Wednesday, October 18, 2017

संघर्षाचा आनंद

     माणसाला यशासाठी संघर्ष करावा लागतो. कष्ट करावे लागतात.मेहनतीशिवाय फळ नाही, असे उगीच म्हणत नाहीत. आणि हे यश मिळाल्यावर जो आनंद होतो,तो अवर्णनीय असतो.यश मिळवणं किंवा जिंकणं सगळ्यांना चांगलं वाटतं. आणि महत्त्वाचे म्हणजे जितका सामना चुरशीचा,तितका आनंदही मोठा असतो.असे असतानादेखील आपल्याला आव्हान फारसं कठीण नको असतं.सोपी लढत व्हावी, असे आपल्याला वाटत असते. कठीण सामन्यापासून बचावासाठी पराभवाची भिती आपल्याला उकसावत असते.इथे राफेल नाडाल,जो टेनीस जगतातला महान खेळाडू आहे, त्याने जे काही म्हटले आहे, त्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे. तो एकदा म्हणाला होता की,त्याला असा सामना जिंकायला मजा येते, जो पाचव्या सेटपर्यंत ताणला गेला आहे.म्हणजे प्रतिस्पर्धीदेखील तसा तगडा पाहिजे,त्यामुळे सामना तितकाच आनंद देतो.
     हेच जीवनाचे सत्य आहे. संघर्ष जितके कठीण, तितके त्याचे सुखदेखील मोठे असते. संघर्षापासून निर्माण झालेल्या सुखाचा इतिहास फार जुना आहे. स्पार्टाकस यांनी गुलामीच्या व्यवस्थेविरोधात संघर्ष केला. मार्टिन लूथर किंग  वंशिक भेदभाव विचाराविरोधात संघर्ष करत राहिले.ते संघर्षाचे नायक होते आणि त्यामुळे सुखीही!भगवान बुद्ध यांनी सुख-दु:खाच्या विषयावर सर्वात अधिक इंतन केले आहे,ते दु:खाशी दीर्घकाळ संघर्ष करीत राहिले. अमेरिकेचे राष्ट्रपती थियोडोर रूजवेल्ट म्हणतात की, इतिहास सहज जीवन जगणार्यांना लक्षात ठेवत नाही.त्यामुळे आराम करायचे सोडून द्यायला हवे आणि आपल्याला संघर्ष करून त्यापासून मिळालेल्या सुखाचा आनंद घेतला पाहिजे. असं म्हणतात की, स्त्री सृष्टीचा सर्वात मोठा संघर्ष गर्भधारण करण्याने करत असते. त्यामुळे सर्वात मोठे सुख तिच्या वाट्यालाच येते. हे सुख आई होण्याचे आहे.
     मानसशास्त्रज्ञ म्हणतात कीमहिला शारीरिक आणि मानसिक संघर्ष करून सृजनाची महान प्रक्रिया पूर्ण करते, त्यामुळेच ती पुरुषाच्या तुलनेत अधिक समाधानी आणि सुखी असते. मग असा एक प्रश्न निर्माण होतो की, आज जे दु:खी आहेत,त्याच्या मागे संघर्षापासून दूर पळणे, हा तर नसेल ना!

No comments:

Post a Comment