Wednesday, October 14, 2015

शाळांमध्यल्या कवितांचं सुरेल गायन हरवलं


     कवितेच्या गळ्यात सुरांनी हात गुंफले  की तिचं गाणं होतं. कवितेचा असं गाणं होण्याचा एक काळ होता. शाळा- शाळांच्या वर्गा-वर्गातून कवितांच सामूहिक सुरेल गायन चालायचं. मात्र आता हे शाळांमधलं सुरेल लोप पावलं आहे. आता वृत्तांच्या लयबद्ध  आवर्तनात गिरक्या घेणार्‍या कविता पाठ्यपुस्तकातून गायब झाल्या आहेत. कवितेला चाली लावता न येणार्‍या निरस अवजड आणि  मुक्त छंदातल्या कवितांनी त्यांच्या जागा घेतल्या आहेत.
      पूर्वीच्या काळी केशवसुताम्च्या,भा.रा. तांबेंच्या, गोविंदाग्रजांच्या,कुसुमाग्रजांच्या कविता असायच्या. त्या कवितांना वृतांच्या लयबद्ध आवर्तने असायची. आणि त्या कवितांची गाणी व्हायची.काही लोकांच्या जीभेवर आजही त्या कविता रेंगाळतात.आता कवितांमधला सुरेलपणा लोप पावत चालला आहे. चाल लावण्यात अडचणी येऊ लागल्या. अशैक्षणिक कामाचा ताप शिक्षकांच्या माथी असल्याने त्यांच्या मराठी, हिंदी, इंग्रजी कवितांना चाली लावण्याच्या क्षमता कमी झाल्या, अपुर्‍या पडल्या. छंदबद्ध कवितांचा भडिमार झाला. इयत्ता पहिलीच्या वर्गातल्या कवितांना चाली लावण्याच्या अडसरी येऊ लागल्या. पण काही गायनाचा. चाली लावण्याचा छंद असलेले शिक्षक मात्र अशा कवितांना चाली लावण्यात यशस्वी होतात.
     मात्र अशा शिक्षकांची संख्या कमी  म्हणजे  मूठभरच आहे.संगीताची जाण, संगीत शिकलेल्या शिक्षकांची संख्या फारच कमी आहे. शाळांमध्ये तबला-पेटी  आदी वाद्य साहित्य आहे. मात्र संगीत कला अवगत असलेले शिक्षक नाहीत, त्यामुळे ही वाद्ये शाळा-शाळांमध्ये अडगळीत पडले आहेत. त्यांची वाट लागलेल्या आवस्थेत ती आहेत. मग शिक्षक कुठली तर चाल लावून मोकळे  होतात. काही चाली लक्षात राहाव्यात अशाही नसतात.शिक्षक कुठली तरी सिनेमातल्या गाण्याच्या  चाली लावून मोकळे होतात. बहिणाबाईंच्या कवितांना, इंद्रजीत देशमुखांच्या माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा... अशा कवितांना पारंपारिक उभ्या जगाचा क कुठली तरी सिनेमातल्या गाण्याच्या चाली  लावून मोकळे   होतात. बहिणाबाइा क्षमता कमी झाल्या, त्याच त्या चाली सगळ्याच कवितांना लावतात. काही म्युझिक कंपन्यांनी कवितांच्या ओडियो, व्हिडियो काढल्या आहेत. मात्र त्यांच्या चाली फारच जड आहेत. लक्षात राहतील अशा त्यांच्या चाली नाहीत. त्यामुळे शिक्षक एक-दोन कवितांना कुठल्या तरी चाली लावून मोकळे होतात. मराठी कवितांची ही तर्‍हा तर हिंदी, इंग्रजी कवितांची काय तर्‍हा असेल. मुलांकडून  कविता गायला सांगितल्या तर सरळधोपट वाचून दाखवल्या जातात. प्राथमिक शाळांमध्ये काही कवितांना चाली तरी लावतात. मात्र आठवी ते दहावी वर्गातल्या कवितांना चाली लावण्याच्या फंदातच शिक्षक पडत नाहीत. त्यामुळे भाषा विषय अवघड, नीरस होत चालला आहे.
      आता  मुक्तछंदातल्या कवितांची पाठ्यपुस्तकात मेजॉरेटी दिसते. त्यांची चाल कोण ठरवणार अन कशी ठरवणार? कही शाळांमधल्या मुलांना कविता चालीत म्हणायची असते. वर्गा-वर्गात एका सुरात गायची असते. हे ठाऊकच नाही. त्यामुळे कवितांचं गाणं होता होत नसतं. आता छंदांचं बंद नाही म्हटल्यावर ओळींनी कुठेही, कसंही भरकणं आलं. मग सूर तरी ओळींशी गट्टी कशी करणार, असा प्रश्‍न आहे.
     कवितेचं गाणं होतं तेव्हा अर्थातच त्या कवितेच्या अनुभवाला आणखी नवं परिमाण लाभतं.म्हणून गेय कवितेंच्या परंपरेचं जतन करणं आवश्यक आहे.  त्यासाठी शाळा-शाळांमधून बाळ-गोपाळांना या परंपरेचा संथा देण्याचा उपक्रम व्हायला हवा.

No comments:

Post a Comment