Friday, January 27, 2012

पुस्तकांचा मोठा बाजार


मुंबईच्या अंजली जोसेफच्या 'सरस्वती पार्क; या कादंबरीला दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. सध्या भारतीय युवा लेखकांचा बोलबोला सुरू आहे.सगळ्याच वयोगटातील वाचकांवर त्यांची पुस्तके जादू करताना दिसत असून ही नवी लेखक मंडळी  रात्रीत स्टार होताना दिसत आहेत. ही सारी किमया त्यांच्या नव्या लेखन स्टाईलची आहे, असे म्हाणायला हवे. जुन्या साचेबद्धतेतून बाहेर पदत या मंडळी आपला असा एक नवा रस्ता शोधला आहे. इंग्रजी भाषेला देशी बाज देत आणि बोल्ड प्रयोगाची वाट चोखांदळत त्यांनी वाचकांना खिळवून ठेवण्याचे तंत्र आत्मसात केले आहे. मोठ्या मोठ्या गप्पा आणि आदर्शाचा बाता न मारता साध्या सोप्या गोष्टी सांगताना दिसतात.
विशेष म्हणजे त्यांना डोक्यावर घेण्यात युवा पिढीचाच वाटा अधिक आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की, या युवा लेखकांच्या प्रती लाखोने विकल्या जात असून त्यांचे इन्कमसुद्धा लाखोच्या घरात गेले आहे. चेतन भगतच्या 'फाइव्ह पॉईंट समवन' या पुस्तकाच्या दहा लाखाहून अधिक प्रती खपल्या आहेत.    आता त्याच्या नव्या तीन पुस्तकांच्या प्रिंट ऑर्डरी पाच लाखांपेक्षा अधिक  आहेत. चेतन भगतप्रमाणेच आयाअयटीचा प्राध्यापक अमिताभ बाग याच्या ' अबॉव एवरेज' यापुस्तकाच्या प्रकाशकाने चारदा रिप्रिंट काढल्या आहेत. 'एचएसबीसी'मध्ये वरच्या पोस्टवर काम करीत असलेल्या बँकर रवी सुब्रमण्यमच्या ' इफ गॉड वाज ए बॅ़कर'पुस्तकाच्या लाखाहून अधिक प्रती संपल्या आहेत. या पुस्तकाच्या माध्यमातून सुब्रमण्यमला चाळीस लाखाचे इन्कम मिळाले आहे. आता तोही दुसर्‍या पस्तकाच्या तयारीला लागला आहे. हॉटेल एग्जीक्युटीव ते लेखक असा प्रवास केलेल्या बनी अद्वैताने 'आलमोस्ट सिंगल' च्या नावाने एखादी रहस्यकथा लिहावी आणि ती हातोहात उचलावी, हे सारे अजब म्हणावे लागेल. हे पुस्तक सध्याच्या घडीला 'हिट बुक्स'मध्ये सामिल झाले आहे. त्याच्या ५० हजाराहून अधिक कॉपीज विकल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर अनुराग माथूरच्या ' इन्स्क्रेबल अमरिकन्स' नोबेलने तर रेकॉर्ड ब्रेकच केले आहे. डझनभराहून अधिक युवा लेखक आपल्या पिढीच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. ही मंडळी त्यांच्या हृद्याच्याच गोष्टी मांडत असल्याने   त्या आपल्याशा वाटतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की, या युवा लेखकांनी सध्याची 'फ्रेम' तोडून त्याला नवा आयाम दिला आहे. भाषेच्या स्तरावर प्रचलित 'सिस्टीम' ला फाटा देऊन  नव्या शैलीचा अविष्कार केला आहे.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की, इंग्रजी फिक्शन लेखनप्रकारात विविध क्षेत्रातील लोक येत आहेत. आपल्या सिस्टीमशी जुडलेल्या अशा कथा  सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की, इंग्रजी फिक्शन लेखनप्रकारात विविध क्षेत्रातील लोक येत आहेत. आपल्या सिस्टीमशी जुडलेल्या अशा कथा  परस्परांशी संबंधीत असल्याकारनाने त्याचा सबंध सामन्यांशीही येतो आहे. याचा आनखी एक फायदा असा झाला आहे की, लिखानात अधिक वास्तवता आणि लेखनक्षेत्र विभिन्नता युक्त बनले आहे. गेल्या दशकभरात बॅ़कर्सपासून आयटी प्रोफेशनल्सपर्यंत सारे या क्षेत्रात आले आहेत. काही वर्षापूर्वी विबिन्न पेशातील माणसे इच्छा असूनही  लेखनापासून स्वतःला व्यक्त करायला पुढे यायला तयार नव्हते. खुद्द इंग्रजी अथवा परकिय प्रकाशक एक नवा पायंडा पाडण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे नव्या जमान्यातील युवा वर्ग लॅपटेपच्या माध्यमातून सातत्याने लेखन करताना दिसत आहे. स्वतःच्या मनातील अस्वस्थता, खदखद या रुपाने व्यक्त करीत आहे. सध्याच्या नेट-ब्लॉगच्या माध्यमातून ते अपसूक जाहीर होत आहे. स्वतःला मांडण्याचा प्रयत्न करणार्‍याचे हे माध्यम दोन्ही बाहू पसरून स्वागत करण्यास उत्सुक आहे.
नवा लेखक वर्ग नवी सोच आणि नवा ट्रेण्ड घेऊन मैदानात उतरला आहे. त्यांच्या लक्षात आलं आहे की, आपला वाचक विशाल असा युवा वर्ग आहे. हा वर्ग आपल्याविषयी, नोकरीविषयी , प्रेम-तक्रार अशा गोष्टी घेऊन  समकालीन पुस्तकांमध्ये स्वतःची प्रतिमा  धुंडाळत आहे.    प्रारंभी चित्रपटांनी हा ट्रेंड पकडला होता. आता प्रकाशकांनी तो आपलासा केला आहे. वास्तविक आयाआयटी ग्रॅज्युएट ते बॅ़कर बनलेल्या चेतन भगतच्या ' 'फाइव पॉईंट समवन' पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वी  प्रकाशकांना रहस्यमय पुस्तकांना देशात बाजार नाही, असेच वातत होते. त्यांना यशाची शक्यता नव्हे खात्रीच नव्हती. पन पुस्तक बाजारत आले आणि सारे काही पालटूनच  गेले. इंग्रजी भाषेतसुद्धा काही काळापूर्वी दोन्-तीन हजार कॉपीज खपल्या म्हणजे उत्कृष्ट सेल म्हटला जात होता. पाच हजाराहून अधिकची संख्या बेस्ट सेलर मानली जायची. पन सध्याच्या पुस्तकांच्या विक्रीने सगळे मापदंदच बदले आहेत.
पुस्तकांच्या जबरदस्त यशामुळं भारत देश पुस्तकांचा मोठा बाजार असल्याचं निदर्शनास आलं आहे. पुस्तकांच्या नव्या क्रांतिचा प्रणेता चेतन भगत असल्याचे म्हटले जाऊ लागले आहे. बाजारात चमकत असलेल्या नव्वद टक्के लेखकांचे आयु २५ ते ३५ च्या दरम्यान आहे. काहींनी कॉर्पोरेट जगतामध्ये नोकरी करत कथा लेखन क्षेत्रात उडी घेतली आहे.

No comments:

Post a Comment