Saturday, November 26, 2016

संत शिरोमणी: संत ज्ञानेश्‍वर


 संत ज्ञानेश्‍वर हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक. योगी व तत्त्वज्ञ होते. भावार्थदीपिका (ज्ञानेश्‍वरी)अमृतानुभाव,चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ही त्यांची काव्यरचना. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्‍वास संत ज्ञानेश्‍वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरांतील लोकांना आध्यात्मिक लोकशाहीची प्रेरणा मिळाली.
     ज्ञानेश्‍वरांचा जन्म आपेगाव येथे तेराव्या शतकातमध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमीशके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. गोविंदपंत व मीराबाई हे त्यांचे आजोबा-आजी होत. नवृत्तीनाथ हे ज्ञानेश्‍वरांचे थोरले बंधू. नवृत्तीसोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांचा जन्म अनुक्रमे शके ११९५११९९ व १२0१ मध्ये झाला. (काही अभ्यासकांच्या मते निवृत्तीज्ञानदेवसोपान व मुक्ताबाई या सर्व भावंडांचा जन्म आळंदी येथेच अनुक्रमे शके ११९0, ११९३११९६ व ११९९ मध्ये झाला.)
     आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. ज्ञानेश्‍वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले. गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुऊंनी त्यांना परत पाठवले. त्यांच्या आदेशानुसार पुन्हा गृहस्थाश्रमात  प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली. निवृत्तीज्ञानदेवसोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत.
     विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. त्या काळी संन्यासाची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. गावाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. ज्ञानेश्‍वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रींना विचारले. त्यावर केवळ देहदंडाचीच शिक्षा आहे असे ब्राह्मणांनी सांगितले. मुले संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले व्हावे यासाठी विठ्ठलपंतानी व रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देहान्त प्रायश्‍चित्त घेतले.
    आई-वडिलांच्या मृत्यूनंतर ज्ञानेश्‍वर आणि त्यांच्या भावंडांना लोकांकडून फार त्रास दिला गेला. त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या. पुढे ही भावंडे पैठणला गेली आणि तेथे ज्ञानेश्‍वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली.
     संत ज्ञानेश्‍वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली. नवृत्तीनाथ हेच ज्ञानेश्‍वरांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या गुरूंच्या कृपाशीवार्दाने गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. खरे पाहता ज्ञानेश्‍वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी लिहिली. या ग्रंथास 'ज्ञानेश्‍वरीकिंवा 'भावार्थदीपिकाअसे म्हणतात. हे मराठी वायाचे देशीकार लेणे झाले. ज्ञानेश्‍वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील 'ज्ञान', श्री संत ज्ञानेश्‍वरांनी प्राकृत भाषेत आणले.
     माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। (ज्ञाने - ६.१४)
असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमानमराठीची महती व्यक्त केली आहे. कर्मयोगज्ञानयोग व भक्तियोग सांगणार्‍या ज्ञानेश्‍वरीत सुमारे ९000ओव्या आहेत. हा ग्रंथ इ.स. १२९0 मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते. त्यांचा दुसरा ग्रंथ 'अनुभवामृतकिंवा 'अमृतानुभवहोय. सुमारे ८00 ओव्या (दहा प्रकरणे) या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे.
     'चांगदेव पासष्टीया ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. चांगदेव हे महान योगी १४00 वर्षे जगले असे मानले जाते. पण त्यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्‍वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय. संत ज्ञानेश्‍वरांचा 'हरिपाठ' (अभंगात्मक,२८ अभंग) हा नामपाठ आहे. यात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे.
     संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षीआळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशीशके १२१८,दुर्मुखनाम संवत्सरइ.स.१२९६गुरुवार). हा 'ज्ञानसूर्यमावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्तीसोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. 

No comments:

Post a Comment