आजच्या मल्टिफ्लेक्सच्या
जमान्यात हिंदी चित्रपटाच्या यशाची समिकरणे बदलली आहेत. पूर्वी 25 -25 आठवडे एकच चित्रपट थिएटरवर लागलेला असायचा. जास्तीत जास्त
जो चित्रपट चालाला,तो हिट समजला जायचा. साहजिकच राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांचे चित्रपट अधिक
दिवस चालायचे. राजेश खन्नाच्या अस्तानंतर सुपरस्टार म्हणून अमिताभ
बच्चन उदयास आला. मात्र त्यानंतर सुपरस्टार या नावाची पदवी कोणालाच
मिळाली नाही. बॉलीवूडचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा शाहरुख बॉलीवूडचा
खरा सुपरस्टार आहे का, हा सवाल उपस्थित होतो. कारण खरा सुपरस्टार या उपाधीसाठी निवड कशी आणि कोणाची करायची? कारण आज हिट चित्रपटाचे समिकरण बदलले आहे. आज शंभर कोटी
क्लबमध्ये पोहचणारा चित्रपट हिट समजला जातो. म्हणजे चित्रपटाने
शंभर कोटीचा बिझनेस केला की, तो चित्रपट हिट. आपल्यादृष्टीने सुपरस्टार कोणाला ठरवायचे? सगळ्यात जास्त
ज्याचे चित्रपट शंभर कोटी क्लबमध्ये पोहचले आहेत, त्याला सुपरस्टार
बहाल करावे का? तत्पूर्वी यावर्षीचा थोडा लेखाजोखा पाहू.
2017 मध्ये सलमान,
शाहरुख आणि आमिर या खान त्रिकुटासह ऋत्विक रोशन आणि रणबीर कपूर या सगळ्यांनाच
बॉक्स ऑफिसवर जोरदार झटके बसले आहेत. मात्र अक्षयकुमारचे स्टारडम
वाढले आहे. अजय देवगनला दिवाळीच्या मुहुर्तावर आलेल्या गोलमाल
अगेनने आपली चमक कायम ठेवण्यास हातभार लावला आहे. हा दोनशेचा
कोटीचा पल्ला गाठेल, असे सध्यातरी दिसत आहे. वरुण धवन स्टारडमच्या स्पर्धेत वेगाने पुढे येत आहे. त्याच्या यावर्षी दोन चित्रपट शंभर कोटीचा बिझनेस केला आहे. त्यामुळे त्याला आता लंबी रेस का घोडा म्हटले जात आहे. आता शेवटच्या दोन महिन्यात पद्मावती आणि टायगर जिंदा है या तगड्या चित्रपटांचे
कलेक्शनदेखील चांगलेच असणार आहेत, असा तर्क काढला जात आहे.
अशा सगळ्या परिस्थिती 2017 जाता जाता आशा-
निराशाचे वातावरण देऊन जाईल, का असे म्हणायला अजून
थोडा कालावधी आहे. त्यामुळे
हे पाहणं मनोरंजक आहे की, या चित्रपट तार्यांच्या रेसमध्ये शेवटी बॉक्स ऑफिसचा खरा बादशहा कोण असणार आहे. शंभर कोटी आज यशाची ओळख आहे. या आधारावर यावर्षीचा स्टारडम कुणाचा किती चमकतो आहे,
हे पाहता येणार आहे. मात्र ऑलटाइम सुपरस्टार कुणाला
बहाल करायचे हा प्रश्न उरतोच नाही का? त्यामुळे आजच्या आघाडीच्या कलाकारांच्या आजवरच्या कारकिर्दीवर थोडा प्रकाशझोत
टाकू.
सलमान खान

अक्षय कुमार
यानंतर क्रमांक
लागतो तो अक्षयकुमारचा! अक्षयकुमारने खूप मेहनत घेत या मुकामवर पोहचला आहे. त्याला
हिट मशीनची उपमा दिली जाते. शंभर कोटी क्लबच्या या स्पर्धेत अक्षयकुमार
शाहरुख आणि आमिरच्या पुढे आहे.त्याचे आतापर्यंत आठ चित्रपट शंभर कोटी क्लबमध्ये पोहचले आहेत.
टॉयलेट: एक प्रेमकथा,, जॉली
एलएलबी2, रुस्तम, हाऊसफुल3 एयरलिफ्ट या पाच चित्रपटांनी शंभर कोटीचा बिझनेस केला आहे तर हाऊसफुल2,
राऊडी राठोड आणि हॉली डे या चित्रपटांनी शंभर कोटीपेक्षा अधिक बिझनेस
केला आहे.
शाहरुख खान

आमिर खान
आमिरखानचे पाच
चित्रपट शंभर कोटी क्लबमध्ये पोहचले आहेत. बॉलीवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट नावाने ओळखला जाणारा हा कलाकार
आपल्या भूमिकेत अक्षरश: जीव ओततो. भूमिकेनुसार
आपल्यात चेंजेस करणारा हा एकमेव कलाकार आहे. भूमिकेसाठी वजन वाढवणं,
कमी करणं, हा प्रकार रिस्की आहे.पण आमिर खान असली रिस्क घ्यायला तयार असतो. अशा या कलाकारानेच
बॉलीवूडमध्ये शंभर कोटी क्लबचा यशाचा फार्म्युला सुरू केला होता. 2008 मध्ये त्याच्या गजनी चित्रपटाने 114 कोटी कमावले होते.
2012 मध्ये आलेला तलाश (90 कोटी) सोडला तर आमिरखानची मुख्य भूमिका असलेल्या प्रत्येक चित्रपटाने देशभरात शंभर
ते तीनशे कोटीचा बिझनेस केला आहे. त्याच्या थ्री इडियटस आणि धूम
3 या दोन्ही चित्रपटांनी 200 कोटी बिझनेसचा पल्ला
गाठला आहे. पीके आणि दंगल ने 300 कोटीचा
आकडा पार केला आहे.
अजय देवगण

वरुण धवन


ऋत्विक रोशन
कहो ना प्यार है
या चित्रपटापासून ब्लॉकबस्टर सुरुवात करणारा ऋत्विक रोशन नंतर मात्र यशापयशाच्या हिंदोळ्यावर
झुलत राहिला. घरच्या प्रॉडक्शनमध्ये
तयार झालेल्या कोई मिल गया, क्रिश आणि क्रिश-3 या चित्रपटांमुळे त्याचे स्टारडम कायम राहण्यास हातभार लागला आहे.
2016 मधला सुपफ्लॉप मोहनजोदडो आणि यावर्षीचा साधारण व्यवसाय केलेला काबिल
चित्रपटांमुळे त्याचे स्टारडम धोक्यात आले आहे. आता ऋत्विक शिक्षणतज्ज्ञ
आणि गणिततज्ज्ञ आनंदकुमार यांच्या बायोपिकद्वारा आपले नशिब आजमावणार आहे. ऋत्विकच्या खात्यावर अग्निपथ, क्रिश-3 आणि बँग बँग हे शंभर कोटी क्लबचे चित्रपट आहेत. आपली चमक कायम ठेवण्यासाठी
त्याला चमकदार कामगिरीची गरज आहे.
No comments:
Post a Comment