Sunday, January 22, 2017

साबरमती का एक संत


 महात्मा गांधी फक्त एक नावच नाही,तर एक पूर्ण विचारधारा आहे.जितके अधिक समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो,तितक्याच नव्या गोष्टी समोर येतात.
1.ब्रिटेन म्हणजेच तो देश ज्याच्या विरोधात गांधीजींनी स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली,तिथूनच त्यांच्या मृत्यूच्या 21 वर्षांनंतर त्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकिट जारी करण्यात आले.

2.महात्मा गांधी जीवनभर रोज 18 किलोमीटर पायी चालत राहिले.सांगितलं जातं की,ते रोज जवळपास 700 शब्द लिहायचे.यात राजकारण,स्वातंत्र्य,समानता आदी संबंधीत विविध विषयांवर लिहिलेल्या लेखांचा समावेश आहे.
3.टॉल्सटॉय, आइन्स्टीन आणि हिटलर सारख्या व्यक्तिंबरोबर महात्मा गांधीचा आयुष्यभर पत्रव्यवहार सुरू राहिला.4.भारतात महात्मा गांधींच्या नावावर 53 मुख्य मार्ग आहेत.तसेच भारताबाहेरही 48 असे मार्ग आहेत,ज्यांची नावे महात्मा गांधींच्या नावाने आहेत.
4. महात्मा गांधी यांच्या अंत्ययात्रा 8 किलोमीटर इतकी लांब होती.
5.ज्यावेळा भारताच्या स्वातंत्याची घोषणा झाली,तेव्हा गांधीजी दिल्लीत नव्हते. ते कोलकात्यातील धार्मिक सदभावनेसाठी उपोषणाला बसले होते.
6.जगभरात आपल्या नेतृत्वसाठी चर्चेत राहिलेले गांधीजी आपल्या आयुष्यात कधीही कुठल्याही राजकीय पक्षाचे पद घेतले नाही.
7.महात्मा गांधीजींना नोबेल पुरस्कारासाठीदेखील पाच वेळा मानांकन मिळाले होते.
8.दक्षिण आफ्रिकेत त्यांनी 15 हजार डॉलरचा पगार मिळाला होता.ही त्याकाळाच्या हिशोबाने खूपच मोठी रक्कम होती.पण ते ती सर्व रक्क्म सोडून भारतात परत आले. आणि सत्याग्रही बनले.
9. आफ्रिकेत वर्णभेद मिटवण्याच्या प्रयत्नात त्यांनी फुटबॉल क्लबदेखील बनवला होता.
10.ते पहिले असे भारतीय आहेत की,ज्याला अमेरिकेच्या साप्ताहिक पत्रिकाद्वारा दरवर्षी दिला जाणारा टाईम पर्सन ऑफ द इयर टायटल दिले गेले.11.तामिळनाडूतील मदुराईमध्ये ज्यावेळा त्यांचा काही गरीब लोकांना संवाद झाला,त्यावे़ळीपासून त्यांनी आयुष्यभर वस्त्राचा त्याग करून फक्त पंचा नेसण्याचा निर्णय घेतला



No comments:

Post a Comment