Sunday, November 20, 2016

टीव्ही: इडियट नव्हे,जिवलग मित्र


     दूरचित्रवाणीची खिल्ली उडविण्यासाठी त्याच्या संचाला इडियट बॉक्स म्हटलं जातंयहे खरंयपण ती खिल्ली कामधाम सोडून टीव्हीपुढे बसून राहणार्या रिकामटेकड्या लोकांची असतेदूरचित्रवाणी संच आता इडियट बॉक्स राहिला नाहीतर आपली मतं बनविण्याचं आणि त्यावरून निर्णय घेण्याचं प्रभावी माध्यम झालंयवस्तूतहे निरीक्षण नोंदविण्यासाठी कुठल्या तज्ज्ञाची गरज नाहीआपणच आपल्या दैनंदिन व्यवहाराचे अवलोकन केले असता टीव्ही पाहून आपण कितीतरी मतं बनविली आणि निर्णय घेतल्याचे ध्यानात येते.
     टीव्हीने सर्वांसाठीच आपली उपयुक्तता सिध्द केली आहेभारतातील रिकामा माणूस दिवसभर स्वत:ची करमणूक करू शकतोमहिला वर्गांसाठी ’सास बहूवाल्या मालिकांचा तर भडिमार आहेचमुलं कार्टून शो पाहून घरात गडबड गोंधळ न करता शांतता ठेवू शकतातज्ञानलालसा असलेल्या व्यक्तींना टीव्हीतून ज्ञानही मिळतंशिवाय त्यातून माहितीचा तर खजिनाच बाहेर पडत असतोभारतात हल्ली राजकीय मतंही टीव्ही पाहून व्यक्त होतातएखादं प्रॉडक्ट जाहिरातीच्या प्रभावाखाली येऊन खरेदी केलं जातंमाणसाच्या जीवनाला टीव्हीने व्यापून टाकले आहे.
     दूरचित्रवाणीचा शोध 19 व्या शतकाच्या अखेरीस लागला असला तरी भारतात टीव्हीचे प्रसारण सुरू व्हायला1959 साल उजाडलेदिल्लीत प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेले प्रसारण 1965 पासून दररोज आणि नियमित होऊ लागले. 1972 मध्ये मुंबई आणि अमृतसरपर्यंत या प्रसारणाची कक्षा रुंदावली. 1975 पर्यंत तर देशातील केवळ सात शहरांतच टीव्ही दिसत होतात्यानंतर मात्र टप्प्याटप्प्याने देशभर आणि प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारण सुरू झाले.. खासगी वाहिन्या आल्याकेबल टीव्ही सुरू झाले अन् मानवी जीवनावरील टीव्हीचा प्रभाव वाढतच गेला.
     संयुक्त राष्ट्रसंघाने हा प्रभाव ओळखून17 डिसेंबर 1996 साली एक ठराव पारित करून 21 नोव्हेंबर हा दिवस जागतिक दूरचित्रवाणी दिन म्हणून जाहीर केलादूरचित्रवाणीवरून प्रसारित होणार्या कार्यक्रमांमधून जागतिक शांततासुरक्षाआर्थिक आणि सामाजिक विकासावर दृष्टिक्षेप टाकणारे असतातत्यामुळे सध्या टीव्हीचे महत्त्व वाढलेले आहेहे संयुक्त राष्ट्रसंघाने मान्य केलेसमकालीन जगात संपर्क आणि जागतिकीकरणाचे दूरचित्रवाणी हे एक प्रतीक असल्याचेहीयुनोने नमूद केले आहेपूर्वीच्या काळी'दूरदर्शनही एकमेव वाहिनी दर्शकांसाठी उपलब्ध होती आणि तीही दिवसातून ठराविक काळासाठीच हे ऐकले तर नवल वाटले. परंतु हे खरे आहे. संध्याकाळी दूरदर्शनचे कार्यक्रम सुरू होण्याअगोदर दूरदर्शन संचावर असलेल्या मुंग्या पाहणे नशिबी असे. कार्यक्रमाची वेळ होताच ती प्रसिद्ध धून चालू होऊन धुरकट वर्तुळातून दूरदर्शनचे बोधचिन्ह आकारास येत असे आणि नंतर कार्यक्रम सुरू होत असत. सुरूवातीला चढ्या किंमतींमुळे मोजक्याच लोकांकडे दूरदर्शनवरचे कार्यक्रम पाहायला धावपळ करावी लागे.  सामान्य लोक टीव्हीच्या शोरूमपुढे घोळक्याने उभारून दूरचित्रवाणी संच पाहण्याचा आनंद घेत असतपंतप्रधान इंदिरा गांधींची31 ऑक्टोबर 1984 रोजी हत्या झालीशहरवासीयांना मोठा धक्का बसलादूरचित्रवाणीचे प्रसारण नुकतेच सुरू झाल्यामुळे इंदिराजींची अंतिमयात्रा पाहून त्यांना आदरांजली वाहिलीत्यावेळी चौकगल्लीबोळात टीव्हीचा संच लावून इंदिराजींचा अंतिम प्रवास पाहण्याची सोय करण्यात आली होती.
   1991 पासून खासगी दूरचित्रवाहिन्यांना प्रारंभ झालास्टार टीव्हीने पाया रचलाआज एक हजाराहून अधिक टीव्ही वाहिन्या आहेत. 1990 चे आखाती युद्ध जगभरात दिसले. 1984 साली केबल टीव्हीचा प्रसार झालासंगीतचित्रपटवृत्तनिसर्गअँक्शनधार्मिकमुलांसाठीविनोदीफॅशनखाद्यपदार्थपर्यटन अशा कित्येक क्षेत्रासाठी स्वतंत्र वाहिन्या आहेतकेबलचालकांच्या अडथळ्याविना आपल्याला हव्या त्या वाहिन्या पाहण्यासाठी डीटीएच सेवा सुरू झालीआता मोठया शहरातील प्रत्येक घरात टीव्हीसाठी ’सेट टॉप बॉक्स’ बसविणे अनिवार्य करण्यात आले आहेसध्या आपल्या मोबाईलवरदेखील लाइव टीव्ही पाहण्याची सोय झाली आहे.कुठे प्रवासात,बाहेरगावी असलात तरी आपल्याला आपल्या आवडीचा कार्यक्रम पाहता येतो.नव्या तंत्रज्ञान युगात टीव्ही आपल्या आणखी जवळ आला आहेआपला झाला आहे.तो आता इडियट बॉक्स राहिला नाही तर आपला जिवलग मित्र झाला आहे.          

No comments:

Post a Comment