Sunday, October 2, 2011

रावणराज

दसरा विशेष                                  
   रावण नावाची जगात दुसरी कुठली व्यक्ती नाही. राम भेटतील, पण रावण नाही. रावण हा फक्त रावण आहे. राजाधिराज, लंकाधिपती महाराज रावणाची रणनीतीची ख्याती सर्वदूर होती. परंतु शेवटी दशरथपुत्र रामापुढे तो निष्प्रभ ठरला. वाल्मिकी रामायणानुसार एक पराक्रमी, धर्मात्मा, नीती आणि राजनीती शास्त्राचा ज्ञाता, शास्त्रज्ञ , ज्योतिषाचार्य, रणनीती निपुण असा एक सर्व कुशल राजनीतीज्ञ, सेनापती आणि वास्तूकलेचा मर्मज्ञ असण्याबरोबरच ब्रम्हज्ञानी आणि बहुविद्यांचा जाणकार होता. त्याला मायावी म्हटले जात होते. कारण तो इंद्रजाल, तंत्र-मंत्र , संमोहन आणि विविध प्रकारची जादू जाणत होता. त्याच्याजवळ एक असे वेगवान विमान होते, जे कोणाजवळही नव्हते. या सगळ्या कारणांमुळे त्याची मोठी दहशत होती.
दशाननाची दहा डोकी
रावणाला दहा डोकी नव्हती. पण दहा डोकी असल्याचा भ्रम निर्माण करायचा. म्हणूनच त्याला दशानन म्हटले जाते. रावणाच्या गळ्यात नऊ मणी असायचे. या नऊ मण्यांमध्ये त्याचे डोके- तोंड दिसायचे. यामुळेच त्याला दहा डोकी आहेत, असा भ्रम व्हायचा. जैन शास्त्रात रावणाला प्रती नारायण मानले गेले आहे.
रावणाचे कुटुंब
दानववंशीय योद्ध्यांमध्ये विश्वविख्यात दुन्दुभीच्या काळात रावण होऊन गेला. रावणाचे आजोबा पुलस्त्य ऋषी होते. ब्रम्हदेवाचे पुत्र पुलस्त्य आणि  पुलस्त्यचा मुलगा विश्रवा. याला चार संतती. रावण  सर्वात मोठा होता. अशाप्रकारे तो ब्रम्हाचा वंशज होता. ऋषी विश्रवाने ऋषी भारद्वाजची पुत्री इडविडाशी विवह केला होता. इडविडाने दोन पुत्ररत्नांना जन्म दिला होता. त्यातल्या एकाचे नाव कुबेर आणि दुसर्‍याचे विभिषण. विश्रवाची दुसरी पत्नी  कैकसी हिच्यापासून रावण, कुंभकर्ण आणि शुर्पणखा यांचा जन्म झाला होता. लक्ष्मणने शुर्पणखाचे नाक छाटले होते, जी रावणाची बहीण होती. यामुळेच रावणाचे हरण केले होते. कुंभकर्णाच्याबाबतीत म्हटलं जातं की तो सहा महिने झोपलेला असायचा आणि    सहा महिने जागा. रावणाचा सावत्रभाऊ विभिषण रावणाची साथ सोडून युद्धाच्यावेळी रामाला येऊन मिळाला होता.
कुबेर रावणाचा सावत्रभाऊ. कुबेर धनपती होता. कुबेराने लंकेवर राज्य करून त्याचा विस्तारही केला होता. रावणाने कुबेराकडून लंका बळकावून घेतली. आणि तिथे आपले राज्य स्थापित केले होते. लंका भगवान शंकराने विश्वकर्मातून निर्माण केली होती. असं मानलं जातं की माली, सुमाली आणि माल्यवान नावाच्या दैत्यांद्वारा त्रिकुट सुबेल पर्वतावर वसवलेली लंकापुरी देवांनी जिंकून कुबेराला दिली  व त्याला लंकापती केले. रावणाला अनेक बायका होत्या. यात मंदोदरीचे स्थान सर्वात वरचे. सुंबा राज्याचा राजा आणि वास्तुशिल्पकार मयदानवाने रावणाच्या पराक्रमावर प्रभावित होऊन आपली अतिशय रुपसौंदर्यपुत्री मंदोदरीचा विवाह रावणाशी करून दिला. मंदोदरीच्या मातेचे नाव हेमा होते, जी एक अप्सरा होती. मंदोदरीकडून रावणाला परमपराक्रमी पुत्र प्राप्त झाला होता, त्याचे नाव मेघनाद.मेघनादने इंद्राचा पराभव केला होता. त्यामुळे त्याला इंद्रजित असेही म्हटले जाते.
नाभीमध्ये जीव
 रावणाने अमृत्व प्राप्तीसाठी भगवान ब्रम्हाची घोर तपस्या करून वरदान मागितले. पण ब्रम्हदेवाने त्याच्या वरदानाकडे कानाडोळा केला. मात्र त्याचे जीवन नाभित असल्याचे सांगितले.
शिवभक्त रावण
एकदा रावण आपल्या पुष्पक विमानातून प्रवास करीत असताना वाटेत जंगलक्षेत्र लागले. त्या क्षेत्राच्या पर्वतावर भगवान शिव ध्यानमग्न बसले होते. शिवाचा गण नंदी याने रावणाला रोखले. आणि म्हटले की येथून गमन करण्यास मनाई आहे. कारण भगवान तपमग्नतेत आहेत. रावणाला आपला रस्ता आडवल्याबद्दल राग आला. त्याने आपले विमान खाली उतरवून नंदीचा चांगलाच पाण उतारा केला. नंतर शिव ज्या पर्वतावर विराजमान होते. त्यास तो उचलू लागला. हे पाहून भगवान शिवने आपल्या अंगठ्याने पर्वत दाबला. त्यात रावणाचा हात पर्वताखाली सापडला.  आपल्याला मुक्त करण्यात यावे यासाठी रावणाने शिवाची प्रार्थना केली. यानंतर तो शिवभक्त बनला.
रावणाची ग्रंथसंपदा  
रावणाने शिव तांडव स्त्रोत्राबरोबरच अनेक तंत्र ग्रंथांची निर्मिती केली. काहींचे म्हणणे असे की लाल किताब ज्योतिष हा प्राचीन ग्रंथसुद्धा रावणसंहितेचा भाग आहे. रावणाने ही विद्या भगवान सूर्यापासून शिकली होती.    श्रावणसंहितांशमध्ये   या दुर्लभ विद्येबाबत विस्ताराने लिहिले आहे.
रावण राज्य विस्तार
 रावणाने सुंबा आणि बलीद्वीप जिंकून आपल्या अधिपत्याखाली आणले होते. त्याचबरोबरच अंगद्वीप, मलयद्वीप, वराहद्वीप, शंखद्वीप, कुशद्वीप, यवद्वीप, आणि आंध्रालयावर विजय प्राप्त केला होता.यानंतर रावणाने लंकेला आपले लक्ष्य बनवले.
रावणाचे पुष्पक विमान
रावणाने कुबेराला पदच्युत करून लंकेची सत्ता बळकावली. धनपती कुबेराजवळ पुष्पक विमान होते. ते रावणाने हिरावून घेतले होते. हे पुष्पक विमान इच्छेनुसार लहान्-मोठे होत असे. शिवाय मनाच्या गतीने उड्डान करीत असे.
अहंकारामुळे नाश
रावण पराक्रमी, विद्यावंत, रणनीतीज्ञ अशा सर्व क्षेत्रात पारंगत होता. त्याच्या कौशल्य-निपुणतेची चर्चा सर्व दूर पसरली होती. पण त्याच्यात एक अवगुण होता. तो खूप अहंकारी होता. त्याला स्वतः चा मोठा अभिमान वाटे. यामुळेच दशरथपुत्र राम त्याला भारी पडला.
दशाननाच्या पुतळ्याचे दहन
देशभरात दसर्‍याच्यादिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करून लोक एकमेकांना विजयाच्या शुभेच्छा देतात. याच दिवशी रामाने रावणाचा वध करून विजय मिळवला होता. म्हणून या दिवसाला विजयादशमी असेही म्हणतात.  

No comments:

Post a Comment