवाळी म्हटली तर विचारुच नका.  हा सणच फटाक्यांचा आहे. आपल्याकडे दिवाळी हा सण फटाके फोडून पारंपरिकरित्या सर्वत्र साजरा केला जातो. लहान मुले या सणाची उत्सुकतेने वाट पाहतात. कारण त्यांना फटाके वाजवून मजा करायची असते. मोठ्यांनाही यानिमित्ताने आपली हौस भागवता येते.  परंतु, बरेच लोक फटाके फोडल्याने होणारे आजार याबाबतीत अनभिज्ञ असतात. फटाके फोडताना इजा होते, नाकातोंडात धूर जातो. मात्र फटाके फोडताना योग्य ती काळजी घेतल्यास दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करता येतो.

Wednesday, October 23, 2019

पोषण मोहिमा अपयशी का?

प्रगत महाराष्ट्रात 80 हजारच्या आसपास कुपोषित बालके आहेत आणि तब्बल सव्वा पाच लाख बालके कुपोषणाच्या उंबरठ्यावर आहेत. हा मोठा काळजीचा प्रश्न असून हा चिंतेचा विषय गांभीर्याने घेण्याचा विषय आहे. विशेष म्हणजे यासंदर्भातल्या जनजागृतीवर वर्षाला 144 कोटी खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे फक्त जनजागृती करून भागणार नाही तर पालक आणि शासनाच्या काय अडचणी आहेत, हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे. बरीच मुले अंगणवाडीत येत नाहीत. पालकांमध्ये अज्ञान आहे. गरिबी आहे. या प्रश्नांची सोडवणूक होण्याची गरज आहे.
आदिवासी भागातील मुलांच्या कुपोषणाची एक वेळ गोष्ट आपण मान्य करू,मात्र सर्व सेवा आणि सुविधा पोहचलेल्या ग्रामीण भागातील चित्रही भयंकर असल्याने शासनाचे नियोजन कुठे तरी चुकते आहे,हे मान्यच करायला हवे. ग्रामीण भागात सर्वदूर शिक्षण पोहचले आहे. याहीपेक्षा अधिक वेगाने मोबाईलद्वारा तंत्रज्ञान पोहचले आहे. या तंत्रज्ञानाच्या जोरावर कुपोषणावर मात करता येते का, याचा विचार होण्याची गरज आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून कुपोषित बालकांपर्यंत आपण पोहचायला हवे आणि त्याला सुदृढ करण्याच्या दृष्टीने पावले उचलायला हवीत. जवळ पास साडेपाचशे प्रकल्प कुपोषित बालकांसाठी राबवले जात आहेत.

Friday, September 13, 2019

मुनव्वर सुलताना: अफसाना लिख रही हूं


चित्रपट सृष्टीची नशा काही औरच असते. आणि त्यात ज्यांच्या चित्रपटांना जबरस्त यश मिळालेले असते, अशांना त्यापासून दूर राहणं अवघडच असतं. मुमताज, नीतू सिंह, श्रीदेवी यांच्यापासून माधुरी दीक्षितपर्यंत अनेक अभिनेत्रींनी लग्न केल्यानंतर चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला होता. पण त्या काही वर्षांनी पुन्हा परत आल्या. मात्र अशा काही अभिनेत्रीही आहेत, ज्या लग्नानंतर चित्रपट सृष्टीला कायमचा रामराम ठोकला. परत त्यांनी वळूनही पाहिले नाही. अशाच अभिनेत्रींपैकी एक मुनव्वर सुलताना! त्यांच्यावर चिित्रित करण्यात आलेले अफसाना लिख रही हूं... हे गाणे त्यावेळी फारच गाजले होते. त्यांचा 15 सप्टँबर स्मृतिदिन. त्यांच्याबद्द्ल थोडेसे...

किमती हास्य


हसायला पैसे पडत नाहीत, असं म्हटलं जातं. या छोट्याशा वा़क्याचे विश्लेषण केल्यास खरोखरच याचा विस्तृत आणि खोल दडलेला अर्थ निघून आपल्यासमोर येईल. माणसाचे शरीर संवेदनांनी भरलेले आहे. हास्यगाणे-रडगाणे, सुख-दु:,आनंदाचे आसू- दु:खाचे आसू या माणसाला आतर्बाह्य हेलावून सोडणार्या गोष्टी आपल्या जीवनातले विविध रंग आहेत. या पृथ्वीवर मनुष्य असा एकमेव प्राणी आहे, जो हसतो, रडतो, गातो आणि गुणगुणतो. प्राणी आणि पक्ष्यांमध्येदेखील हसण्या-रडण्याचे त्यांचे भाव असतील आणि त्यांची एक भाषाही असेल पण ज्या अर्थाने आणि भावनेमध्ये आपण मनुष्याला हसताना पाहतो, तसे हसताना कोणत्या पशू- पक्ष्यांना आपण पाहिले आहे काय? आपल्या चेहर्यावर ज्या भावमुद्रा उमटतात, तशा भावमुद्रा इतर प्राण्यांमध्ये-पक्ष्यांमध्ये पाहायला मिळत नाही. हेच आपल्या मनुष्य प्राण्याचे वैशिष्ट्य आहे.

Friday, September 6, 2019

आपल्या जीवनाला दिशा देणारी माणसं शिक्षकच!

सूचकशैवव वाचको दर्शकतास्तथा।।
शिक्षको बोधकशैव षडेते गुरव: स्मृता:।।
अर्थात प्रेरणा देणारे, माहिती सांगणारे, सत्य सांगणारे, मार्गदर्शन करणारे, शिक्षण देणारे आणि बोध करणारे  हे सगळे आपल्याला गुरू समान असतात.
जे आपल्याला अक्षराचे ज्ञान देतात, तेच आपले शिक्षक असतात, असे नाही. जीवनात जे काही योग्य आहे त्याचे मार्गदर्शन करून भव सागर पार करायला मदत करतात ते गुरू. अर्थात हे कोणीही असू शकतात. लहान मोठा, श्रीमंत गरीब, शिक्षित अशिक्षित. एकादी घटना किंवा अनुभवसुद्धा आपला शिक्षक बनू शकतो. गुरुदेव या नामाने प्रसिध्द असलेले कवी, नाटककार आणि साहित्यकार रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं होतं की, प्रत्येक झाड पहिल्यांदा जमिनीवर पडलेलं एक बीज असतं.

Thursday, September 5, 2019

सुख-दु:खाचा फेरा...

मानवी जीवन सुख-दु:खाने भरलेलं आहेकधी सुख तर कधी दु:ख ठरलेलं आहेसुखासीन फुलांच्या पाकळ्यांवर लोळताना दु:खाचे काटे बोचणारचसुख-दु:ख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेतडाव घेताना छापा-काटा करायची वेळ येते,तेव्हा आपला मर्जीचा छापा यावा,म्हणून आपण देवाला हात जोडत असतोछापा आला कीआपण अक्षरशआनंदाने उड्या मारतोतो आनंद स्वर्गीय असतोपण सतत सुखाची अपेक्षा करणं चांगलं असलं तरी वाट्याला दु:ख आलं म्हणून हिरमसून जायचं नाहीत्याला हसत तोंड द्यायचंहसत तोड देतोतेव्हा दु:ख हलकं होतंजर एकादी व्यक्ती दु:खाला तोंड द्यायला घाबरतेरडू लागते,तेव्ह अडचणींचासमस्यांचा डोंगर वाढायला लागतो.पण ज्यावेळेला व्यक्ती दु:खाला पाहून हसते,तेव्हा अडचणी नाहीशा होतात

Saturday, August 31, 2019

(लघुकथा) अलका


मंगलाबाई सोफ्यावर बसून 'राम जप' लिहीत होत्या. रामराव सकाळपासून चारदा वाचलेला पेपर हातात घेऊन टाईमपास करत होते. तेवढ्यात एका खांद्यावर पर्स लटकवलेली दुसऱ्या हातात मोठ्या पिशवीचे ओझे सावरत अलका आत आली. सासुकडे हास्य नजर टाकून  तशीच ती आत गेली. मंगलाबाईच्या रागाचा पारा चढला. त्या रामरावांकडे  तीक्ष्ण नजर टाकत म्हणाल्या,"पाहिलंत का? कार चालवायची आणि टॉप जीन्स घालण्याची काही गरज होती  का?''

(बालकथा) अब आया उंट पहाड के नीचे

उंटानं पहाड कधी पाहिला नव्हता. त्याच्या बाबतीत कधी काही ऐकलं नव्हतं. त्यामुळे आपल्यापेक्षा मोठा आणि उंच कोणी नाही, या पौढीत होता. एक दिवस झाडांची पानं खातं तो एका खुल्या मैदानात आला.  एक शेळीही  झाडांची पानं खात खात तिथे आली. आपल्या शरीराचा गर्व  बागळणारा उंट म्हणाला, "बघ, माझं शरीर किती बलाढ्य आणि उंच आहे."

Thursday, August 29, 2019

प्राथमिक शाळेत खेळ अनिवार्य हवा


अलीकडे विविध क्रीडा क्षेत्रातील खेळाडू जागतिक स्तरावर चमकत असताना दिसत आहेत. जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधूने अंतिम फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहाराला नमवून सुवर्णपदक आपल्या नावावर केले. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पी. व्ही. सिंधू पहिली भारतीय खेळाडू ठरली. हिमा दास ही एक भारतीय धावपटू आहे. २0१८ मध्ये फिनलँडमध्ये वर्ल्ड ज्युनियर अँथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी झालेल्या स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी ती पहिली भारतीय आहे. गेल्या महिन्यात  चीनमध्ये पार पडलेल्या  स्पर्धेत तिने पुन्हा पाच सुवर्णपदक जिंकून भारताचे नाव उंचावण्याचे काम केले आहे.

Tuesday, August 27, 2019

(बालकथा) फेकू उंट


एक उंट होता. पण तो मोठा फेकू होता. मोठं मोठं फेकायचा, मोठ्या मोठ्या बाता मारायचा. एक दिवस तो असाच फिरायला निघाला. नदीच्या काठाला उंदीर, खारुताई, माकड आणि ससा गप्पा मारत होते. त्यांच्या गप्पा रंगात आल्या होत्या आणि ते मोठमोठ्याने हसत होते. तिथे उंट गेला आणि तोही मोठमोठ्याने हसू लागला. सशाने विचारलं,"उंटदादा, तू का हसतो आहेस?"
उंट म्हणाला,"तुला पाहून हसतोय. माझ्या समोर तुम्ही काहीच नाही आहात. अगदी चिल्लर आहात."
"उंदराने विचारले,"म्हणजे? तुला म्हणायचं काय आहे?"
उंट आपली मान झटकून म्हणाला," याचा अर्थ असा की, माझं एक दिवसाचं राशन-पाणी तुमच्या सर्वांसाठी महिनाभर चालतं. जिथंपर्यंत तुमची नजर जाते,तिथं पर्यंत तर माझी मान जाते. मी वाळवंटातला जहाज आहे. मी तिथे अगदी सहजरित्या न थांबता, न थकता धावू शकतो. तुम्ही तिथे चार पावलं टाकली तरी दमून जाल. कळलं?"

(बालकथा) खरी यात्रा

प्राचीन काळातील गोष्ट आहे. एक संत तीर्थयात्रा करत करत गंगोत्रीला पोहचले. वाटेत त्यांनी हरिद्वार आणि उत्तर काशीमध्येदेखील स्नान केले. मंदिरात जाऊन ईश्वराचे दर्शन घेतले आणि तिथेच व्हरांड्यात आडवे झाले. थकले होते, त्यामुळे त्यांना लगेच झोप लागली.
झोपेत त्यांना एक स्वप्न पडले. त्यात त्यांनी दिव्य पुरुषांचे संभाषण ऐकले. एक दिव्य पुरुष विचारत होता, "या वर्षी किती तीर्थयात्री आले आहेत?"
"जवळपास दहा हजार यात्री आले असतील?"
"मग परमेश्वराने सर्वांची सेवा स्वीकारली का?"
दुसरा म्हणाला,"नाही!त्यातील काही मोजक्याच लोकांच्या सेवा स्वीकारल्या गेल्या."
"असं का?"

(बालकथा) दुसरा स्वर्ग


एक होते आत्रेय ऋषी. अत्यंत ज्ञानी आणि तपस्वी. त्यांचा आश्रम गौतमी नदीजवळच्या वनात होता. तिथे ते आपल्या पत्नीसोबत राहत होते. वनात आणखीही काही ऋषी आश्रम करून राहत होते.
एकदा आत्रेय ऋषींनी सर्वांसोबत मिळून यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. यज्ञाची पूर्ण तयारी झाली. गौतमी नदीच्या उत्तर काठावर यज्ञाला सुरुवात झाली. कित्येक दिवस तिथे मंत्रोच्चार गुंजत राहिले.
यज्ञ पूर्ण झाला. सर्व ऋषीगण आपापल्या तपोवनात निघून गेले. पण अजूनही आत्रेय ऋषींचे मन संतुष्ट पावले नव्हते. ते पुन्हा यज्ञ करण्याच्या तयारीला लागले. यज्ञ यावेळेला फारच दिवस चालला. ऋषी तन, मन साधना करत राहिले. 
शेवटी एक दिवस यज्ञ पूर्ण झाला. तेव्हा एक आकाशवाणी झाली,' देवता तुमच्या साधनेवर प्रसन्न झाले आहेत. आपल्याला आठ प्रकारच्या सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत. आता आपण तुमच्या इच्छेनुसार कुठेही जाऊ -येऊ शकता.'
आत्रेय संतुष्ट होऊन आपल्या आश्रमात परतले. त्यांना त्यांच्या साधनेचे फळ मिळाले होते. 

(बालकथा) हुशार शिकारी


एका गावातला एक जमीनदार फार रागीट होता. त्याला लोकांना विनाकारण त्रास द्यायला आवडायचे. तो काहीसा मठ्ठ डोक्याचाही होता,त्यामुळे कोणतीही गोष्ट लक्षात यायला त्याला उशीर लागायचा. गावाजवळ दाट जंगल होतं. जमीनदार या जंगलात नेहमी शिकार खेळायला जायचा.
एकदा जमीनदार जंगलात शिकार करायला गेला. तिथे एका हरणाला पाहून त्याने बंदुकीचा निशाणा साधला. पण इतक्यात तिथेच असलेल्या एका शिकाऱ्याने अचूक निशाणा साधून त्या हरणाची शिकार केली. हरीण खाली कोसळले. 
हे पाहून जमीनदार भयंकर संतापला. तो शिकाऱ्याला म्हणाला,"ही शिकार माझी होती, तू का त्याला मारलंस?" त्याने संतापाने आपल्या माणसांकरवी त्या शिकाऱ्याला खूप मारहाण केली.
शिकाऱ्याला विनाकारण मारहाण झाल्याने तोही संतापला.त्याने मनातल्या मनात निश्चय केला,"आता या गावात राहायचे नाही,पण जमीनदाराला मोठी अद्दल घडवायची."
शिकारी रात्रभर काय करायचे,याची योजना आखत राहिला. सकाळी उठल्यावर जमीनदाराच्या वाड्याच्या दिशेने निघाला. वाटेत त्याला कळले की, थोड्याच वेळात जमीनदार पुन्हा शिकारीला जाणार आहे.
मग काय! तो लगेच माघारी फिरला. घरातून बंदूक घेऊन जंगलात गेला. वाटेत त्याने एका सशाची शिकार केली. ती शिकार त्याने एका झाडाखाली झाकून ठेवली. पुढे गेल्यावर त्याने काही कावळ्यांची शिकार केली. तीही तिथेच एका झाडाखाली झाकून ठेवली. या नंतर शिकारी लपून जमीनदाराची प्रतीक्षा करू लागला.

(कथा) खचलेले मन


ही हकीकत मी सातवीचा विद्यार्थी असतानाची आहे. आम्हाला गणिताला नवीन सर आले होते, सुरेश केंगार. मी गणितात हुशार नव्हतो. प्रयत्न खूप करायचो,पण मार्क मात्र किमान पासिंगच्या मार्कांजवळच घुटमळायचे. हा विषय माझ्या डोक्यावरूनच जायचा. आमच्या गणिताच्या शिक्षकांना पहिल्यांदा पाहिले तेव्हा  आम्ही काहीसे चकित झालो होतो. कारण ते दिसायला थोडे विचित्रच होते. त्यांचा चेहरा मोठा होता आणि बाकी धड थोडे ठेंगणे होते. त्यांची उंची पाच फुटाच्या खालीच होती. सगळे त्यांना पाहण्यापेक्षा अधिक निरखून पाहात होते. याच दरम्यान, काही खोडकर मुलांच्या तोंडून हसू फुटले.
मला ही हरकत काही आवडली नाही. सर दिसायला थोडे विचित्र होते,पण शेवटी ते आमचे गुरू होते. सुरेश सर यांच्यासोबतचा पहिला दिवस काही खास गेला नाही. ओळखी करण्यात आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यात गेला. त्यांनी सांगितले की,त्यांचे घर खेड्यात आहे आणि ते एकटेच इथे शहरात राहतात. 

(बालकथा) मधाची विहीर


चारी बाजूंनी रेतीचे तुफान उठले होते आणि वर प्रखर सूर्य आग ओकत होता. महालाच्या बुरुजावर सुलतान विमनस्कपणे उभा होता. तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला," या खुदा, या प्रखर उन्हाने माझ्या राज्याचं काय होईल?"
तेवढ्यात त्याची पत्नी उसासे टाकत आली आणि म्हणाली,"शहजादेला काय झालंय कोण जाणे,पण उठल्यापासून रडतो आहे. "
सुलतान आपल्या मुलाच्या खोलीत गेला. प्रेमानं विचारलं," बेटा, काय झालं? का रडतो आहेस?" 
तो म्हणाला,"अब्बाजान, स्वप्नात मी दुधाच्या आणि मधाच्या विहिरी पाहिल्या. मला त्या हव्यात." असे म्हणून तो पुन्हा रडायला लागला. सुलतानने त्याला खूप समजावलं, परंतु तो रडायचा काही थांबला नाही.
सुलतान प्रखर उन्हाच्या झळा विसरून गेला. तो वजीरला सोबत घेऊन त्या विहिरींच्या शोधात निघाला. पुढे अंतर चालल्यावर त्यांना एका खजुराच्या झाडाजवळ एक उंट दिसला.जवळच एक वृद्ध नमाज पडत होता. नमाज पडून झाला. वृद्ध व्यक्तीने सुलतान आणि वजीराला विचारलं,"खूप भुकेले दिसता?"  मग त्याने उत्तराची वाट न पाहता हवेत हात फिरवला . चार सुंदर तबकांमधून फळे आणि मेवा समोर आला. दोघेही चकित झाले. 

(बालकथा) झोपडपट्टीतला संजू


संजू वर्गात याच वर्षी आला होता. त्याच्या येण्याने विराट, अनय आणि चित्रांश यांची अडचण झाली होती, कारण हे तिघेही वर्गातले टॉपर्स होते आणि पहिल्याच टेस्टमध्ये संजूने थर्ड रँक मिळवले होते. त्या दिवसापासूनच या तिघांनी त्याला त्रास द्यायला सुरुवात केली होती. कधी त्याच्या दप्तरावरून तर कधी त्याने डोक्याला लावलेल्या तेलावरून त्याची थट्टा चालवली जात होती. संजूला आपण एकटे पडल्याची जाणीव होत होती. तो एका कोपऱ्यात बसून एकटाच डबा  खायचा. एके दिवशी संजू एकटाच बसून लंच बॉक्स उघडून जेवण खाणार इतक्यात चित्रांशने त्याची शिळी भाकरी उचलली आणि सगळ्यांना दाखवू लागला. सगळी मुले त्याची टर उडवू लागले. त्याची मस्करी करू लागले. संजूच्या डोळ्यांतून आसवे टपकू लागली. 

(बालकथा) मंटू आणि बबलू अडकले


लहानग्या मंटू माकड आणि बबलू अस्वलामध्ये दाट मैत्री होती. मंगल वनात ते एकाच कॉलनीत राहत होते. 
एक दिवस ते घराबाहेर खेळत होते. तिथे मदारी राजू कोल्हा आला. त्याने त्यांना केळे दाखवले,ते पाहून त्यांच्या तोंडाला पाणी सुटले. ते उड्या मारतच त्याच्याजवळ पोहचले. दोघांनाही मदारीने एक एक केळ दिले.
"आणखी?" बबलूने मदारीपुढे हात पसरला.
"आणखी हवेत तर, माझ्यासोबत चला.जवळच माझी केळीची बाग आहे.तिथे हवी तेवढी केळी खा." मदारीने लालूच दाखवले.
मंटू आणि बबलूचे नशीबच खोटे होते. ते घरात काही न सांगता मदारीसोबत निघाले. पुढे आणखी एक कोल्हा होता. राजुने त्याला मदतीला बोलावले होते. दोघांनी मिळून मंटू आणि बबलूचे हात बांधले आणि तोंडात कापडाचा बोळा कोंबला. फक्त एवढेच करून थांबले नाहीत तर ,त्यांच्या डोळ्यांवर पट्टीही बांधली. 

(बालकथा) वाटण्यातला आनंद


विनायकने सकाळी लवकरच आईला उठवलं आणि हाताला धरून बाहेर अंगणात  जिथे काही दिवसांपूर्वी पपईच्या बिया लावल्या होत्या, तिथे आणलं. "बघ आई,मी ज्या बिया पेरल्या होत्या, आता त्या उगवून आल्या आहेत." हे सांगताना त्याला फार आनंद झाला होता.
"खूप छान बाळा,आता तुला यांची काळजी घ्यावी लागेल.आता कुठे अंकुर फुटले आहेत. नंतर त्यांचे रोपटे होईल. पुढे ती मोठी होतील आणि मग फळं लगडतील." आई म्हणाली.

(बालकथा) भूक लागल्यावर...!


"आई,मी जाते गं!" म्हणून आपले दप्तर पाठीला टाकत निकिता घरातून बाहेर पडली.
"नाष्टा केलीस का?" आईने आतून आवाज देत विचारलं,पण तिला काही परत आवाज आला नाही. रस्त्यावर धावत येत तिने स्कुल बसच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. खरं तर आज सकाळी उठायला उशीर झाल्यानं तिला आवराआवरी करायलाही उशीर झाला. या गडबडतीत ती  नाष्टासुद्धा  करू शकली नाही. त्यात सकाळपासून पावसाचंच वातावरण होतं. काळे ढग भरून आले होते. बसमध्ये बसल्यावर तिने दप्तरात डोकावून पाहिलं तर त्यात तिला लंच बॉक्सच दिसला नाही. "बरं झालं." ती मनातल्या मनात म्हणाली. तिला आनंद झाला. खरं तर तिला लंच बॉक्स आवडायचा नाही. आई जबरदस्तीने लंच बॉक्स दप्तरात ठेवते, असे तिला वाटायचं. तिला तिच्या शाळेच्या कँटीनमधले गरम गरम सामोसे,,वडापाव,भजी, पॅन्टीज असले पदार्थ खूप आवडायचे. ती आपला लंच बॉक्स इतर मैत्रिणींना द्यायची आणि कँटीनमधले पदार्थ खायची. तिचे बाबा तिला आईची नजर चुकवून वर खर्चाला पैसे द्यायचे.

मोबाईलचा वापर व दुरुपयोग

आज मोबाईल आपला अविभाज्य घटक बनला आहेअन्नवस्त्रनिवारा याबरोबरच मोबाईलसुद्धा मूलभूत गरज बनला आहेत्याने आपल्या कित्येक गोष्टी सोप्या केल्या आहेतत्यामुळे आणखी काही वर्षात मोबाईलशिवाय जगणं प्रत्येकालाच अशक्य होणार आहेआजची परिस्थिती पाहाएकवेळ जेवायला नसले तरी चालतेपण मोबाईलमध्ये रिचार्ज टाकण्यासाठी लोकांकडे पैसा आहेअगदी हमालापासून ते भाजीवाल्या बाईकडेही मोबाईल दिसतो आहेफक्त ग्रामीण भागातल्या भिकार्यांकडे तेवढा मोबाईल नाहीनाही तर पुण्या-मुंबईसारख्या भिकार्यांकडेत्यांच्या नेत्यांकडेत्यांची एजंटगिरी करण्यांकडे मोबाईल आहेइतका हा मोबाईल माणसाशी फेव्हिकॉलसारखा चिकटला आहे.

(बालकथा) देशाच्या भल्याचा विचार


ग्रामीण भागातल्या एका हायस्कूलमध्ये काऊंसलिंग प्रोग्रॅम सुरू होता. काउंसलर प्रत्येक विद्यार्थ्याला,'भविष्यात मोठे झाल्यावर तू काय होणार?' असा प्रश्न तो विचारत  होता. करून त्याची इच्छा विचार होता. प्रत्येक मुलगा उभे राहून आपापली स्वप्नं सांगत होता. कोणी म्हणत होतं, मी इंजिनिअर बनणार, कोणी म्हणत होतं डॉक्टर. कुणाला बँक मॅनेजर, कुणाला आयएसआय ऑफिसर. कुणाला उद्योजक बनायचं होतं. प्रत्येकजण आपापल्या इच्छा मनमोकळेपणाने सांगत होता. हे सगळे त्या कार्यक्रमात बसलेला एक विद्यार्थी शांतपणे ऐकत होता.  त्याचा नंबर आल्यावर काउंसलरने त्याला विचारलं,"भविष्यात तुला कोण व्हावंसं वाटतं?" 

(बालकथा)आळशी राजा


एकदा गोवळकोंडा राज्यात मोठा दुष्काळ पडला. पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली. जनता घागरी घेऊन वणवण फिरू लागली. पाण्यासाठी लोकांमध्ये भांडणे होऊ लागली. शेवटी जनतेने राजाकडे तक्रार केली.
राज्यावर राजा गोळायुद्ध राज्य करीत होता. तो प्रत्येक गोष्ट मंत्री आणि अधिकाऱयांना विचारत असे. ते जे काही सांगत,तेवढेच तो करे, तेवढेच पोपटासारखा बोले. काय चांगलं,काय वाईट याची काहीच माहिती नसे. तो खूप आळशी होता. सकाळी दात घासायलाही तो आळस करायचा. आठ आठ दिवस आंघोळ करत नसे. तासनतास झोपलेला असे. कधी डोळे उघडे असतात,तेव्हा मंत्री आणि अधिकारी राजकीय कागदपत्रांवर सह्या घेत. राजा पेंगत पेंगतच सह्या करत असे.