Tuesday, November 28, 2017

आर. आश्‍विनची कमाल

     विराट कोहलीच्या संघाने पुन्हा एक सामना सफाईदारपणे जिंकला. मात्र हा सामना खासच ठरला. एक तर भारताने हा सामना एक डाव 239 अशा विक्रमी धावांनी जिंकला आणि दुसरे म्हणजे या सामन्यात भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन आश्विन याने 54 व्या सामन्यात सर्वात वेगवान 300 बळी घेण्याचा विक्रम मोडीत काढत नवा विक्रम साधला. अर्थात हा सामना भारत जिंकणारच होता आणि श्रीलंका हा सामना हरणारच होता. खरे तर हा सामना सुरू झाला तेव्हा जय-पराजयाचा विषयच नव्हता. विषय होता फक्त आर. आश्विनच्या 300 बळी पूर्ण करण्याचा! श्रीलंकेचा शेवटचा बळी आश्विनने टिपला आणि कसोटी सामन्यात सर्वात वेगवान बळी घेण्याचा गोलंदाज ठरला. महान क्रिकेटपटू डेनिस लिली यांना हा टप्पा करताना 56 कसोटी सामने खेळावे लागले होते. रविचंद्रन आश्विनने हा टप्पा 54 कसोटीतच पूर्ण केले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त बळी घेणार्या मुथैया मुरलीधरनलादेखील यासाठी 58 सामने खेळायला लागले होते.

     सध्याच्या घडीला विराट कोहलीच्या क्रिकेट संघाचा आश्विन महत्त्वाचा भाग बनला आहे. तो चालला की, संघाचा विजय निश्चित मानला जातो.गेल्या काही सामन्यांपासून त्याचे प्रदर्शन चांगले दिसून येत आहे आणि त्यामुळे विराट कोहलीचा संघदेखील उत्तम कामगिरी करत आहे.आश्विनचे नाणे चालते, तेव्हा ते अगदी खणखणीतच चालते. एक-दोन नाही तर तो आठ- नऊ बळी मिळवतो. एकदा सुरू झाला की, मग मागे वळून बघणे नाहीच! समोरच्या संघाला गारद करण्यासाठी,ज्या गोलंदाजाची गरज असते, ती गरज  खरोखरच आश्विनच पूर्ण करतो.त्याच्या गोलंदाजीत कमालीची विविधता आहे.त्याचे ऑफस्पिन झकासच आहे. त्याच्याइतके ऑफस्पिन क्रिकेट जगतात कदाचितच दुसरा कोणी असू शकेल. त्याचा कॅरम बॉल वेगळ्या प्रकारचा आहे.प्रत्येक हंगामानंतर असं वाटतं की, त्याच्या गोलंदाजीत थोडी थोडी सुधारणा होत आहे. तो स्वत: ला उत्तम बनवण्याच्याबाबतीत तो फारच प्रयत्नशील दिसतो.
     या आशिया उपखंडात त्याची गोलंदाजी कमालच करते. पाकिस्तानला तो जाऊ शकला नाही. त्याची कारणे वेगळी आहेत. पण श्रीलंका, बांगला देश आदी ठिकाणी त्याच्या गोलंदाजीने कमालीची कामगिरी केली आहेआश्विनची कामगिरी त्याला महान बनवण्यास हातभार लावणारी आहे.मात्र त्याची ही कामगिरी घराबाहेर फार काही चांगली चालली नाही. श्रीलंका आणि बांगला देश येथील मैदाने पाहिली तर ती त्यांना आपण घरच्यासारखीच म्हणू शकतो. बाहेर जाऊन म्हणजे वेस्ट इंडिजला गेल्यावर त्याच्या गोलंदाजीची प्रदर्शन चांगले राहिले आहे. त्याला अजून ऑस्ट्रेलिया,इंग्लंड,दक्षिण आफ्रिका आणि न्यूझिलंडमध्ये चांगली कामगिरी करावयाची आहे. याठिकाणी त्याचे मागचे दौरे विसरण्यासारखेच आहेतखरे तर बाहेरच्या दौर्यामध्ये फक्तच फिरकी गोलंदाज खेळवला जातो. तिथली मैदाने (पिच) फिरकीसाठी नसतातच मूळी! म्हणजे बाहेर त्याची संघातली जागा निश्चितच नसते. आश्विन तसा समजूतदार खेळाडू आहे. आपल्या चुकांमधून तो शिकत असतो. स्वत:वर तो मोठी मेहनत घेत असतोकदाचित तो बाहेरच्या मैदानासाठी तो स्वत:ला तयार करीत असावा. तो स्वत:मध्ये सुधारणा व्हावी,यासाठी इंग्लिश काउंटी क्रिकेट खेळायलाही गेला होता. हे त्याचे पाऊल चांगलेच म्हणायला हवे.
     विराट कोहलीचा क्रिकेट संघ सध्या जगात एक नंबरचा संघ आहे.त्याला नशिबाने आपला संघ आसपासच खेळत आहेत, हेही लक्षात घेण्यासारखे आहे.त्यामुळे या भारतीय संघाला महान म्हणणे अवघड जाणार आहे. हेच कारण आश्विनच्याबाबतीतही लागू होत आहे. पुढच्या वर्षी या संघाला बाहेरच्या मैदानावर बरेच खेळायचे आहे.तिथे आश्विनची जादू चालली नाही तर भारतीय संघासाठी ते एक वाईट स्वप्न असणार आहे. पण तो यशस्वी झाला तर मात्र भारतीय क्रिकेटसाठी तो एक सुवर्ण काळच म्हणायला हवा. या संघाला आणि आश्विनला महान बनवण्यात पुढील वर्ष फारच महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. क्रिकेटवेड्या लोकांना यासाठी पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागणार आहे.

No comments:

Post a Comment