Monday, April 23, 2018

अभिनेता रहमान


     आपल्याला एखाद्या गोष्टीत कारकीर्द करायची आहे, असा दृढनिश्चय केल्यावर आणि त्यावर प्रचंड मेहनत घेतल्यावर ती गोष्ट साध्य होऊन जाते. हिंदी चित्रपटसृष्टीत काम मिळवायला आलेले रहमान यांना एका शॉटसाठी तब्बल 50 टेक घ्यावे लागले. दिग्दर्शकाची सडकून बोलणी खावी लागली. एवढा मोठा अपमान झाल्यावर दुसरा कोणी असता तर त्याने आपल्या अंगातले अभिनयाचे भूत कधीच उतरवून टाकले असते.पण रहमान यांनी त्याकडे कानाडोळा करत यासाठी प्रचंड मेहनत घेतली आणि एक चांगला अभिनेता म्हणून नाव कमावले. 1944 मध्ये चित्रपटसृष्टीत पर्दापण करणारे अभिनेता रहमान यांनी अनेक संस्मरणीय चित्रपट दिले आहेत.

     अभिनेता रहमान यांनी सुरुवातील गेस्ट आर्टिस्ट म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. यापूर्वी त्यांनी पायलटचे रॉयल इंडियन एयर फोर्समध्ये प्रशिक्षण घेतले होते. पण त्यांनी लवकरच आपला इरादा बदलला आणि चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. कामासाठी ते थेट मुंबईत दाखल झाले. दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांच्यासोबत ते सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करू लागले. चांद या चित्रपटात एका गाण्याच्या दरम्यान दिग्दर्शकांना फेटा बांधण्यासाठी एका माणसाची आवश्यकता होती. रहमान यांना फेटा बांधायला येत होता. दिग्दर्शकांना रहमान फेटा बांधतात, हे कळल्यावर त्यांनी त्यांनाही चित्रपटात एका ओळीत उभा केले. चित्रपटात त्यांना एक डॉयलॉगही देण्यात आला होता. मात्र तो डॉयलॉग बोलायला त्यांना 50 टेक घ्यायला लागले दिग्दर्शक तर त्यांच्यावर अक्षरश: ओरडले. खूप वाईटसाईट बोलले. कसा तरी तो चित्रपट पूर्ण झाला. यात त्यांना कसलेच काही क्रिडेट मिळायचा प्रश्न नव्हता.पण त्यांना चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
     प्रभात स्टुडिओने पुन्हा एकदा पी.एल. संतोषी यांच्या हम एक है (1946) या चित्रपटासाठी कास्ट केले. या चित्रपटात त्यांच्या आईची भूमिका साकारली होती दुर्गा खोटे यांनी! चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यश मिळवलं आणि रहमानने कधी मागे वळून पाहिले नाही. या नंतर त्यांनी शाहजहां (1946), नरगिस (1946), तोहफा (1947), इंतजार के बाद (1947), रुपरेखा ( 1948), सारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. 1948 मध्ये प्यार की जीत मध्ये नायकाच्या भूमिकेत त्यांना पसंद करण्यात आले. चित्रपटात सुरैय्यासोबतच्या त्यांच्या जोडीला चांगलीच वाहवा मिळाली. नंतर मग 1949 मध्ये बडी बहन या चित्रपटातदेखील सुरैय्या त्यांच्यासोबत होती. हाही चित्रपट हिट ठरला. रहमान आणि गुरु दत्त खूप चांगलेच दोस्त होते. त्यामुळे गुरुदत्त यांच्या चित्रपटांचे ते अविभाज्य भाग होते. प्यासा,चौदहवी का चांद, साहब, बीवी और गुलाम, दिल ने फिर याद किया, छोटी बहन,फिर सुबह होगी आणि वक्त इत्यादी त्यांचे संस्मरणीय चित्रपट आहेत.
(त्यांचा जन्म 23 जुलै 1921 आणि मृत्यू 5 नोव्हेंबर 1984)

No comments:

Post a Comment