Sunday, November 20, 2016

शाही विवाहाचा लेखा-जोखा बाहेर यायला हवा



देशातील सर्वसामान्य जनता दोन-चार हजार रुपयांसाठी बँकांच्या दारात ताटकळत उभी असताना कर्नाटकाच्या माजी मंत्री गाली जनार्दन रेड्डी यांची मुलीचा विवाह मात्र परवा बेंगळूर येथील पॅलेस ग्राऊंडवर मोठ्या शाही थाटात पार पडला.हैद्राबाद येथील उद्योजक राजीव रेड्डी यांच्याबरोबर ब्राम्हणीचा विवाह झालाया शाही विवाहाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू असली तरी यामुळे सर्वसामान्यांचा आ वासला आहेइतका मोठा शाही विवाह सध्याच्या ताईट वातावरणात होतोच कसाअसा सवाल जिकडेतिकडे उपस्थित केला जात आहेयाची चौकशी होण्याची गरज आहेआणि या विवाहाची पारदर्शिकता सर्वांपुढे येण्याची आवश्यकता आहेया विवाहामुळे देशातले वातावरण संशयास्पद आणि गढूळ होऊ लागले आहे.
या विवाहाची राज्यसभेनेही दखल घेतली आहेएकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी 1000  500 च्या नोटांवर बंदी घातली आहेपंतप्रधानांच्या या निर्णयाचे सुरुवातीला स्वागत झालेआता आपल्याच खात्यातील दोन हजार रुकाढण्यासाठी सामान्य माणसाला चार-चार तासाहून अधिक काळ बँकांसमोर रांगेत उभे रहावे लागत आहेकाळा पैसा बाहेर काढण्यासाठी हे कठोर पाऊल उचलले गेले असले तरी याचा मोठा फटका सामान्यांनाच बसला आहेसेलिब्रिटी,पुढारी,उद्योजक,व्यापारी यांच्यावर कुठलाच परिणाम जाणवला नाहीही मंडळी कुठेच रांगेत उभारल्याचे दिसले नाहीत्यातच नोटाबंदी करून दहा दिवस उलटून गेले तरी परिस्थिती बदलायचे नाव घेत नाहीअशा परिस्थितीत इतका मोठा शाही विवाह होतोच कसाअसा सवाल उपस्थित होणेसाहजिकच आहेसुट्या,लहान नोटांची चणचण या विवाहात भासलीच नाही काका अशा नोटांची तजवीज अगोदरच करण्यात आली होतीअसा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीया विवाहामुळे लोकांच्या मनात असंख्य प्रश्नांचा मोहोळ उठला आहेत्या प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळायला हवीतआणि हा त्यांचा हक्क आहेजनार्दन रेड्डी यांच्या कन्येच्या विवाहासाठी 500 कोटी खर्च झाले आहेतही बातमी साऱयांनाच अस्वस्थ करणारी ठरली आहे.  नाही तर समाजात चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे.
लग्न हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असलातरी लग्नासाठी किती पैशाचा चुराडा करावा याचा विचार सध्याच्या नोटांच्या आणीबाणीच्या परिस्थितीत होऊ लागला आहेदेशातील सध्याची परिस्थिती पाहता हा विवाह पुढे टाळण्याची आवश्यकता होतीअर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी हा श्रीमंती थाट मात्र सामान्य लोकांना अस्वस्थ करून सोडत आहेलोकांमध्ये संताप खदखदत आहेत्यामुळे या विवाहाची चौकशी हो ऊन सत्य बाहेर येण्याची गरज आहे.
    आपल्या श्रीमंतीचा थाट दाखविण्यासाठी जनार्दन रेड्डी यांनी पॅलेस मैदानावर 200 कोटी खर्चून जणू देवलोकच उभारला होताअशी चर्चा होत आहेया शाही मंडपात विजयनगर साम्राज्यबळ्ळारी शहराचा काही भागऐतिहासिक हंपी आणि तिरुमला मंदिरांची प्रतिकृती साकारण्यात आली होती म्हणेया शाही विवाहाची देशातीलच नव्हे तर विदेशातील माध्यमांनीही दखल घेतलीजनार्दन रेड्डी हे भाजपचे नेते आहेतबी.एसयेडियुरप्पा सरकारमध्ये मंत्रीपदावर असताना बेकायदा खाण घोटाळयासंबंधी त्यांना अटक झाली होतीबळ्ळारी ही त्यांची राजधानी असल्याचे बोलले जातेइथे त्यांनी कित्येक वर्षे राज्य केले आहेबळ्ळारी आणि शेजारच्या आंध्र प्रदेशात खाण व्यवसायातून मिळालेली माया आणि त्यानंतर त्याच्या जोरावर मिळवलेली सत्ता इथे मोठा चर्चेचा विषय आहे
शाही विवाहांवर कायद्याचा चाप लावण्यासाठी कर्नाटकात गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेतदेवराज अरस आणि एसएमकृष्णा यांच्या राजवटीत खाजगी विधेयक आणण्याचे प्रयत्न झालेयासाठी सिद्धरामय्या सरकारचेही गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेतलग्न समारंभाच्या निमित्ताने होणारी अन्नाची नासाडी आणि पैशाचा चुराडा रोखण्यासाठी कायदा करण्याची मागणी जुनीच आहेकाही  माणसांना संपत्तीचे प्रदर्शन घडविण्याचा रोग असतोजनार्दन रेड्डींनाही तो रोग आधीपासूनच आहे.कर्नाटक-आंध्र प्रदेशमधील नैसर्गिक संपत्तीची लूट करून गडगंज माया गोळा करणाऱया जनार्दन रेड्डी यांची चौकशी अद्याप पूर्ण झाली नाहीविविध न्यायालयात त्यांच्यावर खटले सुरू आहेततपास यंत्रणांनी त्यांची बँक खाती गोठवलेली असताना लग्नासाठी 500 कोटीचा खर्च ते कसे करू शकले असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेया शाही विवाहाला मोठमोठी असामी उपस्थित होतीलग्न कसे आणि कुठे करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न असलातरी दुष्काळात असा घाट हवा होता काराजकारण आणि समाजकारणात असणाऱयांनी तर किमान याचा विचार करायला नको का असा प्रश्न सर्व सामान्यांसमोर पडला आहेकर्नाटकात दुष्काळाचे भीषण सावट आहेपिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर  आहेअशा विपरीत परिस्थितीत केंद्र सरकारच्या नोटा बंदीच्या निर्णयामुळे आपल्याच खात्यातील दोन हजार रुकाढण्यासाठी बँकांसमोर तास न् तास ताटकळत उभे रहावे लागत आहेसुरुवातीला देशहिताचा विचार करून या निर्णयाचे स्वागत करणारेच आता त्रासामुळे सरकारला खडे बोल सुनावत आहेतलोकांमधून आता संताप व्यक्त हो ऊ लागला आहेकाळया पैशाच्या मुद्यावर देशभरात चर्चा सुरू असतानाच भाजपच्या या माजी मंत्र्याने कन्येच्या विवाहासाठी केलेला खर्च आता लोकांच्या डोळ्यांसमोर येऊ लागला आहेहा विवाह सोहळा अलीकडेच झालेल्या म्हैसूर राजघराण्याच्या युवराजाच्या विवाह सोहळयापेक्षाही दिमाखदार होताअसे सांगतले जात आहेत्यामुळे या विवाहाची चौकशी व्हायलाच हवीआणि नोटाबंदीमुळे भरडला जात असलेल्या लोकांना या विवाहाचा पारदर्शीपणा दिसायला हवानाही तर समाजात चुकीचा संदेश जाईलया विवाहाचा शाही थाटमाट सरकारला,भाजपला आणि देशाला धोकादायक ठरू नयेयाची खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

No comments:

Post a Comment