Monday, June 26, 2017

कटरिनाची डुबती नैया सावरणार का?

     कटरिना कैफचे 'फँटम','फितुर' आणि  'बार बार देखो' या सारखे तीन चित्रपट एका पाठोपाठ एक  बॉक्स ऑफिसवर कोसळले. या चित्रपटांच्या अपयशांचा परिणाम तिच्या करिअरवर झाल्यावाचून राहिला नाही. पण आता तिचे दोन नवे चित्रपट घेऊन ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे चित्रपट जरा हटके आहेत. वेगळ्या धाटणीचे आहेत. हे चित्रपट आहेत,'जग्गा जासूस' आणि 'टायगर जिंदा है'वास्तविक, बराच काळ अडकून पडलेला 'जग्गा जासूस' लवकरच रिलिज होणार आहे. अनुराग बासू यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटापासून कटरिनाला मोठ्या अपेक्षा आहेत. चित्रपटात ती तिचा एक्स बॉयफ्रेंड रणवीर कपूरसोबत काम करत आहे. शिवाय सलमान खानसोबत ती टायगर जिंदा है सारख्या चित्रपटातदेखील काम करत आहे. सलमान खानने तिला बॉलीवूडची ओळख करून दिली. त्याच्यामुळेच तिला हिट चित्रपटांची चव चाखता आली. सलमानसोबतचे सगळे चित्रपट हिट झाले आहेतत्याच्याशी तिचे नावसुद्धा जोडले गेले होते. सलमान आणि रणवीर तिचे दोन्ही एक्स फ्रेंड आहेत. त्यामुळे दोन्ही चित्रपट तिच्यासाठी खास आहेतच शिवाय प्रेक्षकांसाठीदेखील उत्सुकतेचे आहेत.

     'जग्गा जासूस' खूपच एंटरटेनिंग असल्याचं सांगितलं जात आहे. या चित्रपटाची स्टोरी आणि ट्रीटमेंट फारच वेगळी आहे.मात्र कुठल्याही चित्रपटाच्या यशाची हमी देता येत नाही. तशी जग्गा जासूसचीही देता येणार नाही मात्र हा चित्रपट बर्फीचा पुढचा भाग असल्याचे म्हटले जात आहे. अनुराग बसू यांनी हा चित्रपट दिग्दर्शित करायला फारच वेळ घेतला,पण याचा रिझल्ट फारच पॉजिटिव्ह राहिला आहे. कटरिनाला तर वाटते की, हा चित्रपट मास्टरपीसप्रमाणे समोर येईल. यात ती श्रुती नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे.श्रुती जग्गा (रणवीर कपूर)ची फ्रेंड आहे. ती एका छोट्या शहरात राहणारी आहे. ती स्वत:ला खूप समजूतदार समजते. चित्रपटात जग्गा आपल्या बापाच्या शोधात आहे. ती त्याच्या कामात त्याला मदत करते आहे. हा एक अॅडव्हेंचर चित्रपट आहे. हा चित्रपट सगळ्या वयोगटातील लोकांना पाहता येईल, असे कटरिना एका मुलाखतीत सांगते.
     हा चित्रपट पूर्ण व्हायला तीन वर्षांपेक्षा अधिकचा काळ लागला आहे. या चित्रपटाबाबत बोलताना कटरिना सांगते की, या चित्रपटाचा विषय जुना होण्यासारखा नाही. चित्रपटाचा कंटेंट जितका चांगला आहे, तितकेच म्युझिकदेखील सुंदर आहे. चित्रपटाच्या स्क्रिन प्लेसाठी फारच मेहनत घेण्यात आली आहे. चित्रपट लांबण्याला परिस्थिती कारणीभूत असल्याचे कटरिना स्पष्ट करते. अर्थात प्रत्येक चित्रपटाचे आपले एक नशिब असते,तसे या चित्रपटाचे म्हणावे लागेल.कटरिना आणि रणवीर यांच्या बिघडलेल्या नातेसंबंधाचा या चित्रपटावर परिणाम झाला, असे बोलले जात आहे. मात्र कटरिना त्याला नकार देते.
     कटरिनाच्या फँटम, फितुर आणि बार बार देखो या चित्रपटांना चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही. त्यामुळे त्याचा परिणाम कटरिनाच्या करिअरवरही झाला आहे. कटरिनादेखील त्यामुळे अपसेट होती. कारण एकदम तीन चित्रपट लागोपाठ अपयशी होण्याचा प्रकार यापूर्वी कधीच घडला नव्हता. त्यामुळे तिला मोठा धक्का बसला होता. तिला यातून सावरायलादेखीला वेळ लागला. बॉलीवूडचा प्रवास हा असाच असतो, हे उमगायला तिला उशीर लागला. तिच्यासारख्या फेलियरलादेखील एक्सेपट करावं लागतं.त्यांना त्यांच्या मिस्टेक्समधून शिकावं लागतं आणि पुढं सरकावं लागतं. तिनेही तसंच केलं.
     तिच्या या पडत्या काळात तिच्यासाठी सलमान खान पुन्हा एकदा धावून आला आहे. वाईट काळात तो नेहमीच तिच्या पाठीशी उभा राहिला आहे. त्यामुळे त्याने 'टायगर जिंदा है 'मध्ये तिला नायिकेचा रोल दिला. यावर बोलताना कटरिना म्हणते की,सच्चा दोस्तासारखं सलमान धावून येतो.टायगर जिंदा है या चित्रपटात ती अॅक्शन करताना दिसणार आहे. यासाठी तिने खास ट्रेनिंग घेतले आहे. सलमान खानबरोबरच शाहरुख खानसोबतदेखील ती काम करणार आहे. सध्या अजून या चित्रपटाबाबत बोलणी सुरू आहेत. सलमान आणि रणवीर दोघेही एक्स फ्रेंड आहेत. मात्र या दोघांमुळेच तिचे करिअर सावरण्याचे चान्सेस आहेत. कारण दोन्हीही चित्रपट हटके आहेत. सलमान तर नेहमीच तिच्या मदतीला आला आहे. आता पाहुया रणवीर काय करतो ते?

No comments:

Post a Comment