Friday, January 27, 2012

वाचनीय माहिती

१) कुबेराचे नाव वैश्रवण होते. त्याला यक्षगणाचा नायक म्हणून साक्षात भगवान शंकरांनीच नियुक्त केलेला आहे. नलकुबेर हा वैश्रवणाचा पुत्र. यानेच रावणाला 'परस्त्रीला स्पर्श करू नकोस' असा शाप दिला होता.२) बिभीषण हा रामायण आणि महाभारत काळातही होता. याचं कारण म्हणजे त्याला मिळालेलं अमरत्वाचं वरदान. सप्तचिरंजीवांमधील इतर सहा असे आहेत- हनुमान, अश्वत्थामा, बली, कृपाचार्य, परशुराम व वेदव्यास ३) महाभारतचे रचनाकार कृष्ण्द्वैपायन व्यास. त्यांच्या चिरंजीत्वामुळे निधन पावलेच नाहीत. ४) रामायण व महाभारत काळात साधारण १५०० वर्षांचे अंतर मानण्यात येते.
५) तिसरा काल संपावयास चौर्‍याऐंशी लक्षपूर्व तीन वर्ष आठ मास पंधरवडा असताना र्‍षषभदेवांचा जन्म झाला. तृतीय कालामध्ये जैन धर्माचा युगारंभ झाला. र्‍हषभदेव हे संस्थापक. यांना आदिनाथ, पुरू ही नावे आहेत. त्यांचे माता-पिता नभिराज, मरुदेवी. विदेह क्षेत्रात नेहमी चतुर्थ काल नांदत असल्यामुळे तीर्थकरांची उत्पत्ती नेहमी चालू असते. त्यामुळे जीवास आपले आत्महित साधण्यास चांगलाच अवसर मिळू शकतो. तशी गोष्ट भरत क्षेत्रात नाही. कारण इथे व ऐरावत क्षेत्रात विशिष्ट काळातच तीर्थकरांचे अस्तित्व उपलब्ध होत असते. तो म्हणजे चतुर्थ काळ. या काळात नियमाने चोवीस तीर्थंकर होतात. त्यांच्या प्रभावामुळे अनेक जीवांचे कल्याण होते. उत्सर्पिणी वावसर्पिणी या दोन्ही युगांच्या चवथ्या काळात तीर्थंकरादी त्रेसष्ट शलाका पुरुषांची उत्पत्ती होते. त्यांच्या आचरणाचा इतर प्राणीमात्रावर प्रभाव पदतो. तेव्हा जैन धर्मात काल नावाचे स्वतंत्र द्रव्य आहे. त्यांचे अस्तित्व अनादी निधन आहे.
६) ह्र्षभ हे पहिले तीर्थंकर हो ऊन गेले .त्यांच्यानंतर महावीर हे चोवीसावे तीर्थंकर आहेत. चोवीस तीर्थंकरांची नावे अशी:   १) षभनाथ २) अजीतजी ३) संभ्भवजी ४) अभिनंदनजी ५) सुमतिनाथ ६) पद्मप्रभू ७) सुपार्श्वनाथ ८) चंद्रप्रभ ९) पुष्पदन्त १०) शीतलनाथ ११) श्रेयांसनाथ १२() वासपुज्य १३) विमलनाथ १४) अनंतनाथ १५) धर्मनाथ १६) शांतीनाथ १७) कुंथुनाथ १८) अरनाथ १९) मल्लीनाथ २०) मुनीसुव्रत २१) नेमिनाथ २२) नेमिनाथ २३) पार्श्वनाथ २४) महावीर. वीर, महावीर, सन्मति, वर्धमान, अतिवीर ही पाच नावे महावीरांना आहेत. पार्श्वनाथानंतर अडीचशे वर्षांनंतर महावीर तीर्थंकर झाले. त्यावेळी जिकडे-तिकडे अराजकता, हिंसाचार माजलेला होता. भारत भूमीवर महावीरांचा जन्म झाला त्यावेळी लोकांनी अहिंसा सम्रात जन्माला आला म्हणून उत्सव केला. त्यांनी शांततेचा उपदेश देऊन अहिंसेचा प्रसार केला. जैन धर्म हा कलियुगातील नाही. जैनामध्ये महापुरान हा ग्रंथ श्रेष्ठ, अलौकिक आहे.
७) हजरत मोहमंद पैगंबर यांच्याअगोदर १,४०,००० ( एक लाख चाळीस हजार) पैगंबर पृथ्वीवर येऊन गेले आणि त्यांनी धर्मकार्य केले. सर्वात अगोदर जे पैगंबर पृथ्वीवर आले, त्यांचे नाव आदम अलैसलाम. पैगंबरचा मराठी अर्थ होतो ईश्वरदूत. संदेशवाहक, प्रेषित , अवतार. मात्र महमंद पैगंबर यांच्या काळात रमजान महिन्यात पवित्र कुरानाचे लेखन केले गेले आणि ते शेवटचे प्रेषित असल्यामुळे भगवान महावीरांप्रमाणे सर्वाच्या लक्षात राहिले.
८)  आशिया खंडात बौद्ध धर्माची पाळेमुळे दोन्-अडीच हजार वर्षांपूर्वी रुजलेली आहेत. पर्यटकांचे आकर्षन ठरलेला 'बुद्धिस्ट सर्किट' म्हणजे जागतिक (युनिस्को) वारशाच्या यादीतील लुम्बिनीपासून सांची कुशीनगरसह अनेक ऐतिहासिक स्थळांची सफर होय.
९) संतांची संपूर्ण नावे: संत एकनाथ सूर्यनारायण कुलकर्णी जन्मस्थळ -पैठण जन्म शके १४५० ते ५५ च्या दरम्यान झाला असावा. संत तुकाराम बोल्होबा मोरे( आंबिले) जन्मस्थळ- देहू जन्म शके- १५३०. संत नामदेव दामाशेटी (आडनाव मिळू शकले नाही) जन्मस्थळ- नरसी बामणी जन्म शके- ११९२ ,संत रामदास- नारायण सूर्याजीपंत ठोसर जन्मस्थळ- जांब जन्मशके-  १५१० , संत ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी जन्मस्थळ- आळंदी जन्मशके- ११९३ संत गाडगेबाबा- डेबुजी झिंगरराजी जानोरकर जन्मस्थळ- शेणगाव जन्मशके- १७९८
१०) अष्टवक्र हा त्यांच्या वडिलांच्या शापामुळे आठ ठिकाणी वाकडा असा जन्मला, पण तो खूप विद्वान होता. तो बारा वर्षांचा असतानाच जनक राजाच्या दरबारातील विद्वानांचया सभेत त्याने सर्वांना जिंकून घेतले. त्याची अष्तावक्रगीता खूप प्रसिद्ध आहे.
११) जन्मपत्रिकेत राहू-केतू याम्ना ग्रह म्हटले असले तरी वास्तवात मात्र ते ग्रह नसून अवकाशातील दोन काल्पनिक बिंदू आहेत. वास्तविकता चंद्राची कक्षा व पृथ्वीची कक्षा यांच्यात ५ अंशाचा कोन आहे. म्हणजेच चंद्राची कक्षा ५ अंशांनी कललेली आहे. त्यामुळे साहजिकच बहुतांश वेळा चंद्र हा पृथ्वीच्या प्रतलात नसतो. परंतु याला दोन बिंदू अपवाद आहेत. चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या प्रतलाला ज्या दोन त्।इकाणी छेदते त्याठिकाणी चंद्र असल्यास चंद्र, पृथ्वी  व सूर्य हे खगोल एक प्रतलीय अवस्थेत येतात. या दोन बिंदूंनाच राहू केतू म्हणतात. येथे कोणताही ग्रह (राहू-केतू) अस्तित्वात नसल्याने त्यांची प्रतिमा नाही. ग्रहणाच्यावेळी चंद्र या दोन बिंदूंपैकी एका बिंदूच्या जवळ असतो. चंद्र पूर्वेकडऊन पश्चिमेकडे जात असताना ज्या बिंदूपासून जातो, तो राहू, तर ज्या बिंदूपासून चंद्र दक्षिणेकदे जाऊ लागतो तो केतू होय.
१२) भगवान विष्णूंचे अवतार मानलेल्या श्रीराम- श्रीकृष्ण यांना सर्वांनी देवरुपामध्ये स्वीकारले.चैत्र शुद्ध नवमीला श्रीराम जन्म आणि श्रावण वद्य अष्टमीला  आपन  श्रीकृष्णजन्म असे मोठ्या उत्साहाने साजरे करीत असतो. श्रीरामाच्या ( वाल्मीकी रामायनापासून सर्वच) चरित्रांमध्ये उल्लेख आहे, की सीतेला भूमातेने आपल्या उदरी सामावून घेतल्यानंतर काही कालाने आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता झाली असे मानून श्रीरामांनी शांतपणे शरयु नदीमध्ये प्रवेश करून आपले अवतारकार्य संपविले. श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये उल्लेख असा आहे की, यादव कुळाला मिळालेल्या शापानुसार यादवी हो ऊन यादववंश नाश पावला. त्यामुळे उद्विग्न हो ऊन श्रीकृष्ण वनामध्ये जाऊन एकटाच एका वृक्षाखाली पायावर पाय टाकून पहुडला. दूरवरून त्याच्या पावलाला हरणासारखे मानून कोणा व्याधाने सोडलेल्याबानाने त्याचे देहावसान झाले.
१३)म्युझियम हा इंग्रजी शब्द जरी लॅटिन शब्दावरून आलेला असला तरी त्याची उत्पत्ती मूळच्या श्लेग्दह या ग्रीक शब्दातून झालेली आहे. Museiem शब्दाचा अर्थ 'म्युझेसना अर्पन केलेले मंदिर' ग्रीक पुराणानुसार देवांचा राजा झूस याच्या नऊ कन्या म्युझेस या नावाने एकत्रितपणे ओळखल्या जातात. त्या विविध कलांच्या देवता आहेत. त्यांच्या कलांचा समावेश असलेले मंदिर म्हणजेच  Museiem . अर्थात आधुनिक काळात म्युझियम. अनेक जानकारांच्या मते, इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकात टॉलेमी सॉटर पहिला या इजिप्तच्या राजाच्या कालात अलेक्झांड्रिया येथे स्थापन्यात आलेले भव्य ग्रंथालय हेच जगातील पहिले म्युझियम. विविध विषयांवरील पन्नास हजारांहून अधिक भूर्जपत्र, चर्मपत्रावरील हस्तलिखिते या ग्रंथालयात संग्रहित करण्यात आली होती. काळाच्या ओघात अनेक कारणांनी हे ज्ञानाचे भंडार उदध्वस्त झाले किंवा नष्ट झाले.

No comments:

Post a Comment