भारताचे हिमालय
क्षेत्र विविध प्रकारच्या वनस्पती,जीव-जंतूंचं आवास तर आहेच शिवाय विभिन्न जलस्त्रोतांचे
उगमस्थानही आहे.पण औद्योगिकरण,खाणकाम,वनतोड आणि प्रदूषण आदी कारणांमुळे या क्षेत्रातील पर्यावरणीय तंत्र सतत बिघडत
चालले आहे.एका बाजूला हिमनद्या वितळत आहे,तर दुसर्या बाजूला वनांची संख्या कमी होत असल्याने भूस्खलन
आणि पेयजल संकट उभे ठाकत आहे. मॅगेसेस पुस्कार विजेते कल्याण
पॉल यांना जाणवलं की, नैसर्गिक संसाधने नष्ट होणे,हेदेखील गरिबीचं प्रमुख कारण आहे. या विचारामुळेच त्यांना
मूलभूत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण आणि संवर्धन करायला
प्रेरणा मिळाली. भारतात विपूल नैसर्गिक संपत्ती असतानादेखील हिमालय
क्षेत्रातले लोक देशातल्या अन्य भागातल्या तुलनेत अधिक प्रमाणात मूलभूत सुविधांसाठी
वंचित आहेत.मध्य आणि पश्चिमी हिमालयातील
नैसर्गिक संसाधनांचं आंकुचन शेतीच्या अस्तित्वासाठी संकट निर्माण करत आहे.
कल्याण पॉल यांनी 1992 मध्ये पॅन हिमालयन ग्रासरुट
डेवलपमेंट फाऊंडॅशन ची सुरुवात केली,कारण पर्यावरण समुदाय आधारित
अशा तंत्रज्ञानाचा प्रचार-प्रसार केला जावा,जे पर्यावरणाराच्या हिताचे असेल.त्यांनी मग रोजच्या गरजांशी
जोडलेल्या तंत्रज्ञानाला स्थानिक समुदयांच्या जीवनाशी जोडण्याचा निश्चय केला.पेयजल,ऊर्जा संरक्षण,जैवविविधतेचे संरक्षण,टिकाऊ शेती अशा साधनांची निर्मिती
आणि माहितीच्या आधारे सामुदायिक सशक्तीकरण हा आपल्या रणनीतीचाच भाग आहे.कल्याण पॉल यांनी त्याचा अभ्यास केला आणि अशा मूलभूत तंत्रज्ञानाच्या शोधाला
लागले,जे पर्वतीय पर्यावरणीय तंत्र आणि स्थानिक गरजांशी अनुकूल
असेल. कल्याण पॉल यांना अंत:स्त्राव कूप
( भूजल स्तर राखण्यासाठी), रुफटॉप वॉटर,हार्वेस्टिंग,पारंपारिक पिकांची शेती, सामुदायिक व्यवसाय आणि बायोगॅस यामुळे स्थानिक पर्यावरणीय तंत्रात सुधारणा
करु शकतो. त्यांना हेही माहित होतं की,जल
आणि वन व्यवस्थापनासाठी मातीमध्ये ओलावा असावा लागतो. याच्या
प्रसार आणि प्रसारासाठी स्थानिक बेरोजगार युवकांना संस्थेचे माध्यमातून प्रशिक्षित
करण्यात आले. आणि त्यांचे एक नेटवर्क तयार केले गेले.हे युवक गावोगावी जाऊन या तंत्रज्ञानाशिवाय पारंपारिक शेती आणि चांगल्या मूल्यांच्या
पिकांबाबतीत लोकांना सांगायचे. अशाप्रकारे पशूपालन आणि पोल्ट्रीच्या
सहाय्याने सामुदायिक सशक्तीकरणाचा प्रयत्नदेखील केला गेला. याबरोबरच
गेल्या काही काळापासून चालत आलेल्या हिमखाद्य नावाचा ब्राँड स्थानिक शेतकर्यांच्या उत्पादनांना बाजराशी जोडण्यासाठीदेखील फायद्याचे सिद्ध झाले.
पेयजल सुनिश्चित करण्यासाठी अंत:स्त्राव कूप सगळ्यात चांगले तंत्रज्ञान सिद्ध झाले.याचे
व्यवस्थापन समुदायातले लोक स्वत:च करतात. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातल्या 350 गावांमध्ये
500 हून अधिक अंत:स्त्राव विहिरींची निर्मिती केली
गेली. यामुळे जवळपास एक लाख लोकांना दररोज पिण्याचे पाणी मिळायला
लागले. या क्षेत्रातल्या महिला आणि मुलांना आता पाण्यासाठी दूर
दूर भटकावे लागत नाही. छतावरचे पावसाचे पाणी एकत्रित गोळा करण्यासाठी लोकांना प्रेरित
केले गेले.त्यामुळे जलस्त्रोतांवरचा भार कमी झाला. शिवाय इथे स्वच्छतेसंबंधीच्या
सुविधांनादेखील प्रोत्साहन दिले जात आहे,यामुळे पाण्यामुळे होणारे
आजार रोखण्यास फारच मदत मिळते आहे. स्वच्छ आणि ऊर्जेचे टिकाऊ
स्त्रोत म्हणून बायोगॅसचा उपयोग होत आहे. त्यामुळे सरपणासाठी
जंगलावरची निर्भरतादेखील कमी होत आहे.
No comments:
Post a Comment