Thursday, September 5, 2019

सुख-दु:खाचा फेरा...

मानवी जीवन सुख-दु:खाने भरलेलं आहेकधी सुख तर कधी दु:ख ठरलेलं आहेसुखासीन फुलांच्या पाकळ्यांवर लोळताना दु:खाचे काटे बोचणारचसुख-दु:ख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेतडाव घेताना छापा-काटा करायची वेळ येते,तेव्हा आपला मर्जीचा छापा यावा,म्हणून आपण देवाला हात जोडत असतोछापा आला कीआपण अक्षरशआनंदाने उड्या मारतोतो आनंद स्वर्गीय असतोपण सतत सुखाची अपेक्षा करणं चांगलं असलं तरी वाट्याला दु:ख आलं म्हणून हिरमसून जायचं नाहीत्याला हसत तोंड द्यायचंहसत तोड देतोतेव्हा दु:ख हलकं होतंजर एकादी व्यक्ती दु:खाला तोंड द्यायला घाबरतेरडू लागते,तेव्ह अडचणींचासमस्यांचा डोंगर वाढायला लागतो.पण ज्यावेळेला व्यक्ती दु:खाला पाहून हसते,तेव्हा अडचणी नाहीशा होतात
अडचणी हलक्या होतात.फ्लेडंस निवासी गोल्डस्मिथने एक अशी व्यक्ती शोधून काढली होती कीतशी व्यक्ती त्याने त्यांच्या आयुष्यात कधी पहिली नव्हतीतो एक गुलाम होतासाखळदंडांनी बांधलेला होता.त्याच्या नशिबीच ते होतंपणथकवा म्हणून त्याच्या चेहर्यावर कधी नव्हता.तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत गुणगुणतच असायाचासगळे दु:ख गिळून टाकत जीवन हसत कसं जगावंहेच तो सांगत होताउदासी वाट्याला आलेलं जीवन त्याला कशाप्रकारचं आनंदाचे रंग द्यायचे,ही कला आपल्याला साधली पाहिजे.जीवन जर फूल असेल तर काटेदेखील त्याच्याबरोबरच येणारचत्यामुळे सुख-दु:ख यांचं नातं आपल्या संपूर्ण जीवनाशी बांधलं गेलं आहेजीवनात मेहनतीला जसं महत्त्व आहेतसंच फुलांबरोबरच काट्यांचंही आहेसुख-दु:ख जीवनचा अविभाज्य भाग आहेत्यामुळे प्रत्येकाला त्या प्रसन्नचित्त गुलामासारखं जीवनातल्या प्रत्येक परिस्थितीचे हसून स्वागत केले पाहिजेजर व्यक्ती सुख आनंदाने भोगत असेल तर मग दु:खदेखील हसत हसत का नाही भोगू शकत?मानवी जीवनात संकटाच्या घटना या आवश्य येत राहतात.वेद सांगतो कीज्यावेळेला समस्यांचे ओझे डोक्यावर  असते आणि दु:खाच्या रेषा मनाला त्रास देत असतील आणि चोहो बाजूला अंधार असेल तरीदेखील संतुलन बिघडू न देतास्वत:ला कमी न लेखता,हसत-गात जीवनाची गाडी हाकत राहायचंदु:खाचं ठिकाण आपोआपच मागे जातं.आयुष्यात जी माणसं मोठी झाली,त्या माणसांनी खूप सोसलेलं असतंदेवपण असं सहजासहजी कुणाला मिळत नाहीदगडातून सुंदर मूर्तीची निर्मिती होते,तेव्हा त्याला घाव सोसावे लागलेले असतात.त्यामुळे जीवनातल्या भट्टीत जी माणसं तावून-सुलाखून निघताततेव्हाच ती उच्च पातळीला पोहचलेली असतातअशी माणसं आपण पाहिली आहेत,तर मग आपण बारीक-सारीक दु:खाकडे पाहून गोंधळून जायचा प्रश्नच येत नाहीघाबरून तर अजिबात जायचं नाही.

No comments:

Post a Comment