Saturday, December 24, 2016

यशासाठी घाला सकारात्मक चश्मा


     प्रत्येक माणूस आपले जीवन सुंदर बनवण्यासाठी कोणता ना कोणता संकल्प आवश्य करत असतो. जर तुम्हाला आपले आयुष्य आणि करिअर आनंददायी बनवयाचे असेल तर तुम्हालाही एक संकल्प सोडायला हवा. तो म्हणजे आपला दृष्टीकोन थोडा बदलण्याचा संकल्प. तुम्हाला आपल्या नजरेवर पॉजिटिव चश्मा चढवावा लागेल. काही काळ हा चश्मा तसाच  घालून ठेवा, मग आपलं जीवन  नजरांना चांगले दिसायला लागेल.
या जगात सगळेच चांगले
     जर आपण वाईटच पाहण्याचा निश्चय केला असेल तर मग कसं बरं आपण यशापर्यंत पोहोचू शकाल? या नजरेमुळे आपल्याला प्रत्येक पावलावर वाईटच दिसेल. कुठे भ्रष्टाचार असेल,कुठे भावंडांमध्ये वाद दिसतील. कुठे काय तर कुठे1 आपल्याला चांगले दिसण्याची कुठे संधीच दिसणार नाही.यामुळे निराश होऊन मान खाली घालून बसण्यापेक्षा उठा. आकाशाकडे पहा. आपल्या मनातल्या विश्वासाला कमजोर होऊ देऊ नका.
होतं ते चांगल्यासाठी
     जग खूप मोठं आहे, मात्र आपला विचार करण्याचा परीघ छोटा आहे. कित्येकदा आपण एखाद्या घटनेच्याबाबतीत इच्छा असूनही चांगल्या दृष्टीने विचार करू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या चांगल्या बाबींकडे लक्ष द्यायला सुरुवात करा.मग बघा, तुम्ही प्रत्येक गोष्टीचा सहजतेने निपटारा करू लागाल.
चांगले पहा,चांगले होईल
     सगळं जग चांगल्या गोष्टीनं भरलेलं आहे.पण कदाचित आपली रीत असेल किंवा जगाची. आपण कुठल्या गोष्टींवर विश्वासच ठेवायला तयार नाही.कित्येकदा आपण प्रत्येक चांगल्या माणसामध्ये वाईट शोधायला लागतो. कंपनी किंवा बॉसने  आपल्या हितासाठी लाख चांगली पावले उचलू दे, आपले मन वाईटच चिंतणार. आपल्याला विश्वासच होत नाही की,जगात आपल्यासोबतदेखील चांगले घडू शकते. आपण फक्त संशय घेत राहतो.कित्येकदा आपल्याबाबतीत वाईट घडतं,त्यावेळा आपण असा का विचार करत नाही की, वाईट काळात वाईट विचार केल्याने वाईटच गोष्टी वाढतील.
आनंद आजूबाजूलाच आहे
     नेहमी लोकांना वाटतं की, सुख मोठ्या मुश्किलीने मिळतं.पण हे खरे नाही. सुख तर नेहमी आपल्या आजूबाजूलाच विखुरलेलं असतंफक्त तो गोळा करणारा आणि वाटणारा माणूस पाहिजे आहे. आनंद मिळवण्यासाठी आपल्याला दूर कुठे जाण्याची गरज नाही. तर तो जाणून घेण्याची गरज आहे.    



No comments:

Post a Comment