Monday, November 14, 2016

किशोर कथा ड्रायव्हर


     भाडं त्याच्या घरापर्यंत पोहचवून रतनने टॅक्सी  आपल्या घराच्या दिशेने वळवली आणि  टॅक्सीला वेग दिलारात्रीचा एक वाजला होतादिवसभराच्या कामानं तो पार शिणून गेला होताकधी एकदा  घरी जावं आणि अंथरुणात अंग टाकावंअसं त्याला झालं होतंचोहोबाजूला नीरव शांतता होतीकुठे चिटपाखरूही  दिसत नव्हतेपुलावर पोहचताच  त्याला काचक्कन ब्रेक मारावा लागलागाडीच्या प्रकाशात रतनला एक माणूस दिसलाजो एकदम त्याच्या गाडीच्या आडवा आला होतात्यानं जर ब्रेक लावला नसतातर माणूस टॅक्सीखाली आला  असता.
     रतन  टॅक्सी थांबवून पटकन बाहेर आलात्याला धरलंआणि रस्त्याच्या  बाजूला नेऊ लागला.  अचानक त्याचं लक्ष त्या माणसाच्या चेहर्याकडे गेलं.  चेहरा  पाहून तो चकीतच झालाकारण तो  तर गोपाळत्याचा बालमित्र.बरीच वर्षे दोघांची गाठ-भेट  नव्हती.  रतन  मेहनत करून पोट भरत होतातर गोपाळ  वामार्गाला लागला होतावाट चुकला होताचोरांच्या,  गुन्हेगारांच्या टोळीत सामिल झाला होतात्यामुळे रतनने त्याच्याशी बोलणे टाकले होतेभेटणेदेखील  टाळले होतेपण त्याला मनापासून वाटत होतं कीत्याचा बालमित्र सुधारावासन्मार्गाला लागावात्यानं इतर चारजणांप्रमाणे चांगलं जीवन जगावं.
     पुलावरून त्याला असा असावधपणेकाहीसा भेंडकाळत  एकट्यानं चालताना  पाहून  रतनला त्याची दया आलीत्याचे मन पिघळले.  तो गोपाळला सावरत  म्हणाला, ‘ मित्राअसल्या स्मशान रात्री असा एकटा  कुठे निघाला  आहेस?’
रतनला पाहून गोपाळ  चमकलाम्हणाला, ‘ अरे व्वा,तू तर  फार दिवसांतून  भेटलासपण साल्याते सन्मार्गाचे लेक्चर तेवढं  देऊ नकोस.’
     गोपाळच्या तोंडाचा वेगळाच दर्प येत होतारतन  म्हणाला, ‘ अरे बाबातसा माझा काही इरादा नाहीमी घरी चाललो होतो ... चलमी घरी सोडतो तुला.’
     गोपाळ  तयार झालारतनने त्याला मागच्या सीटवर बसवलेआता त्याने टॅक्सीची दिशा बदललीकाही अंतरावर गोपाळने गाडी थांबवली आणि उतरून काळोखात गडप झाला
     रस्त्यात  टॅक्सी चालवताना रतन आपल्या मित्राचाच विचार करत होताएवढ्या रात्री रस्त्यात चिटपाखरूही नसताना तो काय करत होतायाचा त्याला उलगडा होत नव्हताअन अचानक त्याची गाडी थांबलीत्याने  स्टार्ट करण्याचा बराच प्रयत्न केलापण तिने चालू व्हायचे काही  नाव घेतले नाही.
     बहुतेक आजची रात्र आपल्याला इथेच  रस्त्यात काढावी लागते की कायअसे त्याला वाटलेतसाच काही तरी बडबडत तो बाहेर आला.  मॅकेनिकचा कानोसा घेण्यासाठी त्याने इकडे-तिकडे पाहिले.आपण कुठे थांबलो आहेयाचा त्याला अंदाज आला.   पुलाजवळ एक वर्कशॉप होतंते त्याला ठाऊक होतंमिस्त्री तिथेच पतर्याच्या टपरी वजा खोक्यात झोपला होतात्याला उठवून आपल्यासोबत न्यायला त्याला बरीच खटपट करावी लागली आणि उशीरही झाला
     रतन मिस्त्रीसोबत गाडीजवळ पोहचलाआणि  त्याला  धक्काच बसलादोन पोलिस शिपाई टॉर्चच्या उजेडात  टॅक्सीत काही तरी शोधत होते.
     रतन  आल्यावर त्यातला एकटा गाडीच्या बॅनेटवर काठी मारून दरडावत म्हणाला, ‘ ही रक्ताची काय भानगड आहे?’
     रतनच्या अंगावर  सर्रकन काटा उभा राहिलाकाहीसा  थरथरत ओरडला, ‘रक्तकसलं रक्त?’
     ‘ये शहाणपट्टी शिकवू नकोबर्या बोलानं बोलही रक्ताची काय भानगडायकोठून आलं हे रक्त?’
     रतनचं तर डोकंच चक्रम  झालंटॅक्सीच्या मागच्या सीटवर रक्ताचे डाग  कोठून आलेहेच त्याला कळेनातो विचार करू लागला.- रक्ताच्या या डागाचा  गोपाळशी तर काही संबंध नाही?  कारण शेवटच्यावेळी  तोच मागच्या सीटवर बसला होताम्हणजे गाडीत बसताना गोपाळ  जखमी होतात्याच्या जखमेतून रक्त वाहत असले पाहिजेपरंतुरस्त्यावर तर तो एकटाच दिसलाआपण जखमी असल्याचेही तो काही बोलला नाहीतेवढ्यात पोलिस शिपायाने त्याच्या खांद्याला धरून जोरानं हलवलं, ‘ अरे ये,कुठल्या तंद्रीत गडप झालासचलआमच्याबरोबर ठाण्याला!’
     ‘ मला तर जाऊ द्या साहेब,’  मिस्त्री गयावया करत म्हणालाशिपाई त्याला निरखून पाहत म्हणाला, ‘ नाहीतुलाही पोलिस ठाण्यात यावं लागेल.तुला असा मोकळा सोडणार नाही.’
     रतन  आणि मिस्त्रीला शिपायांसोबत पोलिस ठाण्यात जावे लागलेपुढील तपासासाठी टॅक्सीही पोलिस ठाण्यात आणण्याची व्यवस्था केली गेली.  
     वाटेत रतन  विचारात गढून गेला होतात्याची अवस्था मोठी विचित्र झाली होतीकाय करावेसमजेनासे झाले होतेशेवटी तो पोलिसांना काय सांगणार होताएकदा त्याचं मन म्हणत होतंजे काही घडलं ते खरं खरं सांगावंयामुळे गोपाळ  संशयाच्या भोवर्यात सापडला असतासापडला तर सापडलाआपण तर सुटूगाडीच्या मागच्या सीटवर बसताना त्याने आपण जखमी आहोतअसे का बरं सांगितलं नाहीनक्कीच तो कुठल्या तरी भानगडीत अडकला असला पाहिजेनाही तर रस्त्यात असा एकटा  चालला नसता.मग त्याला जुनी मैत्री आठवलीत्याला अशाप्रकारे अडकवणे योग्य नाहीअसे त्याला वाटू लागले.  शेवटी त्याने निश्चय केलागोपाळचा पोलिसांसमोर अजिबात विषय काढायचा नाही.
     ठाण्यात जाबजवाबादरम्यान  रतनने खोटीच कहानी रचून सांगितली. ‘शेवटचे भाडे  सोड्ून आपण घरी निघालो होतो तेवढ्यात दोघांनी हाताच्या इशार्याने गाडी थांबवलीआणि ते दोघे पिस्तूल दाखवून गाडीत घुसलेआणि जिथे गाडी बंद पडली होती,तिथंपर्यंत घेऊन आले होतेमी त्या गुंडांना म्हटलं कीगाडी आता गाडी सुरू होणं अशक्य आहे,  तेव्हा ते उतरून जंगलाच्या दिशेने निघून गेले.’
    ‘पुढे काय झालं?’  इन्स्पेक्टर म्हणाला
      ‘झालंमी मिस्त्रीला बोलवायला गेलोपरत आलो तेव्हा हे दोन साहेब तिथे होते.’
     ‘मग रक्त कसे लागले सीटला?’
     ‘ साहेबमला काहीच माहित नाहीबहुतेक दोघा गुंडांपैकी कोणी तरी एकटा जखमी असावा.हा डाग त्याच्याच  रक्ताचा असला पाहिजे.’ 
     रतनने तर सांगितलंपण पोलिसांना तो खोटं सांगतो आहेअसं वाटत होतंतो आणि मिस्त्री कुठल्या तरी गुन्ह्यात सामिल असले पाहिजेतअसा पोलिसांचा संशय होतारतन  आणि मॅकेनिकला अटक करण्यात आलीरतनने बायकोला फोन केलाकारण ती नवरा घरी न आल्याने काळजीत होती.
     दुसर्या दिवशीच्या  वर्तमानपत्रात रतन आणि मॅकेनिकचा फोटो छापून आलारात्रीच्या घटनेचा सगळा तपशील बातमीत दिला होताइकडे पोलिस त्याला वारंवार विचारत होतेपण तो दोन गुंडांच्या कहानीवरच ठाम  होता
दुपारी बारा वाजता पोलिस ठाण्यात एक फोन आलाबोलणार्याने आपले नाव आणि पत्ता सांगितला आणि म्हटलेङ्ग या रात्रीच्या केसची वस्तुस्थिती  जाणून घ्यायची  असेल तर मी सांगितलेल्या पत्त्यावर याङ्घ
     फोन  गोपाळने केला होतापोलिसांचे पथक त्याच्या घरी पोहचलेतो अंथरुणावर पडला होताहाताला पट्टी बांधली होतीतो म्हणाला, ‘ पेपरमधली बातमी वाचलीत्यात जे काही छापलं आहेते सगळं खोट आहे.’
     ‘मग खरं काय आहे?’ इन्स्पेक्टर म्हणाला
     यावर  गोपाळने रात्री जे काही घडलं,ते सगळं  सविस्तर  सांगितलंतो म्हणाला, ‘मी आणि रतन  लहानपणापासूनचे मित्र आहोतत्याला ठाऊक आहेमी गुन्हेगारी क्षेत्रात आहे तेकाल रात्री मी आमच्या साथीदारांसोबत एका बंगल्यात चोरी करायला शिरलो होतोपण तिथे आमच्या हाती काही लागलं  नाहीपरताना मी जखमी झालोतेवढ्यात  रतनने मला रस्त्यात पाहिले आणि टॅक्सी थांबवलीआम्ही दोघे खूप वर्षांतून भेटलो होतोत्याने मला गाडीत बसवलेत्यावेळी माझ्या जखमेतून वाहणारे रक्त त्याच्या गाडीच्या सीटला लागलेमी त्याला काहीही सांगितलं नव्हतंपण आज पेपरमध्ये वाचलंतेव्हा लक्षात आलं कीत्याने पोलिसांना खरा प्रकार  सांगितलाच  नाहीमला वाचवण्यासाठी तो स्वतगोत्यात यायला  तयार झालामग अशावेळेला मी कसा गप्प बसू शकतो?’ बोलताना गोपाळला दम लागला.
     ‘पण याची काय गॅरंटी की तू खरे बोलतो आहेस ते?’  इन्स्पेक्टर म्हणालातेव्हा गोपाळ  हसून म्हणाला, ‘ इतक्या दिवसांपासून खोट्याचं  खरं करत आलो आहेआणि आज खरं सांगण्याचा प्रयत्न करतो  आहे  तर ते तुम्हाला खोटं  वाटतं आहेकमाल आहे!’
     गोपाळ  पोलिसांबरोबर ठाण्यात आलारतनला भेटलाम्हणाला, ‘ मित्रामाझ्यासाठी  तू तुझे स्वतचे आयुष्य   गोत्यात घालायला निघाला आहेस?  पोलिसांना खरे काय , ते सारे मी सांगितले आहेमाझा अपराध आपल्या शिरावर का घेतो आहेस?’...
     रतन गोपाळचे  फक्त ऐकत राहिला.नंतर  गोपाळने बरीच विनंती केल्यावर रतनने  खरा प्रकार पोलिसांसमोर कथन केलाआपल्या खोट्या कहानीबद्दल माफी मागितलीगोपाळला अटक करण्यात आली.  व रतन  आणि मिस्त्री यांची सुटका झाली.
जाताना रतन  म्हणाला, ‘पण मित्राहे सत्य तुला महागात पडेलपोलिस तुला सोडणार नाहीत.’
    ‘मित्रामला वाचवण्यासाठी तू अडचणीत यावासहे मला कसे रुचेल बरं?  आणि असे मी कदापि घडू देणार नाहीतू मैत्रीचे कर्तव्य पार पाडलेसपण मग ते मी कसा विसरूअरेमाझ्या खर्या बोलण्यानं कदाचित माझं पुढचं आयुष्य तरी  तुझ्या इच्छेप्रमाणं बदलून जाईल.’  असे म्हणत गोपाळ  हसलाआणि पटकन  रतनच्या डोळ्यांत पाणी आल.  

No comments:

Post a Comment