
संगणक,त्याचे सुटे भाग,मोबाईल, केबल्स,प्रिंटर,सेल्स (बॅटर्या),की-बोर्ड,माऊस,हेडफोन,पेन्सिल सेल,चार्जर,
युज अँड थ्रो साहित्य,इलेक्ट्रॉनिक वस्तू या सगळ्या
वस्तूंचा ई-कचर्यात होतो. या वस्तू खराब झाल्या की, कुठेही बाहेर फेकून दिल्या
जातात. या वस्तू जाळल्यामुळे विषारी वायू बाहेर पडतो.
जनावरांसाठी हानीकारक आहेत. नाशिक,कोल्हापूर,पुण्यासारख्या शहरात रोज दहा ते पंधरा टन ई-कचरा तयार होतो.कोल्हापूर,सांगली,सोलापूरसारख्या शहरातही मोठ्या प्रमाणात ई-कचरा तयार
होतो.हा कचरा पर्यावरणाला मोठा हानीकारक आहे. त्याचा परिणाम माणसाच्या आरोग्यावरही होतो,त्यामुळे हा
कचरा गोळा करण्यासाठी व त्याच्या विल्हेवाटीसाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
घरोघरी जाऊन अथवा शहरातल्या इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये जाऊन हा कचरा
गोळा करण्याची गरज आहे. कचर्याच्या विल्हेवाटीसाठी
प्लांट उभारण्याचीही आवश्यकता आहे.
No comments:
Post a Comment