Saturday, February 24, 2018

टेन्शनला बाय-बाय


     मुलांमध्ये अभ्यास करताना लक्ष लागत नाही ही तक्रार मोठ्या प्रमाणात आढळून येत असते; परंतु त्यासाठी अभ्यासाला पूरक वातावरण घरामध्ये असणे गरजेचे आहे. अभ्यास करण्याची जागा सतत बदलती असावी म्हणजे मुलांना कंटाळा येणार नाही. मुलांनी सेल्फ स्टडी करणे आवश्यक असते म्हणजे केलेल्या अभ्यासातले काय लक्षात राहिले हे आपल्याला समजते. मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी किमान 6 ते 8 तासांची झोप आवश्यक असते. त्यामुळे मन ताजेतवाने राहण्यास मदत होते. अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणून चहा, कॉफी पिण्यास हरकत नाही परंतु यामध्ये साखरेचे प्रमाण कमी असावे. कोल्ड ड्रिंक, गोड पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. परीक्षेच्या शेवटच्या क्षणापर्यंत वाचण्याची अनेकांना सवय असते; परंतु बर्‍याचदा वाचून झाले नाही तर त्या अस्वस्थतेमुळे वाचलेले देखील लक्षात राहात नाही. सततच्या अभ्यासामध्ये 2 ते 3 तासांनी 1 तासाचा गॅप ठेवा म्हणजे वाचलेले लक्षात राहते आणि पुढचा करणारा अभ्यासही लक्षात राहण्यास मदत होते. मुलांनी आपल्या मनामध्ये सतत सकारात्मकता ठेवावी. 

     परीक्षेच्या आदल्या दिवशी किमान 7 तास झोप घ्यावी. परीक्षेला जाताना उपाशीपोटी जाऊ नये, लाईट पदार्थ खावेत जेणेकरून पेपर लिहिताना झोप येणार नाही.पालकांनी मुलांच्या अभ्यासानंतर त्याच्याशी चांगल्या विषयांवर गप्पा माराव्यात त्याला परीक्षेचे दडपण आल्यास ते दूर करण्यासाठी त्याला समजून सांगावे. मार्कांचे, ग्रेडचे टेन्शन त्यांच्यावर लादू नये. या गोष्टींचे पालन केल्यास निश्‍चितच परीक्षेच्या टेन्शनला आपल्याला बायबाय करता येईल. परीक्षेच्या काळात मित्रांमध्ये अभ्यासाबाबत चर्चा सुरू असतात. एखादा मुलगा हुशार असेल तर त्याचा अभ्यास लगेचच होऊ शकतो; परंतु इतर मुलांनी त्याचे दडपण घेऊन अभ्यास करणे चुकीचे आहे. केवळ त्याचा अभ्यास झाला म्हणून माझेही तेवढे वाचून झाले पाहिजे, असे म्हणून अभ्यास केल्यास तो अभ्यास लक्षात राहात नाही. त्यामुळे मुलांनी अभ्यासाबाबत कोणत्याही प्रकारची स्पर्धा करू नये.

No comments:

Post a Comment