Sunday, December 25, 2016

तरुणाईने विधायक संकल्प घेऊन पुढे आले पाहिजे


चार दिवसांतच नववर्षाची सुरुवात होईल. नवे वर्ष म्हणजे संकल्प, नवी सुरुवात, नवा प्रयत्न व नवा उत्साह असायला हवा. जुन्याचे जुनाटपण , कटू अनुभव विसरायला लावून नवी उमेद देण्याची प्रेरणा नवे वर्ष देते. त्यामुळे दरवर्षी नव वर्षाच्या सुरुवातीचे स्वागत करण्यासाठी तरुणाई आसुसलेली असते,परंतु या स्वागतामध्ये संकल्पापेक्षा , विधायक उपक्रमांपेक्षा गटागटाने एकत्र येऊन पार्ट्या साजर्या करण्यावरच अधिक भरवाढू लागला आहे.हे चित्र खटकणारेच आहे.
गेल्या काही दिवसांपासून नव्या वर्षाच्या तयारीसाठी सोशल मिडियांवरून प्लॅनिंगचे चॅटिंग सुरू आहे.मात्र नव्या वर्षाचे स्वागत दारु पिऊनच करावे, असे काही कोणत्या पुस्तकात, मार्गदर्शिकेत लिहून ठेवले नाही. हा काळोखाचा रस्ता आपला नाही, हे माहित असूनही तरुणाई नवीन वर्षाचे स्वागत दारुच्या पार्ट्यांनी करायचे म्हणते, हे जरा अजबच मानावे लागेल.ार्थात सरकारनेही त्यापुढे दोन पावले पुढे टाकत बार, दुकानांना नव्या वर्षाच्या सुरुवातीला जरा जास्तीचीच मोकळीक दिली आहे. त्यावरून सरकारी व्यवस्थेलाही नेमके काय सांगायचे आहे, हेही स्पष्ट होत नाही.
गेल्या काही वर्षांपासून शहरी,निमशहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागात अगदी वाड्यावस्त्यांवरही मद्याच्या बाटल्या रित्या करून नवीन वर्षाचे स्वागत होते. नशेत बेधुंद झालेली तरुणाई ध्वनिवर्धकाच्या भिंती लावून,कर्णकर्कश्श आवाजापुढे  अचकट-विचकट नृत्य करून नववर्षाचे स्वागत करते हे दुर्दैवच मानावे लागेल. त्यापुढचे काही नमुने दुचाकीच्या सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून भरधाव दुचाक्या चालवून हॅपी न्यू इयर अशी हाळी देत रस्त्याने फिरतात. गाढ झोपेत असलेले ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना नव्या वर्षाच्या पहिल्या क्षणालाच असा खडा लागणार असेल तर नव्या वर्षाबद्दल त्यांची काय मते बनतील याचा विचार कोणी करीत नाही, या वर्षी तो करावा अशी माफक अपेक्षा आहे.
राज्यात एकिकडे दररोजच्या हलाखीला, नेहमीच्या शेतीतील तोट्याला कंटाळून, पिचून गेलेल्या शेतकर्यांनी आपल्या जीवनयात्रा संपवण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. दररोज पाच-सहा आत्महत्यांच्या घटना घडतच आहेत. कदाचित आपल्या घराजवळ, गावाजवळ, तालुक्याजवळ नसेल,परंतु आपल्या राज्यातच या दुर्दैवी घटना घडत आहेत. कोणाच्या तरी घरातील आधार सहजगत्या संपतो, हे चित्र दिसत असताना खिसा रिता होईपर्यंत खर्च करून नव्या वर्षाचे स्वागत चुकीच्या पद्धतीने करण्याची चूक या वर्षी तरी तरुणाईने करू नये. नोटाबंदी याला काही प्रमाणात आळा घालील, असे वाटत असले तरी तरुणाई स्वत: हो ऊन यापासून परावृत्त झाली तर चांगलेच म्हणायला हवे. राज्यात,देशात अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. शिक्षणापासून ते नोकर्यांपर्यंत अन शेतीतील कष्टापासून ते व्यवसायातील मंदीपर्यंत अनेक समस्या आहेत. त्याची जाणीव बाळगून आपला उत्साह कोणाच्या तरी अडचणींचा विषय बनणार नाही, याची काळजी नववर्षाचे स्वागत करणार्यांनी नक्की घ्यावी.
आपल्या नेहमीच्या कट्ट्यावर एकत्र येऊन उवा पिढीने या निमित्ताने सामाजिक जाबाबदारीचे भान ठेवत शेतकयांच्या वाढत्या आत्महत्यांबद्दल, त्यांच्या प्रश्नांबद्दल चिंतन करण्याची ही वेळ आहे. आत्महत्यांपासून शेतकर्यांना परावृत्त करण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करता येतील, त्यामध्ये आपला काय वाटा राहिल, याविषयी गटचर्चा करण्याचीही आवश्यकता आहे. गरिबांना मदत,स्वच्छतासारखी जबाबदारी उचलता ये ईल का याविषयी संकल्प करावा. ॠमाजात वाढत चाललेल्या अंधश्रद्धांना पायबंद घालण्यासाठी नव्या वर्षात युवकांची फळी उभारता ये ईल का? त्यांच्यामध्ये सामाजिक समरसतेची मशाल पेटविता ये ईल का, याविषयीही विचारमंथन करावे. अर्थात नव्या वर्षाचे स्वागत जल्लोषाने करूच नये, असा याचा अर्थ कदापि नाही. फक्त तो चुकीच्या मार्गाने न करता जो खर्च जर गावातील एखाद्या गरजु, हुशार मुलाला शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेऊन तोच खर्च शाळेकडे सुपूर्त केला,त्या विद्यार्थ्यास आवश्यक साहित्य खरेदी करून भेट देऊन केला तर तो सार्थकी लागेल. आजची युवा पिढी ही समंजस आहे, त्याहून ती नव्या विचारांना आयाम देणारी व दूरदृष्टीने विचार करणारी आहे, हे थोरांना पटवून देण्याचीही संधी यानिमित्ताने आहे.

या दिवसाच्या निमित्ताने आपले गाव, आपली वाडी-वस्ती स्वच्छ व लखलखीत करण्यानेही नवे वर्ष अधिक उत्साहाने साजरे करता येऊ शकते.गावात जलसंवर्धनासाठी एखादी उपाययोजना आखता येत असेल तर त्यामध्येही योगदान देऊन नवनिर्मितीला हातभार लावता येऊ शकेल. गावातील ओढे खोलीकरणासाठी, स्मशानभूमी सुशोभिकरणासाठी एवढेच नाही तर गावातील अंतर्गत रस्त्यांच्या सुशोभिकरणाचीही मोहिम युवकांनी हाती घ्यावी.एकदा का तरुणाईने एखादा प्रश्न हाती घेतला व त्यांचा समूह एखाद्या कामास सुरुवात करताना दिसला तर आजच्या तरुणाईकडे भरवशाने पाहात असलेली जुनी पिढी आणि आपोआपच ग्रामपंचायतीही माणसेही या कामात पुढे सरसावतील. फक्त सुरुवात झाली पाहिजे.

पाणी आणि अनाहूत सल्ले

     काहीजण सांगतात की ,सकाळी उठल्यावर सगळ्यात अगोदर दोन ग्लास पाणी प्यायला पाहिजे.आणखी कोणी दुसरेच काही सांगतं.जगातल्या जलसंकटाबाबत ज्याला कसलीही  गंध वार्ता नाही ,अशी मंडळी सकाळी सकाळी दोन दोन लीटर पाणी प्यायचा सल्ला देतात. जितकं पाणी प्याल,तितकं चांगलं,असंही ठणकावून सांगतात. जादा पाणी पिल्याने शरीराला कोणताच अपाय होत नाही, कारण जादा झालेले  पाणी शरीर स्वतः बाहेर फेकते आणि त्याच्या बरोबर शरीरातील घाणदेखील बाहेर टाकते,असेही सांगितले जाते.हे असल्या सल्ल्यांनी  शरीराला कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही ,त्यामुळे लोक असे सल्ले स्वीकारतात किंवा  अजमावूनही पाहताना दिसतात.पण शास्त्रज्ञ सांगतात की ,अशा सल्ल्यांमध्ये  कसलाच दम नाही आणि या मागील विचाराच्या द्रुष्टीत  सत्यही नाही. आपल्याला माहीत आहेच,आवश्यकतेपेक्षा पाणी कमी पिल्याने  शरीरात डीहायड्रेशन होते.आणि जरूरतपेक्षा अधिक पाणी पिले तर हायपोहायड्रेशन होऊ शकतं. उलट  हायपोहायड्रेशन शरीराला नुकसान पोहचवू शकतं. जादा पाणी पिल्याने शरीरातील  सोडियमचे प्रमाण कमी होते आणि ते धोकादायक होऊ शकतं.शिवाय किडनीचे  कामदेखील वाढते. म्हणजे आपल्याला जीवन देणारे पाणी अधिक झाल्याने जीवावरसुद्धा उठू शकते.
    काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातल्या शास्त्रज्ञांच्या एका टिमने आपल्या शरीरात जादा झालेल्या पाण्याने काय होतं किंवा काय घडू शकतं ,याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला.यांसाठी त्यांनी काही लोकांवर प्रयोगदेखील केले.त्यांनी त्या लोकांचे दोन गट केले.एका गटाकडून खूप उशीरापर्यंत कसरत करून घेतली.कारण व्यायाम केल्याने घाम निघाल्यानंतर  त्यांना पाण्याची गरज जास्त  लागते. दुसऱ्या गटाला अशा ठिकाणी ठेवलं गेलं की ,त्यांच्या शरीरातून घाम निघणार नाही.काम केल्यानेही त्यांच्यावर फारसा परिणाम होणार नाही. यानंतर दोन्ही गटातील लोकांना एकाच वेळी पाणी प्यायला देण्यात आले. तसेच ते पाणी पीत असताना त्या सगळ्यांचे 'फंक्शनल एमआरआय'देखील करण्यात आला. या 'एमआरआय'मध्ये असे आढळून आले की ,ज्या  लोकांनी व्यायाम केला होता त्या लोकांच्या मेंदूने आरामात पाण्याचा स्वीकार केला.पण दुसऱ्या गटातील लोक जबरदस्तीने पाणी पिण्याचा प्रयत्न करत होते.वास्ताविक  त्यांना तहान लागलेली नव्हती. या गटातील लोकांच्या मेंदूतील कोशिकांमध्ये तणाव दिसत होता. कारण नसताना ते पाणी पीत होते.
शास्त्रज्ञांचे म्हणणे असे की ,जितकं आवश्यक आहे तितकंच खावे तसे,पाण्याच्याबाबतीतही आहे.तहान लागली असेल तेवढेच पाणी प्यावे. आपल्याला भूक लागते , याचा सरळ अर्थ असा की , आपल्या शरीराला  ऊर्जेची गरज आहे. त्याप्रकारे ज्यावेळेस आपल्याला तहान लागते,त्यावेळेस शरीराला पाण्याची गरज आहे. आवश्यकतेपेक्षा खाल्लेले अन्न आपल्याला नुकसान पोहचवते. तसेच जादा पाणी शरीराला धोका पोहोचवते.आपण जादा मीठ असलेले  भोजन खाल्ले की आपल्याला  अधिक तहान लागते. कारण शरीरातील किंवा रक्तातील सोडियमची मात्रा कमी करण्यासाठी जादा पाणी लागते .आपले आणि बाकीच्या जीव -जंतूचे शरीर अशा प्रकारे विकसित झाले आहे की ,त्याला स्वतः ला आपल्या पोषनांची गरज ठाऊक आहे.आपल्या शरीराला माहीत आहे ,त्याला केव्हा , आणि किती पाणी लागते .यांसाठी त्याला सोशल मिडियातील वैद्यांची गरज लागत नाही.सोशल मीडिया आपल्या सामाजिकतेशी निगडीत आहे.आमच्या आरोग्यासाठी नाही.

पतंगापासून वीजनिर्मिती

पतंगापासून वीजनिर्मिती
     आकाशात उडणारे रंगी-बेरंगी पतंग सगळ्यांनाच लुभावतात.जगभरातल्या मुलांसाठी तो एक खेळ आहे, तर मोठ्यांसाठी पतंग उडवणं ही एक कला आहे.भारतात  फक्त पतंग उडवले जात नाही, तर लढवलेदेखील जातात. आम्ही या कलेला स्पर्धात्मक खेळामध्ये रूपांतरित केले  आहे. इथे पतंग उडवणं म्हणजे फक्त उडवणं, असा अर्थ होत नाही.इथे पतंगबाजी होते.पहिल्या महायुद्धात पतंगांचा वापर शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी केला गेला. अठराव्या शतकात त्यांचा वापर संशोधनासाठी केला गेला. बेंजामिन फ्रँकलिन, अ‍ॅलेक्झांडर विल्सन यांनी हवामानाच्या अभ्यासासाठी त्याचा वापर केला, तर राईटबंधू यांनी त्याचा वापर करून पुढे विमानाचा शोध लावला. विल्यम एडी व लॉरेन हारग्रेव्ह यांनी हवामानाचा अभ्यास त्याच्या मदतीने केला.  इतिहासात असे अनेक प्रसंग घडले.भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातला एक दिलचस्प प्रसंग आहे. सायमन कमिशन भारतात आला होता. आपल्या बैठकीच्यानिमित्ताने तो लखनौलादेखील गेला होता.कुठलाही स्वातंत्र्य सैनिक जवळपासदेखील फिरकू शकणार नाही, अशा पद्धतीची खास व्यवस्था करण्यात आली होती. त्यादिवशी अचानक बैठकीच्या ठिकाणी काही पतंग तुटून पडले. त्या सगळ्यांवर लिहिलं होतं-सायमन गो बॅक.
पतंग ही अशी पहिली वस्तू आहे, जिला माणसाने आकाशात उडवू शकला आणि आपल्या इशार्‍यावर नाचवूही शकला.पतंगाचा उपयोग हवामान जाणून घेण्यासाठी आणि  हेरगिरी करण्यासाठीदेखील केला गेला.
     आकाशात उडणारे पतंग शास्त्रज्ञांसाठीदेखील आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिले.विविध प्रकारच्या पतंगांनी त्यांना फक्त उडण्याच्या सिद्धांत शिकवला नाही तर त्यांना एकाद्या  वस्तूला उडण्यालायक बनवण्यासाठीचे एरो-डॉयानमिक डिझाईनसुद्धा शिकवलं.ढगांनी आच्छादलेल्या एका दुपारी ज्यावेळेला बेंजामिन  फ्रँकलिनने रेशमी दोरीने पतंग उडवला, त्यावेळेला त्याला आकाशातल्या विजेचे रहस्य उलगडले.आता शास्त्रज्ञ पतंगाचा आणखी  एक उपयोग करण्यासाठी सज्ज झाले आहेत.ते पतंगापासून वीजनिर्मिती करणार आहेत.वास्तविक यादिशेने गेल्या 35 वर्षांपासून प्रयत्न चालू  आहेत.पण आता या तंत्रज्ञानाने एक फलस्वरूप प्राप्त केले आहे. स्कॉटलंडमध्ये एक  असं विद्युत संयंत्र बसवलं जात आहे, ज्यातून फक्त पतंगापासून वीजनिर्मिती केली जाणार आहे.या संयंत्राद्वारा शास्त्रज्ञ 500 मेगावॉट वीजनिर्मिती करू शकणार आहेत.यासाठी क्रॉसविंड तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. प्रत्येक टर्बाईनला 40 फुटाचे दोन विशालकाय पतंग जोडलेले असतील.पतंग हवेत उडत असतील त्यावेळेला टर्बाईन चालतील आणि वीज तयार होईल. यातील आणखी एक खास गोष्ट अशी की,यापासून  वीज निर्माण होताना  पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचा धोका पोहचणार नाही. आणि दुसरे म्हणजे ती सगळ्यात स्वस्त पडणार आहे.असं म्हटलं जात आहे की, सध्या विद्युत निर्मितीसाठी जी गुंतवणूक करावी लागत आहे ,त्यापेक्षा या तंत्रज्ञानाने वीज निर्मितीसाठी फक्त दहा टक्के खर्च येणार आहे. म्हणजे अशा प्रकारे जर वीज उत्पादन सुरू झाले तर सरकारला सबसिडीसुद्धा द्यावी लागणार नाही.
     या प्रयोगासाठी स्कॉटलंडची निवड केली आहे, याला आणखी एक कारण आहे. इथे वर्षभर एकाच वेगाने हवा वाहात असते.त्यामुळे भारतासारख्या देशात हवेचा वेग आणि दिशा सतत बदलत असते, अशाठिकाणी हे  तंत्रज्ञान कितपत फायद्याचं आहे,याची आपल्याला अजून कल्पना नाही.पण एकदा का हा प्रयोग यशस्वी झाला तर या तंत्रज्ञानात सुधारणा होत राहतील, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.पण आपल्याला दिलासा देण्यालायक गोष्ट अशी की, स्वस्त ऊर्जा आणि पर्यावरण हित जोपासणार्‍या वैकल्पिक साधनाच्या शोधाची मोहिम यशस्वी होताना दिसत आहे. गेल्या काही वर्षात सौर ऊर्जेवरील खर्च  कमी होत आहे. पवन ऊर्जेच्या उत्पादनाचा विस्तार वाढत आहे.दुसरीकडे विद्युत बिल कमी येणाच्यादृष्टीने वापरात येणार्‍या वस्तू बनविण्यात आपण यशस्वी होत आहोत.त्यामुळे विजेचा वापर कमी होऊ लागला आहे. हा सिलसिला असाच राहिला तर पर्यावरणातील बदल आणि ग्लोबल वार्मिंगचे आव्हान आपण  सहजगत्या  पेलू शकू. यापूर्वी वीज निर्मितीत रंगीबेरंगी पतंगदेखील  आपली भूमिका वटवतील, याचा विचारदेखील कोणी केला नव्हता.

Saturday, December 24, 2016

सेंकड हँड स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी...


      तुम्ही सेकंड हँड स्मार्टफोन विकत घ्यायचं प्लॅनिंग करत असाल तर  काही गोष्टीची काळजी घ्यावी लागेल
आजकाल काही लोक नवा स्मार्टफोन थोड्या दिवसांसाठी वापरून लगेच विकून टाकतात. तुम्ही कमी किंमतीत सेकंड हँड फोन विकत घेऊन वापरू शकता, पण यासाठी थोडी काळजी घेतली पाहिजे. फोन खरेदी करताना खालील गोष्टींकडे लक्ष द्या.
बील आणि बॉक्स घ्या
     सेकंड हँड स्मार्टफोन खरेदी करतेवेळी बील घेणं यासाठी आवश्यक आहे की,यामुळे आपल्याला हा फोन चोरीचा तर  विकला जात नाही ना, हे आपल्याला कळेल.जर आपल्याला भविष्यात हा हँडसेट पुन्हा विकायचा असेल किंवा रिप्लेस करायचा असेल तर हे बील आपल्या कामी येईल.फोनसोबतच बॉक्स घेतल्याने तुम्ही आयएमईआय नंबरची खात्री करू शकाल.लक्षात ठेवा की, विकणारा तुम्हाला एक्सेसरीज देत नसेल तर तुम्ही किंमत आणखी कमी करू शकता.
चोरीचा फोन
     कित्येकदा लोक चोरीचा स्मार्टफोन विकतात. जर तुम्हाला अशा प्रकारचा संशय असेल तर बिलासोबत बॉक्सदेखील मागून घ्या. चोरीच्या स्मार्टफोनसोबत बॉक्स असण्याची शक्यता फारच कमी असते.बॉक्समध्ये लिहिलेला आयएमईआय नंबर आपल्या स्मार्टफोनच्यावर*#06# डायल करून दिसणार्या नंबरशी पडताळून पहा.हा नंबर जुळला माही तर काही तरी गडबड आहे, हे लक्षात येईल.सोबतच imeidetective.com सारख्या वेबसाइटसवर हा क्रमांक टाकून तपासा. कारण चोरीचा स्मार्टफोन ट्रेकिंगसाठी तर या वेबसाईटवर टाकला नाही ना,हेही लक्षात येईल.
2 जीबी रॅम
     10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या स्मार्टफोनचे आता 2 जीबी रॅम सामान्य झाले आहेत.त्यामुळे सेकंडहँड स्मार्टफोनमध्ये कमीत कमी 2 जीबी रॅम असणं आवश्यक आहे. प्रोसेसरदेखील चेक करून पाहायला हवं. एक वर्ष जुने मिडियाटेक प्रोसेसर स्मार्टफोनचे परफॉर्मेंस चांगले राहत नाही.क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन चिपचे स्मार्टफोन चांगले असतात.
हार्डवेअरवर लक्ष द्या
     स्मार्टफोनची बॉडी लक्षपूर्वक तपासा.कुठे तो फुटला तर नाही ना, ते पहा.सोबत लॅपटॉप आणि यूएसबी केबल आवश्य घेऊन या. तो योग्यप्रकारे चार्ज होतो की नाही ते पहा. शिवाय फाईल्स योग्यप्रकारे ट्रान्सफर होतात की नाही ते चेक करा. त्यात सिमकार्ड टाकून नेटवर्क योग्यप्रकारे चालतो का पाहतानाच इंटरनेट सुरू करून अॅप्सदेखील रन करा.
वॉरंटी तपासा
     कित्येकदा लोक नवीन स्मार्टफोन घेतात आणि आपला जुना स्मार्टफोन विकतात. कित्येकदा लोक फोन खरेदी करताना स्मार्टफोनच्या वॉरंटी कालावधीकडे पाहत नाहीत.वॉरंटी कालावधी पाहण्याचे कारण म्हणजे यामुळे कदाचित हा तुमचा फायद्याचा व्यवहार ठरू शकतो. यामुळे कुठल्याही प्रकारची तक्रार आल्यास आपण त्याला ऑफिशियली सर्विस सेंटरकडे जाऊ शकतो



यशासाठी घाला सकारात्मक चश्मा


     प्रत्येक माणूस आपले जीवन सुंदर बनवण्यासाठी कोणता ना कोणता संकल्प आवश्य करत असतो. जर तुम्हाला आपले आयुष्य आणि करिअर आनंददायी बनवयाचे असेल तर तुम्हालाही एक संकल्प सोडायला हवा. तो म्हणजे आपला दृष्टीकोन थोडा बदलण्याचा संकल्प. तुम्हाला आपल्या नजरेवर पॉजिटिव चश्मा चढवावा लागेल. काही काळ हा चश्मा तसाच  घालून ठेवा, मग आपलं जीवन  नजरांना चांगले दिसायला लागेल.
या जगात सगळेच चांगले
     जर आपण वाईटच पाहण्याचा निश्चय केला असेल तर मग कसं बरं आपण यशापर्यंत पोहोचू शकाल? या नजरेमुळे आपल्याला प्रत्येक पावलावर वाईटच दिसेल. कुठे भ्रष्टाचार असेल,कुठे भावंडांमध्ये वाद दिसतील. कुठे काय तर कुठे1 आपल्याला चांगले दिसण्याची कुठे संधीच दिसणार नाही.यामुळे निराश होऊन मान खाली घालून बसण्यापेक्षा उठा. आकाशाकडे पहा. आपल्या मनातल्या विश्वासाला कमजोर होऊ देऊ नका.
होतं ते चांगल्यासाठी
     जग खूप मोठं आहे, मात्र आपला विचार करण्याचा परीघ छोटा आहे. कित्येकदा आपण एखाद्या घटनेच्याबाबतीत इच्छा असूनही चांगल्या दृष्टीने विचार करू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या चांगल्या बाबींकडे लक्ष द्यायला सुरुवात करा.मग बघा, तुम्ही प्रत्येक गोष्टीचा सहजतेने निपटारा करू लागाल.
चांगले पहा,चांगले होईल
     सगळं जग चांगल्या गोष्टीनं भरलेलं आहे.पण कदाचित आपली रीत असेल किंवा जगाची. आपण कुठल्या गोष्टींवर विश्वासच ठेवायला तयार नाही.कित्येकदा आपण प्रत्येक चांगल्या माणसामध्ये वाईट शोधायला लागतो. कंपनी किंवा बॉसने  आपल्या हितासाठी लाख चांगली पावले उचलू दे, आपले मन वाईटच चिंतणार. आपल्याला विश्वासच होत नाही की,जगात आपल्यासोबतदेखील चांगले घडू शकते. आपण फक्त संशय घेत राहतो.कित्येकदा आपल्याबाबतीत वाईट घडतं,त्यावेळा आपण असा का विचार करत नाही की, वाईट काळात वाईट विचार केल्याने वाईटच गोष्टी वाढतील.
आनंद आजूबाजूलाच आहे
     नेहमी लोकांना वाटतं की, सुख मोठ्या मुश्किलीने मिळतं.पण हे खरे नाही. सुख तर नेहमी आपल्या आजूबाजूलाच विखुरलेलं असतंफक्त तो गोळा करणारा आणि वाटणारा माणूस पाहिजे आहे. आनंद मिळवण्यासाठी आपल्याला दूर कुठे जाण्याची गरज नाही. तर तो जाणून घेण्याची गरज आहे.    



हा निर्णय देश हिताचा नाही


     कर्नाटक सरकारकडून लवकरच राज्यातील खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या नोकर्‍यांमध्ये स्थानिक लोकांना म्हणजेच भूमिपुत्रांना 100 टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. यातून माहिती व तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्राला वगळण्यात आले आहे. यातून सगळ्यात पहिला प्रश्‍न असा उपस्थित होतो की,खासगी क्षेत्रात अशा प्रकारची आरक्षण व्यवस्था लागू केली जाऊ शकते का? केले जाऊ शकते तर मग कुठल्या क्षेत्रात केले जाऊ शकते किंवा किती करू शकतो? वास्तविक अशा प्रकारच्या प्रश्‍नाची चर्चा करणंच योग्य नाही. अशा प्रकारची चर्चा देशाच्या हिताची नाही.जर खासगी क्षेत्रात आरक्षणाची गोष्ट केलीच तर खासगी क्षेत्रच संपुष्टात येईल आणि देशातील रोजगाराची समस्या कमी होण्यापेक्षा आणखी वाढेल.स्थानिक लोकांना नोकरी देण्यास खासगी क्षेत्राला बांधिल करणं योग्य नाही.उदाहरण म्हणून जर कर्नाटक किंवा आंध्र प्रदेशच घेतल्यास, आणि इथे खासगी क्षेत्रास आरक्षण लागू केल्यास सांगा, मग हा निर्णय माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राला का लागू केला नाही?  असे करण्याचा प्रयत्न केला असता तर  या क्षेत्राचा विकासच खुंटला असता. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे क्षेत्र सरकारकडून कुठल्याही प्रकारचे अनुदान घेत नाही, सवलत मिळवत नाही.उलट राज्यालाच काही देत असेल तर त्यांना अशा प्रकारची बांधिलकी स्वीकारायला लावता ये ईल  का? खरे तर सर्वोच्च न्यायालयासमोर अशा प्रकारचा मामला आलेला नाही. त्यामुळे त्यांच्या निर्णयाचे उदाहरण समोर नाही.पण वाटतं की, न्यायालयदेखील अशा प्रकारचा निर्णय सामान्य माणसाच्या मूळ अधिकाराच्या विरुद्धच मानेल आणि या विचाराच्या विरोधातच निर्णय देईल. तुम्ही कुणाला अशा प्रकारचे आरक्षण देण्यासाठी दवाब आणू शकत नाही. वास्तविक  ते तुमचा निर्णयच मानत नाहीत. वरकरणी अशा प्रकारचा मान्य करतील, पण त्यांना जे काही करायचे आहे, तेच करतील. हा मुद्दाच वेगळा आहे, त्यामुळे याची इथे चर्चा करणे योग्य नाही. आता दुसरा प्रश्‍न हा की,खासगी क्षेत्रातील कंपन्या, कारखाने तर स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार देत असतात. ते असे यासाठी करतात, कारण स्थानिक व्यक्ती,माणसे त्यांच्यासाठी अधिक काम करू शकतात. अन्य प्रदेशातील व्यक्ती तर अनेक कारणांसाठी आपल्या घरी, आपल्या प्रदेशात जायला बघतो.त्याच्या सुट्टी घेऊन जाण्याने कामकाजावर परिणाम होतो. त्यामुळे खासगी क्षेत्राला आरक्षणासाठी दबाव आणण्याची गरजच नाही. जरा विचार करा, देशातल्या अन्य राज्यांनीही अशाच प्रकारचा निर्णय घेतला तर काय होईल? मुंबई शहर तर उत्तर प्रदेश आणि बिहारी लोकांनी भरलेलं आहे. जर इथेही खासगी क्षेत्रात आरक्षण दिले जाऊ लागले तर हे क्षेत्र रिकामच होऊन जाईल. त्यामुळे विविध प्रकारच्या आरक्षणानं खासगी क्षेत्रात रोजगार उपलब्ध करणं फारच संकोचित विचार म्हणता येईल.नि: संशय हा अशा प्रकारचा निर्णय राजकीय कारणांनी घेतला जातो. पण यामुळे देश आणि समाजाचेच मोठे नुकसान होते. आरक्षण जातीच्या नावावर असेल किंवा मग भाषेच्या नावावर,खासगी क्षेत्रात तर चुकीचेच मानले जाईल. कदाचित  अशा प्रकारच्या गोष्टी राजकीय लाभासाठी केल्या जात असतील. आणि त्यामुळे लोकांना मतेही मिळत असतील पण शेवटी याचे नुकसान देशालाच सोसावे लागणार आहे.या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर वाटतं की, अशा प्रकारची चर्चा करणंच योग्य नाही. कारण हा निर्णय देश हिताचा नाही. संवेधानिकदृष्ट्या तर याला योग्य मानलं जाऊच शकत नाही.


Friday, December 23, 2016

गोल्डन गर्ल: सिमोन बाईल्स


    
चार फूट 9 इंच उंचीच्या सिमोन बाईल्सचे आयुष्य चित्रपटात शोभेल असेच आहे.कोलंबियात जन्मलेली सिमोनची आई मादक द्रव्याच्या आहारी गेली होती.त्यामुळे वयाच्या सहाव्या वर्षांपासून तिचा आजी- आजोबांनी सांभाळ केला.सिमोनसह त्यांनी तिच्या बहिणीलाही दत्तक घेतले.गोल्डन गर्ल म्हणून ओळखली जाणारी सिमोन 19 वर्षे वयात वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या इतिहासात सगळ्यात जास्त गोल्ड मेडल जिंकणारी जिम्नॅस्ट बनली आहे. तिच्या आयुष्यातील अंतरंगाविषयी...
     सिमोनला आईचा व्यवहार विचित्र वाटत होता.ती कधीही आपल्या मुलांवर प्रेम करत नव्हती.ती इतर आयांप्रमाणे  घरात ना स्वयंपाक करायची ना मुलांचा सांभाळ करायची.कित्येक दिवस तर ती घरीच यायची नाही. आलीच तर तिची अवस्था मोठी विचित्र असायची. लहानगी सिमोन तिच्याजवळ जायचा प्रयत्न करायची.पण ती भडकून तिला झिडकारून टाकायची.सिमोनला दोन बहिणी आणि एक भाऊ होता. तिचे आजोबा ऊेमधे यायचे,मुलांची हालहवा जाणून घ्यायला.ते आईला खूप रागवायचे. तिला ड्रग्झ सोडण्याचा सल्ला द्यायचे. पण आईवर त्याचा काही एक परिणाम व्हायचा नाही.
     तेव्हा सिमोन फक्त सहा वर्षांची होती. तिला माहित नव्हतं की, ड्रग्झ काय चीज आहे? पण तिला एवढं माहित होतं की,ड्रग्झमुळेच आईची ही खराब अवस्था झाली आहे.काही दिवस गेले. आईच्या वागण्यात काहीच सुधारणा झाली नाही.मग एक दिवस आजोबांनी वैतागून एक निश्चय केला की, सिमोन आणि तिची धाकटी बहीण अदरिया आपल्या आईसोबत राहणार नाहीत. ते दोघींना घेऊन आपल्या घरी आले. आईने एका दस्ताऐवजावर सही करून आपल्या दोन मुलींशी कायदेशीररित्या संबंध तोडून टाकले. आता ती कधीच आपल्या दोन मुलींना भेटणार नव्हती. ही घटना आहे2003 सालची.आजोबा आपल्या दुसर्या पत्नीसोबत टेक्सासला राहत होते. नेली खूपच प्रामाणिक महिला होती. सिमोन सांगते, आजी खूपच चांगली होती. ती आमची फार काळजी घ्यायची. आम्ही आजोबांना पप्पा म्हणायचो, आणि आजीला मम्मी. ते आमचा फार लाड करायचे.त्यांनी आम्हाला कायद्यानं दत्तक घेतलं होतं. आईमुळं मुलांचं आयुष्य बरबाद हो ऊ नये, असं त्यांना वाटायचं. त्यामुळे त्यांनी आईला सक्त ताकीद दिली होती की,त्यांनी कधीच त्यांच्या घरी यायचं नाही.मुलींना कधी भेटायचा प्रयत्नही करायचा नाही.
     आता सिमोन आणि अदरियाची जबाबदारी आजी- आजोबांवर होती. पण त्यांची मोठी बहीण एशले आणि भाऊ तेविन तेव्हाही एकटचेच होते.त्यांचा सांभाळ करायला कोणीच नव्हते. सगळ्यात दुखद गोष्ट म्हणजे सिमोनचे वडील केल्विन स्लेवन यांनाही नशेची लत होती. ते तर आधीच घर सोडून गेले होते.या दरम्यान एका नातेवाईकांनी एशले आणि तेविन यांना दत्तक घेतले. अशाप्रकारे चारही भावडांना नवे पालक मिळाले.पण त्यांचे मूळ कुटुंब मात्र उदवस्त झाले होते.
     सिमोन आणि अदरिया शाळेत शिकू लागल्या. त्यांना त्यांचं बालपण परत मिळालं.त्यांचं खेळणं-बागडणं पाहून आजी- आजोबा खूश होत. एकदा शाळेच्यावतीने मुले एका जिमनॅस्टिक सेंटरला भेट द्यायला गेली. सिमोनने तिथे जिम्नॅस्टच्या कसरती पाहिल्या. तिला राहवले नाही,तीही सगळ्यासमक्ष त्यांची नक्कल करू लागली. सगळे एकदम चाट पडले, कारण तिच्यात कमालीची स्फूर्ति होतीच पण कोणत्याही ट्रेनिंगशिवाय ती लिलया कसरती करीत होती.ती घरी आली. एका आठवड्याने सेंटरमधून एक पत्र आले. पत्रात लिहिले होते की, आपल्या मुलीमध्ये अदभूत प्रतिभा आहे.तिला ट्रेनिंगसाठी पाठवून द्या. दुसर्याचदिवशी जिम्नॅस्ट सेंटरमध्ये तिची भरती झाली. सिमोन सांगते, आजीने मला जिम्नॅस्ट बनण्यासाठी प्रेरित केले.तिने मला कधीच निराश केले नाही.ती माझी आईही आहे आणि आजीही. मला कधीच वाटले नाही की, ती माझ्या आईची सावत्र आई आहे.
     लहानग्या सिमोनला या खेळात आनंद वाटू लागला.ज्या कसरती करायला बाकीच्या मुलांमुलींना कित्येक वर्षे लागायची, त्या सिमोन काही दिवसांतच शिकून घ्यायची. लवकरच तिची ख्याती सार्या अमेरिकेत पसरली. की बातमी तिच्या खर्या आईपर्यंत म्हणजे शेनॉनपर्यंत पोहचली. ज्या ज्या वेळेला टिव्हीवर तिच्या मुलीची बातमी यायची, त्या त्या वेळेला तिचं मन तिला भेटायला अतुर व्हायचं. पण वडील रोनाल्ड यांची सक्त ताकीद असल्यामुळे ती असे काही करू शकत नव्हती. या दरम्यान तिने नशेच्या सवयीपासून स्वत:ची सुटका करून घेतली होती.पण कायद्यानं ती आपल्या मुलांवरचा अधिकार गमावून बसली होती.शेनॉन म्हणते,माझी सिमोनला भेटण्याची खूप तडपड व्हायची. मी खूप रडायची. पण माझ्यामुळे तिचे लक्ष विचलित होऊ नये म्हणून मी तिला भेटायचा प्रयत्न केला नाही.

     गेल्या काही वर्षात सिमोन जिम्नॅस्टोंच्या जगतात नवी सनसनाटी निर्माण करत एकदम प्रकाश झोतात आली.कमी कदकाटीच्या या अश्वेत मुलीला पाहून सारे जग चकीत झाले. तिने सर्वाधिक सुवर्णपदक पटकावण्याचा विक्रम केला.त्यामुळे लोक तिला गोल्डन गर्ल म्हणू लागले. यावर्षीच्या रिओ ऑलम्पिकमध्ये तिने चार सुवर्णपदके आपल्या नावावर केली. 19 वर्षाच्या या वयात इने वर्ल्ड चॅम्पियनच्या इतिहासात सगळ्यात जास्त पटकावली आहेत.ती तीन कसरती एका दमात करते. तिच्या स्टाईलला द बाईल्स असे नाव दिले गेले आहे.सिमोन सांगते, माझ्या कित्येक सहकारी मित्र-मैत्रिणी माझ्यासारखा पराक्रम दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण ते तो करू शकत नाहीत.मला स्वत:लाच माहित नाही की, ही कला मी कशी शिकले? सिमोन आपल्या यशावर खूश आहे. ती म्हणते,हे सगळं आजी- आजोबांच्या त्यागा आणि प्रेमामुळं शक्य झालं. आता तिला तिच्या आईविषयी कसलीच तक्रार नाही. पाच वर्षांपूर्वी ती आपल्या आईला भेटली होती. आता ती नेहमी तिच्याशी फोनवर गप्पा मारत असते.सिमोनची आई म्हणते,ज्या वेळेला माझ्या मुलीने रिओमध्ये गोल्ड मेडल जिंकले, त्यावेळेला मी माझ्या शेजार्यांमध्ये चॉकलेट्स वाटली. मला खात्रीच वाटत नाही की, मी सिमोनची आई आहे.