Monday, September 18, 2017

स्वतः ला बदला,पण थांबू नका

      बहुतांश लोक अपयशी होतात,त्याला ते स्वतः जबाबदार असतात, कारण त्यांनी स्वतः ला बदलले नसते.त्यांना स्वतः मध्ये बदल करावासा वाटत नाही. पण खरे वास्तव असे की, परिवर्तनाशिवाय यश हाताला लागत नाही. परिवर्तनामुळे आपल्या आयुष्याला फायदा होतो. काही माणसे खड्ड्यात असतात.खड्डा खोदण्याचे काम करीत असतात. ते आपल्या कामाची पद्धत बदलत नाहीत. त्यामुळे ते अडचणीत सापडू शकतात. काही माणसे आपल्या आपल्या म्हणण्यावर ठाम असतात.त्यांना बदल नको असतो. अशा माणसांना काळाचे वादळ संपुष्टात आणते. काही माणसांना बदलण्यापेक्षा आहे तिथेच थांबायला आवडते. अशी माणसे कुठे पोहचतच नाहीत. मग प्रगती कशी साधली जाणार? जर तुम्ही तुमच्या व्यवसाय,धंद्यात वा अन्य कोणत्या क्षेत्रात नव्या पद्धतींचा स्वीकार नाही केला तर नया समस्या आयुष्यात उभ्या राहणार आहेत . कुणी तरी म्हटले आहे, जो स्वतः ला बदलायचे थांबवतो, तो स्वतःदेखील थांबतो,संपतो.त्यामुळे थांबण्यापेक्षा बदलण्याचा प्रयत्न करा.जितक्या लवकर तुम्ही स्वतः बदलाल,तितक्याच लवकर तुम्ही यशस्वी व्हाल. 
     यश अगदी जवळ असते,पण माणूस स्वतः मध्ये बदल करत नाही आणि यशाच्या मार्गावर चालायला नकार देतो.जो माणूस बदलाला,परिवर्तानाला घाबरतो, तो स्वतः च्या क्षमता पार विसरून जातो.त्यामुळे त्याच्या पदरी अपयश पडते. आणि निराश होतो. जर तुम्हाला कधी दृढ राहायचं आहे आणि कधी झुकायचं आहे,याचा अंदाज आला तर तुमचे यश निश्चित आहे.  सततच्या परीवर्तनाने तुम्ही बैचेन व्हाल,पण परिवर्तन नसेल तर मात्र तुम्ही घाबरून जाल.पुढे काय करायचे हे  ,याची तुम्हाला आयडीया येणार नाही.
     जी व्यक्ती स्वतः मध्ये बदल घडवते,मात्र आपल्या सिद्धांताशी कसल्याही प्रकारचा समझोता करता प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेते ,ती व्यक्ती चांगली समजली जाते.परिवर्तन याचा अर्थ असा की,लक्ष्य  मिळवण्यासाठी योग्य मार्गाचा शोध घेणे. हा मार्ग असा असायला हवा,याचे कौतुक सगळ्यांनी करायला हवे आणि त्यातून प्रेरणा घ्यावी. या मार्गातून मिळालेले यश प्रामाणिक असायला हवे. सच्चे असायला हवे.


No comments:

Post a Comment