Monday, October 4, 2021

सण आणि मानवता धर्म


सुख, समाधान, शांतता आणि आनंदाची पर्वणी म्हणून सण साजरे केले जातात. आणखी म्हणजे उत्सव हे मनाचे आरोग्य जपत असतात. उत्सव साजरे करीत असताना आप्तेष्ट-मित्र एकत्र येतात. गावाच्या उत्सवात तर गावातील सर्व आबालवृद्ध स्त्री-पुरुष एकत्र येत असतात. उत्सवामुळे एकमेकांच्या भेटीगाठी होत असतात. उत्सवांमुळे सहकाराची व समानतेची भावना निर्माण होते. नवीन चांगल्या विचारांचा प्रचार उत्सवात करणे सहज शक्य होते. एखाद्या सार्वजनिक कामासाठी पैसासा गोळा करणे शक्य होते. सर्वानी एकत्र येऊन मोठे काम करता येऊ शकते. या उत्सवांतून मोठी सार्वजनिक कामे केली जाऊ शकतात. उत्सवांमधूनच नेतृत्व निर्माण होऊ शकते. कार्यकत्रे निर्माण होऊ शकतात. म्हणूनच लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले यांनी स्वराज्यप्राप्तीसाठी आणि राष्ट्रीय भावना निर्माण व्हावी यासाठी सार्वजनिक उत्सवांची प्रथा सुरू केली. उत्सवात सहभागी झाल्याने होणाऱ्या आनंदप्राप्तीबरोबरच माणसे आपल्या जीवनातील दु:ख, चिंता विसरून जातात उत्सवातून कला सादर करूनच कलावंत मोठे होतात. उत्सवांमुळे हजारो हातांनाही काम मिळते. राष्ट्रपुरुषांच्या जयंती उत्सवांमुळे राष्ट्राभिमान जागृत होण्यास मदत मिळते.

सणांमुळे आर्थिक विकासाला चालना मिळण्याबरोबरच सामाजिक सलोखा आणि बांधीलकीही जपली जाते. त्यामुळे सणांचा आनंद मनमुराद घ्यायला हवा. सणांची निर्मिती होण्यामागे पूर्वीपासून काही शास्त्रोक्त कारणं आहेत. शीख धर्मियांत गुरुपुरव, बैसाखी, होला महल्ला, दरबारे खालसा या सणांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक धर्मातील सणांद्वारे धर्मनिरपेक्षतेचा आणि संतांच्या सेवेचा संदेश दिला आहे. ख्रिश्चन धर्मात प्रामुख्याने ईस्टर हा सण साजरा करतात. प्रभू येशूच्या जन्माचे स्मरण म्हणून ख्रिसमस साजरा होतो. ईश्वरावर आणि मानवावर प्रेम करणे हा सणांचा प्रमुख उद्देश आहे.तसेच  सण-उत्सवांचा उद्देश शरीराचे आणि मनाचे आरोग्य चांगले राहणे हा आहे. शरीराचे आरोग्य विशेषत: आहारावर अवलंबून असते. ऋतूप्रमाणे आहारात बदल केला, की आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. म्हणून शास्त्रकारांनी ऋतूप्रमाणे सणांची रचना केलेली आहे.  शरीराचे आरोग्य विशेषत: आहारावर अवलंबून असते. ऋतूप्रमाणे आहारात बदल केला, की आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. म्हणून शास्त्रकारांनी ऋतूप्रमाणे सणांची रचना केलेली आहे.सणांद्वारे विविध धर्माची संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचविता येते. रोजे ठेवल्यामुळे मनुष्याला भूकेची आणि ईश्वराची जाणीव होते. ईद साजरी करताना भुकेल्याला अन्न द्यावे, हेच सांगितले जाते.   सणाचे काहीना काही वैशिष्ट्य असून, एकोप्याने सण साजरे करण्यातून मानवता धर्मही जपला जातो.

 - मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 


No comments:

Post a Comment