Saturday, July 14, 2018

सुविचार संग्रह (भाग -2)


1)   विवेकभ्रष्ट तरुण निश्चितपणे दुर्गतीकडे जातो-भर्तृहरी
2)   मनुष्याजवळची नम्रता संपली म्हणजे त्याच्याजवळची माणुसकी संपली असे समजावे-सानेगुरुजी
3)   कोणत्याही विषयावरील उत्तमोत्तम विचार याचे नाव संस्कृती-.चिं. केळकर
4)   सत्यप्राप्तीची पहिली अट धाडस हीच आहे-ओशो
5)   कलेशी प्रामाणिक राहिलं, तर परमात्मा काही कमी पडू देत नाही.-पं.भीमसेन जोशी
6)   दूरदृष्टीचा मनुष्य प्रत्येक प्रसंगास सज्ज असतो.-तिरुवल्लूवरन
7)   नीती म्हणजे शहाणपणाने जगण्याची रीती-प्र.के. अत्रे
8)   गर्विष्ठ माणूस आपली स्तुती स्वत:च गातो, तर विनयशील माणसाची स्तुती दुसर्याला करावी लागते.- आप्पासाहेब पटवर्धन
9)   केलेल्या अपराधांचे प्रायश्चित घेण्यास धैर्य लागते.-प्रा. वसंत कानेटकर
10) चुकांकडे डोळेझाक केली तर सत्य तुमच्याकडे पाठ फिरवेल.-गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर
11) क्रोध म्हणजे दुसर्यांनी केलेल्या चुकीबद्दल स्वत:ला शिक्षा देणे.-सरश्री
12) उघड शत्रूंपेक्षा विविध प्रलोभनांच्या रुपाने वावरणारे छुपे शत्रू जास्त घातक असतात.-भानू काळे
13) अन्यायाने मिळवलेल्या ऐश्वर्यापेक्षा दारिद्ˆय बरे.-कृष्णशास्त्री चिपळूणकर
14) भक्कम देहापेक्षा भक्कम मनाशीच शौर्याचा संबंध अधिक असतो.-पु..देशपांडे
15) एक अडचण दहा उपदेशांपेक्षा अधिक शिकवण देऊ शकते.-चिं.वि. जोशी
16) सोन्याच्या हारापेक्षा घामाच्या धारा अधिक शोभतात.-लोकमान्य टिळक
17) अज्ञान व भोळसरपणामुळे सर्वत्र जुलूमच चालतो असा नेम आहे.- लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख
18) सत्कृत्ये या जगात अमरत्व देणारी अपूर्व रसायने आहेत.-स्वा. सावरकर
19) सरळ झाडे कापली जातात, वेड्यावाकड्या झाडांच्या वाटेला कुणी जात नाही.-आर्य चाणक्य
20) दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात, प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा उपयुक्त आहे.-स्वामी विवेकानंद
21) ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्या लोकांचा उद्धार करणे हे आपले कर्तव्य आहे.-डॉ.बाबासाहेब आंबेडकर
22) कोणाकडूनही कृपेची याचना करणे म्हणजे स्वत:चे स्वातंत्र्य गमावणे आहे.- महात्मा गांधी
23) मोठ्या गोष्टींचे फक्त बेत करण्यापेक्षा एखाद्या छोट्या गोष्टीचा आरंभ करणे अधिक श्रेयस्कर.-स्वामी विवेकानंद
24) तुम्हाला पुढे जाणे जमत नसेल तर जाऊ नका,परंतु पुढे जाणार्याला मागे खेचू नका.-लोकमान्य टिळक
25) सुप्त चैतन्य आणि निद्रिस्त शक्ती जागृत करण्याचे एक साधन म्हणजे शिक्षण होय.-विनोबा भावे
26) चारित्र्यात सूर्याची तेजस्विता आणि अंत:करणात चंद्राची शीतलता हवी.-सदगुरू काका महाराज
27) शिखरापर्यंत पोहचण्यासाठी पायापासून सुरुवात करा.-श्री महावीरस्वामी
28) शौर्य हे मनात असावे लागते, ते नसले तर चिलखत व हत्यारे हे ओझेच ठरतील.-संत तुकाराम
(मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या संग्रहातून)

No comments:

Post a Comment