Thursday, March 30, 2017

बदला घ्यायचा तर आनंदाने घ्या

     आपल्या भारतीय संस्कृतीत सूड उगवणं किंवा बदला घेणं,याला वाईट मानलं जातं. काही जण याला आगीशी खेळणं म्हणतात,काहीजण याला दुसर्यांबरोबर स्वत:लाही जाळणं, असं समजतात.याने दाट जंगल पार करताना रस्ता चुकण्याची शक्यता असते. पण हे आपल्याला केव्हा कळते तर ज्यावेळेला आपण सुडाच्या भावनेत धुमसत काही पावले पुढे गेलेलो असतो.
     खरे तर आपण कित्येकदा कसलीही प्रतिक्रिया न देता पुढे जात असतो. पुढे कधीतरी समज येईल किंवा वाईट कर्माची फळं मिळतीलच, असे म्हणून पुढे जातो. पण नेहमीच सूड उगविण्याच्या भावनेला दाबून ठेवणं, अवघड असतं.शेक्सपिअर तर सुड उगवणेच्या भावनेला उगवत्या सूर्यासमान मानतात. होतंही असतं,जर कोणी नुकसान पोहचवत असेल,धोका देत असेल किंवा मग पुन्हा पुन्हा हल्ला करत असेल तर काहीतरी करायलाच हवं ना? काही न करणं,कित्येकदा षंड किंवा लाचार असल्याचा अनुभव देतं.पण काय गरज आहे,यातून स्वत:लाही नुकसान पोहचवायचं?स्व्त:ला का यात लोटायचं? स्वत:वर सुडेच्या भावनेला हावी होऊ द्यायचं नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. लोक काहीही  म्हणोत,त्याकडे लक्ष न देता पुढे गेले पाहिजे. आपल्या कृतीतून त्यांना दाखवायचं आहे,त्यामुळे न बोलता,व्यक्त न होता,बदला घेता आला पाहिजे.

     बदला घेताना आपल्याला खूप बरं वाटतं. पण हा आनंदाचा अनुभव मानसशास्त्रतज्ज्ञ क्षणिक बरोबरच मिथकही मानतात. क्लिनिकल सायकॉलॉजीच्या जाणकार आणि पीस ऑफ माइंड कॉलमच्या लेखिका कॅरेन हाल म्हणतात की, बेलगाम संताप आणि चुकीच्या प्रतिक्रियेच्या कारणामुळे आपण स्वत:चे किंवा दुसर्यांचे अधिक प्रमाणात नुकसान करतो. पण ज्यावेळेला नुकसान कारणांपेक्षा मोठे होते,तेव्हा बदला घेतल्याने होणारा त्यातला आनंददेखील संपून जातो.नाती तर कायमचीच संपतात आणि सूड भावना मात्र आपल्या मनात कायम राहते.
     बदला कसा असावा,याबाबत एंगर स्पेशलिस्ट एंड्रिया ब्रेंडेट म्हणतात, स्वत:साठी उभं राहणं महत्त्वाचं आहे. असं कराही,पण सूड घेण्याची भावना सोबत घेऊन नाही. जखम खोलवर असेल तर पहिल्यांदा ते बरे होण्यासाठी वेळ द्या. बौद्ध गुरू तिक न्यात म्हणतात, पहिल्यांदा आपल्या आतील आग शांत करा. त्यानंतर जे काही कराल,ते राग,संतापाने नाही तर योग्य मार्गाने करा.
     कृतीने स्वत:ला सिद्ध करा. चुकीचे काही बोलू नका, शिष्टता ठेवा. पारदर्शक रहा.ते कामात,बोलताना आणि भावनेच्यास्तरावरदेखील राहायला हवे. आपले नेटवर्क वाढवा. जितका मोठा विस्तार, तितकाच विशाल विचार आपल्यात निर्माण होतो. जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन विशाल राहतो.लोकांपासून दूर जाण्यापेक्षा थेट मुद्द्याचे बोला.प्रत्येक वेळेला प्रतिष्ठेचा विषय करू नका. विनाकारण विरोधक बनलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. उलट त्यांच्या नडीला त्यांना मदत करा. अशा लोकांसाठी एवढे पुरेसे आहे. मिटिंगमध्ये किंवा ऑनलाईन तुमच्यावर हावी होत असेल तर लगेच प्रतिक्रिया देण्याच्या फंदात पडू नका. यामुळे तुम्हालाच चुकीचे ठरवले जाऊ शकते.थोडे थांबून आपले म्हणणे मांडा.
     जर कोणी तुमच्यावर जळत असेल,इर्षा करत असेल तर अशा लोकांजवळ आपल्या खासगी गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या आरोग्याची आणि मनोरंजनाची काळजी घ्या. रोज व्यायाम करा. काही नवं शिका आणि काम करा.



No comments:

Post a Comment