Wednesday, September 27, 2023

युद्ध निर्वासितांना विस्थापनाचा करावा लागतोय सामना

जिनिव्हा येथे निर्वासितांच्या समस्यांवरील यूएन उच्च आयोगाच्या (NHCR) जागतिक ट्रेंड अहवालाचे प्रकाशन करताना, UN निर्वासित एजन्सीचे प्रमुख फिलिपो ग्रँडी म्हणाले की, 'छळ आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनामुळे सुमारे 11कोटी लोकांना आपले घर सोडावे लागले आहे. ही गोष्ट आपल्या जागतिक परिस्थितीला लांच्छनास्पद आहे.  2022 मध्ये सुमारे 1.9 कोटी लोक विस्थापित झाले, त्यापैकी 1.1 कोटींहून अधिक लोकांनी युक्रेनवर रशियाच्या आक्रमणामुळे आपली घरे सोडली.दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने लोक युद्धामुळे विस्थापित झाले आहेत.  खरं तर हे आणीबाणीचेच लक्षण आहे, असे म्हणावे लागेल.

अल्पावधीतच पस्तीस प्रकारच्या आपत्कालीन घटना समोर आल्या आहेत, ज्या गेल्या काही वर्षांच्या तुलनेत तीन ते चार पटीने अधिक आहेत. ग्रँडी यांनी असा युक्तिवाद केला की सुदानमधून पाश्चात्य नागरिकांना हद्दपार केल्यानंतर, तेथे सुरू असलेल्या संघर्षाच्या बातम्या बहुतेक वर्तमानपत्रांमधून गायब झाल्या आहेत. सुदानमधील या संघर्षामुळे एप्रिल 2023 पासून 20 लाख लोक विस्थापित झाले आहेत. त्याच वेळी, रिपब्लिक ऑफ काँगो, इथिओपिया आणि म्यानमारमधील संघर्षामुळे प्रत्येकी 10 लाख लोकांना त्यांचे मूळ निवासस्थान आणि देश सोडण्यास भाग पाडले गेले आहे. मात्र, सकारात्मक माहिती देताना त्यांनी समाधान व्यक्त केले की, '2022 मध्ये एक लाख 14 हजार निर्वासितांचे पुनर्वसन करण्यात आले, जे 2021 च्या तुलनेत दुप्पट आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या दहा दिवसांनंतर, संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांसाठी उच्च आयोगाने अहवाल दिला की हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दहा लाखांहून अधिक नागरिक युक्रेनमधून पळून गेले आहेत. गेल्या शतकात इतक्या वेगाने स्थलांतर कुठेही झालेले नाही. हे लोक रोमानिया, पोलंड, मोल्दोव्हा, स्लोव्हाकिया, हंगेरी आणि बेलारूसमध्ये आश्रय घेत आहेत. त्यापैकी सर्वाधिक 6.5 लाख लोक पोलंडमध्ये आश्रयाला गेले आहेत.  काही लोक जवळच्या रशियाच्या सीमा भागातही गेले आहेत.

सर्वात कमी शरणार्थी बेलारूसमध्ये पोहोचले आहेत.  कारण बेलारूस हा रशियाचा मित्र देश आहे. जागतिक बँकेच्या मते, 2020 च्या अखेरीस युक्रेनची लोकसंख्या 4.4 कोटी होती. एनएचसीआरला भीती आहे की जर परिस्थिती आणखी बिघडली तर चाळीस लाखांहून अधिक युक्रेनियन नागरिकांना शेजारच्या देशांमध्ये आश्रय घेण्यास जावं लागेल. यापूर्वी 2011 मध्ये सीरियामध्ये सुरू झालेल्या गृहयुद्धामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू झाले, जे 2018 मध्ये अमेरिकेने केलेल्या हल्ल्यापर्यंत सुरूच होते. अमेरिकेने आपले मित्र राष्ट्र ब्रिटन आणि फ्रान्ससह सीरियावर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. सीरियामध्ये असलेल्या रासायनिक शस्त्रांचा साठा नष्ट करण्याच्या उद्देशाने 105 क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सची ही क्षेपणास्त्रे राजधानी दमास्कस आणि होम्सवर डागण्यात आली.  यामध्ये रासायनिक शस्त्रांची भांडारे आणि वैज्ञानिक संशोधन केंद्रांना लक्ष्य करण्यात आले.त्यामुळे अनेक इमारतींना आग लागली आणि दमास्कस धुराने झाकोळले गेले.  युक्रेनमध्ये रशियन हल्ल्यामुळे आजकाल असेच दृश्य पाहायला मिळत आहे.जैविक आणि रासायनिक शस्त्रांच्या भीतीने अमेरिकेने इराकवरही हल्ला केला होता.

सुमारे साडेसात वर्षे चाललेल्या सीरिया युद्धात पाच लाखांहून अधिक लोक मारले गेले.  निर्वासित म्हणून एक कोटी लोकांना विस्थापनाचा फटका सहन करावा लागला, त्यापैकी 67 लाख लोक अजूनही अनेक देशांमध्ये निर्वासित आहेत. धर्मांधतेमुळे हे निर्वासित ज्या देशांमध्ये राहत आहेत, तेथेही ते अडचणीचे कारण बनले आहेत. जर्मनीने जास्तीत जास्त विस्थापित लोकांना आश्रय दिला होता.  खरं तर, 7 एप्रिल 2018 रोजी रासायनिक हल्ल्यात सत्तर नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सूडाची कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला होता. तोही त्यांनी निष्कर्षापर्यंत नेला होता. कदाचित त्यामुळेच रशियाचे उपपंतप्रधान अर्काडी व्होर्कोविच यांनी ट्रम्प यांना प्रत्युत्तर देताना 'आंतरराष्ट्रीय संबंध एखाद्या व्यक्तीच्या स्वभावावर अवलंबून नसावेत' असे म्हटले होते. व्लादिमीर पुतिनही युक्रेन युद्धात ट्रम्पसारखे वागत आहेत आणि अमेरिकेसारखे बलाढ्य देश या आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत.  म्हणूनच युद्ध सुरूच आहे."

युक्रेनच्या NHCR (राष्ट्रीय मानवाधिकार आयोग) प्रतिनिधी कॅरोलिना म्हणाल्या की 'जग शेजारच्या देशांमध्ये आश्रय घेतलेल्या लोकांच्या डेटाकडे पाहत आहे, परंतु हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की सर्वाधिक प्रभावित लोक अजूनही युक्रेनमध्ये आहेत. आमच्याकडे या अंतर्गत विस्थापित नागरिकांबद्दल कोणताही विश्वसनीय डेटा नाही. NHCR म्हणते की लाखो लोकांना देशामध्ये विस्थापन आणि दहशतीचा फटका सहन करावा लागला आहे, जे सध्या ट्रेन, बस, कार किंवा बंकरमध्ये राहून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. संयुक्त राष्ट्र निर्वासित संस्थेच्या जागतिक अहवालानुसार, विस्थापन संकट वीस वर्षांपूर्वीच्या तुलनेत दुप्पट झाले आहे. 2019 पर्यंत, अंतर्गत विस्थापितांची एकूण संख्या 4 कोटी 13 लाख होती.  त्यापैकी 1 कोटी 36 लाख लोक असे आहेत ज्यांना 2018 मध्ये विस्थापित व्हावे लागले होते. हे खरे आहे की विकसित देश त्यांच्या वर्चस्वासाठी युद्धाची परिस्थिती निर्माण करतात, कारण अमेरिका आणि रशिया यांच्यातील वर्चस्वाचा लढा आपण युक्रेनच्या दृष्टिकोनातून पाहत आहोत. हे तेच देश आहेत ज्यांनी 1993 पर्यंत तिसरी आण्विक शक्ती असलेल्या युक्रेनला 1994 मध्ये बुडापेस्ट अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी करायला भाग पाडले आणि त्यांची  सर्व अण्वस्त्रे समुद्रात नष्ट केली. या करारासाठी अमेरिका आणि ब्रिटनने युक्रेनला तयार केले होते आणि या देशांसोबत रशियानेही सहमती दर्शवली आणि युक्रेनच्या सुरक्षेची हमी दिली होती. मात्र आता रशियाने थेट युक्रेनवर हल्ला केला असून अमेरिका आणि ब्रिटन लांब राहून तमाशा पाहत आहेत.

असे असूनही, हे तेच श्रीमंत देश आहेत जे मोठ्या संख्येने युद्ध आणि पर्यावरण निर्वासितांना आश्रय देतात. 2015 मध्ये, लाखो लोकांनी सीरियातील हिंसाचारापासून वाचण्यासाठी महिला आणि मुलांसह भूमध्य समुद्र पार करून आपला जीव धोक्यात घालून ग्रीस आणि इटलीमध्ये आश्रय घेतला होता. या दोन्ही देशांनी तेव्हा म्हटले होते की, काळाचा विचार करता निर्वासितांना आश्रय देण्यासाठी धोरण तयार करणे आवश्यक आहे. व्हेनेझुएलामध्ये राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेमुळे चाळीस लाखांहून अधिक लोकांनी पलायन केले होते.  त्यापैकी जेमतेम पाच लाख लोकांना औपचारिक निर्वासितांचा दर्जा आहे. युद्ध आणि गृहयुद्धाच्या परिस्थितीमुळे सीरियातील सर्वाधिक 67 लाख, अफगाणिस्तानमधून 27 लाख, दक्षिण सुदानमधून 23 लाख, म्यानमारमधून 11 लाख आणि सोमालियातील 9 लाख लोकांनी विविध विकसित देशांच्या सीमावर्ती भागात शरणार्थी म्हणून आश्रय घेतला आहे. बांगलादेश आणि म्यानमारमधील गृहयुद्धांतून पलायन केलेल्या सुमारे चार कोटी लोकांनी भारतात घुसखोरी केली आहे. संयुक्त राष्ट्र निर्वासित एजन्सीच्या 2019 च्या अहवालानुसार, एकूण 7 कोटी 95 लाख विस्थापित लोकांपैकी 4 कोटी 57 लाख जातीय,नस्लीय , वांशिक हिंसाचार आणि पर्यावरणीय आणि नैसर्गिक आपत्तींमुळे त्यांच्याच देशात विस्थापनाला सामोरे जात आहेत. बलाढ्य देशांच्या लहरीपणामुळे कमकुवत देशांवर युद्ध लादले जाते आणि लाखो लोकांना निर्वासितांचे शापित जीवन जगावे लागते, ही विडंबनाच म्हणावी लागेल. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 


No comments:

Post a Comment