Friday, February 15, 2019

प्रेमाचा पारा


प्रेमात अपयशी ठरलेल्या प्रेमी मंडळींची एक सर्वसाधारण तक्रार असते की, त्यांना यात काहीच मिळालं नाही. पण खरे तर प्रेम कधी मिळवण्याचे साधनच नसते, ती तर नेहमी द्यायची वस्तू असते. प्रेम द्यायचं म्हणजेच मिळवायचं, असा त्याचा अर्थ आहे. तत्त्वज्ञ खलील जिब्रान यांनी लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात, जर तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर त्याला जाऊ द्या,कारण जर ती परत येते, तेव्हा ती तुमची असते. जर ती आली नाही ती तुमची नाही. खलील यांच्या मतानुसार, तुम्ही त्याला जाऊ दिले, म्हणजेच ते तुमचे देणे आहे. हेच तुमचे ग्रहीत. ओशोसुद्धा आशाच  काहीशा शब्दांमध्ये सांगतात की, प्रेम हे एक दान आहे. प्रेम मागायचं नसतं. ती एक भेट आहे. प्रेम भिकारी नाही, सम्राट आहे. जो प्रेम देतो, वाटतो, त्यालाच प्रेम मिळते.

Tuesday, February 12, 2019

चहावाले ते शाळा मास्तर


     
डी प्रकाश राव यांच्या वडिलांनी दुसर्या विश्व युद्धात भाग घेतला होता. युद्ध संपल्यावर ते आपल्या ओडिशातल्या घरी परतले.त्यांचे कुटुंब कटकमधल्या बक्सी बाजार इलाक्यात राहत होते. त्यांना कामाच्या शोधात इकडे-तिकडे भटकावं लागलं.पण काम काही मिळालं नाही. कुटुंबाजवळ शेती करण्याइतपत जमीनदेखील नव्हती. जवळ पैसा-अडका नव्हता. फक्त पाच रुपये त्यांच्याजवळ होते. कुठेच काम मिळालं नाही,म्हटल्यावर त्यांनी चहाची टपरी टाकली.

सोशल मीडियाने खूप काही हिरावून घेतलं


आज सर्वत्र सोशल मीडियाचा दबदबा आहे. तरुणाई यातच व्यस्त आहे.फार विचार न करता तत्कालीन परिस्थितीवर भाष्य अथवा मत व्यक्त करून मोकळी होणारी ही तरुणाई भविष्याचा फार विचार करताना दिसत नाही. मुलां-बाळांपेक्षा करिअरला महत्त्व देणारी आजची पिढी पैशालाच सर्वस्व मानते आहे. मात्र यामुळे आपल्या मुलांना वेळ देऊ शकत नसल्याने पुढच्या पिढीचेही काही खरे नाही,अशी परिस्थिती आहे. आज सर्वांच्या हातात स्मार्टफोन आला आहे, त्याच्याशी खेळण्याचा छंद सर्वांना जडला आहे. आज स्मार्टफोनची गरज असली तरी त्याचा किती उपयोग करून घ्यावा, हे आज कळण्याची आवश्यकता आहे. कुणाला कुठे ठेवावे,हे आपल्याला माहीत असले तरी त्याप्रमाणे मोबाईललाही कुठे ठेवावे कळले पाहिजे. आज मोबाईल बेडरूमपासून संडासपर्यंत सर्वत्र वावरत आहे. प्रत्यक्षात समोर असलेली माणसे त्याच्यापासून दूर होत चालली आहेत. नाती-गोती संबंधासह कित्येक गोष्टी त्याने हिरावून नेल्या आहेत. यात महत्त्वाची पुस्तकेदेखील आहेत. 

Friday, February 1, 2019

नाते असे जपा!


     
नात्यामध्ये प्रेम असायला हवं,पण एकमेकांशी सतत जोडून राहणं चुकीचं आहे. अशा परिस्थितीत नातेसंबंधावर त्याचा परिणाम होतो. आपसातील ओढीवर त्याचा परिणाम होऊन असं वाटायला लागतं की, नातं फक्त निभावलं जात आहे. आपल्या नात्यांमध्ये अगदीच जवळीक निर्माण करायची असेल तर अधे-मधे त्यातील दुराव्याचा स्वाददेखील चाखला पाहिजे. अमेरिकेतील वर्तणूक विज्ञानाचे शास्त्रज्ञ डॉ. जोसेफ जे प्लाउड म्हणतात की, आपल्याला वाटतं असतं की, आपली प्रिय व्यक्ती सतत आपल्यासोबत राहायला हवी. पण यात आपण इतके गंभीर होतो की, त्याला अप्रिय बनवून टाकतो. सोबत राहून व्यक्तिस्वातंत्र्य मिळत नसेल तर नात्यात बिघाड निश्चित मानायला हवं.

Thursday, January 31, 2019

प्रसिद्धी कुणाला नकोय!


आपल्याला नेहमी अनेक प्रकारची माणसं भेटत असतात. त्यातल्याच काहींना प्रसिद्धी नको असते. कुणी कौतुक केलं तर म्हणतात, मीदेखील असं करू शकतो,पण मला प्रसिद्धी नकोय. अर्थात कुणाला प्रसिद्धी नकोय, ही खरे तर चांगलीच गोष्ट म्हटली पाहिजे. पण त्यामुळे चांगलं काम न करणं मूर्खपणाचं नाही का? मला तर वाटतं, याच्यापेक्षा आणखी कोणी दुसरा मूर्ख असू शकेल. प्रसिद्धी नको म्हणून तो फक्त कामापासून दूर जाण्याचं काम करतो.

Friday, January 18, 2019

मोबाईलवर स्मार्टशिक्षण द्या


ओडिसातील गंजम जिल्ह्यामध्ये ओडिया माध्यमांच्या शाळांमध्ये स्मार्टफोनच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. ऑनलाईन अध्यापन प्रणाली यासाठी विकसित केली असून यथावकाश अशा प्रकारचे शिक्षण संपूर्ण राज्यात दिले जाणार आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून शिक्षण देण्याची ही कल्पना मोठी भन्नाट असून याचा लाभ नक्कीच विद्यार्थ्यांना होणार आहे. विविध विषयांतील तज्ज्ञ शिक्षकांनी घेतलेल्या शिकवणीचे रेकॉर्डिंग करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. यूट्युब आणि व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून शिक्षकांचे अध्यापन उपलब्ध करून दिले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून अभ्यास करता येणार आहे. एखाद्या दिवशी विद्यार्थी अनुपस्थित राहिला तरी त्याला स्मार्टफोनच्या माध्यमातून मागे काय शिकवले, याची माहिती मिळू शकते.या स्मार्टफोन शिक्षणाचा नक्कीच फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. खरे तर आपल्या महाराष्ट्र सरकारने याबाबतीत आघाडी घ्यायला हवी होती. पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्र हे शब्द फक्त नावालाच आहेत, असेच शिक्षणाच्याबाबतीत जाणवते.

Wednesday, January 9, 2019

गांजा,हुक्का पार्टीत रमलीय तरुणपिढी


आजच्या तरुणपिढीला गांजा बरबाद करते आहे. आज दुष्काळी भागासह सधन म्हणजेच ऊसक्षेत्रातदेखील गांजा मोठ्या प्रमाणात पिकवला जात असून आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हा गांजा चक्क वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मिळू लागला आहे. देशी आणि विदेशी दारू जशी वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये कंपन्या काढू लागल्या आहेत, तसेच गांजादेखील वेगवेगळा फ्लेवर मारून चोरट्या मार्गाने बाजारात येऊ लागला आहे. त्यातच हुक्का पार्टी करण्याचे फॅड आजच्या तरुणाईमध्ये आलेली आहे. त्यामुळे अशा नवनव्या नशाखोरीमुळे तरुण वर्ग बरबाद होत चालला आहे. त्याला सावरण्याची गरज असून यासाठी शासनाने कडक कायदे करण्याबरोबरच कायद्याची अंमलबजावणी करणार्यांनी डोळ्यांत तेल घालून अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आजच्या तरुणांमध्ये व्यसनाधिनता प्रचंड वाढली असून यामुळे अनेकांना अकाली वृद्धत्व आणि कायमस्वरुपी पाठी लागणारे आजार चिकटू लागले आहेत. हा भारतासारख्या तरुण देशाला घातक आणि मारक आहे.