Tuesday, August 18, 2015

पर्यावरण रक्षणासाठी वीज बचत करा

     भारतातील मोसमी पाऊस बेभरवशाचा झाला आहे. हवामानात वारंवार बदल होत असतात. परिणामी अन्नधान्य सुरक्षा धोक्यात येत असून कित्येक वनस्पती व प्राणयांच्या जाती नष्ट होत चालल्या आहेत.हे संकट जागतिक असले तरी त्याचे परिणाम अनेक देशांना भोगावे लागतात.त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या पातळीवर हवामान बदल रोखण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आणि याची सुरूवात आपण वीज बचतीपासून करू शकतो. त्यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे. सामाजिक स्वयंसेवक संस्थांनी याबाबत पुढाकार घेऊन जागृतीसाठी प्रयत्न करावेत. अलिकडेच महाराष्ट्रात झालेली गारपीट हे हवामान बदलाचेच द्योतक आहे. पृथ्वीच्या सरासरी तापमानात गेल्या दीडशे वर्षांत अतिशय वेगाने वाढ झाली आहे.    वातावरणातील उष्णता धरून ठेवणार्‍या कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड वायूंचे उत्सर्जन यास कारणीभूत आहेत. औद्योगिक क्रातीपासून आजतागायत मानवी समाजाने औद्योगिक प्रगतीच्या नावावर खनिज तेल,कोळसा, जंगल आदी संसाधनांची प्रचंड लूट केली. परिणामी यांच्या ज्वलनातून मोठ्या प्रमाणात उष्णता धरून ठेवणार्‍या वायूंचे उत्सर्जन झाले. आणि पृथ्वीचे तापमान वाढले. के प्रमाण 350 पीपीएम (पार्टपर मिलियन) पर्यंत खाली आणणे हे जागतिक उद्दिष्ट असले तरी सध्या हे प्रमाण 315 पर्यंत जाऊन पोहचले आहे. परिणामी पृथ्वीवरील हिमनग वितळून समुद्राच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे समुद्र किनार्‍यावरील निसर्ग आणि जनजीवन पाण्याखाली जात आहे. हवामान बदलाचे हे संकट जागतिक असले तरी त्याचे परिणाम अमेरिका, युरोप, भारत, बांगला देश अश सर्वच देशांना कमी-जास्त प्रमाणात भोगावे लागणार आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. याची सुरूवात आपल्याला वीज बचतीतून करता ये ईल. याचा दुहेरी लाभ आपल्याला मिळेल.उष्णता धरून ठेवणार्‍या वायूंवर नियंत्रण ये ईल आणि दुसरे म्हणजे वीज बचत केल्याने आपले आर्थिक नुकसानदेखील होणार  नाही.                                                                      
 

No comments:

Post a Comment