Tuesday, September 20, 2011

9 ऑगस्ट फ्रेंडशीप डे निमित्त

9 ऑगस्ट फ्रेंडशीप डे निमित्त
अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'देल्ही बैली'ची कथा तीन दोस्तांच्या भोवतीनं फिरताना दिसते. यात ही दोस्त मंडळी आपापसात हरप्रकारची मस्ती करताना दिसतात. या चित्रपटात अपशब्दांचा भरिमाड असा वापर करण्यात आला आहे. पण वेळ पडल्यास खरी दोस्तीसुद्धा निभावत  एकमेकांना साथ देतानाही दिसतात . 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मध्येसुद्धा फरहान अख्तर,अभय देओल आणि हृत्विक रोशन या तिघा मित्रांभोवतीच  कथा घुटमळली असल्याचे दिसते. या सगळ्या चित्रपटांमध्ये पुरुष मैत्रीची महती गायिली आहे. पण मैत्रीचा उथळ खळखळाट अधिक यांमध्ये जानवतो.  'दिल चाहता है', रंग दे बसंती' अथवा 'थ्री इडियटस' हे सिनेमेसुद्धा पुरुष नायकांच्या मैत्रीवर आधारित होते. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटांवरून असं लक्षात येतं की, आपल्या बॉलीवूडमधील निर्मात्यांना  'पुरुष दोस्ताना' पडद्यावर आणल्यास आपल्याला यश मिळतं, याचं गमक मिळालं आहे. 'दोस्ताना' च्या खांद्यावर बंदूक ठेवून वार केल्यास निशाणा अचूक बसतो, याची कल्पना आल्याने निर्मात्यांनी तोच तो फॉर्म्युला वारंवार वापरल्याचे दिसते. मित्रांची भूमिका साकारणार्‍या अभिनेत्यांनी आपापल्यात चांगली केमेस्ट्री जमवून प्रेक्षकांनाही खूश करून टाकल्याने 'दोस्ताना' सिलसिला पुढे चालू राहिला आहे..
अर्थात हा फार्म्युला बॉलिवूडमध्ये पुराना आहे. 'शोले' च्या जय-विरूची जोडी आजही प्रेक्षकांच्या स्मरणातून गेलेली नाही. 'संगम' मध्ये गोपाल आपल्या 'सुंदर' नावाच्या मित्रासाठी आपली प्रियेसी राधा हिचासुद्धा त्याग करतो. तिला विसरायला तयार होतो.पण अलिकडच्या चित्रपटांमध्य्रे तो दर्द राहिला नाही. त्यात फुटकळपणा आला.   या  विषयांवर अलिकडे अनेक चित्रपट निघाले.'गोलमाल', 'डबल धमाल',' दोस्ताना',' नो एंट्री,'    'हे बेबी', सारख्या चित्रपटांमध्ये नायकांनी आपल्या धमाल अंदाजात, द्वीअर्थी संवाद आणि बावळट हरकती करून प्रेक्षकांची करमणूक केली. आणि महत्त्वाचे म्हणजे प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवत बॉक्स ऑफिसवरसुद्धा चांगला धंदा करून दिला. 
बॉलिवूडमध्ये पुरुष जोड्या हकली-फुलकी कॉमेडी करून व रुपेरी पडद्यावर उत्कृष्ट केमेस्ट्री जमवून प्रेक्षकांना हसवू शकतात. याची नाडी निर्मात्यांना सापदली. काही दिग्दर्शकांचं म्हणणं असं की, 'पुरुष ज्या पद्धतीनं पडद्यावर हास्य निर्माण करतात, त्या पद्धतीने करण्यास महिला असमर्थ आहेत. त्या गंभीर भूमिका साकारू शकतात.' अर्थात तसं काही नाही. अनेक महिला कलाकारांनी चांगल्या हास्यभूमिका केल्या आहेत्.परंतु अलिकडे शो पीस आणि अंगप्रदर्शनशिवाय महिला कलाकारांच्या वाट्याला काही येतच नाही. त्यांना भूमिका करण्यासारख्या अथवा जागण्यासारख्या  आल्याच नाहीत. वास्तविक मैत्रीसारखा गहन विषय बॉलिवूडने कधी गंभिर्याने घेतला नाही. निस्सीम मैत्री, त्यातील गहनता समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. नायकांचा विनोद कितीही बालिश असला तरी प्रेक्षकांनी त्यांना पसंद केलं आहे.  महिलांसाठी मात्र रोमांटिक, शरिराचे ओंगळवाणे प्रदर्शन आणि स्त्री केंद्रित चित्रपटच निर्माण केले गेले. ही वाट सोडलेली नाही.
बॉलिवूडमध्ये महिला जोड्या अथवा त्यांच्या मित्रत्वावर चित्रपट जवळजवळ नसल्यात जमा आहेत. ‘;फिलहाल’,‘दिल आशाना है' सारखे एक-दोन चित्रपट च समोर येतात. समाज अजूनही पुरुषी सत्तेच्या अंमलाखाली  आहे. पुरुष केंद्रित चित्रपटच पाहणे पसंद करतो.  म्हणून नाइलाजास्तव अशा चित्रपटांचा रतीब घालायला लागतो, असं खुद्द निर्माता -दिग्दर्शकांचं म्हणणं आहे. 'सात खून माफ', फॅशन सारखे मोजकेच सिनेमे महिलांवार अधारित बनतात. त्यात त्यांच्या मैत्रीचं काय घेऊन बसलात? साहजिकच असा प्रश्न पदतो.आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की, बॉलिवूडमध्ये सशक्त अभिनय करणार्‍या अभिनेत्रींची वाणवा आहे. त्याचबरोबर सगळ्यांना एखाद्या कथेच्या भूमिकांमध्ये सामावून घेण्याची कुवत असलेल्या दिग्दर्शकांचीसुद्धा इथे कमरता आहे. त्यामुळेच महिला मैत्रींवर आधारित चित्रपट बनत नाहीत. 
.                                                                                                         _       मच्छिंद्र. ऐनापुरे,                   

No comments:

Post a Comment