Friday, January 6, 2012

ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवारी

सांगली/ प्रतिनिधी
जत येथील मराठी साहित्य सेवा मंचच्या वतीने आयोजित १७वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन जत तालुक्यातील येळवी येथे रविवार, दि. ८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनास अध्यक्ष म्हणून अहमदनगर येथील ज्येष्ठ चित्रपट गीतकार व कवी बाबासाहेब सौदागर लाभणार असल्याची माहिती साहित्य संमेलन स्वागताध्यक्ष तथा सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती प्रकाश जमदाडे, मराठी साहित्य सेवा मंच अध्यक्ष माणिक कोडग व लवकुमार मुळे यांनी दिली.
या एकदिवसीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात रविवार दि. ८ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता ग्रंथदिंडीने होणार आहे, तर या साहित्य संमेलनाचे उद्घाटन राज्य सहकारी बँक माजी संचालक विलासराव जगताप यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ‘मराठी साहित्य-दुष्काळ व उपाययोजना’ या विषयावर डॉ. कृष्णा इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात नातेपुते येथील प्रा. सुनीता सूर्यवंशी, मिरज येथील प्रा. राजेंद्र जेऊर व डॉ. श्रीकांत कोकरे यांचा सहभाग असणार आहे. दुपारच्या सत्रात बारामती येथील प्रा. रवींद्र कोकरे व जत येथील अनिल देशपांडे यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम होणार आहे.
गडहिंग्लज येथील कवी विलास माळी यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होत असून, कडेगाव येथील चंद्रकांत देशमुख, पुणे येथील अरुण कटरे, सांगोला येथील दयासागर बन्न्ो, प्रा. आबासाहेब शिंदे, भरत पाटील व सुनील जवंजाळ, नागठाणे येथील लता ऐवळे व रमजान मुल्ला, मंगळवेढा येथील प्रा. दत्ता सरगर, औरंगाबाद येथील डॉ. सूरज चौगुले, प्रा. संतोष काळे, चंद्रकांत बाबर, महादेव सवाईसर्जे व रत्नकुमार गोर्हे आदी नवोदित कवी सहभागी होणार आहेत. सायंकाळी पत्रकार व लेखक प्रा. मच्छिंद्र ऐनापुरे यांचा ‘हसत जगावे’ या विनोदी संग्रहाचे, तर डॉ. सरिता पट्टणशेट्टी यांच्या ‘रंगपंचमी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन, पुरस्कार वितरण व अध्यक्षीय भाषण होणार आहे. या कार्यक्रमास माजी आमदार उमाजी सनमडीकर, जत पंचायत समिती सभापती मन्सूर खतीब, उपसभापती मीनाक्षी अक्की, आर. के. माने, येळवी गावचे सरपंच मारुती जमदाडे, दादासाहेब माने व सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती सुरेश शिंदे आदी उपस्थित राहणार असल्याचेही प्रकाश जमदाडे, माणिक कोडग व लवकुमार मुळे यांनी सांगितले.
ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवारी Bookmark and Share Print E-mail
सांगली/ प्रतिनिधी
जत येथील मराठी साहित्य सेवा मंचच्या वतीने आयोजित १७वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन जत तालुक्यातील येळवी येथे रविवार, दि. ८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनास अध्यक्ष म्हणून अहमदनगर येथील ज्येष्ठ चित्रपट गीतकार व कवी बाबासाहेब सौदागर लाभणार असल्याची माहिती साहित्य संमेलन स्वागताध्यक्ष तथा सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती प्रकाश जमदाडे, मराठी साहित्य सेवा मंच अध्यक्ष माणिक कोडग व लवकुमार मुळे यांनी दिली.
या एकदिवसीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात रविवार दि. ८ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता ग्रंथदिंडीने होणार आहे, तर या साहित्य संमेलनाचे उद्घाटन राज्य सहकारी बँक माजी संचालक विलासराव जगताप यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ‘मराठी साहित्य-दुष्काळ व उपाययोजना’ या विषयावर डॉ. कृष्णा इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात नातेपुते येथील प्रा. सुनीता सूर्यवंशी, मिरज येथील प्रा. राजेंद्र जेऊर व डॉ. श्रीकांत कोकरे यांचा सहभाग असणार आहे. दुपारच्या सत्रात बारामती येथील प्रा. रवींद्र कोकरे व जत येथील अनिल देशपांडे यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम होणार आहे.
गडहिंग्लज येथील कवी विलास माळी यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होत असून, कडेगाव येथील चंद्रकांत देशमुख, पुणे येथील अरुण कटरे, सांगोला येथील दयासागर बन्न्ो, प्रा. आबासाहेब शिंदे, भरत पाटील व सुनील जवंजाळ, नागठाणे येथील लता ऐवळे व रमजान मुल्ला, मंगळवेढा येथील प्रा. दत्ता सरगर, औरंगाबाद येथील डॉ. सूरज चौगुले, प्रा. संतोष काळे, चंद्रकांत बाबर, महादेव सवाईसर्जे व रत्नकुमार गोर्हे आदी नवोदित कवी सहभागी होणार आहेत. सायंकाळी पत्रकार व लेखक प्रा. मच्छिंद्र ऐनापुरे यांचा ‘हसत जगावे’ या विनोदी संग्रहाचे, तर डॉ. सरिता पट्टणशेट्टी यांच्या ‘रंगपंचमी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन, पुरस्कार वितरण व अध्यक्षीय भाषण होणार आहे. या कार्यक्रमास माजी आमदार उमाजी सनमडीकर, जत पंचायत समिती सभापती मन्सूर खतीब, उपसभापती मीनाक्षी अक्की, आर. के. माने, येळवी गावचे सरपंच मारुती जमदाडे, दादासाहेब माने व सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती सुरेश शिंदे आदी उपस्थित राहणार असल्याचेही प्रकाश जमदाडे, माणिक कोडग व लवकुमार मुळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment