गांधीजींच्या
हसर्या मुद्रेच्या रुपयावर डॉलर कसा भारी होत चालला आहे,
याची कारणमीमांसा काही मोजकेच अर्थशास्त्रज्ञ करीत आहेत, पण त्याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाहीए. डॉलरच्या
तुलनेत रुपयाची गेल्या तीन वर्षातली रेकॉर्ड ब्रेक घट गेल्या आठवड्याभरात पाहायला मिळाली.
1947 मध्ये रुपाया आणि डॉलरचा प्रवास संगेसंगे चालला होता, हे काही थोड्या लोकांना माहित असेल. पण यानंतर भारत फक्त
आयात करणारा देश ठरला, तेव्हा डॉलर रुपायाच्या तुलनेत वधारत चालला.
रुपयाची किंमत कमी कमी होत चालली. असा प्रवास सुरू
असताना भारताला 1966 आणि 1991 मध्ये मोठे
आर्थिक झटके मिळाले. या काळात रुपयाचे जबरदस्त अवमूल्यन झाले.

थोडासा ढोबळ मानाने
विचार करू. आपला भारत देश 1947 पासून म्हणजे
स्वतंत्र झाल्यापासून
निर्यातीपेक्षा आयात अधिक करत आला आहे. पण गेल्या सात वर्षांपासून
आपल्या देशाच्या आयात निर्यातीचं अंतर दुप्पट झालं आहे. भारतातल्या
काही अर्थतज्ज्ञांनी इशाराही दिला होता, पण त्याकडे दुर्लक्षच
झाले. शिवाय भारतातल्या अर्थमंत्र्यांनी-पी. चिदम्बरम यांनी आपल्याला आश्वस्त केलं होतं की विदेशी गुंतवणूक वाढवत असलेला आणि प्रगती करत असलेला भारत उभारी घे
ईल आणि डॉलरच्या तुलनेत घसरत चाललेला रुपाया सावरेल. पण झालं
असं की, स्वत: विदेशी गुंतवणूकदारच आर्थिक
मंदीमुळे काहीसे खचले आहेत. त्यातच भारतात उघड होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या घटना
, जातीयवादाच्या वाढत असलेल्या घटना यामुळे विदेशी गुंतवणूकदारांनी आपला
पैसा परत घेतला. अशात रेटिंगसुद्धा घटत चालले. शिवाय आयात-निर्यातीतले अंतरही वाढत चालले. याचा परिणाम म्हणजे रुपाया घसरत चालला. असे सगळे घडत
असताना भारताची आर्थिक नीती ठरवणारे मात्र फक्त गोड गोड आश्वासन
देत चालले. अजूनही यावर गंभीर व्हायला कुणी तयार नाही.
टिकाऊ अर्थव्यवस्था बनवायची असेल तर त्याला राजस्व स्त्रोतांचीच गरज
असणार आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेत
दोन मूलभूत गोष्टींचा अभाव आहे. एक म्हणजे वित्तीय घट.
जी सरकार पांढर्या हत्तीसारखी पोसत आहे.
दुसरी- आमच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही
आयातीवर अधिक अवलंबून आहोत. वित्तीय घटही त्रुटीपूर्ण बजेट नीतीचा
परिणाम आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान आणि खाद्य सुरक्षा आदींमुळे वित्तीय घट वाढत चालली आहे,
असा दोष देऊन मोकळे होता येत नाही. खरं वास्तव असं की, आम्ही मोठ्या प्रमाणात श्रीमंतांना करात सवलत दिली आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर सोन्या-हिर्यांवर दिलेल्या सवलतीचं देता ये ईल. 2 जी घोटाळ्यापेक्षाही
अधिक राजस्वीय घट या सवलतीमुळे झाली आहे. शिवाय सरकारी खर्च ही
एक मोठी समस्या आहे. केंद्र सरकारच्या कार्यबलावर दरवर्षी जवळपास
एक लाख करोड खर्च केले जातात. सरकारची प्रतिमा तर अपंग,
भ्रष्ट आणि अकार्यक्षम
अशी बनली आहे.
No comments:
Post a Comment