Tuesday, January 31, 2012

यशस्वी होण्याचे नऊ मंत्र

प्रत्येक माणसात प्रतिभेचा राजहंस दडलेला असतो, माणसाने या राजहंसाचा शोध घेतला पाहिजे, तसेच उच्च ध्येय ठेवून कर्तृत्वाने उंच शिखर गाठावे. विकासाच्या दृष्टीने वाटचाल केली पाहिजे. गरिबांनी गरीबच रहावे म्हणून समाजात अनेक गोष्टी पेरल्या आहेत. यात अंथरुण पाहून पाय पसरावेत, साधी राहणी, उच्च विचार अशा गोष्टींचा समावेश आहे, परंतु अंथरूण पाहून पाय पसरायला लागतात, तर उद्या दुसरा कुणी तुमच्या अंथरुणात पाय घालेल. त्यामुळे तुम्ही तुमचे अंथरूण वाढवा. साधी राहणी व उच्च विचार हाही बकवास आहे. कुणी पॉश राहतो म्हणून त्याचे विचार वाईट आहेत, असे मानण्याचे कारण नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही एके ठिकाणी म्हटले आहे की, 'ठेविले अनंते तैसेचि राहावे' या उदासिन वृत्तीचा त्याग करण्यास लोकांना प्रवृत्त केले पाहिजे. कारण आहे त्या स्थितीत समाधानी न होण्याच्या वृत्तीतूनच स्वतः ची व समाजाची उन्नती होत असते.  जीवनात यशस्वी होण्यासाठी नऊ सूत्रांचा अवलंब करावा, यश नक्की तुमच्या दारात आहे, असे समजा. ध्यानात ठेवा आणि अवलंब करा- १) सर्वांत आधी ध्येय निवडा. ते उच्च दर्जाचे हवे. २) ध्येयप्राप्तीसाठी दुर्दम्य इच्छाशक्ती ठेवा. ३) कठोर पर्शिम ४) वेळेचे योग्य नियोजन. ५) शॉर्ट कट कधीच नको. ६) जे जे उदात्त व चांगले असेल त्याचा स्वीकार. ७) आई-वडिलांचे महत्त्व वेळीच ओळखा. ८) सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवा. ९) मानसिकता बदला. - मच्छिंद्र ऐनापुरे,  लोकमत, कोल्हापूर (३०/१/१२)

No comments:

Post a Comment