Monday, February 5, 2018

१0 वी १२ वी विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दिवसांत काळजी घ्यावी


ं परीक्षा जवळ आल्या म्हणून मानसिक तणाव वाढवू नये.
ं नेहमीप्रमाणे आपण आपल्या अभ्यास सुरू ठेवावा.
ं परीक्षेपूर्वी पेपर सोडविण्याचा जास्तीत जास्त सराव करावा. सरावामुळे आपला मानसिक तणाव नक्कीच कमी होईल.
ं विनाकारण प्रत्येक विद्यार्थ्याने आपला वेळ वाया घालवू नये.
ं विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दिवसांत सहा तास झोप व योग्य आहार घ्यावा.
ं विद्यार्थ्याने ६ ते ७ तास झोप झाल्यावर उरलेल्या वेळात अभ्यासच करावा.
ंपरीक्षेच्या दिवसांत विद्यार्थ्यांने बाहेर जाण्याचे टाळावे.

ं पेपरला जाण्यापूर्वी नाश्ता किंवा हलकेसे जेवण करुनच बाहेर पडावे व सोबत आपली स्वत:ची पाण्याची बॉटल घेऊन जावी.
ं परीक्षेच्या १0-१२ दिवसांपूर्वी परीक्षेचे वेळापत्रक माहिती करून घ्यावे.
ं परीक्षेच्या वेळा, तारखा व परिक्षा केंद्र याची खात्री करुन घ्यावी.
ं परीक्षा केंद्रावर अर्धा- एक तास पूर्वी पोहोचता येईल, अशा बेताने घरून निघण्याचे नियोजन ठेवावे.
ं शक्य झाल्यास परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना ने-आण करण्याची जबाबदारी नीट पाळावी.
ं १४ प्रत्येक विद्यार्थ्यांनी किमान परीक्षेच्या काळात तरी वाहन चालविणे टाळावे. किंवा पालकांनी वाहन देणे टाळावे.
ं परीक्षा केंद्रावर पोहोचण्यापूर्वी किंवा पोहोचल्यावर मन शांत ठेवावे.
ं पेपर होलमध्ये पेपर हातात येताच घाबरुन न जाता शांत मनाने पेपर सोडवावे.
ं कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा हे १0 ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनी सरावामध्ये पूर्वनियोजन करून घ्यावे.
ं पेपर लिहिताना प्रश्न क्रमांक बरोबर टाकले किंवा नाही ही खात्री करून घ्यावी.
ं पेपर हा ५ ते १0 मिनिटे पूर्वी पूर्ण करून सर्व प्रश्न सोडविले गेले किंवा नाही किंवा प्रश्न क्रमांक बरोबर टाकले गेले किंवा नाही याची खात्री करून द्यावी.
ं परीक्षा केंद्रावर पेपर संपल्यानंतर जास्त वेळ घालवू नये किंवा उन्हात फिरू नये.
ं एकदा पेपर दिल्यानंतर वारंवार त्या पेपर बद्दल विद्यार्थी व पालकांनी चर्चा टाळावी.
ं घरी गेल्यानंतर शांततेने जेवण करून झोप घ्यावी. झोप येत नसल्यास पुढील पेपरचा अभ्यास सुरू करावा.
ं अभ्यास करताना आपल्या मागील पेपर कसा गेला. त्यामध्ये काय सुटलेत त्यात किती मार्क्‍स मिळतात किती कटतात, हा विचार करू नये. यामुळे पुढील पेपरवर परिणाम होणार नाहीत.
ं कोणत्या पेपर कसा गेला, त्याला किती गुण मिळतात याचा आपण विचार करू नये.
ं परीक्षेच्या दिवसांत मन शांत ठेवण्याकरिता किंवा चांगले मन लागण्याकरिता आपले जे श्रद्धास्थान असेल त्याचे ५-१0 मिनिटे ध्यान करावे.


No comments:

Post a Comment