Wednesday, November 11, 2015

दु:ख, अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराचा नायनाट करा


      दिवाळीचा सण दरवर्षी येतो आणि प्रत्येकजण आपापल्यापरीने आनंदाने, उत्साहाने साजरी करतो.तसं पाहायला गेलं तर आपण भारतीय माणसं उत्सवप्रिय आहोत. आणि या उत्सवप्रियतेला खतपणी घालण्याचं काम करणार्‍यांची दुकानदारी बिनबोभाट ङ्गोङ्गावत चालली आहे. पण हीच दुकानदारी आणि उत्सवप्रियता नकळत समाज जीवनाच्या र्‍हासाला कारणीभूत ठरत आहे. याचाही विचार प्रत्येकानं याच दिवाळीच्या आनंदाच्या क्षणाच्या निमित्ताने करायला हवं. उत्सवप्रिय असणं, यात काही गैर नाही.पण त्याला सामाजिक बांधिकलकीची जोड असायला हवी.
       दिवाळीपुरता विचार करायचा म्हटले तर या सणाच्या निमित्ताने किती लोकांना व त्यांच्या मुलांना नवे कपडे परिधान करायला मिळतात. किती लोकांच्या घरी गोडधोड, ङ्गराळाचे पदार्थ बनवले जातात. किती लोकांच्या घरी दिव्यांची रोषणाई असते.याचा कधी आपण विचार केला आहे का? सारा देश बाहेर उत्सव साजरा करित असतो, पण आपल्या मुलांना नवे कपडे लेवू, गोडधोड खाऊ घालू शकत नाही, म्हणून डोळ्यांतून दु:खाश्रू वाहवत बसलेल्या आई-वडिलांना मदत नाही ते नाहीच पण आपण धीर देण्याचं काम तरी केलं आहे का? ते दु:खाश्रू पुसण्याचं कार्य म्हणजेच सर्वात मोठा दीपोत्सव आहे. हे काम महत्त्वाचं आहे. आपल्या पाठीशी समाज आहे, ही जाणिव त्यांच्यात निर्माण करून देण्याचं काम आपण करायला हवं.
     वीटभट्ट्यांवर, ऊसाच्या ङ्गडात रात्रंदिवस खपणारी, पोटासाठी पडेल ते काम करणारी, प्रसंगी मागून खाणारी माणसं इथे कमी नाहीत. त्यांच्याही डोळ्यांत प्रकाश उजळायला हवा. यानिमित्तानं दुसर्‍याचाही विचार करायला शिकलं पाहिजे. त्यांनाही या आनंद सोहळ्यात आपापल्या परीनं सामावून घ्यायला हवं. आपण मोठ्या आनंदानं, उत्साहानं सण साजरा करत असतो. या नादात आपला दुसर्‍याला त्रास होतो का, याचा विचार केला पाहिजे. आपण आपल्याच मस्तीत राहून चालत नाही. पण आजच्या जमान्यात ङ्गारच थोडी माणसं विचार करताना दिसतात. त्यांना आपल्या आनंदात सामावून घेताना दिसतात. इतरांची दु:खे दूर करून आनंद साजरा करण्यात ङ्गार मोठा आनंद आहे.
 काही माणसं सगळ्याच गोष्टीकडे उदासिनदृटीने पाहात असतात. सतत डोक्यावर मोठं ओझं घेऊन वावरत असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद-दु:ख, समस्या, अडचणी असतात.प्रत्येकाला कौटुंबिक, वैयक्तिक, सामाजिक प्रॉब्लेम असतात. म्हणून काय ती डोक्यावर वाहायची असतात का? सुख जवापाडे, दु:ख पर्वताएवढे, असे म्हटले जात असले तरी ते आपण माणण्यावर अवलंबून आहे. दु:ख करत बसल्याने सुख आयते येत नाही.दु:खालाच सुख मानून आनंदाने जगायचे असते. आणि तसं जगलं पाहिजे. नाही तर विरस जगण्याला अर्थ तरी काय आहे? सण आपल्यात उत्साह आणतात. त्यात मोठ्या आनंदानं सामिल व्हावं.
      आजकाल आजूबाजूला बर्‍याच काही आपल्याला नको असलेल्या गोष्टी घडत असतात. आपल्या देशात भ्रष्टाचार शिष्टाचार झाला आहे. दिवसाढवळ्या आपल्या माता-भगिनींवर अत्याचार होत आहेत आहेत. रोज कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी मुडदे पडत आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. रोज कोणावर ना कोणावर अन्याय घडत आहे. या गोष्टी थांबवता येणं शक्य नाही, पण कमी जरूर करता येतील. त्यासाठी एका विचाराच्या माणसांनी एकत्र येऊन तोडगा काढला पाहिजे. यावर निव्वळ भाषणे देऊन चालणार नाही. संयमाने या समस्यांच्या मुळाशी जायला हवे. हे करताना आपल्या स्वत:लाही बदलायला हवे. आपल्या आवडी-निवडींना, स्वभावाला मुरड घालावी लागणार आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो, असा विचार करून समाजासाठी काही केले पाहिजे. की बांधिलकी जोपासली पाहिजे. मन संवेदनशील असलं पाहिजे. सहिष्णु असलं पाहिजे.
      समाज अनेक कारणांनी प्रदुषित होत आहे. तसं माणसाच्या कृपेनं निसर्गदेखील प्रदूषित होत आहे. जल, हवा,ध्वनी प्रदूषणाने माणूस माणसाचंच जिणं हराम करत आहे. सांडपाणी,रसायन मिश्रित कारखाण्याची मळी नद्यांमध्ये मिसळत आहे. त्यातल्या पाण्याच्या सेवनानं आरोग्य बिघडत चाललं आहे. जमिनीत रासायनिक खताचा बेसुमार वापर करून तिला नापिक करत आहोत. कारखान्यांच्या धुरंड्यांमधून, वहनंमधून निघणारा विषारी वायू माणसाचंच आयुष्य कमी करत आहे. त्यातच करू नये ते माणूस करू लागल्याने स्वत:च स्वत:च्या शरीराची नासाडी करून घेत आहे. दारू, मावा-गुटखा, बिडी-सिगरेट याची लत माणूस हकनाक लावून घेत आहे. सरळ जीवन जगण्याचा मंत्र आपल्या साधू-संतांनी दिला असताना माणूस वाकड्यात शिरत आहे. यावर समुहाने आवर घालता ये ईल. गाव करी तिथे राव काय करील, अशी एक म्हण आहे. त्यामुळे सगळ्यांनी मिळून वाईटाचा नाश करण्याचा चंग बांधला तर सर्व काही शक्य आहे. सध्या आपण दिवाळी साजरी करतो आहे. प्रदूषण करणार्‍या ङ्गटाक्यांचा जपून वापर कराच, पण त्याचा अतिरेकही होऊ देऊ नका. 

No comments:

Post a Comment