Tuesday, September 20, 2011

शेणामुळे वीज संकटावर मात

शेणामुळे वीज संकटावर मात 
भारतात गायीला माता मानलं जातं. गायीच्या दुधाला अमृतासमान म्हटले जाते. गायीचे दूधगायीचे दूध हे पंचगव्यातील एक महत्वाचा घटक आहे. गायीचे दूध हे लहान बालकापासून मोठय़ांपर्यंत सगळ्यांनाच योग्य असते. तान्ह्य़ा बाळाचे आईचे दूध सुटले की पुढे आयुष्यभर गायीचे दूध त्याला हितकारक ठरते. गायीचे दूध हे  पचायला हलके असते. याशिवाय गायीचे शेणखत एक उत्तम खत आहे. शेणखत जमिनीची सुपिकता टिकवून ठेवत असे.पिकाची वाढ जोमात हू ऊन उत्पन्न चांगले मिळते.गायीच्या शेणाचे महत्त्व देश-परदेशातातील लोकांनी ओळखले आहे. कारण जगातल्या काही मोठ्या आयटी कंपन्या गायीच्या शेणात वीज संकटाचे समाधान शोधत आहेत. भारतात गोबरगॅस प्लांटद्वारा स्वयंपाक बनविण्यापासून घरातील सामान्य उपकरणे , टीव्ही आदी साधने चालवली जात आहेत. याची प्रेरना घेऊन अमेरिकेतल्या एचपी कंपनीने आपल्या संस्थेत केलेल्या एका संशोधनानंतर डेटा सेंटर चालवण्याच्या मोठ्या योजनेला अंतीम स्वरूप देन्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एचपी कंपनीने गायीच्या शेणापासून वीज उत्पादन करून डेटा सेंटर चालवण्याला सुरूवातही केली आहे.
एचपी कंपनीद्वारा केलेल्या संशोधनानुसार दहा हजार गायींच्या मदतीने कमीत कमी एक मेगावॅट वीज खपणारे डेटा सेंटर बनवले जाऊ शकते. एका गायीपासून  दिवसभरात जवळजवळ २५ किलो शेण मिळू शकते. अशा परिस्थितीत दहा हजार गायींची क्षमता असणार्‍या डेअरीद्वारे दरवर्षी जवळपास एक लाख मेट्रीक टन खत मिळू शकते. अशा प्रकारे यातून रोज तीन किलो मेगावॅट वीज उपलब्ध हो ऊ शकते. , ज्याद्वारे मध्यम दर्जाचे डेटा सेंटर सहजरित्या चालवले जाऊ शकते. सध्याच्या परिस्थितीत जगभरातल्या काही कंपन्या आणि आयटी सेक्टरचे डेटा सेंटर विजेच्या कमतरतेमुळे चालविण्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा काळात या कंपन्यांना एचपी कंपनीचा हा नवा शोध एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. शेणापासून वीज निर्मिती करून आवश्यक विजेचा पुरवठा केला जाऊ शकतो. एचपीद्वारा केल्या गेलेल्या शोध प्रयोगशाळेचे प्रमुख चंद्रकांत डी, पटेल यांच्यानुसार    अशाप्रकारच्या प्रयोगामुळे केवळ शेणाचा वीज  आनि खतासाठी उपयोग होणार नाही तर वातावरण आणि पर्यावरन्ही स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे. भारतात वैकल्पिक ऊर्जा म्हणून शेणाचा प्रयोग यापूर्वीपासूनच केला जात आहे. खेड्यात गोबरगॅस संयंत्राद्वारा गॅसचे उत्पादन केले जात आहे. गॅसनिर्मितीवर केवळ स्वयंपाक बनवण्याचे काम होत नाही तर गावागावांमधला अंधार घालविण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशात या संयंत्राच्या माध्यमातून आयटी कंपन्यांचे डेटा सेंटर भारतातही सुरू झाल्यास शेतकरी आणि ग्रामीण जनतेला मिळकतीचा एक नवा स्त्रोत निर्माण होईल.  राष्ट्रीय डेअरी विकास योजना आणि सहकार डेअरीच्या माध्यमातून एक व्यवसाय म्हणून आजमावता येईल. शेणाच्या योग्य वापरामुळे विजेचे संकटही दूर होईल.

No comments:

Post a Comment