Wednesday, October 10, 2018

घटस्थापना-परंपरा आणि महत्त्व


उत्सव नवरात्रीचा
आज आश्विन शुद्ध प्रतिपदा. आजपासून नऊ दिवस दुर्गा देवीचीचा उत्सव साजरा होत आहे. त्यासशारदीय नवरात्रअसेही म्हणतात. शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव आहे. ते देवीशी संबंधित व्रत आहे. हिंदू धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत, तर शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. भारतात सर्वत्र या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे देवीचीपूजा केली जाते. सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तीचे दैवतीकरण होऊन त्या शक्तिरूप मूर्तीलादेवीअसे नाव मिळाले. शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया, जगदंबा म्हणून गौरविले. देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पाहायला मिळतात. जसे उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी ही सौम्य रूपांची नावे असून; दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत. महाकाली, महासरस्वती व महालक्ष्मी ही देवीची महत्त्वाची रूपे मानली आहेत. महाकाली संहार करणारी, दैत्यांना मारणारी हीतमोगुणीरूपी देवी आहे. महालक्ष्मी हे तिचेरजोरूपवैभव, संपत्ती यांचे रूप आहे

महासरस्वती हे तिचेसात्त्विकरूप आहे. सप्तशतीच्या पोथीत या तीनही रूपांचे वर्णन आहे. पहिल्या अध्यायात कालीचे वर्णन; दुसर्या ते चौथ्या अध्यायांत महालक्ष्मीचे वर्णन आहे. पाच ते तेरा अध्यायांत महासरस्वतीचे वर्णन आहे. नवरात्रात सप्तशतीच्या पोथीचे वाचन करतात. कथा नवरात्र व्रताची एक कथा सांगतात ती अशी, की रावणाने सीतेला पळवून नेल्यामुळे राम शोकग्रस्त झाला. मग त्याच्या सांत्वनासाठी नारद तिथे आला. त्या वेळी नारदाने रामाला सीतेच्या पूर्वजन्माची कथा पुढीलप्रमाणे निवेदन केलीपूर्वजन्मीसीताही भूमिकन्या होती. ती एकदा तप करीत बसली असताना रावणाच्या दृष्टीस पडली. तिच्या रूपावर मोहित होऊन रावण म्हणाला, ‘तू माझी पत्नी हो.’ रावणाच्या या विनंतीचा सीतेने अव्हेर केला. त्यामुळे रावण चिडला व तिचे केस धरून तिला फरफटत नेऊ लागला. त्याच्या याकृत्यामुळे सीता क्रोधित झाली व तिने शाप दिला की, ‘तुझा नाश करण्यासाठी पुढच्या जन्मी मी अयोनिसंभव अशी स्त्री होईन.’ तीच आजची सीता व तुझी भार्या होय. ती आज लंकेच्या अशोक वनात आहे. रावणाचा नाश केल्यावाचून तू तिला परत आणू शकणार नाहीस. नंतर रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने नारदाने रामालानवरात्र व्रतकरायला सांगितले. रामाने ते केले. अष्टमीच्या मध्यरात्री देवीने रामाला दर्शन देऊनतुझ्या हातून रावणाचा वध होईलअसा आशीर्वाद दिला. रामाने व्रत पूर्ण करून दशमीच्या दिवशी लंकेवर स्वारी करण्यासाठी प्रस्थान ठेवले व रावणाला मारले.
 घटस्थापना
 पहिल्या दिवशी घटस्थापना करतात. लहानशा मातीच्या ढिगावर गहू पेरून त्यावर मातीचा घट ठेवतात. घटावर देवीची स्थापना करतात. कित्येक ठिकाणी घटावर तांत्रिक यंत्राचीही स्थापना करतात. नऊ दिवस देवीची पूजा करतात. रोज माळ बांधणे, कुमारिकेचे पूजन करणे, ब्राह्मण-सुवासिनींना भोजन घालणे, अखंड दीप लावणे, उपवास करणे, सप्तशतीचा पाठ करणे इ. विविध आचार वेगवेगळ्या कुळांत पाळले जातात. विजयादशमी हा देवीच्या विजयाचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर अष्टमी ही महाअष्टमी किंवा दुर्गाष्टमी म्हणून प्रसिद्ध आहे.
 नवरात्रीचे महत्त्व
 जीवनामध्ये शक्ती, ऐश्वर्य, समृद्धी व ज्ञान प्राप्त व्हावे, म्हणून नवरात्रीत देवीची उपासना करतात. देवीच्या पूजेत वापरल्या जाणार्या साहित्यामागेसुद्धा काही विशिष्ट अर्थ आहे. जसे घटस्थापनेत विड्याची पाने पृथ्वीतत्त्वाचे प्रतीक आहे. तर हळकुंड तेजतत्त्वाचे प्रतीक, सुपारी आपतत्त्वाचे प्रतीक, तर खारीक वायुतत्त्वाचे प्रतीक, दक्षिणा (ज्याला पाण्याचा स्पर्श झाला आहे असे नाणे) आकाशतत्त्वाचे प्रतीक आहे. म्हणजेचपंचमहाभूतांचीही सर्व प्रतीके आहेत. त्याबरोबर हळद ही परमकल्याण रूप आहे. कुंकू मांगल्याचे रूप आहे. सिंदुर जीवनात अभ्युदयाचा काळ दाखवितो. (ऐश्वर्यप्राप्ती होते.) तुपाचा दिवा स्नेहाचे प्रतीक आहे. तेलाचा दिवा स्थैर्य दर्शवितो. दान/दक्षिणा समर्पक वृत्तीचे प्रतीक आहे. कापूर आरती केल्याने घराची शुद्धता होते. तसेच अग्निहोत्र केल्याने घराची शुद्धता व आरोग्यप्राप्ती होते.
 देवीचे वर्णन
 देवी ही ब्रह्मरूप आहे. चराचर सृष्टी तिच्यापासून निर्माण होते. विश्वावर ती शासन करते. अग्नीसारखी तेजस्वी दिसते. ज्ञानाने प्रकाशित होते. देवी असुरांचा, तसेच अज्ञानाचाही नाश करते. वेदांमध्ये तिचा गौरव करतात. ती पाशांकुश आणि धनुष्य-बाण धारण करते. ती त्रिनेत्र आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या मागची प्रेरक शक्ती म्हणजेदेवीचआहे. ब्राह्मी, माहेश्वरी, वैष्णवी, वाराही इंद्राणी, चामुंडा व महालक्ष्मी या देवीच्या अष्टशक्ती आहेत. घटस्थापना-
 देवीची चैतन्यरूपे
 देवीची एकूण नऊ चैतन्यरूपे आहेत. 1) देवी शैलपुत्री 6) देवी कात्यायनी 2) देवी ब्रह्मचारिणी 7) देवी कालरात्री 3) देवी चन्द्रघंटा 8) देवी महागौरी 4) देवी कुष्मांडी 9) देवी सिद्धिदात्री 5) देवी स्कंदमाता नवरात्रात प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व आहे. प्रत्येक दिवसाची वेगळी देवता आहे. त्यातही विशिष्ट दिवशी विशिष्ट पूजा, कुळाचार आहेत. पहिले तीन दिवस दुर्गेचे (कालीमातेचे), नंतरचे तीन दिवस महालक्ष्मीचे व शेवटचे तीन दिवस सरस्वतीचे असे मानतात. 1) प्रतिपदा - घटस्थापना शुद्ध प्रतिपदेला. ऊँ सुरभ्यै नमः। या मंत्राने गायीची पूजा करावी, असे देवी भागवतात सांगितले आहे. गायीला या दिवशीगोघ्रासघालावा. 2) द्वितीया - दुर्गेची पूजा करावी. संध्याकाळी बीजेच्या चंद्राचे दर्शन घ्यावे व नमस्कार करावा. 3) तृतीया - ‘तीजदुर्गेची पूजा करावी. 4) चतुर्थी - महालक्ष्मीची पूजा करावी. 5) पंचमी - ललितापंचमी, उपांग ललिता पूजन. हे एक काम्य व्रत आहे. 6) षष्ठी - महालक्ष्मीचे पूजन करतात. 7) सप्तमी - देवी सरस्वतीचे पूजन करावे. 8) अष्टमी - सरस्वतीचे पूजन करावे. नवचंडी याग व देवळात होमहवन करतात. 9) नवमी - कुंकुमार्चन करतात. स्वतः देवीनेच एका प्रसंगी, ‘आश्विन प्रतिपदेपासून नऊ दिवस निष्ठेने माझी पूजा केली, तर मी तुमच्या सुखासाठी जपत राहीन.’ असे सांगितले. अशी श्रद्धा आहे. देवीच्या देवळात नवरात्रात देवीला रोज नवीन वेशभूषा करतात. देवी कधी मोरावर, कधी वाघावर, कधी हत्तीवर, कधी कमळावर असे रोज नवीन साज असतात.

No comments:

Post a Comment