
ज्योतीचा जन्म
वारंगल या छोट्याशा गावात एका गरीब कुटुंबात झाला. लहानपणीच तिच्या आईचे देहावसान झाले. आईविना
पोरके पोर तिचे काय होणार? पण तिच्या घरच्यानी तिला अनाथालयात
सोडले. कारण तिने आपले शिक्षण पूर्ण करावे. ती दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. पण गरिबीमुळे तिला शिक्षण अर्ध्यावरच सोडून द्यावे लागले आणि शेतात कामाला
जावे लागले. दहावी झाल्यावर अवघी 16 वर्षांची
असतानाच तिला बोहल्यावर चढावे लागले.मात्र तिचा नवरा हा तिच्यापेक्षा
कितीतरी वयाने मोठा होता. लग्न झाल्यावर अवघ्या दोन वर्षात म्हणजे
ती 18 वर्षाची होईपर्यंत दोन मुलांची आई बनली. राबराबूनही घरगाडा चालवणे मुश्किल झाले. या सततच्या आर्थिक
तंगीमुळे घरात वारंवार खटके उडायला लागले. वाद व्हायला लागले.
मात्र ती हताश झाली नाही. तिने शिकायचं ठरवलं. तिने निश्चय
केला की, आपल्या मुलांचा सांभाळ चांगल्या प्रकारे करायचा.त्यांना शिकवायचे. चांगला माणूस घडवायचे.ती शेतात राबतच शिकत राहिली.
पहिल्यांदा ती
बीए पास झाली. नंतर पोस्ट
ग्रॅज्युएट डिग्री मिळवली. या दरम्यान तिने कॉम्प्युटर कोर्स
जॉइन केला. यानंतर ती 2000 मध्ये आपले भविष्य बनवायला युएएसला गेली. तिथे तिने पडेल ती कामे केली. गॅस स्टेशनमध्ये,
बेबी सिटर म्हणून तर कुठे व्हिडिओ शॉपमध्ये कामे केली. याच दरम्यान तिने आपल्या कंपनीची सुरुवात केली. आपल्या कष्टाच्या,जिद्दीच्या, विश्वासाच्या जोरावर
आणि काही तरी करून दाखवण्याच्या इच्छेमुळे रात्रंदिवस काम करून आपली कंपनी नावारुपाला आणली. मग काय तिने मागे वळून पाहिलेच नाही. ती सतत काम करत
राहिली. आज तिची देशात, जगात आपली अशी वेगळी
ओळख आहे.
No comments:
Post a Comment